दोन साधू ( रूपक)
लेखनप्रकार
खलील जिब्रान वाचताना त्याच्या कथांमध्ये नक्की कायकाय आढळेल हे सांगता येत नाही.
पण एक नक्की तो वाचकाला अंतर्मुख करायला लावतो. मानसशास्त्र कोळून प्यायलेला अवलीया माणूस असावा तो. मनाचे काने कंगोरे वेगळ्याच कोनातून दाखवून देतो.
त्याची अशीच एक कथा
एका टेकडीवर दोन साधू रहात होते. आपण त्याना मोठा आणि धाकटा अशी नावे देवू या.
दोघे जण टेकडीवरच्या एका झोपडीत रहात होते. ती झोपडी त्यातली अंथरायची चटई असणारे आणि पाण्याचा एक जुना माठ हीच काय ती त्यांची संपत्ती.
एक दिवस धाकट्याच्या मानात आले तो मोठ्या साधूला म्हणाला " मला माझ्या संपत्तीचा वाटा हवा आपण वाटण्या करुयात"
मोठा म्हणाला " घे ना हे सगळे तुझेच आहे त्यात वाटा आणि वाटण्या कसल्या"
मला माहीत होते की तू असेच बोलणार म्हणून मला दया नको आहे माझा बरोब्बर निम्मा वाटा हवा'
त्याने त्या झोपडीच्या मधोमध एक रेघ आखली चटई अर्धी फाडली आणि म्हणाला ही अर्धी जागा तुझी. ही तुझी चटई.
आता आपण माठाचे सुद्धा वाटे करुयात.
मोठा म्हणाला माठ कसा काय वाटणार तो तुझ्या कडे राहु देत मी त्यातून पाणी पिईन.
धाकट्याला संताप अनावर झाला. रागारागाने त्याने माठ फोडून टाकला.
म्हणाला " हलकट आहेस मला थोडासुद्धा मोठेपणा दाखवण्याचे समाधान मिळू देऊ नकोस"
वाचन
10107
प्रतिक्रिया
53