उत्तर सांगा...
माझे नाव स्थिरबुद्धी. मी जंबूकाचार्यांचा शिष्य. अनाथ सापडलेल्या माझे संगोपन व शिक्षण जंबूकाचार्यांनी केले. अध्ययन संपल्यावर गृहस्थाश्रमात जाण्याची अनुज्ञा देताना आचार्य मला म्हणाले, 'स्थिरबुद्धी. तुला स्वतःचे कुणी नाही. मलाही मेधा या एकुलत्या एक मुलीखेरीज कुणी नाही. तू मेधाशी परिणय करुन हे गुरुकुल चालवावेस असे मला वाटते.'
त्यावर मी म्हणालो, 'गुरुदेव! आपण मेधाचाही विचार घ्यावात. मला येथे राहून गुरुकुल चालवणे आवडेल, पण मेधाशी विवाह मात्र अडचणीचा वाटतो. आपण माझे संगोपन केलेत त्याअर्थी आपणच माझे पिता. दुसर्या अर्थाने गुरु हा पित्यासमान असतो. त्यामुळे भगिनीसम मेधाशी विवाह अनुचित नाही का ठरणार?'
आचार्यांनी मेधाला बोलवून विचारले. मेधा ही अत्यंत बुद्धिमान, पण खोडकर होती. ती म्हणाली, ' मी आजवर स्थिरबुद्धीकडे बंधू या नात्याने कधीच पाहिलेले नाही. त्यामुळे मला तो पती म्हणून चालेल. पण 'कन्या हे परधन' असे आपली नीती सांगते. स्थिरबुद्धी इथेच राहिला तर माझी सासरी पाठवणी होणार नाही आणि परधन स्वतःकडे ठेऊन घेतल्याचा दोष तुम्हाला लागेल. अर्थात स्थिरबुद्धीने अन्यत्र गुरुकुल चालवले तर मी त्याची सहचरी बनायला तयार आहे. मात्र त्याने येथे गुरुकुल चालवण्यात मला अडचण वाटते.'
आम्ही उपस्थित केलेल्या या पेचावर आचार्यांनी काय केले असावे? या कहाणीचा शेवट काय झाला असावा, असे तुम्हाला वाटते?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कंदमुळे..
"स्त्री ही क्षण कालाची पत्नी
स्त्री ही
सर्वांचे आभार...
_/\_
जबरा. _/\_
बालमित्रांना गोष्ट आवडली.
आयला लग्न पण झालं .. भारीये
तु पण???