शांघाईचे बाप्पा.
मी सध्या शांघाईला वास्तव्यास आहे. इथे ह्या वर्षी बाप्पांचे दर्शन होईल का नाही, बाप्पांची आरती कानावर पडेल का नाही, बाप्पांचा प्रसाद खायला मिळेल का नाही, ह्यासाठी गेले काही दिवस मन कासावीस होत होते. पण बाप्पांच्या कृपेने *श्री. आराध्ये ह्यांचे 'गणरायाचे आगमन निमंत्रण' बघून खूप आनंद झाला.
ठरल्या वेळेप्रमाणे काळ संध्याकाळी, आम्ही( मी, माझी पत्नी शीतल, माझा मित्र नीरज, आणि त्याची पत्नी निशा) चौघे श्री. आराध्ये ह्यांच्या घरी निघालो. घरी पोहोचल्यावर बाप्पांचे दर्शन झाले. शांघाईतले सजवलेले बाप्पा बघून मन भरून आले.
श्री. आराध्ये ह्यांच्या घरी शांघाई मधील जवळपास ३० कुटुंबे गणरायाचे स्वागत करण्यासाठी हजर होती.
तिथे जुने मित्र भेटले आणि काही नवीन मित्रांच्या ओळखी झाल्या.
श्री. आराध्ये ह्यांनी आरती पठन केली.
सर्व जमलेल्या भक्तांनी गणरायाचे दर्शन घेतले.
आरती संपल्यावर संपल्यावर सर्वांनी अल्पोपहाराचा आनंद घेतला.
बालचमू देखील आनंदाने प्रसाद ग्रहण करीत होती.
मोठे जन देखील गप्पा मारण्यात गढून गेलेले होते.
श्री. श्रीकांत आराध्ये यांच्या निमंत्रणामुळे दूरदेशी देखील आम्हाला बाप्पांचे दर्शन झाले त्यामुळे मी त्यांचा शतश: आभारी आहे.
* शांघाई मध्ये होणार्या कार्यक्रमांमध्ये श्री。 श्रीकांत आराध्ये हे गेली तीन वर्षे प्रामुख्याने भाग घेत होते. सुरुवातीला 'शांघाई मराठी' हा एक खूप लहान ग्रुप होता. हा ग्रुप श्री. चारुहास भेंडे ह्यांनी चालू केलेला होता. एक वर्षांपूर्वी श्री. आराध्ये ह्यांनी आपल्या हातात सूत्रे घेतली आहेत.
'शाघाई मराठी' ग्रुप शांघाई मध्ये दरवर्षी पारंपारिक कार्यक्रम आयोजित करीत असतात. जसे कि मकर संक्राती, गुडी पाडवा, गणेशोत्सव. 'शांघाई मराठी' ग्रुप ने नुकताच जूनमध्ये 'स्वर संध्या' आणि श्री श्रीधर फडके ह्यांचा 'फिटे अंधाराचे जाळे', 'गीत रामायण' हा कार्यक्रम शांघाई मध्ये आयोजित केला होता.
शांघाई मध्ये एक 'भारतीय मंडळ' असून त्यांच्या तर्फे दिवाळी, होळी, नवरात्री, आणि काही समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात.
तसेच शांघाईतील 'भारतीय दूतावास' यांच्या तर्फे स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिवस, साजरे केले जातात.
श्री. आराध्ये ह्यांच्या घरी शांघाई मधील जवळपास ३० कुटुंबे गणरायाचे स्वागत करण्यासाठी हजर होती.
तिथे जुने मित्र भेटले आणि काही नवीन मित्रांच्या ओळखी झाल्या.
श्री. आराध्ये ह्यांनी आरती पठन केली.
सर्व जमलेल्या भक्तांनी गणरायाचे दर्शन घेतले.
आरती संपल्यावर संपल्यावर सर्वांनी अल्पोपहाराचा आनंद घेतला.
बालचमू देखील आनंदाने प्रसाद ग्रहण करीत होती.
मोठे जन देखील गप्पा मारण्यात गढून गेलेले होते.
श्री. श्रीकांत आराध्ये यांच्या निमंत्रणामुळे दूरदेशी देखील आम्हाला बाप्पांचे दर्शन झाले त्यामुळे मी त्यांचा शतश: आभारी आहे.
* शांघाई मध्ये होणार्या कार्यक्रमांमध्ये श्री。 श्रीकांत आराध्ये हे गेली तीन वर्षे प्रामुख्याने भाग घेत होते. सुरुवातीला 'शांघाई मराठी' हा एक खूप लहान ग्रुप होता. हा ग्रुप श्री. चारुहास भेंडे ह्यांनी चालू केलेला होता. एक वर्षांपूर्वी श्री. आराध्ये ह्यांनी आपल्या हातात सूत्रे घेतली आहेत.
'शाघाई मराठी' ग्रुप शांघाई मध्ये दरवर्षी पारंपारिक कार्यक्रम आयोजित करीत असतात. जसे कि मकर संक्राती, गुडी पाडवा, गणेशोत्सव. 'शांघाई मराठी' ग्रुप ने नुकताच जूनमध्ये 'स्वर संध्या' आणि श्री श्रीधर फडके ह्यांचा 'फिटे अंधाराचे जाळे', 'गीत रामायण' हा कार्यक्रम शांघाई मध्ये आयोजित केला होता.
शांघाई मध्ये एक 'भारतीय मंडळ' असून त्यांच्या तर्फे दिवाळी, होळी, नवरात्री, आणि काही समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात.
तसेच शांघाईतील 'भारतीय दूतावास' यांच्या तर्फे स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिवस, साजरे केले जातात.
प्रतिक्रिया
मस्तच
गणराय चीनी राज्यकर्त्यांना
अरे वा..
३० कुटुंबे गणरायाचे स्वागत करण्यासाठी हजर होती
पाठीवरती i लिवलय ते असावेत.
नाही..
छान...
छान
क्या बात है!
लै भारी!
आम्ही ही काल आमच्या मराठी
चीनमधला पाहुणचार