✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डार्विन च्या माकडांचा नंगानाच

ज
जहीर सय्यद यांनी
गुरुवार, 01/03/2013 - 22:47  ·  लेख
लेख
प्रिय वाचकांनो, वाक्य रचनेच्या व्याकरणाच्या व इतर चुका पदरात पाडून घेणे हि नम्र विनंती.

वैज्ञानिक परिकल्पना आणि मानवतेने चुकवलेली किंमत

डार्विन चा जवळ चा मित्र Professor Adam Sedgwick त्या थोड्या लोकांपैकी होता ज्याने डार्विन च्या सिद्धांताचे भयानक स्वरूप ओळखले होते. The Origin of Species वाचल्या नंतर तो म्हणाला होता "If this book were to find general public acceptance, it would bring with it a brutalisation of the human race such as it had never seen before." A.E. Wilder-Smith, Man's Origin Man's Destiny, The Word for Today Publishing, 1993, p.166 डार्विन ने आपल्या परीकल्पनेत असे सांगितले कि सजीवाची प्रगती हि त्याच्या अस्तित्वाच्या लढाई वर अवलंबून आहे. Fight for survival. आणि या संघर्षात फक्त शक्ती शाली चा विजय होणार आणि कमजोर नष्ट होणार. या अवैज्ञानिक परीकल्पने नुसार निसर्गात अस्तित्वासाठी एक निरंतर असे क्रूर संघर्ष आहे ज्या मध्ये शक्तीशाली नेहमी कमजोर वर काबीज होणार आणि अश्या तर्हेने विकासाची एक पायरी चढली जाते. पुढे जाऊन तो सांगतो कि हाच नियम मनुष्य प्राण्याला देखील लागू पडतो. त्याच्या म्हण्या नुसार तो शक्तिशाली आणि लायक "युरोपिअन गोरा" हा वौंश आहे, आणि या व्यतिरिक्त एशियन आफ्रिकन व इतर हे कमजोर आणि नालायक आहेत कालांतराने हे वंश नष्ट होतील व युरोपिअन वंशाचा विजय होईल. Sidney Fox, Klaus Dose, Molecular Evolution and The Origin of Life, New York: Marcel Dekker, 1977, s. थोडक्यात या रानटी विचारांना युरोपातील वैज्ञानिकांनी मान्यता देवून टाकली आणि त्याला विज्ञानाची जोड देवून त्याला योग्य कायदेशीर नैसर्गिक असे सम्भोदित करण्यात आले. खरे म्हणजे डार्विन ने हे विचार माल्थस कडून घेतले होते हा एक ब्रिटीश इकोनॉमीस्ट होता. ह्याने एक पुस्तक लिहले होते An Essay on the Principle of Population त्याचे असे म्हणणे होते कि जागील लोकसंख्या जेंव्हा वाढते तेंव्हा युद्धे, रोगराई, दुष्काळ ह्या नैसर्गिक आपत्ती त्याला काबूत ठेवतात. त्याच्या या रानटी परीकथेनुसार काही लोकांना जगण्या साठी दुसर्या काही लोकांना मरणे आवश्यक आहे. १९ शतकात युरोमधील उच्च वर्गातील बुद्धीवाद्यांनी ह्या बेगड्या तत्वज्ञानाला मान्यता दिली. Theodore D. Hall चा एक लेख "The Scientific Background of the Nazi "Race Purification" Programme मध्ये मानवतेच्या दुर्दैवाचे सत्य अश्या प्रकारे सांगतो: “In the opening half of the nineteenth century, throughout Europe, members of the ruling classes gathered to discuss the newly discovered "Population problem" and to devise ways of implementing the Malthusian mandate, to increase the mortality rate of the poor: "Instead of recommending cleanliness to the poor, we should encourage contrary habits. In our towns we should make the streets narrower, crowd more people into the houses, and court the return of the plague. In the country we should build our villages near stagnant pools, and particularly encourage settlements in all marshy and unwholesome situations," and so forth and so on.” New Evidence on Evolution of Early Atmosphere and Life, Bulletin of the American Meteorological Society, cilt 74, Kasım 1982, s. 1328-1330 १९ व्या शतकाच्या पूर्व अर्ध्या मध्ये संपूर्ण युरोपातील साशक वर्गातील सदस्य ह्या लोकसंख्या वाढीच्या नवीन प्रश्नाचे समाधान शोधण्या साठी एकत्र जमले आणि काय काय उपाय योजना करता येईल ह्या साठी चिंतन सुरुकेले. जास्तीत जास्त गरीब लोक मेले पाहिजे त्यासाठी काही ठराव केले गेले ते असे होते: गरीब लोकांसाठी रस्ते अरुंद ठेवा, त्यांना छोट्या घरात जास्त लोकांना राहणे/जगणे भाग पाडा, त्यांना अस्वच्छ, घाणेरडे राहण्यची सवय घाला, छोटे छोटे खेडे पाण्याच्या डबक्या जवळ वसावा. प्लेग सारखे रोग पसरेल यासाठी प्रयत्न करा. Thomas R. Malthus, An Essay on the principle of population as it affects the future improvement of society, Reprint, London: Reeves and Turner, (1798) 1878, p. 412. (emphasis added) विज्ञानाच्या नावावर किती खालच्या पातळीला जाऊ शकतात हे तथाकथित बुद्धीवादी. मानवतेच्या दुर्दैवाने हि उपाय योजना इंग्लंड मध्ये अमलात आणली गेली. औद्योगिक संस्था स्थापून गरीब मुलांना कोळश्याच्या खाणीत दिवसातून १६/१६ तास काम करवून घेतले. अतिशय विपरीत भयानक अश्या परीस्थित काम करून हजारो लोक आपल्या जीवास मुकले. माल्थस च्या सिद्धांत "जगण्यासाठी संघर्ष" च्या मागणी नुसार लाखो गरिबांना अत्यंत विपरीत परिस्थितीत जगावे लागले. अश्या या माल्थस च्या कार्याने प्रभावित होऊन डार्विन ने सुद्धा आपले "मोलाचे योगदान" दिले. माल्थस च्या ह्या संघर्ष च्या सिद्धांत ला त्याने संपूर्ण निसर्गावर लागू केले आणि सांगितले कि सशक्त आणि योग्य/लायक फक्त ह्या संघर्षात टिकतात बाकी नष्ट होतात आणि हे एक उचित आणि न टाळता येणारे नैसर्गिक नियम आहे. ह्या अश्या रानटी विचारांच्या प्रचार प्रसाराने २० शतकतिल मानवतेला निर्दयता आणि क्रूरते कडे घेवून गेले. आणि मानवतेला त्याची भारी किंमत चुकवावी लागली. युरोप वर डार्विनवादाने आपली पकड मजबूत केलेली होती. हळू हळू Struggle for survival ह्या भ्रमाचा प्रभाव दिसुलागला आणि विशेषतः सत्तापिपासू साम्राज्यवादी युरोपीय शक्ती त्यांच्या अधिपत्यखालील गुलाम देशांना "Evolutionary backward nations" म्हणून तर्कसंगतते साठी डार्विन कडे बघू लागली.

डार्विन वादाचा भयानक राजकीय प्रभाव म्हणजे पहिल्या महायुद्धाचा भडका...

पहिल्या महायुधासाठी डार्विनवाद कसा कारणीभूत आहे हे समजावून सांगताना इतिहासाचे प्रख्यात प्रोफेसर James Joll असे म्हणतात: “…it is important to realise how literally the doctrine of the struggle for existence and of the survival of the fittest was taken by the majority of the leaders of Europe in the years preceding the First World War. The Austro-Hungarian chief of staff for example, Franz Baron Conrad von Hoetzendorff, wrote in his memoirs after the war: Philanthropic religions, moral teachings and philosophical doctrines may certainly sometimes serve to weaken mankind's struggle for existence in its crudest form, but they will never succeed in removing it as a driving motive of the world… It is in accordance with this great principle that the catastrophe of the world war came about as the result of the motive forces in the lives of states and peoples, like a thunderstorm which must by its nature discharge itself.” Stanley Miller, Molecular Evolution of Life: Current Status of the Prebiotic Synthesis of Small Molecules, 1986, s. 7 हे समजून घेणे महत्वाचे आहे कि कश्या प्रकारे युरोप च्या राजकीय नेत्यांनी डार्विन चे सिधात्न्त Struggle for existence आणि Survival of the fittest ह्यांना शब्दशा घेतले होते. Friedrich von Bernhardi, पहिल्या महायुद्धातील एक जनरल युद्ध आणि युद्धाचे नियम बद्दल असे काही सांगतो "War, is a biological necessity"; it "is as necessary as the struggle of the elements of nature"; it "gives a biologically just decision, since its decisions rest on the very nature of things." Leslie E. Orgel, "The Origin of Life on Earth", Scientific American, cilt 271, Ekim 1994, s. 78 ह्या व इतर अनेक उदाहरण वरून अनुमान काढू शकतो कि पहिल्या महायुध्याच्या भडका होण्यात डार्विन च्या सिद्धांताचा किती मोठा वाट आहे.

दुसरे महायुद्ध:

डार्विन च्या प्रभावा खालील फसिस्ट भक्तांनी युद्धाला एक आवश्यक घटक मानले आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आणि जगातील इतर मानव जातीला अनन्वित छळ आणि मानवी संहाराला कारणीभूत ठरविणारे दुसरे महायुद्धाची मुहूर्त पेढ रोवली. त्यांच्याच युकीवादावरून किंवा कबुली जबाबावरून निघणारा निष्कर्ष ऐकून एक सर्व साधारण मनुष्याला आश्चर्य युक्त दुखद धक्का बसतो कि या सर्व ऐतिहासिक दुर्दैवाला डार्विन चे विचार, युक्तिवाद जबाबदार आहेत. डॉ. जेरी बर्गमन डार्विन वादाच्या प्रभावाचे विश्लेषण करताना असे म्हणतात. “The evidence is very clear that Darwinian ideas had a tremendous impact on German thought and practice… In fact, Darwinian ideas had a tremendous influence on causing World War II, the loss of 40 million lives, and the waste of about 6 trillion dollars. Firmly convinced that evolution was true, Hitler saw himself as the modern savior of mankind… By breeding a superior race, the world would look upon him as the man who pulled humanity up to a higher level of evolution.” http://www.fixedearth.com/hlsm.html तो अगदी स्पष्ट आणि सरळ भाषेत सांगतो कि “जर्मनी च्या विचारात आणि आचारात डार्विनच्या विचारांचा प्रभाव होता आणि एवढेच नव्हे तर दुसरे महायुद्ध घडून येण्या मागे डार्विनवादी विचारांचा प्रत्यक्ष सहभाग होता. ४० लाख लोकांचे जीवन, ६ ट्रीलीयन डॉलर चा चुराडा, डार्विन च्या परीकल्पनेने भारावून हिटलर एक नवीन आर्यवंशा चे निर्माण करून स्वतःला मानवतेचा रक्षक समजत होता कि ज्याने मानवतेला उत्क्रांतीच्या एका उच्च पायरीवर नेहले आहे”. याच्यात वाद नाही कि आधी देखील इतिहासात अनेक युद्धे झाली मानव संहार झाला परंतु डार्विन च्या परीकल्पनेच्या प्रभाव खाली इतिहासात पहिल्यांदा युद्धातला विज्ञानाच्या संमतीने कायदेशीर करण्यात आले. एका लेखाने अमेरिकेत बरेच वादळ उठले होते, त्या मध्ये लेखक मॅक्स नॉरडाउ दुसर्या महायुद्धसाठी किंवा नरसंहारासाठी डार्विन वादी विचार कशे जबाबदार होते ते अगदी स्पष्ट भाषेत सांगतो... “The greatest authority of all the advocates of war is Darwin. Since the theory of evolution has been promulgated, they can cover their natural barbarism with the name of Darwin and proclaim the sanguinary instincts of their inmost hearts as the last word of science”. Max Nordau, The Philosophy and Morals of War, North American Review 169 (1889):794, cited in Hofstadter, Social Darwinism, p. 171.

हिटलर:

हिटलर वर डार्विनवादाचा खोलवर प्रभाव होता. आणि याचे प्रतीबिंब त्याचे पुस्तक माझा लढा या मध्ये अगदी स्पष्टपणे जाणवते. तो काबुल करतो कि तो डार्विन च्या Struggle for survival या युक्तीवादाने कश्या प्रकारे प्रभावित झालेला आहे. तो म्हणत असे कि जगाच्या इतिहासातून उत्तर जर्नामिच्या युरोपियन समाजाला काढून टाकले तर खाली काय शिल्लक राहील ...फक्त माकडांचा नाच. या वाक्यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो कि तो किती पक्का डार्विन भक्त होता. १९३३ मधील न्युरेम्बर्ग पार्टी ऱ्याली मध्ये तो म्हणतो... "Higher race subjects a lower race to itself… a right which we see in nature and which can be regarded as the sole conceivable right…" www.trueorigin.org/holocaust.asp हे वाचून लक्षात येते कि डार्विनच्या विचारांचा तो फक्त समर्थकच नव्हता, तर त्याने केलेल्या जुलूम अत्त्याचार आणि हत्याकांडाला जणू काही ह्या डार्विनच्या तथाकथित वैज्ञानिक विचारांचा आधार घेतला होता.. हिटलर चा आर्य वंश च्या तथाकथित उच्च असण्याच्या मतावर ठाम विश्वास होता. त्याचे मानने होते कि आर्य वंशाला हि देणगी निसर्गाने दिली आहे. आणि हेच नाझी पार्टी चे तत्व होते कि ज्या मुळे जगाने ऐतिहासिक हत्याकांड पहिले. आणि हि गोष्ट एखादा शालेय विद्यार्थी देखील सांगू शकेल कि हि तत्वे डार्विनच्या Natural selection आणि Survival for the fittest चा अर्क आहे म्हणून.

