काका,
भलताच अनुभव हो हा!
पण , मला त्यांना(तुमच्या मित्राला) यातून नक्की काय सांगायचं होतं ते समजलं नाही.
त्या मृत शरिराच्या कुठच्याच अवयवातून मला भास होईल असं आणि शोधून काढिन असं दया आणणारा अवयव,इच्छाशक्ती दाखवणारा अवयव किंवा संगीताला उद्युक्त करणारा अवयव असं काही शोधता आलं नाही.
नंतर डॉक्टरने कवटीचा भाग उलटाकरून विजेच्या करवतीने काळजीपुर्वक कापून मेदुचा गोळा बाहेर काढला.पापुद्र्यात गुंडाळलेल्या त्या मेंदुच्या गोळ्यावर स्मरणशक्तिच्या आणि अनुभवाच्या सुरकुत्या दिसल्या.त्या राखाडी रंगाच्या शिरांचं जाळं बघून त्याग करणं,माफ करणं,किंवा आत्महत्या करणं ह्या गोष्टी बद्दल माझी असलेली समजूत आणि माणसाचं आयुष्य म्हणजे एक जीवशास्त्र आहे ह्या बद्दलची माझी कल्पना ह्याची सांगड घालणं मला जमलं नाही. माझी स्वतःची खात्री होती की ईच्छाशक्ति,कल्पनाशक्ति,आणि विचार ह्याचं रुपांतर एखाद्या केमिकल रियाक्षन किंवा वीजेच्या लहरीत होईल.पण तसं काही दिसलं नाही.
म्हणजे नक्की काय? त्या शरीरात इच्छाशक्ती दाखवणारा किंवा संगीताला उद्युक्त करणारा अवयव सापडला नाही .. म्हणजे नक्की काय अभिप्रेत होतं?? आणि मेंदूच्या शिरांकडे बघून , माफ करणं.. आत्महत्या करणं.. या गोष्टींची कारणं समजली असती असं काही म्हणायचं होतं का?
थोडी गोंधळले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्राजुजी,
मी पण तुमच्या सारखांच त्यांच भाषण ऐकता ऐकता गोंधळलो होतो.
फिलॉसॉफिकल विषय घेऊन मुळात चिंतन करण्याच्या वृत्तीचे हे प्रो.देसायांचे भाऊ फक्त त्यांच्या सारखे प्रोफेसर झाले नाहीत एव्हडंच.पण एखादा विषय घेऊन प्रो. जसे चर्वीचरण करतात तेच गुण ह्यांच्या अंगी आलेले मला दिसले.
एव्हडी प्रस्तावना ह्या गृहस्थांची करून झाल्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
जीवंत असताना माणसाचं शरिर चैतन्यमय असतं.हे चैतन्य निर्माण व्हायला त्या शरिरात काही तरी अजब गोष्टी पहायला मिळतील की ज्यामुळे जरी शरिर मृत झालं तरी त्यातला आत्मा निघून गेल्यावर ते इतकं तेव्हड्यापुरतं आणि क्षणभंगूर असावं की त्या मृत शरिरात आणि एखाद्दा लाकडाच्या ओंडक्यात जितकं साम्य असावं तेव्हडं दिसावं.जीवंत असताना तेच शरिर शास्त्रीय नियमानुसार हवे ते पडताळे देऊ शकतं मग असं काय होतं की मृतझाल्यावर त्यातला कसलाच मागमूस त्यात पाहायला मिळू नये.
तेव्हा जास्त खोलात न जाता एखादी अद्भुत शक्ति ह्यावर काम करीत असावी असा विचार करून ते समाधान मानत होते.आत्मा हा त्यांच्या दृष्टीने ही शक्ति असावी ही त्यांची श्रद्धा द्विगुणीत होत होती आणि म्हणूनच ते पुढे म्हणतात,
"अखेर एक अदृश्य पण पवित्र मुलभूत शक्ति माझ्या कानात माझ्या देव जाणण्याच्या आणि त्या बद्दल आनंद मानण्याच्या क्षमतेची आठवण देऊन कुजबुज करीत होती असा मला त्यावेळी भास झाला."
मला ते काय सांगतात ते अर्थात ऐकून घ्यायचं होतं.त्यांच्याशी वाद न घालता मी म्हणूनच मनात म्हणालो,
"हे सगळं त्यांच संभाषण ऐकून मी क्षणभर अचंबीत़च झालो.मनूष्य आपल्या विचारशक्तिच्या जोरावर काय काय मनात आणू शकतो,आणि कुठल्या कुठल्या कनक्लुजनला येवू शकतो हे सुद्धा विचाराच्या पलिकडचंच आहे असं वाटलं."
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सामंत साहेब,
तुमच्या अनुभवाबद्दल आम्ही अनादर मुळीच दाखवित नाही.(डांबीस काका श्टाईल ;))..पण तुम्ही आता जरा ब्रेक घ्या बुवा...अहो किती लेख टाकता हे? कंटाळा येतो ना...
बैलोबा
बैलोबाजी,
नका हो असं म्हणू !. ही निर्मिती आहे. देव तथास्तू म्हणतो. नंतर मग वाईट वाटेल.
"प्रतिभा उरी धरूनी
मी लेखन करीत रहावे
हे भाव स्वप्न अपुरे
साकार त्याने करावे"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
बापरे..
प्राजुजी, म
सामंत
आता मागे वळून बघणे नाही.
छान
असतो एखादा तसा