आत्तच एक चित्र बघण्यात आले, बहुधा राजा रविवर्माचे.
या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे, समजले नाही. काही अंदाज?
हे चित्र यंडुगुंडु भाषेतील दुव्यावर आहे:
http://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#
धरणी माता म्हणजे सर्वांची माता. परस्त्री नव्हे.
परंतू हे रामाला ती धरणी माता आहे, हे कळले नसावे, त्याला ती मारीचासारखी कुणी मायावी राक्षसीण वाटलेली चेहर्याच्या अविर्भावावरून वाटते.
परंतू हे रामाला ती धरणी माता आहे, हे कळले नसावे, त्याला ती मारीचासारखी कुणी मायावी राक्षसीण वाटलेली चेहर्याच्या अविर्भावावरून वाटते.
माता असल्याचे कळले नसेल तर परस्त्रीच की मग!
राक्षसिणी काय स्त्रिया नसतात का? विचारा आमच्या श्रामो, घासुगुर्जी, बिका वगैरेंना.
बायदवे, रामाने आदल्या दिवशी महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण प्रकरण वाचले असण्याची शक्यता कितपत आहे?
राम* बहुधा सासूबाईंच्या पदराला धरून "मी पण येतो" म्हणाला असावा. तेव्हा धरणीमातेने "अरे हाआआआड" असे म्हणून पदर सोडवून घेतला असेल.
*येथे रघुकुलतिलक, अहल्ल्योद्धारक भगवान श्री राम असे वाचावे.
राम* बहुधा सासूबाईंच्या पदराला धरून "मी पण येतो" म्हणाला असावा. तेव्हा धरणीमातेने "अरे हाआआआड" असे म्हणून पदर सोडवून घेतला असेल.
*येथे रघुकुलतिलक, अहल्ल्योद्धारक भगवान श्री राम असे वाचावे.
किंचित बदल "अरे हाआआआड मेल्या" असे म्हणून पदर सोडवून घेतला असेल.
बाकि प्रतिसादहि भन्नाटच :)
थत्ते साहेब आणि पंगा यांचे प्रतिसाद विशेष भावले.
मूळ चित्राविषयी थोडं - या चित्रात एक अनोखी दुर्घटना होत असताना सगळे आपापल्या खुर्च्यांत वगैरे बसून धिक्कार, दुःख वगैरे व्यक्त करत आहेत. सीतेला सोडवायला कोणी जात नाही. चित्रात कोणी कविता करताना दिसत नाहीत, कदाचित राजा रविवर्माची ही चित्रमय कविता असेल. '*र्यहीन विचारजंती कुठचे!' असं रविवर्म्याला म्हणायचं असावं. (चित्रात राम असल्यामुळे कवितेतला शब्द वापरणं मला उचित वाटत नाही)
राक्षसिणी या स्त्रियाच असतात. त्यांना स्त्रियांविषयीचे सगळे (सोयीचे) कायदे लागू होतात. उदाहरणार्थ त्यांच्या वयाची जाहीर चर्चा वगैरे केली तर त्यांना राग येतो. फक्त सामान्य स्त्रीप्रमाणे अबला नसल्यामुळे त्या दात, नखं, शस्त्रं वगैरे पाजळून अंगावर धावून येतात. कधीकधी त्या मूळ दोषी माणसाला सोडून निरपराधालाच फाडून खातात.
म्हणजे सीतेचीपण माता आणि रामाचीपण माताच. म्हणजे रामाची सीता कोण?
"रामाची सीता कोण - आई की बहीण" या सनातन प्रश्नाचे उत्तर (आख्खे रामायण न वाचतासुद्धा) मिळाले! रामाची सीता नि:संशय बहीणच!!!
>>"रामाची सीता कोण - आई की बहीण" या सनातन प्रश्नाचे उत्तर (आख्खे रामायण न वाचतासुद्धा) मिळाले! रामाची सीता नि:संशय बहीणच!!!
(जैन की) कुठच्यातरी रामायणात राम आणि सीता बहीण भाऊच असतात म्हणे.
राजा रवीवर्मा किंवा राम जैन असण्याशी माझा काय संबन्ध येणार,
राजरवीवर्मा किंवा राम जैन होता किंवा नाही हे भाजप सांगु शकेल जैन डायरीत त्याबाबतीत काही लिहीले असेल तर ते त्यानाच माहीत असेल
वरची सर्व उत्तरे चुक आहेत,
हा एका हिंदी सिनेमातील प्रसंग आहे.
ती जमीनीवर बसलेली बाई आपल्या सिनेमाच्या नायकाची बहीण आहे. आणि सिहासनावर बसलेला अमरीश पुरी किंवा शक्ती कपुर आहे. मागे अमरीश पुरीचा सज्जन भाउ परेश रावल आहे. बाजुला मुनी अनुपमखेर बसलेले आहेत.