कम्युनिस्ट जग :

डार्विनवादाचे कम्युनिइज्म इतके महत्व होते कि जेंव्हा डार्विन चे पुस्तक पहिल्यांदा छापले गेले, Engels आपला मित्र Marx ला पत्र द्वारे लिहतो... “Darwin, whom I am just now reading, is splendid." Conway Zirkle, Evolution, Marxian Biology and the Social Scene, Philadelphia: The University of Pennsylvania Press, 1959, p . 527. १९ डिसेंबर १८६० मध्ये या पत्राच्या प्रती उत्तरात Marx असे लिहतो... "…This book contains the basis in nature for our view." …ह्या पुस्तकात आपल्या विचारांना निसर्ग देखील पुस्ती जोडतो असे सांगितले आहे (थोडक्यात कम्युनिजम ला डार्विनवादाचा संपूर्ण (वैज्ञानिक) पाठींबा आहे.) J. D. Bernal, Marx & Science, New York, International Publishers, 1952, p. 17. १६ जानेवारी १८६१ मध्ये Marx त्याचा अजून एक सोशालीस्ट मित्र Ferdinand Lassalle ला एका पत्रा द्वारे असे सांगतो कि… “डार्विन चे हे पुस्तक माझ्या साठी खूप महत्वाचे आणि माझ्या विचारांचे समर्थन करणारे आहे कारण हे ऐतिहासिक वर्ग संघर्ष या तत्वज्ञानाला नैसर्गिक विज्ञानाचे समर्थन मिळवून देणारे आहे”. "Darwin's work is most important and suits my purpose in that it provides a basis in natural science for the historical class struggle" http://www.marxists.org/archive/marx/works/1861/letters/61_01_16.htm इतकेच नव्हे तर Marx डार्विन च्या कार्याने इतका प्रभावित झाला होता कि त्याने स्वतःच्या सर्वात उल्लेखनीय प्रसिद्ध पुस्तक Das Kapital डार्विनला समर्पित करताना पुस्तकाच्या जर्मन आवृत्तीवर स्वतःच्या हस्ताक्षरात असे लिहिले होते. "To Charles Darwin, from Karl Marx, a true admirer." Conway Zirkle, Evolution, Marxian Biology, and the Social Scene, Philadelphia: University of Pennsylvania Press, 1959, p. 85-87. Engels देखील डार्विन ची स्तुती करतांना एका ठिकाणी असे म्हणतो… "Nature operates not as metaphysics, but as dialectic. In that regard, the name of Charles Darwin must be remembered above all others." Engels, Utopik Sosyalizm-Bilimsel Sosyalizm (Utopian Socialism-Scientific Socialism), Sol Publishing, 1990, p. 85. आणि एका दुसर्या ठिकाणी Engels डार्विन आणि Marx ची तुलना करताना त्यांच्यातील साधर्म्य अश्या रीतीने अधोरीखीत करतो... "In the same way that Darwin discovered the universal law in organic nature, so Marx discovered the universal law in the history of mankind." 28 Gertrude Himmelfarb, Darwin and the Darwinian Revolution, London: Chatto & Windus, 1959, p. 348. खरे तर डार्विनिज्म आणि कम्युनिज्म ह्यांच्यातील घनिष्ट नाते हे सर्वमान्य आहे. इतकेच काय तर Marx च्या अनेक आत्मचरित्र मध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अश्याच एका आत्म चरित्र मध्ये लेखक डार्विनिज्म आणि कम्युनिज्म यांच्या तील घनिष्ट संबंध अश्या प्रकारे उलघडून दाखवतो... "Darwinism presented a whole string of truths supporting Marxism and proving and developing the truth of it. The spread of Darwinist evolutionary ideas created a fertile ground for Marxist ideas as a whole to be taken on board by the working class… Marx, Engels, and Lenin attached great value to the ideas of Darwin and pointed to their scientific importance, and in this way the spread of these ideas was accelerated." Karl Marx Biography, Ankara: Oncu Publishing, p.368 थोडक्यात डार्विनच्या परिकल्पना मुळे कम्युनिजम विचारांना तथाकथित वैज्ञानिक पाठींबा मिळाला आणि त्यामुळे कम्युनिजम विचारांचा प्रसार जोरात झाला.

माओ, चायना:

माओ, जगातील मोजक्या भयानक मानव संहार पैकी एक, मानवतेला काळिमा फसवणारे कार्य करणारा कट्टर कम्युनिस्ट कि ज्याच्या प्रत्यक्ष आदेशानुसार १० लाख लोक मारून टाकण्यात आले. आणि इतर २० लाख लोक तुरुंगात सडत, किंवा गायब केले गेले, अगदी सरळ आणि स्पष्टपणे सांगतो चीन चा सोशियालीज्म हा डार्विनिजम वर आणि त्याच्या थेरी ऑफ ईवोल्युशन वर उभा केला गेला आहे… "The foundation of Chinese socialism rests upon Darwin and the Theory of Evolution." 30 K. Mehnert, Kampf um Mao's Erbe, (War about Mao's Legacy), Stuttgart: Deutsche Verlags-Anstalt, 1977. एक पक्का Marxist निधर्मी आणि ईवोल्युशनिजम चा सच्चा भक्त होण्याच्या नात्याने त्याने डार्विन चे पुस्तके व त्याला पूरक असे वाचन साहित्य प्रचाराचे आदेश दिले... http://www.fixedearth.com/hlsm.html १९५० च्या दशका मध्ये जेंव्हा कम्युनिस्ट शक्तींनी चीन काबीज केले आणि थेरी ऑफ ईवोल्युशन विचारांचा तत्वांचा पाया बनविला परंतु त्याच्या बर्याच आधी साधारणता १८९८ मध्ये Thomas Huxley's चे पुस्तक Evolution and Ethics छापले गेले होते त्याच काळात चीनी बुद्धिवाद्यांनी डार्विन च्या परीकाल्पनांचा स्वीकार केला होता. Robert Milner, Encyclopedia of Evolution, NY: Facts on File, 1990 p. 81. Latin America: . . . . . . . . . . . . . . . . .150,000 dead Eastern Europe: . . . . . . . . . . . . . .1 million dead Vietnam: . . . . . . . . . . . . . . . . . . . .1 million dead Afghanistan: . . . . . . . . . . . . . . . .1.5 million dead Africa: . . . . . . . . . . . . . . . . . . . . .1.7 million dead Cambodia: . . . . . . . . . . . . . . . . . . .2 million dead North Korea: . . . . . . . . . . . . . . . . .2 million dead USSR: . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .20 million dead China: . . . . . . . . . . . . . . . . . . . . .65 million dead डार्विन ने प्रेरित कम्युनिस्ट राजवटीत एकूण १०० मिलियन पेक्षा जास्त लोकांना प्राणास मुकावे लागले. Andrzej Paczkowski, Cenk Odakan, Engin Sunar, Isil Ozcan, Jean-Louis Panne, Karel Bartosek, Kolektif, Nicolas Werth, Stephane Courtois,Yavuz Topoyan, Komunizmin Kara Kitabi, (The Black Book of Communism), Istanbul: Dogan Publishing,p.17.

युजेनिक्स

युजेनिक्स हा एक सोशल डार्विनिजम चा प्रकार आहे. Sir Francis Galton हा चार्ल्स डार्विन चा चुलत भाऊ होता. त्याने १८८३ मध्ये एउजेनिक्स हि शाखा निर्माण केली. मानव जाती मध्ये हेरफेर करून, बदल घडवून त्यांची अनुवांशिक संरचनेत सुधारण घडवून आणणे ह्यालाच एउजेनिक्स असे म्हणतात. चार्ल्स डार्विन च्या Origin of Species हे पुस्तक वाचून त्याने ह्या विषयाचा पाया रचला. Galton, Francis (1883). Inquiries into Human Faculty and its Development. London: Macmillan. p. 199. "Correspondence between Francis Galton and Charles Darwin". Galton.org. http://galton.org/letters/darwin/correspondence.htm. Retrieved 2011-11-28. सोप्याशब्दात युजेनिक्स म्हणजे मानववंशाची सफाई, स्वच्छता करणे. त्यासाठी वेग वेगळ्या पद्धतीचा अवलंबत करण्यात येतो. जसे सुधृढ पिढी जन्माला येण्यासाठी फक्त सुधृढ, तपासून घेतलेल्या स्त्री पुरुषांच्या संबंधातून नवीन पिढी जन्माला घालणे किंवा जे लोक कमजोर, आजारी, व्यंग असलेले किंवा समाजावर ओझे असलेल्या सर्व स्त्री, पुरुषांची नसबंदी करून टाकणे, किंवा अश्या लोकांना अमानुष पणे मारून टाकणे. अश्या या विज्ञानाशी प्रभावित होवून हिटलर ने जर्मन वंशाची सफाई करण्या हेतू १९३० ते १९४० च्या दरम्यान ४ लाख पेक्षा जास्त लोकांची नसबंदी करून टाकली होती. आणि याही पेक्षा भयंकर म्हणजे जे लोक असाध्य रोगी किंवा संपूर्ण ठार वेडे अश्या लोकांना तर सरळ सरळ निर्दयी पणे मारून टाकण्यात आले होते. "Euthanasia programme" च्या अंतर्गत Action - T4 म्हणून एक प्रकल्प राबविला गेला ज्या मध्ये सप्टेबर १९३९ ते ऑगस्ट १९४१ पर्यंत ७०२७३ आणि पुढे १९४५ पर्यंत असे संपूर्ण मिळून २७५००० निर्दयी पणे मारून टाकण्यात आले. Proctor, Robert N. (1988). Racial Hygiene: Medicine under the Nazis. Library of Congress: Harvard College p.191 Estimated by objective evidence and condemned by the Nuremberg Military Tribunal and subsequently ratified many times, for example, recently by Ryan, Donna & Schuchman, John S. : p.62. परंतु याहि पेक्षा आधी म्हणजे १९ व्या शतकाच्या पूर्व अर्धेत अमेरिकेत देखील सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार युजेनिक्स च्या नावाने १९०७ ते १९६३ दरम्यान ६४,००० लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली होती ज्या मध्ये ६०% स्त्रियांची नसबंदी करण्यात आली. Lombardo, Paul; "Eugenic Sterilization Laws", Eugenics Archive http://www.eugenicsarchive.org/html/eugenics/essay8text.html.

