केव्हा तरी पहाटे...
आकाश तारकांचा उतरून साज गेले
अर्धोन्मिलीत नयनी एक स्वप्न साजलेले
हा मंदगंध वारा विसरून तोच गेला
निष्पर्ण सावलीचे एक पर्ण तरंगलेले
बेधुंदल्या कळ्यांचे निःश्वास दाटलेले
उन्मीलनाचे स्वप्न स्वप्नात पाहिलेले
हलक्याच पावलांची ती वाट धुकटलेली
स्मृतिगंधल्या मनांचे हृदय स्पंदलेले
पौगंडल्या उषेचा प्रियकर नभी तो आला
थरारले अधरही, आरक्त गाल झाले
निस्तब्ध शांतताही विस्कटून सारी गेली
पंखांतली कुजबूज, आसमंत व्यापलेले
चेहर्यावरी बटांचे रेंगाळणे उगाच
निःश्वासही उगाच, उगाच कूस बदलणे
शराबल्या नजरेनं मनपक्षी कैद केला
पुन्हा त्याच मिठीत हरवून सारे गेले...
मला कवितेतलं फारसं समजत नाही
धन्यवाद, स्नेहांकिताजी!