त्या बाईच्या मागची स्त्री तीची आई आहे.
दोन लहान मुले ही आपल्या हीरोचीच भावंड आहेत ज्यांना अमरीशपुरीने बाळं असताना पळवुन आणले आहे आणि त्यांच्या कडुन तो बुरे काम करवुन घेतो. त्यांना आत्ताच समजले आहे की ह्या बायका म्हणजे आपली बहीण आणि आई आहेत.
बाई अमरीश पुरीला सांगत आहे " मुझपर दया करो मुझपे ऐसा जुलुम मत करो मै तुम्हारे बच्चेकी मा बनने वाली हु"
अमरीश पुरी म्हणतो "क्या सबुत है तुम्हारे पास ईस बात का. मुझे नही पता तुम्हारे पेट मे कीसका पाप पल रहा है"
त्यावर खवळुन ती म्हणते "कमीने मेरे भाई को ईस बात का पता चला तो वो तुम्हारा साम्राज्य नष्ट कर देगा"
त्यावर तीची आई तीला मागे ओढत आहे आणि म्हणते आहे "बेटी यहासे चलो ईस पापी को तेरी दया नही आयेगी. हम जैसे गरीबोंका कोई वाली नही होता."
आता या नंतर सनी देवल भिंत फोडुन आत येणार आहे आणि अमरीशला धु धु धुवुन काढणार आहे.
तो पर्यंत मा बेटी रेल्वे रुळांवर जाउन बसणार आहेत त्यांच्या मागे दोन छोटे भाउ "मा रुक जाओ दीदी तुम्हे पिताजीकी कसम" असे म्हणत धावणार आहेत.
एकी कडे सनी दुश्मन चा खातमा करत आहे आणि दुसर्या फ्रेम मधे,
समोरुन कोळश्याचे ईंजीन लावलेली रेल्वे धडधडत येणार आणि काही कळायच्या आत सनी मधे उडी मारुन ती हातानी आडवणार. मग सगळ्या परीवाराचे मिळुन एक गाणे होणार.
" आंधी आये या तुफान ये प्यार ना होगा कम,
एक दुसरेसे जुदा कभी नही होंगे हम.
बम चीकी बम चीकी बम"
अनुपम खेरची मुलगी डिंपल कुठुन तरी धावत येउन सनीला मिठी मारते आणि मग ते सगळे मिळुन परत वरचे गाणे उच्च रवात गाउ लागतात.
तेव्हड्यात द एन्ड ची पाटी येते.
रूप संगम कडून मिळालेली पैठणी नेसून वैनी आल्या आहेत, तेवढ्यात शूटिंग साठी घाइघाइत केलेला सेट मोडून वैन्या खाली पडु लागल्या आहेत, आदेश भावजी व सिताराम सोसायटी, डोंबिवली (पूर्व) चे शेजारी आश्चर्य चकित होउन बघत आहेत... या खास एपिडोस साठी सर्वांनी ऐतिहासिक वस्त्राप्रवरणे नेसली आहेत.
हा प्रसंग जर सीतेला धरणीमाता पोटात घेते असा असेल तर त्यात बर्याच चुका आहेत.
पुराणात वरील प्रसंग हा रामाच्या दरबारात घडलेला नाही. तर तो ऋषींच्या आश्रमात झालेला आहे.
या प्रसंगात सीतेच्या अंगावर आश्रमातील वस्त्रे हवीत.
रामाने त्याच्या अंगात चिलखत घातले असेल तर ते पुर्ण हवे . ब्लाऊज सारखे पोट उघडे दाखवणारे नको
रामाच्या हातात तलवार आहे ती युरोपीयन बनावटीप्रमाणे सरळ आहे. रामायणात ज्या तलवारी आहेत त्या पुढे पाते रुंद असलेल्या आहेत.
रामाच्या राजवाड्याबाहेर शिवसेनेचे झेंडे का लावलेले आहेत?
दरबारात बसलेल्या रामाने पायात काहीच घातलेले नाही. पायाखालीदेखील काहीच नाही.
चित्रातील ढोबळ चुका सर्वाधिक ओळखल्याबद्दल विजुभाऊला मी वर्गातील हुशार मुलगा म्हणून जाहीर करतो. :)
-शेणकुटे गुरुजी-
........................
१) रामायणकाळात नऊवारी साडी व बाह्यांचे ब्लाऊज ही स्त्रियांची वेशभूषा नव्हती. छातीवर कंचुकी व त्यावर एक ओढणीसारखे वस्त्र (अधरीय) असे. कमरेखालचे वस्त्र उत्तरीय म्हणून ओळखले जाई. कमरेवर बांधायचे जे कटिवस्त्र असे त्याला अंशुक म्हणत. पुरुष कंचुकी वगळता हाच पोशाख करत.