आधुनिक साम्राज्यवाद आणि सामाजिक डार्विनवाद:

डार्विनच्या हि बर्याच आधी म्हणजे १६ व्या शतकात युरोप मध्ये वसाहतवादाला सुरुवात झाली होती. परंतु डार्विन च्या सिद्धांत मुळे वसाहत वादाला एक नवीन शक्ती मिळाली आणि एक नवीन लक्ष्य मिळाले. विशेषता औद्योगिक क्रांती नंतर आर्थिक उद्देशाने युरोपियन देशांना इतर खंडात, इतर देशावर नवीन बाजारपेठ आणि कच्या मालासाठी आक्रमण करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी इतर खंडा मध्ये शोषण चालू ठेवले परंतु या १९ व्या शतकातील या शोषणाची प्रेरणा वेगळी होती. आणि म्हणूनच याला आधुनिक साम्राज्यवाद या नावाने ओळखले जाते. सामाजिक डार्विन वादाचा प्रभाव या नवीन साम्राज्यवादा च्या उगमामध्ये होता. डार्विनवादि करणा पैकी एक कारण वंशाची श्रेष्ठता चा सिद्धांत होता जो कि ह्या आधुनिक साम्राज्यावादासाठी कारणीभूत ठरला. ब्रिटीश, फ्रेंच, जर्मन आणि इतर साम्राज्ये असा विचार करत होती कि सर्व श्रेष्ठ वंश सिद्ध होण्यासाठी नवनवीन जमिनीवर कब्जा करून सर्वाशाक्तीशाली राष्ट्र म्हणून उदयास येणे गरजेचे आहे. Encyclopedia Britannica च्या १९४६ च्या प्रकशन मधे स्पष्टपणे सांगितले आहे की डार्विनवाद त्याचे सिधांत वंशवाद आणि साम्राज्यवादासाठी काश्य प्रकारे जबाबदार आहेत: “This new period of imperialism at the end of the 19th century found its spiritual support in Bismarckism and social Darwinism, in all the theories glorifying power and success, which had swept over Europe... Racial theories seemed to give to this new attitude, which was in opposition to all traditional [i.e. Christian] values of morality, a justification by “science” and “nature,” the belief in which was almost becoming the dominant faith of the period.” Encyclopedia Britannica, 1946 edition, vol. 12, p. 122A जिम नॅप आपल्या एका लेखात म्हणतो: “They were also driven by the mistaken goal of proving their superiority over other races. The Anglo-Saxons and Aryans regarded it was their natural right to assume control over the Africans, Asians and native Australians, whom they regarded as “inferior races,” and to exploit their workforces and natural resources. Thus 19th-century imperialism developed more as a result of Darwinist aims than out of any economic concerns” “ते लोक आपण दुसर्या पेक्षा श्रेष्ठ वंशाचे आहोत हे सिद्ध करण्याच्या (चुकीच्या) धेयाने प्रेरित होते. अंग्लो सॅक्सन आणि आर्य वंशीय यांचा असा समाज होता की अफ्रीकन, एशियन आणि मूळ ऑस्ट्रेलीयन लोकांवर त्यांच्या कार्यशक्ती आणि नैसर्गिक संपत्तीवर देखील आमचा तर नैसर्गिकरित्या अधिकार आहे कि ज्यांना ते कनिष्ट वौंशाचे मानत. आणि अश्या प्रकारे १९ व्या शतकातील साम्राज्यवाद हा आर्थिक कारण पेक्षा डार्विनवादी उद्देश मुळे उगम पावला. Jim Knapp, Imperialism: The Struggle to Be Superior, http://www-personal.umich.edu/~jimknapp/papers/Imperialism.html वरील संदर्भ वाचून आपल्या लक्षात येते कि युरोपियन साम्राज्य विस्तार आणि वसाहतवाद त्यांनी केलेले दमन, अत्याचार, जुलूम. हजारो मानव जाती/जमाती समूळ नष्ट केल्या. लाखो लोकांना गुलाम बनवून जनावरानपेक्षा वाईट दुर्दश करून त्यांना नष्ट केले. एकूण किती मनुष्य त्यांचा ह्या साम्राज्य वादाचे बळी पडले याची गणती करणे शक्य नाही. सध्या तो माझा विषय हि नाही. इथे मी फक्त हे दाखवू इच्छितो कि कश्या प्रकारे डार्विनच्या "वैज्ञानिक" सिद्धांत मुळे मानवजातीला नुकसान झाले.

सामाजिक डार्विनवाद आणि वौंशिक संघर्ष:

जागे अभावी मी इथे वौंशिक वादामुळे मागच्या शतकात किंवा आजही देखील ह्या जगाने काय भोगले आहे आणि भोगत आहे याचे तपशील देवू शकत नाही परंतु एकवाक्यत सांगायचे झाले तर २० व्या शतकात सर्वात मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली असेल तर त्या पैकी वौंशिकवादाचा प्रश्न हा एक आहे. ह्या लेखात मला फक्त वौंशिक वादाला सामाजिक डार्विनवाद कसे जबाबदार होते हेच सांगायचे आहे. डार्विन च्या सिद्धांतामुळे वौंशिक संघर्षाला कसा "वैज्ञानिक" पाठींबा मिळाला आणि डार्विनच्या भक्तांनी, वैज्ञानिकांनी, बुद्धिवाद्यांनी, राजकीय नेत्यांनी पूर्ण पाठींबा देत आप आपले हेतू सध्या करून घेतले. ईश्वराने विभिन्न वंश, काबिले, राष्ट्रे हे सौन्कृतिक देवान घेवानासाठी बनविले आहे. एकमेकांना समजुन घेण्यासाठी/ओळखन्यासाठी बनविले आहे असे कुरान सांगतो (सुरे हुजरात : १३ ) परन्तु सामाजिक डार्विनवादा नुसार मानव एकमेकाला समजुन घेण्यासाठी नव्हे तर एकमेकांशी लढ़न्यासाठी जन्माला आला आहे. आणि त्यानुसार मानवजातीच्या प्रगतिला गति मिळन्या साठी विभिन्न वंशात जमाती मधे संघर्ष होणे गरजेचे आहे. ह्या अतर्कसंगत सिधानतानुसार विविध वंशाच्या संघर्षात जिंकन्यासाठी नवनवीन शोध लावले जातील त्या मुळे सभ्य आणि प्रगत वंश वर येतील अश्या तर्हेने मानवतेची प्रगति होइल. थोडक्यात सांगायचेतर मानवाची प्रगति जर लोकांना मारून किंवा हत्याकांड करून अथवा उत्पीडन आणि दमन करून होते तर हे रानटी, जंगलीपणेचे लक्षन होय. वादविवाद आणि समस्या तर नेहमी होतील परंतु ह्याचे समाधान शांततापूर्ण पद्धतीने काढता येते. आज काल काही डार्विनवादी डार्विनचा बचाव करण्याचा केविलवाणी प्रयत्न करात कि तो वंशवादी नव्हता वगैरे वगैरे परंतु त्याच्या The Descent of Man ह्या पुस्तकतील हे वाक्य सत्य लपवूशकत नाही “When civilised nations come into contact with barbarians the struggle is short, except where a deadly climate gives its aid to the native race... The grade of their civilisation seems to be a most important element in the success of competing nations.” Darwin, The Descent of Man, p. 297 डार्विन नंतर अनेकांनी ह्या वौंशिक संघर्षाच्या परीकाल्पनेला विज्ञान समजून तिचा प्रचार आणि प्रसार केला. डार्विन च्या अश्या अनेक भक्ता पैकी एक कार्ल पीयर्सन. National Life from the Standpoint of Science ह्या पुस्तकात प्रसिद्ध वैज्ञानिक Karl Pearson सांगतो: “There is a struggle of race against race and of nation against nation. In the early days of that struggle it was a blind, unconscious struggle of barbaric tribes. At the present day, in the case of the civilized white man, it has become more and more the conscious, carefully directed attempt of the nation to fit itself to a continuously changing environment. The nation has to foresee how and where the struggle will be carried on... I have asked you to look upon the nation as an organized whole in continual struggle with other nations, whether by force of arms or by force of trade and economic processes. I have asked you to look upon this struggle of either kind as a not wholly bad thing; it is the source of human progress throughout the world's history” Karl Pearson, National Life from the Standpoint of Science, Cambridge: Cambridge University Press, 1900, pp. 11-16, 20-23 किंवा “What I have said about bad stock seems to me to hold for the lower races of man. How many centuries, how many thousand of years, have the Kaffir or the negro held large districts in Africa undisturbed by the white man? Yet their intertribal struggles have not yet produced a civilization in the least comparable with the Aryan. Educate and nurture them as you will, I do not believe that you will succeed in modifying the stock. History shows me one way, and one way only, in which a high state of civilization has been produced, namely, the struggle of race with race, and the survival of the physically and mentally fitter race.” Karl Pearson, National Life from the Standpoint of Science, Cambridge: Cambridge University Press, 1900, pp. 36-37, 43-44. प्रसिद्ध भारतीय Anthropologist ललिता विद्यार्थी सांगतात कि डार्विनच्या या युक्तिवादामुळे वंशवाद कश्या प्रकारे सामाजिक विज्ञानाशी जोडला गेला... "His (Darwin's) theory of the survival of the fittest was warmly welcomed by the social scientists of the day, and they believed mankind had achieved various levels of evolution culminating in the white man's civilization. By the second half of the nineteenth century racism was accepted as fact by the vast majority of Western scientists. " Alexander I. Oparin, Origin of Life, (1936) New York, Dover Publications, 1953 (Reprint), s.196 वरील परिच्छेदावरून आपण अंदाज बांधु शकतो कि डार्विनच्या सिद्धांताला, वौंशिक संघर्षाला नैसर्गिक, वैज्ञानिक, काळाची गरज समजून काळ्या दगडावरची रेघ मानून बुद्धिवाद्यांनी पाठींबा दिला आणि मानवीय इतिहासाला काळिमा फासणारे घटना २० व्या शतकाने बघितल्या.

मनुष्याच्या मानसिकतेवरील परिणाम:

प्रख्यात Geneticist, Evolutionary Biologist, आणि Evolutionary Biology मधील एक नामवंत वैज्ञानिक Theodosius Dobzhansky डार्विन वादामुळे समाजावर काय दुष्परिणाम झाला याची माहिती देताना सांगतात कि… “हा सिद्धांत मानव समाजात अहंकार, भौतिकवाद, भित्रेपणा, फसवणूक / दगाबाजी आणि शोषण ची शिकवण देतो या उलट जगातील सर्व समाज सामुहिक नैतिकतेची शिकवण देत ह्या सर्व "नैसर्गिक" व्यवहार च्या उलट गोष्टींची शिकवण देतात. जसे दया, उदारता, बलिदान ज्या कि कोणत्याही कबिल्या साठी, राष्ट्र साठी किंवा संपूर्ण मानवजाती साठी चांगली गोष्ट आहे.” “Natural selection can favor egotism, hedonism, cowardice instead of bravery, cheating and exploitation, while group ethics in virtually all societies tend to counteract or forbid such "natural" behavior, and to glorify their opposites: kindness, generosity, and even self-sacrifice for the good of others of one's tribe or nation and finally of mankind.” Theodosius Dobzhansky, "Ethics and Values in Biological and Cultural Evolution," in Los Angeles Times, June 16, 1974, p. 6. Ken Ham, author of The Lie: Evolution. draws attention to the irreligiousness to which Darwinism leads: "If you reject God and replace Him with another belief that puts chance, random processes in the place of God, there is no basis for right or wrong. Rules become whatever you want to make them. There are no absolutes–no principles that must be adhered to. People will write their own rules..." जर तुम्ही परमेश्वराचा अस्वीकार करून त्याच्या ऐवजी अश्या गोष्टीन वर आस्था ठेवता कि ती परमेश्वरा च्या जागी तुम्हाला शक्यता, संभावना आणि उद्धेश नसलेली प्रक्रिया यांना बसवते, अश्या वेळेस मग चांगले आणि वाईट ला काही आधार राहत नाही. मग तुम्ही बनवताल तसे कायदे बनतील. तेथे कोणत्याही गोष्टीची निरपेक्षता अथवा नितीतत्व राहणार नाही. लोक त्यांचे नियम स्वतः लिहतील. Ken Ham, The Lie: Evolution, Master Books, 15th ed. April 1997, p. 84.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
48838 वाचन

💬 प्रतिसाद (122)

प्रतिक्रिया

त्या वेळी मला शुद्धलेखन हा

जहीर सय्यद
Sun, 01/06/2013 - 09:08 नवीन
त्या वेळी मला शुद्धलेखन हा शब्द आठवत नव्हता. ह्या गोष्टीचा चांगला फायदा उचलला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

@कुराणाच्या एका ओळीचा हावाला

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/04/2013 - 20:07 नवीन
@कुराणाच्या एका ओळीचा हावाला दिल्या मुळे मंडळी भलत्याच दिशेला जात आहे असे दिसते, >>> अहो आश्चर्यम...! अहो...मंडळी नव्हे,,,तुंम्हीच भलत्या दिशेनी आलात असं समजा हवं तर... @माझ्या नावा (किंवा धर्मा मुळे) कुणाला अलर्ज्यी होत असेल.>>> आंम्हाला अ‍ॅलर्जी होणं सोडा हो...मी म्हणतो,तुंम्ही कशाला (तुमच्याच) धर्म अँटिव्हायरस सारखा हाताशी घेतलात.... धर्माशिवाय दुसरं उदाहरण द्यायचं ना.आंम्ही खुषिनी तेही वाचलं असतं...हे बरं आहे,आपण करायची खाज..आणी दुसर्‍यावर फुकटचा माज........! @किंवा कोणी माझ्या लेखाला फक्त एक नवीन विचार न समजता >>> =)) ह्वॉट ए जोक @"मिपा" वर किंवा अजून "कश्यावर" हल्ला समजत असतील तर >>> होय का? @अश्या संकुचित, आखूड, आजारी विचाराच्या (Hatemongers) लोकांचा मी निषेध करतो.>>> स्वतःची विशेषणं आंम्हाला लाऊ नका...........!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जहीर सय्यद

मस्त.

