विनिल आणि...
मुद्दाम शीर्षक अर्धवट ठेवले. विषय आहे विनिल कृष्णाचा. ओरिसातील मलकनगिरीचा जिल्हाधिकारी. लोकप्रिय, प्रामाणिक, कर्तृत्त्ववान... खरे तर या विशेषणांचा क्रम उलटा लिहायला हवा. कारण पुढच्या दोन गुणांमुळे तो लोकप्रिय झाला आहे. माओवाद्यांनी (म्हणजे काय हा प्रश्न आहेच) त्याचे अपहरण करून आता अठ्ठेचाळीस तास होत आले आहेत. त्याच्या सुटकेचे नेहमीचे प्रयत्न वगैरे सुरू आहेत. पण एक प्रश्न मला पडला आहे. बिनायक सेन यांच्यासंदर्भात उठणारे आवाज गेल्या अठ्ठेचाळीस तासांत पुन्हा उठलेले दिसले नाहीत. स्वामी अग्निवेश यांचा अपवाद. त्यांनी विनिलच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. पण बाकीचे? खुद्द सरकारी स्तरावरही एरवी जशी धावपळ दिसते तशी आत्ता दिसत नाही. दिसत नाही म्हणजे अगदी विनिलच्या सुटकेसाठी विशेष मोहीम वगैरे हाती घेतलेली नाही, असेही सरकार म्हणते आहे.
विनिल हा मानवतावाद्यांचा शत्रू निश्चित नाही. विनिल हा अधिकाऱ्यांमधलाही बोटावर मोजण्याजोग्यांमधला एक आहे, असे म्हणतात. दुर्गम भागांत मोटरसायकलवरून जाणारा हा कलेक्टर. लोकांशी संपर्क वाढवणारा कलेकचुकले?
विनिलचे काय चुकले?
तुमचे काय मत?
हा धागा म्हणजे मानवतावाद्यांना धरून झोडण्याची संधी आहे, पण त्याचा तितकाच उपयोग नको. थोडी तपशीलातली मांडणीही होऊ द्या.
प्रतिक्रिया
अभिनंदन!!!!
जय हो!
सु.का. तुम्हाला सांगायला हवे का???????
अभिनंदन
अतिशय महत्त्वाचा प्रश्न.
+१
आनंददायी खबर...!!
+१
श्रामोंचा निषेध.
अभ्यास कमी पडतो आहे अंकल. हे
होय मॅडम.
सुटका
+१
सुटका
शेवटी
हुश्श्य!
Pagination