२) प्रसंग वाल्मिकी मुनींच्या आश्रमात घडला. तेव्हा सीतेच्या अंगावर आश्रमकन्येचा पोशाख होता. राजस्त्रियांची वस्त्रे नव्हती.
३) राम व कृष्ण यांना दाढी व मिशा नव्हत्या आणि त्यांचा शरीरवर्ण गौर नसून निळा-सावळा होता.
४) राम हा कायम कोदंडधारी (धनुर्धर) होता. त्याच्या हाती तलवार नसे. चित्रात दाखवलेली तलवार युरोपिअन धाटणीची धोप (सरळ पात्याची) आहे. भारतीय योद्धे नेहमी टोकाला बाकदार तलवारी वापरत. पुढे रुंद होणार्या तलवारी राक्षस वापरत. पुन्हा या चित्रातील तलवारीच्या लांबीचे प्रपोर्शन गंडले आहे.
५) भगव्या झेंड्याबाबत कुणा राजकीय पक्षाचे नाव न घेता आपण चित्रकाराला संशयाचा फायदा देऊ. इंद्राचा ध्वज हा 'झर्झर दंड' म्हणून ओळखला जाई. त्याचा रंग भगवा होता. रामायणात इंद्राचा उल्लेख आहे. (युद्धात इंद्रानेच आपला ध्वजांकित 'जैत्ररथ' व 'मातली' हा सारथी रामाला लढण्यासाठी दिला होता.) त्यामुळे भगवा झेंडा मान्य करुया.
६) खिडकीतून बाहेर दिसणारा राजप्रासादाचा कडेचा भाग चक्क टॉवरसारखा वाटतोय. टॉवर ही गॉथिक इमारतशैली आहे. ती युरोपिअनांच्या वसाहतीनंतरच आपल्याकडे रुढ झाली. (पोर्तुगीजांची गोव्यातील जुनी चर्च). रामायणकाळात अशा सरळसोट इमारती नसत. प्रासादांचे सौंध, गवाक्ष यावरही शिल्पकाम आणि नक्षी असे. चितोडच्या विजयस्तंभावरुन साधारण कल्पना येते.
७) चित्रात दाखवलेला रामाचा दरबार नसून महाल असावा. कारण दरबारात चक्रवर्ती राजा इतरांपेक्षा उच्चासनावर बसत असे.
८) सीता भूमातेच्या मांडीवर बसून जमिनीखाली गेली. त्या प्रसंगात भूमाता पाटावर बसून वर आली नव्हती तर रत्नजडित सिंहासनावर बसल्याचे वर्णन आहे.
हे एकच चित्र नाही तर चित्रगुप्तांनी दिलेल्या दुव्यावरचे सर्वच चित्रे युरोपियन शैलीतली वाटतात. बहुतेक चित्रातल्या स्त्रियांचे वस्त्र, हावभाव हे पाश्चात्य पद्धतीचे आहेत.
हे चित्र बघा:
या प्रकारची चित्रे भारतीय शैलीची नसून (नऊवारी साडी वगळता) युरोपियन आहेत.
या चित्रांवर युरोपिअन छाप पडण्यामागे एक कारण असेही असू शकेल की मॉडेल व्ह्यू मनात आणताना रविवर्मा पूर्णपणे प्राचीन काळात शिरले नसावेत. त्यांनी त्यांच्या हयातीतला काळच समोर ठेवला असावा.
म्हणजेच रामाचा दरबार चितारताना त्यांनी ज्या राजाच्या दरबाराचे चित्र प्रत्यक्ष पाहिले होते तो जर अठराव्या शतकातील असेल तर तपशिलाच्या अशा चुका दिसणारच...
रविवर्मा ची चित्रे:
http://www.cyberkerala.com/rajaravivarma/
बाळासाहेब पंत प्रतिनिधी (१८६८ - १९५१) यांनी असे लिहून ठेवले आहे, की रविवर्मा (१८४८ - १९०६) ची चित्रे मुख्यत्वेकरून त्याचा लहान भाउ सी. राजा राजा वर्मा हा चित्रित करत असे. रविवर्मा फक्त शेवटी चेहर्यावरील भाव वगैरेत थोडेबहुत काम करून सही करायचा.
बाळासाहेब पंत प्रतिनिधी देखील चित्रकार होते, त्यांचे एक चित्रः
दुवा:
http://www.kamat.com/kalranga/mythology/ramayan/30031.htm
पाश्चिमात्य चित्रकारांच्या मागे जशी एक समृद्ध् परंपरा होती, तशी या भावांना लाभली नव्हती.