सस्नेह
Fri, 01/04/2013 - 14:06 नवीन
सय्यदजी आपण आम्हा (निरुद्योगी ?) मिपाकरांना किती बरे कामे लावता ? तुमचा धागा संपूर्ण वाचणे, उलट सुलट प्रतिसाद देणे, माऊसचा स्क्रोल मोडणे, संदर्भ शोधणे, प्रति आणि उप-प्रतिसादांना अ‍ॅडवणे/खोडून काढणे... आणि तुम्ही मात्र गायब होता...
  • Log in or register to post comments

पहिल्या आणि दुसर्या

इष्टुर फाकडा
Fri, 01/04/2013 - 14:33 नवीन
पहिल्या आणि दुसर्या महायुद्द्धांना डार्विन चे विचार कारणीभूत होते. हा अतिशय हास्यास्पद निष्कर्ष आहे. अशा लेखनाला अजेंड्याचा वास येतो. लेख वाचून क्षणभर वाटले कि मी ओर्कुट च्या कम्युनिटी वरचा फोरम वाचतोय का काय :) युध्द पुकारल्या नंतर ते पुकारणारे आक्रमणाच्या समर्थनार्थ कारणांचे गठ्ठे लिहित असतात. या न्यायाने तुम्ही जे डार्विन चे दाखले दिले आहेत त्यात फुटकळ सत्य असेलही पण मुळात युध्द इतक्या बावळट कारणांनी कोणी आधुनिक युगात सुरु करेल हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. हिटलरनेही ज्यूंचा वंश संपवण्याची प्रतिज्ञा केली याचे सांगितले गेलेले कारण हे वंश शुद्धी असले तरीही ज्यूंची आर्थिक समृद्धी आणि वरचष्मा हेच खरे कारण होते.
  • Log in or register to post comments

माझ्या लेखाच्या निष्कर्षावर

जहीर सय्यद
Sun, 01/06/2013 - 09:20 नवीन
माझ्या लेखाच्या निष्कर्षावर हसण्याचा "त्रास" घेण्यापूर्वी एक गोष्ट नीत समजून घ्या, युद्ध पुकार्ण्यारांनी युद्ध झाल्यावर समर्थनासाठी याचा उपयोग केला नाही तर युद्ध सुरु होण्या आधी आपल्या दृष्कृत्यांना कायदेशीर, वैज्ञानिक justification देण्यासाठी कसा उपयोग केला ते दाखविण्याचा प्रयत्न ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

त्रास कसला हो. चालतं एवढं तेवढं :)

इष्टुर फाकडा
Wed, 01/09/2013 - 12:42 नवीन
तुम्ही म्हणालात त्याप्रमाणेच फक्त Justification साठीच डार्विन चा उपयोग केला गेला असंच मलाही म्हणायचंय. चला तुमची सहमती मिळाली विषय संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जहीर सय्यद

आपला डार्विन वर पयल्यापासूनच

मालोजीराव
Fri, 01/04/2013 - 15:42 नवीन
आपला डार्विन वर पयल्यापासूनच विश्वास नाय, मानुस म्हंजी 'एलियन'च :P
  • Log in or register to post comments

औत सोडून बसलोय -

तर्री
Fri, 01/04/2013 - 19:46 नवीन
औत सोडून सावलीला बसलोय - आणि झाडावर माकडांनी उच्छाद मांडलाय. लाल तोंडी माकडे माजली आहेत आणि काळतोंडी माकडे त्यांचा माज सहन करत आहेत. काळ तोंडी माकडे निर्नायकी आहेत आणि लाल तोंडी माकडे शास्राधार / शस्त्राधार घेवून राहिली आहेत. भयंकर उच्छाद ! मी म्हणतो शेती कासावी कशाला ? डार्विन काय शेतकरी होता ?
  • Log in or register to post comments

एक शंका

तिमा
Fri, 01/04/2013 - 20:12 नवीन
ते ओवॅसी पण डार्विनवादी आहेत काहो?
  • Log in or register to post comments

संपादकांनी लक्ष घालावे आणि हे

अप्पा जोगळेकर
Fri, 01/04/2013 - 22:12 नवीन
संपादकांनी लक्ष घालावे आणि हे असले प्रचारकी लेख उडवावेत अशी विनंती आहे.
  • Log in or register to post comments

+१०० , एकमेव उपयोगी प्रतिसाद,

५० फक्त
Sat, 01/05/2013 - 08:14 नवीन
+१०० , एकमेव उपयोगी प्रतिसाद, मिपावर जातीपातीबद्दल लिहिण्याला बंदी आहे तर हे असं एखाद्या धर्माबद्दल उघड उघड किंवा आडुन आडुन लिहायला का परवानगी आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

-१००

हारुन शेख
Sat, 01/05/2013 - 16:53 नवीन
लेखाबद्दल काहीच ममत्व नाही आहे तरी तो वाचून हा लेख धर्मप्रचार करण्यासाठी काही अजेंडा ठेवून लिहिलाय असे वाटले नाही. इतर धर्मांबद्दल काहीच लिहायचंच नाही किंवा इतर धर्मग्रंथातले संदर्भदेखील लिखाणात येता कामा नये इतके संकुचित मिपाचे धोरण नाही / नसावे . लेखामध्ये कुठेही लेखक इस्लामच श्रेष्ठ आहे, लगेच कलमा पढा आणि मुसलमान व्हा असे म्हणत नाहीये. तरी पण अजेंडा , प्रचार असं म्हणून ऊर बडवून घेणाऱ्यांची गंमत वाटली. जहीर सय्यद असे नाव असलेल्या माणसाने दोन लेख काय टाकले लगेच काही लोकांना त्यांची वैचारिक सुंता झाल्यासारखे वाटून "मिपा खतरेमे है " च्या आरोळ्या देणे चालू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हारून,

संजय क्षीरसागर
Sat, 01/05/2013 - 17:26 नवीन
त्यांच्या पहिल्या लेखातले विचार पटल्यावर त्यावरच्या सर्व चर्चेला मी उत्तरं दिली आहेत. या लेखातली मतं पटली नाहीत इतकंच. अजेंडा वगैरे प्रतिसाद मलाही अयोग्य वाटले... पण वरच्या प्रतिसादातलं शेवटचं वाक्य खटकलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

बाकीच्यांचं माहित नाही

इष्टुर फाकडा
Wed, 01/09/2013 - 12:51 नवीन
पण अजेंडा हा शब्द मी धार्मिक अजेंडा या अर्थाने वापरलेला नाही. खरतर मी आधुनिक साम्राज्यवाद आणि सामाजिक डार्विनवाद यापुढे लेख वरवरच वाचला त्यात मला तरी ते कुरानातले संदर्भ दिसले नाहीत. कसाय ना कि त्यांनी लेखात इतका द्राविडी प्राणायाम केलेला आहे निष्कर्षाप्रत पोचण्यासाठी कि त्याला ब्रिगेडी लेखनाची झाक मिळाली आहे. म्हणून 'अजेंडा'. बाकी गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

चला आता मिपा वर एक नवीन विभाग

श्री गावसेना प्रमुख
Sat, 01/05/2013 - 08:45 नवीन
चला आता मिपा वर एक नवीन विभाग स्थापन करुया ,भारतीय हिरवी क्रांती आणी त्यांची समाजपयोगी कार्ये. जहीर साहेब मालेगावी या,तुमचे फटाके फोडुन स्वागत करीतो
  • Log in or register to post comments

जहीर, तुम्ही कोणताही अजेंडा राबवताय असं वाटत नाही

संजय क्षीरसागर
Sat, 01/05/2013 - 13:55 नवीन
कारण तसं असतं तर ही पोस्ट राहिली नसती. तस्मात प्रतिसाद पर्सनली घेऊ नका. युद्ध ही मानवी जीवनातली सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे. सत्तेची अभिलाषा, संपत्तीचा (नैसर्गिक किंवा मानवी) हव्यास, आर्थिक विषमता आणि धर्म ही युद्धाची प्रमुख कारणं आहेत. डार्विनचा सिद्धांत सजीवांच्या टिकून राहण्याचा नैसर्गिक नियम आहे. तो मानवामानवातील जगण्याच्या हक्काला लागू होत नाही. तुम्ही दिलेल्या संदर्भांवरून तो खुद्द डार्विन किंवा हिटलरनं लागू केला असला तरी ते गैर आहे.
  • Log in or register to post comments

ऐकून आनंद झाला

जहीर सय्यद
Sun, 01/06/2013 - 08:38 नवीन
आपला आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@संजय क्षीरसागर-->

अरुण मनोहर
Sat, 01/05/2013 - 14:16 नवीन
डार्विनचा सिद्धांत सजीवांच्या टिकून राहण्याचा नैसर्गिक नियम आहे. तो मानवामानवातील जगण्याच्या हक्काला लागू होत नाही. तुम्ही दिलेल्या संदर्भांवरून तो खुद्द डार्विन किंवा हिटलरनं लागू केला असला तरी ते गैर आहे.
हे कसे व्यवस्थित लिहीले आहे तुम्ही! पटले. पण मूळ लेखकाने काही घोडचुका केल्यात- पहिले- त्याने सगळी उदाहरणे एकांगी (लॉपसाईडेड) दिलीत, ज्यामुळे अजेंडाचा वास आला. दुसरे- त्याने स्वतःच लिहीले आहे ते
जहीर सय्यद - Fri, 04/01/2013 - 16:18 कुराणाच्या एका ओळीचा हावाला दिल्या मुळे मंडळी भलत्याच दिशेला जात आहे असे दिसते, माझ्या नावा (किंवा धर्मा मुळे) कुणाला अलर्ज्यी होत असेल किंवा कोणी माझ्या लेखाला फक्त एक नवीन विचार न समजता "मिपा" वर किंवा अजून "कश्यावर" हल्ला समजत असतील...
लोकांना भलत्याच दिशेला नेण्याचे काम त्याने स्वतःच केले आहे. असे हवाले देऊन आणि एकांगी लिहून! पेराल तसे उगवेल!
  • Log in or register to post comments

अरूणश्री, मी विचाराकडे विचार म्हणूनच पाहतो,

संजय क्षीरसागर
Sat, 01/05/2013 - 16:24 नवीन
त्यामुळे तो कुणाचा आहे यापेक्षा योग्य आहे की अयोग्य इतकाच मुद्दा राहतो. सर्व धर्म एकाच सत्याकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. कोणताही धर्म वंशश्रेष्ठत्वाकडे निर्देश करत नाही. ज्यांना सत्ता मिळवायची किंवा टिकवायची आहे ते धर्माचा उपयोग एकसंध मानवतेच्या विभाजनासाठी करतात. पोस्टमधे व्यक्त केलेली मतं अयोग्य आहेत पण अजेंड्याचा आरोप योग्य वाटला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

बाब्बो..

चिगो
Sat, 01/05/2013 - 17:40 नवीन
लेख पाहून आधीतर थिजलो, पण कोणे एके काळी हा विषय थोडाफार वाचला असल्याने टंकनश्रम.. 1. 'सर्व्हायवल आॅफ द फिटेस्ट' म्हणजे सगळ्यात शक्तिशाली नव्हे तर परीस्थितीशी जुळवून घेण्यात सर्वाधिक यशस्वी जीव टिकेल.. 'महापूरे वृक्ष जाती, तिथे लव्हाळी राहती' हे स.आॅ.द फि.. वाळवंटात कमी अन्न-गरजा असलेले जीव टिकतील, बाकिचे टपकतील.. 2. लोकांनी जर एखाद्याच्या विचारांचा सोयिस्कर तो अर्थ लावून, त्यानुसार आपला एजेंडा राबवला तर त्यात मुळ विचार/थेअरी मांडणार्याची काय चूक? फाऊल केलात राव तुम्ही.. नाय म्हणजे, 'कुराणात स्रीया/इतर धर्मीय ह्यांचा आदर करा, असं लिहीलंय. पण लोक त्याचा चुकीचा अर्थ लावतात.' असं बचावकर्ते म्हणतातच की. पण तरी स्त्रीयांची गळचेपी, इस्लामी दहशतवाद आहेच की.. 3. ते आमच्या डोळ्यांवरची झापडं-बिपडं, डोळे उघडणे/ दिपणे ह्याची चिंता करु नका. ' बाकीच्यांना घंटा काही येत नाही' अश्या विचाराने, स्वतःला असामान्य समजणारे बरेच असतात. दुर्दैवाने त्यांना मिपाकर फार कोलत नाहीत. :-) फक्त प्रवाहाविरुद्ध (तो प्रवाह आहे, हेपण स्वतःच ठरवून) लिहील्याने 'विचारवंतीपणा' सिद्ध होत नाही, तो विचार पटवून देता यायला हवा. 4. खाते बंद करण्याची धमकी देऊ नये, ही विनंती.. एकतर मिपाकरांना (जनरली) शष्प फरक पडत नाही. आणि धमकी खरी केल्यास नुकसान तूमचेच आहे.. बाकी चालु द्या..
  • Log in or register to post comments

हाण्ण

क्लिंटन
Sat, 01/05/2013 - 18:02 नवीन
फक्त प्रवाहाविरुद्ध (तो प्रवाह आहे, हेपण स्वतःच ठरवून) लिहील्याने 'विचारवंतीपणा' सिद्ध होत नाही
काय बोललात चिगोराव. स्वगतः आयुष्यभर एकाच जोडिदाराबरोबर राहणे ही "पुरूषप्रधान" संस्कृतीची देणगी आहे असे विचित्र "विचार" मांडणे, फाशीच्या शिक्षेला विरोध करणे असे प्रकार करूनही आपण फार मोठे मानवतावादी आणि विचारवंत आहोत असे दाखवायचा अनेकांचा प्रयत्न असतो. हा पण त्यातलाच भाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

बरोब्बर..

चिगो
Sat, 01/05/2013 - 18:30 नवीन
फाशीच्या शिक्षेला विरोध करणे असे प्रकार करूनही आपण फार मोठे मानवतावादी आणि विचारवंत आहोत असे दाखवायचा अनेकांचा प्रयत्न असतो. हा पण त्यातलाच भाग.
एक्झॅक्टली.. कसाबला फाशी(?) दिली, त्यानंतर काही लोकांनी 'मानवतावादी' बकवास केली ती एकदम डोक्यात गेली होती.. अरे, काय गांडूपणा आहे? कोणीतरी आमच्यावर बेफाम गोळ्या झाडाव्यात, आणि आम्ही शिक्षापण द्यायची नाही? सेम अशीच चीड मेधा पाटकरबाई ' अफझल गुरुला फाशी देणे म्हणजे भारताच्या निधर्मीपणाला बट्टा ठरेल' असं कोकलल्या तेव्हा आली होती. देशद्रोह्याची जात, धर्म का पहायचा? दिल्ली रेपकेसमधल्या नराधमांना क्रूरकर्मा म्हणून शिक्षा करणार कि त्यांची 'जात प्रमाणपत्र पडताळणी' करणार? बह्याड साले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

प्रातविस्मरणीय

पुण्याचे वटवाघूळ
Sat, 01/05/2013 - 21:09 नवीन
सेम अशीच चीड मेधा पाटकरबाई ' अफझल गुरुला फाशी देणे म्हणजे भारताच्या निधर्मीपणाला बट्टा ठरेल' असं कोकलल्या तेव्हा आली होती.
मेधा पाटकर या बाई 'प्रातविस्मरणीय'* आहेत (प्रातस्मरणीयच्या विरूध्द) तेव्हा त्यांच्या बोलण्याला फारसे सिरियसली घ्यायची गरज नाही. *: शब्दप्रयोगाचे श्रेय थत्तेचाचांचे. त्यांनी अन्य कोणासंदर्भात 'प्रातविस्मरणीय' हा शब्दप्रयोग केला होता.तेव्हा हा शब्द माझे क्रेयेशन नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

तर मग...

विकास
Sun, 01/06/2013 - 10:16 नवीन
शब्दप्रयोगाचे श्रेय थत्तेचाचांचे.
तर मग नितिनरावांशी (नेहमीप्रमाणेच) सहमत! :-) बाकी डार्विनच्या डोल्यात काय होते कोण जाणे, हा लेख मात्र "सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट" या कॅटेगरीत नक्की बसला आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

थत्ते चाचांनी उपकृत केलेली व्यक्ती बहुतेक...

अर्धवटराव
Wed, 01/09/2013 - 23:34 नवीन
स्वदेशी जागरण मंच वाले राजीव दिक्षीत आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

अभ्यासकांचे मत

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 01/05/2013 - 22:21 नवीन
आयुष्यभर एकाच जोडिदाराबरोबर राहणे ही "पुरूषप्रधान" संस्कृतीची देणगी आहे असे विचित्र "विचार" मांडणे ...
समाजशास्त्राच्या अभ्यासकांमधे याबद्दल फार दुमत नाही. साधारण १०० वर्षांपूर्वी वि.का. राजवाडेंनी लिहीलेलं 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' असो वा २०१० मधलं 'कहाणी मानवप्राण्याची'; स्त्रियांनी एकाच पुरुषाबरोबर रहावं, अन्य पुरुषांशी संबंध ठेवू/येऊ नयेत अशा प्रकारची मूल्यव्यवस्था उदयाला येण्याचं कारण हेच समजलं जातं. हे 'कहाणी मानवप्राण्याची' या नंदा (अनंत यशवंत) खरे आणि इतरांच्या पुस्तकाचं २५६ वं पान. हा विशिष्ट लेख छाया दातार यांचा. मनोविकास प्रकाशन. यातल्या 'स्त्रीचे दास्य' या सबसेक्शनकडे, विशेषतः दुसरा कॉलम, लक्ष वेधून घ्यायचं आहे. यातले शब्द वाचता येण्यासारखे वाटत नसतील तर अन्यत्र हा फोटो पूर्ण रिझोल्यूशनमधे टाकते, म्हणजे सगळ्यांना वाचता येईल. Image removed. पेशवाईच्या काळातल्या श्रमजीवी आणि बुद्धीजीवी वर्गातल्या स्त्रीच्या स्थानाबद्दल याच नंदा खरेंनी 'अंताजीची बखर' आणि 'बखर अंतकाळाची' या दोन कादंबर्‍यांमधे टंग-इन-चीक पद्धतीची पण अतिशय मार्मिक टिप्पणी केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

मूळ चर्चेत अवांतर

क्लिंटन
Sat, 01/05/2013 - 22:38 नवीन
फार अवांतर ठरेल म्हणून जास्त लिहित नाही.पण एकाच जोडीदाराबरोबर राहणे हे स्त्री आणि पुरूष या दोघांनाही तितकेच लागू व्हायला हवे.नंतरच्या काळात काही पुरूषांनी (सगळ्या नाही) हे बंधन पाळले नसेल तर ते नि:संशय चुकीचे आहे.पण मुळातली एकाच जोडीदाराबरोबर राहणे ही व्यवस्था ही एक "हेल्दी सोशल प्रॅक्टिस" होती. आता ती व्यवस्था स्त्रियांना दास्यत्वात/बंधनात ठेवायला केली होती असे म्हणणे कितपत योग्य आहे याचा निर्णय प्रत्येकानेच घ्यावा. मला तरी असे म्हणणे हे "माझी मते इतरांपेक्षा वेगळी आहेत" असे ठासवायचा अस्थानी प्रयत्न वाटतो.असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आय अ‍ॅग्री

संजय क्षीरसागर
Sat, 01/05/2013 - 23:50 नवीन
विषयांतर होईल म्हणून इथे लिहित नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

मुळातली एकाच जोडीदाराबरोबर

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 01/06/2013 - 02:57 नवीन
मुळातली एकाच जोडीदाराबरोबर राहणे ही व्यवस्था ही एक "हेल्दी सोशल प्रॅक्टिस" होती.
Not really. अभ्यासकांच्या मते मुळात स्त्री आणि पुरुष एकाच जोडीदाराबरोबर रहात नसत. खासगी मालमत्ता जमा करणे आणि ती पुढे आपल्याच अपत्याला मिळावी याचा प्रयत्न यातून फक्त स्त्रियांवरच मोनोअँड्री लादली गेली, पुरुषांची पॉलिगॅमी तशीच राहिली. (म्हणूनच रामायणात रामाच्या एकपत्नीव्रताचं कौतुक असावं.) ही व्यवस्था स्त्रियांना बंधनात ठेवायला तयार केली होती असं अजिबात नाही तर या व्यवस्थेमुळे या बाबतीत फक्त स्त्रियांवरच बंधनं आली आणि या बाबतीत पुरुष मोकळे राहिले. (असमानता येण्याचं आणखी एक कारण.) ही "माझी इतरांपेक्षा वेगळी मतं" असं नसून हे संशोधक-अभ्यासकांनी काढलेले निष्कर्ष आहेत. (या संदर्भात माझ्या वाचनात आलेली, वर उल्लेखलेली दोन्ही पुस्तकं कुटुंबसंस्था आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा विकास, स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा र्‍हास याची सखोल माहिती देतात. ही माहिती, निष्कर्ष खोडून काढणारं लिखाण कोणी केलेलं असल्यास माहिती नाही; असल्यास वाचायला आवडेल.) या विषयासंदर्भात अभ्यासकांचा आणखी एक निरीक्षण-निष्कर्ष म्हणजे सस्तन प्राण्यांच्या ९७% प्रजाती मोनोगॅमस नाहीत. पक्ष्यांमधे मोनोगॅमी खूप जास्त प्रमाणात आहे. एकाच जोडीदाराबरोबर रहाणे ही गोष्ट योग्य का अयोग्य, हेल्दी का अनहेल्दी हे ज्याचं त्याने/जिचं तिने ठरवावं. लोकांच्या बेडरूममधे डोकवण्याची मुभा व्यक्तिस्वातंत्र्य देत नाही, त्यामुळे मी त्याबद्दल बोलत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य हे फार उच्च मूल्य हे मात्र माझं मत आहे; हे मत इतरांपेक्षा वेगळं असेल किंवा नसेल किंवा कसंही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

आपले म्हणणे एका अर्थी बरोबरच

जहीर सय्यद
Sun, 01/06/2013 - 08:42 नवीन
आपले म्हणणे एका अर्थी बरोबरच आहे, जर तुम्हाला जनावर आणि मनुष्य या मध्ये फरक कळत नसेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरेच अवांतर तरी विषय निघाला आहे म्हणून

क्लिंटन
Mon, 01/07/2013 - 13:20 नवीन
या विषयासंदर्भात अभ्यासकांचा आणखी एक निरीक्षण-निष्कर्ष म्हणजे सस्तन प्राण्यांच्या ९७% प्रजाती मोनोगॅमस नाहीत. पक्ष्यांमधे मोनोगॅमी खूप जास्त प्रमाणात आहे.
बरं मग?माणूस आणि प्राण्यांमध्ये फरक असलेल्या शेकडो गोष्टी आहेत.सगळ्यात मोठा फरक म्हणजे इतर प्राणी नॅचरल इन्स्टिन्क्टसने राहतात तर माणूस त्या चाकोरीबाहेर जाऊन विचार करू शकतो (कदाचित हेच जगातील सगळ्या वाईट गोष्टींचे कारण आहे :( ) प्राण्यांमध्ये अमुक एक गोष्ट असते--ठिक आहे पण म्हणून माणसांनीही तसे करणे हे म्हणणे तद्दन मूर्खपणाचे आहे.डुकरे चिखलात लो़ळतात,बोके मांजरीच्या लहान पिल्लांचे गळे चावून त्यांना मारतात, इतकेच काय तर मांजरीही पिल्ले थोडी मोठी झाल्यावर त्यांच्याजवळ दूध प्यायला आलेल्या स्वतःच्याच पिल्लांवर फिसकारून मारतात इत्यादी इत्यादी.म्हणून माणसाने चिखलात लोळायला लागावे का?की पुरूषांनी नवजात अर्भकांचे गळे घोटावेत का?गाईचे वासरू लहान असताना आईचे दूध पिते पण वासरे जन्माला आल्यापासून तासाभरात स्वतःच्या पायावर (लिटरली) आणि काही महिन्यात स्वतःचे स्वतः चरायला लागल्यावर स्वतःच्या पायावर (स्वतःचे पोट भरणे या अर्थी) राहतात.माणसांमध्ये असे नक्कीच नसते.तेव्हा ९७% सस्तन प्राण्यांमध्ये मोनोगॅमी नसते हे नुसते एक निरिक्षण म्हणून ठिक आहे पण माणूस आणि प्राण्यांमधले असे अनेक फरक लक्षात न घेता जर हे अभ्यासक किंवा इतर लोक माणसातही मोनोगॅमी/मोनोअ‍ॅन्ड्री चा विरोध करत असतील तर अशा अभ्यासकांची किव कराविशी वाटते. दुसरे म्हणजे विविध मराठी संकेतस्थळांवर विविध प्राण्यांच्या नावाने लेखन करत असलेल्या एका मिपाकराने मागे एका प्रतिसादात म्हटले होते की स्वतंत्र बाण्याचे लोक इतर माणसांनीही अमुक एक गोष्ट केली म्हणून त्याचे अनुकरण करायला जात नाहीत.इथे इतर माणसाचे सोडाच प्राण्यांचे अनुकरण करायची गोष्ट होत आहे का?
या संदर्भात माझ्या वाचनात आलेली, वर उल्लेखलेली दोन्ही पुस्तकं कुटुंबसंस्था आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा विकास, स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा र्‍हास याची सखोल माहिती देतात. ही माहिती, निष्कर्ष खोडून काढणारं लिखाण कोणी केलेलं असल्यास माहिती नाही; असल्यास वाचायला आवडेल.
असल्या कोणत्याही विषयावरील मी काहीही वाचन केलेले नाही.तेव्हा मला तरी याविषयी काही सांगता येणार नाही.आणि खरे सांगायचे तर या विषयात काही वाचन करावेसे मला वाटतही नाही.माझे वाचनाचे/अभ्यासाचे विषय वेगळे.मला या विषयांची आवडही नाही आणि माझ्या नशीबाने माझी हिलरीही काही शे वर्षांपूर्वी/ काही दशकांपूर्वी स्त्रियांवर अन्याय झाला म्हणून विनाकारण डोके गरम करून घेत नाही त्यामुळे तिच्याशी बोलायला म्हणून का होईना असे काही वाचायची वेळ आलेली नाही :)
एकाच जोडीदाराबरोबर रहाणे ही गोष्ट योग्य का अयोग्य, हेल्दी का अनहेल्दी हे ज्याचं त्याने/जिचं तिने ठरवावं.
नाही हे ज्याचे त्याने ठरविले तर त्याचे समाजावर वाईट परिणाम नक्कीच होतील.मला माझा जोडीदार आवडेनासा झाला म्हणून मी चाललो/चालले असे म्हटले तर अशा स्वार्थी लोकांच्या मुलांवर मानसिक परिणाम होतील आणि कदाचित त्यांचे जन्मभराचे नुकसान होईल.इतरांच्या आयुष्याचे काहीही वाटोळे झाले तरी चालेल पण माझा हट्ट पूर्ण व्हायलाच हवा हे म्हणणेच मुळात चुकीचे आहे.अशा बेजबाबदार प्रवृत्तीला हेच "विचारवंत" मोठ्या "व्यक्तिस्वातंत्र्याचे" वलय लावतात त्यालाही माझा प्रखर विरोध आहे.प्रत्येक माणूस हा समाजाचा अविभाज्य घटक असतो आणि प्रत्येकाच्या कृतीचे इतरांवर काहीतरी परिणाम होत असतात.आपल्या कोणत्याही कृतीतून इतरांचे नुकसान होत असेल तर तसे करायचा अधिकार कोणालाही नाही/नसावा.आणि अनेकदा व्यक्तिस्वातंत्र्यवाले या गोष्टींचा विचार करत नाहीत किंवा त्यांना या गोष्टींचा विचार करायची गरज भासत नाही.कारण इतर म्हणजे किस झाड की पत्ती-- आमचा हट्ट पुरा व्हायलाच हवा हा खाक्या.आणि ही प्रवृती विनाकारण "प्रवाहाविरूध्द पोहायचे म्हणून" प्रवाहाविरूध्द पोहून "माझे विचार कसे वेगळे" यापेक्षा फार वेगळी वाटत नाही.म्हणूनच चिगोरावांच्या "' बाकीच्यांना घंटा काही येत नाही' अश्या विचाराने, स्वतःला असामान्य समजणारे बरेच असतात" या म्हणण्याला अनुमोदन देताना या गोष्टीचाही समावेश केला. असो. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