आपण म्हणता तसेच असावे असे वाटते. त्यातल्या त्यात खाली चित्रगुप्तांनी लिहिलंय की रवी वर्म्याची चित्रे त्याचा भाऊ काढत असे.
मला ही चित्रे एखाद्या भारतीयाने पाश्चात्य पद्धतीचा अभ्यास करून काढलेल्या चित्रापेक्षा पाश्चात्य माणसाने भारतीय राहणीमान आणि कथांचा अभ्यास करून काढलेली वाटतात.
रवी वर्म्याचा भाऊ युरोपात वाढला होता का?
जर चित्रात दोन मुले नसती तर हे दौपदी वस्त्रहरण वाटले होते...(वस्त्रहरण करताना दोन मुले नसावीत असा अंदाज आहे असल्यास कल्पना नाही.. तसेही एकाने डोळे झाकले आहेतच :प)
बाकी राजाच्या मागे कोण उभा आहे? त्याने कानात फूल का अडकवले आहे?
मला राहून राहून एक प्रश्न पडतो ... सत्य युगातले , त्रेता युगातले लोक दाढी कशी करत असतील? इव्हान भगवान शंकर पण दाढी करतात ... वैदिक काळात लोकांना दाढी करण्याची कला अवगत होती का ?
अध्यात्ममार्ग किती अवघड आहे हे सांगताना कठोपनिषदात खालील श्लोक येतो.
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्ग पथस्तत् कवयो वदन्ति |
अर्थः क्षुर-म्हंजेच वस्तर्याच्या धारेवरून चालणे जितके अवघड तितकाच अध्यात्ममार्ग अवघड आहे.
ज्या अर्थी वस्तर्याची उपमा उपनिषद काळात दिली गेलीये त्याअर्थी दाढी करायला न्हाव्यांकडे वस्तरे तेव्हापासून असावेत हे स्पष्टच आहे.
चित्र कुठले आहे ते माहिती नाही पणा रद्दड आहे ते कळाले. चित्रातल्या सर्व व्यक्तींनी विशेषतः बायकांनी सर्व कपडे घातले आहेत. अलंकारांवरुन बायका हिंदु वाटतात. तरी पुर्ण कपडे म्हणाजे तर चित्र अजिबातच वास्तवदर्शी आणि कलात्मक नाही हे कळते. असल्या फालतु चित्रांवर कशापाई वेळ वाया घालवायचा?
वास्तवदर्शी चित्र . बहुदा सत्यवतीचे आहे. अर्थात ती काही देवी नाही. त्यामुळे चालून जाईल.
दुवा: त्याच अल्बम मधील चित्र ५८
https://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#5367627736101638370
प्रतिक्रिया
निषेध!
धरणी माता म्हणजे सर्वांची माता. परस्त्री नव्हे.
परस्त्रीच की मग
माझ्यामते
राम* बहुधा सासूबाईंच्या
चित्र एक दम क्लास आहे
माहितीची देवाणघेवाण
पूर्ण सहमत आहे. पुरावा :
चित्र कविता
*र्यहीन विचारजंती कुठचे!
ब्रह्म राक्षसीण?
युरेका!
>>"रामाची सीता कोण - आई की
हम्म्म्म......
याचे
राजा रवीवर्मा किंवा राम जैन
मालवणी नाटकाचे नाव..
हे राम..
माझ्या
अधिक निरिक्षणाअंती
सीतामाई बरेच दिवस घरी
वरची सर्व उत्तरे चुक आहेत,हा
हा हा हा !! ,
पिच्चर पायलेला आहे कदाचित.
मिपाकरांच्या
चतुरंग- सहमत.
_/\_
हे होम मिनिस्टर च्या शूटिंग च्या वेळचे चित्र आहे.
गुगली....
हा प्रसंग जर सीतेला धरणीमाता
विजुभाऊ हा वर्गातील हुशार मुलगा, हे जाहीर करतो..
युरोपियन
स्मिता! अगदी बरोबर
शिवाय आत्ता जे आपण पहात आहोत
रविवर्मा ची चित्रे
मॉडेल व्ह्यू
हे हे हे. रा.स्व. संघीचे नशीब
हं.. राम, सीता, वगैरे विषय टर
१+
दौपदी वस्त्रहरण
मला राहून राहून एक प्रश्न
ज्या लोकांकडे मान कापायला
नसावेत कदाचित !
अध्यात्ममार्ग किती अवघड आहे
महाभारतात कणिक नीतीत पण
रोचक! हे माहिती नव्हते.
चित्र कुठले आहे ते माहिती
हे घ्या
?
अरसिक किती हा शेमेला
Pagination