'पशुवत बलात्कार' केला अशा

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/07/2013 - 22:14 नवीन
'पशुवत बलात्कार' केला अशा प्रकारची भाषा सर्रास वापरली जाते. समलैंगिकता अनैसर्गिक आहे असं ठ्ठासून सांगताना प्राण्यांमधे समलैंगिकता नाही (अशी तद्दन चूक) माहिती पुढे केली जाते. पण हे थोडं मिळमिळीत स्पष्टीकरण आहे. आपण कोण आहोत, कसे आहोत याचा विचार करताना आपला भोवताल कसा आहे याचा विचार करणं भाग पडतं. अलिकडेच एक व्याख्यान ऐकलं. हे संशोधक 'मानवी वर्तनाची उत्क्रांती' या विषयावर संशोधन करत आहेत. आणि त्यातही विशेषतः लैंगिक जोडीदार शोधण्याची गुणसूत्रं, मेंदूतील रसायनं, मेंदूचे भाग या गोष्टींचा आपसातला संबंध असा त्यांचा विषय आहे. त्यासाठी त्यांनी काही खूपच साधी रचना असणारे जीव (बहुदा protozoa) काही सरपटणारे प्राणी, काही पक्षी आणि काही सस्तन प्राणी यांच्या मेंदूंचा अभ्यास केला. त्यात त्यांना असं दिसून आलं की लैंगिक जोडीदार शोधण्याची जी प्रक्रिया आहे ती गेल्या अनेक लाख वर्षांमधे प्रगत झालेलीच नाही. ती होती तशीच आहे. मानवाच्या या वर्तनाचा अभ्यास करताना या प्रकारची माहिती महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट, उत्क्रांतीचा अभ्यास केला तर असं दिसतं की स्त्री बघितल्यावर पुरुषांच्या ज्या पुरुषसुलभ भावना 'चाळवतात' ते होणं नैसर्गिक आहे. (ज्याप्रमाणे धार्मिक ख्रिश्चन समलैंगिकांना दोषी मानतात आणि त्यांच्या मनात समलैंगिक भावना असण्याबद्दल दोष मानण्यास प्रवृत्त करतात ते जसं अवैज्ञानिक आहे त्याचप्रमाणे) पुरुषांच्या मनात अशा पुरुषसुलभ भावना आल्यास त्यात पुरुषाला दोषी वाटलं पाहिजे हा विचारही अवैज्ञानिक आहे. याचा अर्थ बलात्काराला खुलेआम संमती असा घ्यायचा का? नाही. कारण मानवी संस्कृती आणि मूल्य. जशा पुरुषाच्या पुरुषसुलभ भावना असतात तशा त्या स्त्रियांच्याही असतात. ज्या पुरुषाबरोबर लैंगिक संबंध येतील त्या पुरुषापासून आपल्याला अपत्यप्राप्ती होणार हे समजल्यानंतर स्त्रियांना अपत्यासाठी योग्य पिता शोधून त्याच्याबरोबरच समागम करणं योग्य वाटू लागलं. जो पुरुष आरोग्यवंत असेल, पुरेसं कमावू शकेल आणि गरोदरपणात आपली आणि पुढे आपल्या बाळाची योग्य काळजी घेऊ शकेल अशा पुरुषालाच शारीरिक संबंधांची अनुमती देणं हा तो स्त्रीसुलभ स्वभाव. जो पुरुष स्त्रीच्या इच्छेविरोधात तिच्याशी संबंध ठेवतो तो दंडनीय ठरला, कारण दोघांनाही आपापला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य असण्याचं मूल्य. पुन्हा प्राणीसृष्टीकडे वळलो तर असं दिसतं की प्राण्यांमधल्या मादीने नराला झिडकारलं तर नर तिच्या इच्छेचा मान राखतो. याचं कारण मूल्य वगैरे नसावं (कोणाकडे अधिक माहिती असल्यास द्यावी.) सुदृढ, म्हणजे अर्थातच नरांना हवीशी असणार्‍या, मादीवर कोणताही नर 'बलात्कार' करू शकत नाही. शारीरिक बळात मादी किंचित कमी असेल तरीही, मादीचं शारीरिक बळ स्वतःचं 'शीलरक्षण' करता येऊ नये एवढंही कमी नसतं. थोडक्यात प्राण्यांमधे बलात्कार शक्य नाही. (माणसांमधेही सुदृढ पुरुष-स्त्री असतील तर त्या स्त्रीवर बलात्कार करणं शक्य नसतं. म्हणूनच रेप-ड्रग्ज, फसवणूक, समूहाने बलात्कार असे प्रकार संख्येने फारच जास्त असतात.) आधीच्या प्रतिसादात ते वाक्य (असं आगापिछाविना, तरंगतं) लिहायला नको होतं. --- व्यक्तिस्वातंत्र्य मला इतरांच्या बेडरूममधे डोकावण्याची मुभा देत नाही तसंच, व्यक्तिस्वातंत्र्य मला माझी जबाबदारी टाळू देत नाही. उदाहरणार्थ लग्न किंवा अफेअर आहे म्हणून सगळ्याच जोडप्यांना मुलं होतातच/ हवी असतातच असं नाही. व्यक्तिस्वातंत्र्यामुळे जोडीतल्या एकालाही मुलं नको असतील तर तसं असण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्यामुळे जोडी तुटली तर त्याची जबाबदारी नाकारता येत नाही. मुलं असतील आणि त्यानंतर काही कारणांमुळे जोडी तुटली तरीही मुलं सज्ञान होईपर्यंत त्यांची जबाबदारी नाकारता येत नाही. (घटस्फोटांमधे आपल्याकडे नवरा बायकोला मुलांच्या संगोपनासाठी पैसे देतो यामागे हे एक (एकमेव नव्हे) कारण आहे.) स्वातंत्र्य आहे याचा अर्थ जबाबदारी नाही असा अजिबात होत नाही; व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य अशा प्रकारचं नाही. यासंदर्भात रधोंचं उदाहरण पुन्हा आठवलं. र.धों कर्वेंना स्त्रियांचं समाजातलं दास्य, खालचं स्थान अजिबात मान्य नव्हतं. जसं पुरुषांना समाजात आहे तसंच स्त्रियांनाही लैंगिक स्वातंत्र्य हवं या विचारांनी रधोंनी आयुष्यभर, खस्ता खाऊन संततीनियमनाचा प्रचार केला. त्यांच्या या 'वेडा'मुळे मूल वाढवावं एवढी संपन्नता त्यांच्या घरी कधीच नव्हती. रधोंचे हे विचार पटल्यामुळे, संपूर्णपणे स्वीकारल्यामुळे त्यांच्या पत्नी मालतीबाई यांनीही कधी मूल हवं असा हट्ट केला नाही. (मालतीबाईंना मूल असावं अशी इच्छा आधी होती, असं कुठेसं वाचलेलं आहे.) पुरुषांना तेव्हाही जे लैंगिक स्वातंत्र्य होतं (कारण मूल पुरुषांच्या पोटात वाढत नाही, स्त्रियांना त्याची जबाबदारी "झक मारून" घ्यावीच लागते) ते स्वातंत्र्य रधोंनी स्वतः कधी घेतल्याचं दिसत नाही. याचं कारण जबाबदारीची जाणीव. रधोंनी लग्न केलं होतं आणि लग्नामुळे एकनिष्ठता हे कलम आपोआप येतं, रधोंनी (आणि मालतीबाईंनीही) ही जबाबदारी आयुष्यभर पेलली. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे तुमचं आयुष्य = तुमचे निर्णय एवढाच संकुचित नाही. तुमचं आयुष्य = तुमचे निर्णय = तुमची जबाबदारी हे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. (जबाबदारी कोणाकोणाची यावरून बरेच वाद होऊ शकतात, होतात आणि व्हावेत. उदा: लग्न मोडलं तर आई-वडलांना वाईट वाटतं. त्यांना हार्ट अटॅक येऊ नये याची काळजी घ्यावी का? मुलं सज्ञान असतील तर त्यांची जबाबदारी मानावी का?) व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूल्यामधे जे काही दोष दिसत असतील त्यांच्यावर टीका करायला हरकतच नाही. पण जे लोक व्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ सोयीस्कररित्या लावतात त्यांच्याकडे बोट दाखवत, व्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना समजून न घेता त्याला धोपटू नये ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

तर्क

क्लिंटन
गुरुवार, 01/10/2013 - 12:42 नवीन
अलिकडेच एक व्याख्यान ऐकलं. हे संशोधक 'मानवी वर्तनाची उत्क्रांती' या विषयावर संशोधन करत आहेत. आणि त्यातही विशेषतः लैंगिक जोडीदार शोधण्याची गुणसूत्रं, मेंदूतील रसायनं, मेंदूचे भाग या गोष्टींचा आपसातला संबंध असा त्यांचा विषय आहे. याचा अर्थ बलात्काराला खुलेआम संमती असा घ्यायचा का? नाही..........
वर उध्रुत केलेल्या प्रतिसादातील शेवटच्या वाक्याशी (याचा अर्थ.....) सहमती दर्शविण्याखेरीज माझ्याकडे याविषयी फारसे लिहिण्यासारखे नाही.लैंगिकता या प्रकरात तुला बराच इंटरेस्ट आहे असे तुझे इथले आणि इतर ठिकाणचे प्रतिसाद बघून वरकरणी वाटते.त्याच्या ०.०१% इंटरेस्टही मला या विषयात नाही.त्यामुळे याविषयी फार काही मला लिहिता येणार नाही.तरीही मूळ मुद्दा सुरू झाला की पुरूषांमध्ये पूर्वीच्या काळी बहुपत्नीव्रत हा नॉर्म होता पण एकपतीव्रत स्त्रियांनी राखलेच पाहिजे अशी सक्ती होती यावरून.तसे असेल तर कदाचित त्याकाळी समाजात स्त्रियांची संख्या बरीच जास्त असावी असा उगीच तर्क करावासा वाटला.पूर्वीच्या काळी सर्वसंगपरित्याग करून आध्यात्माच्या ओढीने ब्रम्हचारी राहून हिमालायात जाणाऱ्यांची संख्या कितपत होती याची कल्पना नाही. पण जर बहुपत्नीव्रत हा नॉर्म असेल (म्हणजे किमान २-- कदाचित ३/४ सुध्दा) तर किमान ५०% (किंवा ६६.६६%/७५%) पुरूषांनी ब्रम्हचर्य स्विकारले असले पाहिजे तर किमान २ हा नॉर्म होऊ शकेल.इतक्या मोठ्या प्रमाणावर पुरूष ब्रम्हचारी राहात असतील असे म्हणणे मला तरी जरा धाडसाचे वाटते.मग यातूनच माझा तर्क म्हणजे काही कारणाने पूर्वी स्त्रियांची संख्या जास्त असावी. जर "लग्नाळू" पुरूषांची "लग्नाळू" स्त्रियांच्या संख्येपेक्षा कमी असेल तर त्या कमी असलेल्या पुरूषांकडे अधिक बार्गेनिंग पॉवर आली आणि त्यातूनच लग्न झाल्यावर मुलीनेच मुलाच्या घरी जाणे, वर हुंडा देणे तसेच मुलीपेक्षा मुलाला जन्म देणे याला महत्व इत्यादी पध्दती आल्या असाव्यात हा फुकटचा तर्क. मागे कुठल्यातरी लेखात प्राण्यांमध्येही माद्यांची संख्या नरांपेक्षा जास्त असते असे वाचल्याचे आठवते.कदाचित तसेच माणसांमध्येही असावे. आणि ज्या पध्दतीने स्त्रीगर्भांची हत्या होत आहे त्यावरून काही वर्षांनी तीच बार्गेनिंग पॉवर स्त्रीयांकडे जाईल (त्याची सुरवात झालीही आहे). काळजी नसावी :) याउपर अशा विषयांमध्ये मला अगदी शून्य इंटरेस्ट असल्यामुळे अजून लिहित नाही.माझ्या मते "फॉरवर्ड लुकिंग" दृष्टीकोन असावा म्हणजे पूर्वी झाले ते झाले ते आपण बदलू शकत नाही.पण भूतकाळात मनाने वावरण्यापेक्षा पूर्वी नक्की कोणत्या चुका झाल्या ते अभ्यासून परिस्थितीत आपण बदल करायचा प्रयत्न करणे अधिक योग्य ठरेल.पण अनेकदा स्त्रीमुक्ती वाले आणि वाल्या भूतकाळातच वावरत असतात त्यामुळे अशी मंडळी हिंदुत्ववाद्यांइतकीच डोक्यात जातात. (आणि स्त्रीमुक्तीवाले/वाल्या डोक्यात का जातात याचे दुसरे कारण इथे लिहिले आहे. )
व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे तुमचं आयुष्य = तुमचे निर्णय एवढाच संकुचित नाही. तुमचं आयुष्य = तुमचे निर्णय = तुमची जबाबदारी हे व्यक्तिस्वातंत्र्य आहे.
यापुढे जाऊन मी म्हणेन की जबाबदारी पहिली आणि निर्णय घ्यायचा अधिकार त्यानंतर यायला हवा.
पण जे लोक व्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ सोयीस्कररित्या लावतात त्यांच्याकडे बोट दाखवत, व्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना समजून न घेता त्याला धोपटू नये ही विनंती.
नाही बुवा.मी स्वत: व्यक्तिस्वातंत्र्यवादीच आहे पण रेकलेस व्यक्तिस्वातंत्र्यवादी नाही.अनेकदा स्वत:ला व्यक्तिस्वातंत्र्यवादी म्हणणवणारे थोडेसे रेकलेस असतात हा अनुभव जास्त येतो.म्हणूनच आम्हा (मी सुध्दा) व्यक्तिस्वातंत्र्यवाद्यांना झोडपले जाते.ज्यांच्यामुळे असे विनाकारण झोडपले जाते अशांना तांदळातल्या खड्याप्रमाणे बाजूला ठेवायला हवे असे वाटते. (गेले २-३ दिवस कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे हा प्रतिसाद तसा उशीरा देत आहे.आणि उद्यापासूनही आणखी ३-४ दिवस बाहेरगावी जायचे आहे त्यामुळे प्रतिसाद अधिक उशीर नको म्हणून आताच दिला).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रियांची संख्या बरीच होती

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/10/2013 - 23:13 नवीन
स्त्रियांची संख्या बरीच होती यापेक्षा जेव्हा असा (मोनोअँड्री आणि पॉलिगॅमी) नॉर्म तयार व्हायला लागला त्याच काळात वेश्याव्यवसायाचा उगम झाला. वेश्याचं सामाजिक स्थान कधी खालावलं यातले तपशील मलाही खात्रीलायकरित्या माहित नाहीत. ते सुरूवातीच्या काळात फार खालचं नसेल असं मानलं तरीही लग्न करणार्‍या स्त्रीवर, पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात असणारी अनैसर्गिक* बंधनं त्या काळात होतीच. जिथे स्त्री-पुरुष अपत्यांना एकसमान सामाजिक दर्जा आहे (भारत, चीनमधे पुरुष अपत्य अधिक पसंतीचं असतं.) तिथे पुरुष अपत्यांची नैसर्गिक संख्या किंचित अधिक असते (साधारण ५१-४९ टक्के). स्त्रियांचं आयुष्यमान अधिक आहे, त्यामुळे वयस्कर लोकांमधे स्त्रियांचं प्रमाण बरंच अधिक असतं (६०-४० टक्के असं काहीसं.) त्यातून समाजात असणार्‍या सत्ता, पैसा यांच्या उतरंडीमुळे पावरफुल पुरुषांना एकापेक्षा अधिक स्त्रिया आणि ताकद, पैसा, कर्तृत्त्व कमी असणार्‍यांना एकही नाही असे प्रकार होतच होते. एकप्रकारे हे 'बळी तो कान पिळी' किंवा 'survival of the most selfish and powerful gene' होतं. (याचे अधिक तपशील 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास'मधे आहे. ज्यांना सामाजिक शास्त्रांच्या प्रागैतिहासिक उत्क्रांतीमधे रस आहे त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं. जालावर फुकटात उपलब्ध आहे, आकाराने लहान आहे. पुस्तक 'अडल्ट ओन्ली' आहे.) आपल्यातले कोणीही अशा प्रकारच्या पुरुषांचे वंशज असण्याची शक्यता कमीच आहे; यांना स्त्रिया न मिळाल्यामुळे यांचे वंशज जन्मालाच आले नाहीत. स्त्रीमुक्तीवाले डोक्यात का जातात यामागे अनेकांची अनेक कारणं असतील. कोणाच्या डोक्यात काय जावं हा सार्वजनिक चर्चा करण्यासारखा प्रश्न असतोच असं नाही. चंदा कोचर, इंदिरा गांधी, वगैरे अपवादच आहेत हे मोठ्या प्रमाणात सांख्यिकी विदा जमवला की लगेच दिसतं. (जी गोष्ट डेटातून सिद्ध होते त्याबद्दल फक्त मतं बाळगायचं कारण नाही.) त्यामागे कारणंही बरीच असतात; अनेक मुलींना शिक्षण मिळत नाही, स्वतंत्र निर्णय घेण्याचं, स्वतंत्र विचार करण्याची वाढीच्या वयात संधी मिळत नाही, लग्नाशिवाय समाजात प्रतिष्ठा नाही असं म्हणून लग्नबंधनातून जबाबदार्‍या पडतात (ज्या त्यांच्या नवर्‍यांवर पडतातच असं नाही; उलटपक्षी सगळ्याच अवलियांना सुनंदा अवचट भेटत नाहीत), नोकरीच्या ठिकाणीही (नवरोबा मुलांची जबाबदारी घेत नाहीत म्हणून बायकांना घ्यावी लागते, परिणाम म्हणून अनेकींना) नोकरी देतानाच किंवा पदोन्नतीमधे डावललं जातं, ३५-४० वर्षांच्या करियरमधे स्त्रिया एक-दोन वर्ष गर्भारपणाची सुट्टी घेत असतील, पण अजूनही स्त्रिया आठ-दहा पोरांची बाळंतपणं करत प्रॉडक्टीव्ह वयात पोरांपलिकडे प्रॉडक्टीव्हीटी दाखवत नाहीत या समजाखाली वावरणारे उच्चपदस्थ पुरुष आणि क्षुल्लक प्रमाणात असणार्‍या स्त्रिया ... बरीच कारणं असतात. एक चंदा कोचर उच्चपदस्थ बनतात त्याच वेळेस हजारो मुली शिक्षणाच्या आणि सबलीकरणाच्या प्रोसेसमधून बाहेर फेकल्या जात असतात. आपल्या भोवतालाचा, समाजाचा, त्याच्या प्रगती-उत्क्रांतीचा अभ्यास केला नाही तर या सगळ्या गोष्टी नजरेआडच होतात. "रेकलेस व्यक्तिस्वातंत्र्यवादी" असे कोणी लोकं नसतातच, ते फक्त बेजबाबदारच असतात. फारतर हे लोकं व्यक्तिस्वातंत्र्याचा आसरा घेत असतील. हे अनिरूद्ध आणि आसाराम बापू आपला भंपकपणा लोकांच्या श्रद्धेच्या आड लपवतात तसलाच प्रकार! आणि त्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांना धोपटणं मला मान्यच आहे. *नैसर्गिक आहे म्हणून प्रत्येक गोष्ट योग्यच आहे असा दावा अजिबात नाही. नैसर्गिक भावना असण्याबद्दल किंवा त्या व्यक्त करण्याबद्दल कोणालाही दोषी मानलं जाऊ नये एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

तो मी नव्हेच :)

क्लिंटन
Sat, 01/12/2013 - 22:46 नवीन
याचे अधिक तपशील 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास'मधे आहे. ज्यांना सामाजिक शास्त्रांच्या प्रागैतिहासिक उत्क्रांतीमधे रस आहे त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं.
तो मी नव्हेच :)
नोकरी देतानाच किंवा पदोन्नतीमधे डावललं जातं
माझ्या डोक्यात जाणाऱ्या स्त्रीमुक्तीवाद्यांमध्ये पुरूषही बरेच आहेत. त्याविषयी आणि वर उधृत केलेल्या मुद्द्याविषयी माझ्या क्षेत्रातील एक गोष्ट लिहितो.कॅट परीक्षेचे निकाल लागल्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूचे कॉल देताना आय.आय.एम कॅटमधील स्कोरबरोबरच पदवीचे मार्क,१० वी/१२ वी चे मार्क इत्यादींचा विचार करतात.आय.आय.एम कोझीकोडेचे डायरेक्टर देबाशिष चॅटर्जींच्या सुपिक डोक्यातून मागच्या वर्षी एक कल्पना सुचली.आय.आय.एम कोझीकोडेमध्ये "जेंडर रेशो" जपायच्या गोंडस नावाखाली मुलगी असणे हा पण एक घटक विचारात घेतला गेला.त्यातूनच कोझीकोडेमध्ये २०१२-१४ च्या बॅचमध्ये जवळपास अर्ध्या मुली आल्या.स्वत:च्या कामगिरीवर अर्ध्या काय अगदी सगळ्या मुली आल्या तरी काही तक्रार करायची गरज नाही.पण मुलगी असणे ही "कामगिरी" समजली जात असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे.म्हणजे ९९ पर्सेंटाईल वाल्या काही मुलांना प्रवेश मिळणार नाही आणि ९७-९८ पर्सेंटाईलवाल्या मुलींना प्रवेश मिळणार! माझ्या सुदैवाने मला या गोष्टीचा त्रास झाला नाही आणि कोझीकोडेपेक्षा अधिक चांगल्या आय.आय.एम मध्ये मला प्रवेश मिळाला.पण २०१२-१४ च्या बॅचमध्ये या कारणावर पात्रता असूनही डावलले गेलेले काही विद्यार्थी असतीलच. आता २०१४ मध्ये ही बॅच बाहेर पडेल तेव्हा नोकरी देताना कॅटचा स्कोर हा पण एक महत्वाचा घटक असल्यामुळे जर चांगल्या कंपन्यांनी या मुलींना नोकऱ्या दिल्या नाहीत तर परत हेच लोक "चांगल्या कंपन्या मुलींना निवडत नाहीत" अशी उलटी बोंब मारायला मोकळे!!मग नोकरी देताना मुलींना डावलले जाते ही सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी समोरच दिसणार!! इतर ठिकाणचे माहित नाही पण निदान देशातल्या आघाडीच्या बी-स्कूलमध्ये मुलींना नोकरी देताना कसलाही भेदभाव होत नाही किंबहुना झुकते मापच दिले जाते.पण काही मुली या केवळ मुली आहेत म्हणून तिथे जाऊ शकल्या असतील तर त्या मागे पडायची शक्यता बरीच जास्त आहे हे मान्य करायलाच हवे.आणि तरीही मी मगच्या प्रतिसादात उल्लेख केलेल्या २० वर्षे वयाच्या मुलीप्रमाणे पार्श्वभूमी असलेल्या मुलीने (श्रीमंत कुटुंब,शिकलेले पालक, एकुलती एक आणि जरी तिला भाऊ असता तरी तिच्यावर मुलगी म्हणून कुठलाही अन्याय व्हायची सुतराम शक्यता नसती अशा प्रकारचे पुरोगामी कुटुंब) नोकरीच्या ठिकाणी मुलींवर अन्याय होतोच हे तिथे जायच्या आधीच म्हणायला सुरवात करून नकारात्मक दृष्टीकोन बाळगणे हा प्रकार मला तरी अत्यंत दुर्दैवी वाटला. मला एक प्रश्न नेहमी पडतो.कोणताही अपघात झाला की मृतांमध्ये/जखमींमध्ये अमुक इतक्या महिला आहेत किंवा १० वी/१२ वीच्या निकालांनंतर मुलींचे पास व्हायचे प्रमाण मुलांच्या पास होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे असे वेगळे का सांगितले जाते?जर स्त्री-पुरूष असा कोणताच भेद करायचा नसेल तर मग असे मुलींचे प्रमाण वेगळे का सांगितले जाते?आणि मग असे वेगळे सांगायचेच असेल तर १०/१२ वी प्रमाणे कॅट किंवा आय.आय.टी जे.ई.ई परीक्षांविषयी का लिहिले जात नाही? That's it.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अशा प्रकारची कोणतीही आरक्षणं

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/17/2013 - 11:39 नवीन
अशा प्रकारची कोणतीही आरक्षणं नसणार्‍या क्षेत्रात आणि देशात जी स्थिती आहे त्याबद्दल एक लेखः http://www.guardian.co.uk/lifeandstyle/2013/jan/14/sexual-discrimination-science समानतेच्या बाबतीत आपण युकेच्या बरेच (निदान काही दशकं) मागे आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

१ . 'सर्व्हायवल आॅफ द फिटेस्ट

जहीर सय्यद
Sun, 01/06/2013 - 09:01 नवीन
१ . 'सर्व्हायवल आॅफ द फिटेस्ट' म्हणजे सगळ्यात शक्तिशाली अस मला म्हणायचाच नाही लेख पुन्हा एकदा निट वाचा. (शक्ती शाली लोकांनी आपणच ते "फिट" आहोत असे दाखवून आपल्या क्रूर अत्याचार ला वैज्ञानिक PriText मिळविण्याचा कसा प्रयत्न केला... हे मी दाखवू इच्छीतो) २. याला मी ईस्लामी न समजता मुल्लावी दहशतवाद मानतो. त्याचा निषेध आणि खंडन करतो. ३. मिर्ची लागल्या मुळे मनुष्य प्राणी अशी प्रतिक्रिया देतो कधी कधी (वाईट वाटून घ्याच नसत, असे मी अनुभवाने शिकलोय [चीन्गो माझा चांगला मित्र आहे :) ]) ४. याची मानसिक तयारी ठेवूनच लेख प्रकाशित केलाय... ५. आपली "आज्ञा /परवानगी" असेल तर चालू ठेवतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

ओक्के..

चिगो
Sun, 01/06/2013 - 14:38 नवीन
तुमच्या मुद्दा क्र.1 बद्दल पुन्हा तेच म्हणतोय की त्यात डार्विनचा काय दोष? वंशवादी लोकपण आपल्या शरीररचनेवर (त्वचेचा रंग, नाकाचा आकार, केसांचा रंग, डोळे इ.) वातावरणाचा प्रभाव लक्षात न घेता 'सुपिरीयर रेस'चे फंडे मारतातच की.. बाकी मला कसलीही मिर्ची झोंबलेली नाही, फक्त स्वघोषित विचारवंती गुर्मी आवडत नाही एवढंच.. आणि मला चांगला मित्र म्हणताय त्यासाठी धन्यवाद, आणि माझं सदस्यनाम 'चिगो' आहे, 'चीन्गो' नाही हेही सांगू इच्छितो.. आता परवानगी मागताच आहात तर, चालु द्या..;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जहीर सय्यद

ती डार्विनची माकड राहुदेत

माझीही शॅम्पेन
Sun, 01/06/2013 - 09:10 नवीन
ती डार्विनची माकड राहुदेत सायडिंगला पण इथे.............अंमळ करमणूक झाली त्यात लेखाला जाती-पाती , पुरूष प्रधान , दिल्ली गँग रेप , कसाब फाशी फोडणी मिळाल्यावर तर धाग्याची मस्त रेव पार्टी होणार अस दिसताय :)
  • Log in or register to post comments

हे वाचून झकिर नाईकांची आठवण झाली

राजघराणं
Sun, 01/06/2013 - 15:06 नवीन
हा लेख एका विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी लिहिलेला आहे असे वाटते. माकड नाही ......अल्ला निर्मित आदम पासून मानव जात निर्माण झाली ? तसे असेल तर लेखकाने स्पष्ट लिहावे..... उगी हिटलरच्या आडोशाला लपू नये. माकड की आदम ? यावर स्प्ष्ट मत मांडले तर प्रतिक्रिया देणे सोपे होईल.
  • Log in or register to post comments

@उगी हिटलरच्या आडोशाला लपू

अत्रुप्त आत्मा
Mon, 01/07/2013 - 21:20 नवीन
@
उगी हिटलरच्या आडोशाला लपू नये. माकड की आदम ? यावर स्प्ष्ट मत मांडले तर प्रतिक्रिया देणे सोपे होईल.
>>> सहमत....! जहिर सय्यद यांच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

जाहीर सय्यद साहेब निव्वळ

पिंपातला उंदीर
Mon, 01/07/2013 - 21:31 नवीन
जाहीर सय्यद साहेब निव्वळ मुस्लिम आहेत म्हणून पातळी सोडून त्यांच्या एकूण च देशप्रेमाबाद्दल संशय घेणारे लोक हे ओवैसी ची च दुसरी बाजू आहेत. त्यानी मांडलेल्या मताना विरोध समजू शकतो मात्र सर्वच मुस्लिम हे देशद्रोही आणि मद्रशात जाणारे असतात हे सरसकटीकरण जाम नाही आवडले. काही दिवासापूर्वी मी काढलेल्या इंटरनेट हिंदू या धाग्याची आठवण zआलि.
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/07/2013 - 22:17 नवीन
मद्रशात जाणारे
आणि आधुनिक जीवनशैली आणि मूल्य नाकारणारे अशी एक भर घालावीशी वाटते. केवळ सदस्यनाम मुस्लिम दिसतं म्हणून "तुम्ही देशद्रोही नाही हे पटवून द्या" अशा अर्थाचे प्रतिसाद येतात याचा खेद झाला. हारून शेख यांचे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

+२

अर्धवटराव
Mon, 01/07/2013 - 23:16 नवीन
>>केवळ सदस्यनाम मुस्लिम दिसतं म्हणून "तुम्ही देशद्रोही नाही हे पटवून द्या" अशा अर्थाचे प्रतिसाद येतात -- आणि आपण जन्मजात देशभक्तीचं प्रमाणपत्र घेऊन आलोय असा आविर्भाव आणातात तो ही डोक्यात जातो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्धवटराव, कालच 'ल मिझेराब्ल'

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/07/2013 - 23:33 नवीन
अर्धवटराव, कालच 'ल मिझेराब्ल' नावाची संगीतिका सिनेमारूपात पाहिली. जवळपास प्रत्येक पात्राच्या तोंडात येणारा देवाचा उल्लेख सुरूवातीला तापदायक वाटला. पण "आपणच काय ते धर्माने वागतोय असं प्रत्येकाला वाटतं आणि एवढं प्रचंड दारिद्र्य बहुतेक लोक अनुभवत असतात तेव्हा देवाचे उल्लेख आश्चर्यकारक वाटत नाहीत", असं एका मैत्रिणींचं मत पडलं. मला ते पटलं. आता इथे आर्थिक दारिद्र्याच्या जागी भारतीय घटनेच्या आदरासंदर्भातलं दारिद्र्य आणि देवाच्या जागी देशभक्ती आणायची. मग पुन्हा तेच सगळं तसंच दिसतं. १९ व्या शतकातला, राजकीय क्रांती घडवणारा फ्रान्स आज आपल्यासाठी महत्त्वाचा का असू शकतो ते असंही बघता येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

खरय

अर्धवटराव
Tue, 01/08/2013 - 00:56 नवीन
>>आता इथे आर्थिक दारिद्र्याच्या जागी भारतीय घटनेच्या आदरासंदर्भातलं दारिद्र्य... -- हे दारिद्र्य इतकं पराकोटीचं आहे कि मुळात देश म्हणजे काय अणि तो कशाशी खातात याचा विचार केला तर हाती नैरश्याशिवाय काहि पडत नाहि. व्यवस्थे अंतर्गत असलेल्या सुवीधांकडे डोळसपणे बघायचं नाहि, मग ते वापरणं तर दूरच. अशी न वापरता गंजून पडलेली व्यवस्था काय कप्पाळ समस्या सोडवणार... मग आपले अपयश दुसर्‍यांच्या माथी मारुन त्यांना देशभक्ती वगैरे सिद्ध करायला लावण्याचा कोडगेपणा दाखवला कि आपण विडी-ताडी प्यायला मोकळे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>केवळ सदस्यनाम मुस्लिम दिसतं

बॅटमॅन
Tue, 01/08/2013 - 00:35 नवीन
>केवळ सदस्यनाम मुस्लिम दिसतं म्हणून "तुम्ही देशद्रोही नाही हे पटवून द्या" अशा अर्थाचे प्रतिसाद येतात आणि आपण जन्मजात देशभक्तीचं प्रमाणपत्र घेऊन आलोय असा आविर्भाव आणातात तो ही डोक्यात जातो. पूर्ण सहमत. विचारांना शिव्या घाला, काय पाहिजे ती ** करा, पण असले जनरलायझेशन नका करू. याप्रमाणेच असे अनेक आरोप सांगता येतील. मराठी आहात तर शिवसेना-मनसेला शिव्या घालून दाखवा, उच्चजातीय आहात तर जातीव्यवस्थेला/हिंदू धर्माला शिव्या घाला, तमिऴ आहात तर लिट्टेला आणि साऊथ फिल्म इंडष्ट्रीला शिव्या घाला, वगैरे वगैरे अनेक छुपे आग्रह वेळोवेळी दिसतात. असे सुचवणार्‍यांचा जो सेन्स ऑफ एन्टायटल्मेंट आहे तो अतिशय डोक्यात जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

शाब्बास !

परिकथेतील राजकुमार
Wed, 01/09/2013 - 11:36 नवीन
केवळ सदस्यनाम मुस्लिम दिसतं म्हणून "तुम्ही देशद्रोही नाही हे पटवून द्या" अशा अर्थाचे प्रतिसाद येतात -- आणि आपण जन्मजात देशभक्तीचं प्रमाणपत्र घेऊन आलोय असा आविर्भाव आणातात तो ही डोक्यात जातो.
ह्या अशाच विचारांनी आजवर देशाला पाचर मारुन ठेवली आहे आणि पुढेही मारली जाणारच आहे. आपण बहुसंख्य असूनही कसे 'न्यूट्रल विचार' वैग्रे करणारे आहोत, 'स्वत:च्या धर्माची खिल्ली उडवत उडवत आपण इतर धर्माचा मात्र कसा आदर करतो' हे दाखवण्याची आणि उगाच स्वतःच स्वतःला महान वैग्रे मानण्याची/ दाखवण्याची सध्या फॅशन आली आहे. असो... आता ह्याच्यावरती 'आधी आपल्या घरातील घाण साफ केले पाहिजे' अशा टैपातले वांझोटे प्रतिसाद येतीलच म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

नाहि रे परा

अर्धवटराव
Fri, 01/11/2013 - 02:11 नवीन
>>ह्या अशाच विचारांनी आजवर देशाला पाचर मारुन ठेवली आहे आणि पुढेही मारली जाणारच आहे. -- देशाची पाचार मारुन ठेवल्याची कारणे फार वेगळी आहेत रे परा. राजपुतांना कुठलाही "सेक्युलर न्युट्रल विचार" नव्हता तरिही अक्खी मोगलाई त्यांनी रक्ताचं शिंपण देऊन सांभाळली... अगदी शिवाजीला देखील शरण आणलं. एक समर्थ सोडुन इतर कुणाला शक्ती आणि शिवाजीचं महात्म्य समजलं नाहि. विवेकानंद, सावरकर असे मोजके अपवाद सोडले तर सामाजीक एकोप्याची राष्ट्रनिर्मीतीला अत्यावष्यक अशी जाणिव कुणी दाखवली नाहि... असो. देशाला पाचर मारण्याची (मुख्य) कारणे फार वेगळी आहेत. स्वतः अजागळासारखं राहायचं आणि दुसर्‍याने ताटातलं ओढुन नेलं तर बोंबा मारायच्या या पलिकडे विचार करण्याची वृत्ती दिसेल तो सुदीन (आणि तो फार लांब आहे अजुन) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे असे उदात्त विचार व्यक्त करायला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ...

तर्री
Tue, 01/08/2013 - 00:19 नवीन
हे असे उदात्त विचार व्यक्त करायला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ...आणि ते फार थोड्या देशात आहे. ते कोणत्या देशात आहे त्या पेक्षा कोणत्या देशात नाही आणि त्यामध्ये काही समानधर्म सापडतो का ते पहावे. तसा समान घटक आढळला तर तो काय आहे ? हया वर विचार व्हावा. आणि तो तसा इतरत्र होणार नाही याची शाश्वती असेल तर मग हे असे उदात्त आणि उच्च विचार पचनी पडतील.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा