अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...
हे बरे केलेस्.आम्ही लहान असताना आमच्या घराच्या बाहेरच्या बाजूस चिमण्यांची बरीचशी घरे होती. त्यामुळे दिवसभर चिवचिवाट चालायचा.नंतर घर पाडून पुन्हा नव्याने बांधले तेव्हापासून ते ही गेले.आता चिमणी दिसली तरी फार.
छान लिहीले आहेस.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
मस्त. लेख वाचून छान वाटले. पुढला भाग येऊ दे.
मला पण काही ना काही प्राणी / पक्षी रस्त्यावरून उचलून आणायची सवय होती. सध्या फक्त
मांजर आहे.
>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
मस्त लेख..! वाचून बरं वाटलं...
पुन्हा सगळ्या घरभर फिरली आणि भिंतीवर असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या फोटोच्या वरती जाऊन बसली. दर्शन घेत असावी बहुतेक गणपतीचे.
हे मस्तच! :)
आणि रोज तो दुर्वा ठेऊन गेला की मी लगेच त्या दुर्वा सश्यांना खायला घालत असेल.
सश्यावरून आठवलं, सशाचं मटण फार छान लागतं! मी एकदा सापुतार्याला खाल्लं होतं! :)
तुम्ही काळजी करू नका, आपल्या मनी(मांजर)पासून मी नक्की त्यांची काळजी घेईन." आणि त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...
हा लेख क्रमश: वाचायला देखील आवडला असता... छान लिहिला आहे. चिमण्यांच्या पिल्लांची जल्मकथा वाचायला आवडली असती!
आपला,
(शेणाच्या घरातला) तात्या.
पाल्हाळीक मांडणी परंतु चांगला विषय. लेखाच्या शेवटी 'क्रमशः' असे लिहीलेले नाही पण , पुढे काय झाले उत्सुकता आहे.
मुंबईतले आमचे घर जुने आणि कौलारू आहे, आजुबाजूला बरीच झाडे-झुडपे आहेत. मोठा व्हरांडा आहे. कुठले प्राणी पाळले नाहीत तरी त्यांची (चिमण्यांची) वर्दळ घरात, आजुबाजूला असायचीच. चिमण्या (असंख्य), कुत्रे, गाई-वासरं, कोंबड्या (आणि त्यांची गोंडस पिल्ले ), डुकरे, कावळे, पोपट, साळूंख्या, सुतार पक्षी, कोकीळा आदींचा बराच सहवास लाभला.
चिमण्यांना दाणे खाऊ घालणे, कावळ्यांना-कुत्र्यांना पोळीचे तुकडे, डुकरांना-गायी वासरांना भाज्यांची देठे, आंब्यांच्या कोयी आणि सालं, जवळच्याच गोठ्यातील गायींना गोग्रास असा खुराख मी पुरवायचो.
उन्हाळ्यात अंगणात खाटेवर वाळत घातलेले पापड, कुरडया, सांडगे इत्यादी गोष्टी आमच्या परवानगीशिवाय चाखण्यासही गायी-गुरं यायची, कावळे यायचे.
घरातून पिंजर्यात पकडलेले उंदीर, बाहेर उघड्यावर जाऊन काव-काव ओरडून कावळ्यांना जमा करायचे आणि कावळे जमले की पिंजर्यातील उंदीर उंच उडवायचा (ती ही एक कला असते) की मग कावळे त्याला जमिनीवर पडायच्या आंत वरचेवर हवेतच चोचीत 'कॅच' करायचे आणि घेऊन जायचे हाही माझा आवडता छंद होता.
गेले ते बालपण...
शिर्षक लेखाचा शेवट सांगून जातोय .
ते वेगळे/अपूर्ण असत तेव्हा ,उत्सुकता शेवटपर्यंत टिकते.
नुसत `ती आली` असं असत तर छान तर वाटल असत.
चांगली सुरवात आहे लेखाची.
साधे साधे प्रसंग.प्रत्येकानी अनुभवलेले.तरीही उत्तम वर्णनामुळे आपलेच वाटतात.छान शब्द बध्द केले आहेत.
"मी ते पूर्ण बंद नाही केले थोडीशी फट ठेवली... थोडीशी.. अगदी थोडी... एक चिमणी जाण्याएवढी... :)"
हाहा..... पुर्वनियोजित काम पुर्ण झाल्याचा आनंद झालाच असेल नाही :)))
मस्त.... लेखन !
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
मराठीच्या पुस्तकातली एक कथा आठवली. ती अशी काहिशी होती: लेखकाच्या घरात चिमण्या येऊन घरट बांधतात. पहिल्यांदा तो चिमण्यांना घर बांधू देतो, पण साफसफाई करतांना त्याच्या हातून ते घरट पडतं आणि त्यातलं अंड फुटतं. पण चिमण्या पुन्हा जिद्दीनी घरट बांधू लागतात. ह्यावेळी लेखक विचार करतो की परत असं व्हायला नको म्हणून तो चिमण्यांना हाकलू पहातो. पण चिमण्या घरट बाधंतच रहातात. तो घरटं काढून फेकून देत रहातो. असं बर्याचदा होतं. चिमण्या आपला हेका सोडत नाहीत. शेवटी लेखक घरटं अंगणात नेऊन जाळतो. मग परत चिमण्या त्याच्या घरात घुसतं नाहीत.
व्यंकट
प्राजुताई,
लेख आवडला.खुप छान विषय सुरु केला आहात.
थोडे परिच्छेद जास्त केले असतेस तर वाचायला आणिक मजा आंलि असति.
किंवा काहि परिच्छेद थोडेसे छोटे हवे होते.!
नाहितर लेखन लाम्बल्यासारखे वाटते.बाकि लेखनशैली खुप आवडलि.
पण माझा ज्ञानेश्वर ह्या लेखा पेक्षा जास्त चान्गला लिहिला होतात.
जाता जाता....
त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...
माझ्या माहितीप्रमाणे काहि पक्षांना माणसाने शिवलेले चालत नाहि असे म्हणतात.ते कितपत खरे आहे?
अबब
अबब राव,
त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...
ह्याचा अर्थ, मी त्यांना हातात घेऊन चारा भरवला असा होत नाही. त्यांचे मा़ंजरापासून रक्षण करण्याची जबाबदारी मी घेतली इतकेच.
त्यामुळे,
माझ्या माहितीप्रमाणे काहि पक्षांना माणसाने शिवलेले चालत नाहि असे म्हणतात.ते कितपत खरे आहे?
त्या पिलांना मी हात लावला असे कुठेही म्हंटलेले नाही .
- (सर्वव्यापी)प्राजु
प्राजुताई,
तुमचा काहितरि गैरसमज झालेला दिसतोय.
अहो मी जनरल संदर्भात विचारले होते.हे असे असते का?असे मला विचारायचे होते.
त्यात तुमच्या ह्या वाक्यावरुन हा विचार आला म्हणून विचारले.बाकि काहि नाहि.
काहि चुकले असल्यास माफ़ि.!
अबब
वाचून मलाही माझ्या 'चिउताई'ची आठवण झाली, अजूनही रोज सकाळी उठून बाहेर आल्यावर पहिला संवाद होतो तो माझ्या चिमण्यांशीच. त्यांच्यात रमले की काही दिवसात जणु त्यांची भाषा समजते. दाणे हवे असल्याची चिवचिव वेगळी. दाणे टाकलेले दिसल्यावर आपल्या जोडीदाराला बोलावायची चिवचिव वेगळी. आणि त्यांचे दाणे पळवायला कबुतरे वा साळुंक्या आल्या की होणारी चिवचिव वेगळी. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातला सकाळचा हा एक आनंददायी कार्यक्रम.
प्राजु, मस्त आठवण लिहिली आहेस...
त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...
वा मस्तच..
सशांना दुर्वा खायला घालणे....आवडले.
आमच्या घरी एक मांजराचे पिल्लू होते. त्याला लोणी खूप आवडायचे. आम्ही असेच घरातील लोणी चोरून त्याला घालत असू.
त्याची आज आठवण झाली.
मस्त आहे. आम्हाला हा लेख (कथा?) त्या ज्ञानेश्वरांवरच्या लेखापेक्षा जास्त आवडला. तो लेख म्हणजे, लेख लिहायचा, असं निश्चित करूनच लिहिल्यासारखा वाटत होता. या लेखात लेखिकेची (आणि वाचकांची) स्वअनुभूती जाणवते. घरात चिमणी येणे, तिने घरटे बांधणे ही सर्वांच्या (अगदी मुंबयकरांच्याही) परिचयाची गोष्ट. प्राजुने तिचा अनुभव (असावा, अगदीच लेख काल्पनिक वाटत नाही) लिहिला असला तरी प्रत्येक वाचक त्याच्याशी रिलेट करू शकतो.
मी अगदी लहान (२-३ वर्षे) असतांना आई स्वयंपाक करीत असतांना मी मध्ये-मध्ये लुडबुड करू नये म्हणून आई मला खिडकीच्या जवळ बसवीत असे व तिथे थोडे तांदूळ टाकीत असे. मग ते तांदूळ खाण्यासाठी येणार्या चिमण्या मी तासंतास बघत बसत असे (असे आई सांगायची). त्यामुळे तिला निर्वेध स्वयंपाक व इतर कामे करता येत असत. आज आई जाऊन बावीस वर्षे झाली पण प्राजु, तुझा लेखाने तिची आठवण जागी केली...
पण एक गोष्ट खटकली,
"बघा दोन दिवसांत तिने घर पूर्ण केलं बांधून, नाहीतर तुम्ही .. आपलं हे घर बांधायला १० महिने घेतलेत".. बाबांनी माझ्याकडे एक असहाय्य कटाक्ष टाकला
काय गरज होती बापाला असं छळण्याची? तू विनोद केला असशील पण त्यांच्यासाठी? उगाच नाही त्यांनी तुझ्याकडे एक असहाय्य कटाक्ष टाकला! मुलांसाठी इतकं करूनही जेंव्हा मुलं असं बोलतात ना तेंव्हा काय वाटतं हे कळायला बापच व्हावं लागतं!:(((
त्यांनी काय ते घर फक्त स्वतःसाठीच बांधलं असेल? ते बांधतांना त्यांना किती शारिरीक, मानसिक (कदाचित आर्थिक) ताण आला असेल! बाप कितीही कडक झाला तरी तो माणूसच असतो, आणि त्याला त्याच्या भावना आवराव्याच लागतात. आई चटकन रडू शकते आणि त्यात काही वावगं वाटत नाही, पण बापाने असं केलं तर? अब्रम्हण्यम! किती ताण येत असेल त्याच्या मनावर!
तू केलेलं वर्णन कदाचित काल्पनिक असेल आणि प्रत्यक्षात घडलं नसेलही. पण इथे मिपावर अनेक लहान वयाची मुलं येतात. त्यांना आपल्या वडिलांच्या भावनांची कल्पना यावी म्हणून हे लिहीत आहे, राग नसावा...
तुझा,
डांबिसकाका
डांबिसकाका,
ही गोष्ट जरी खरी असली तरी (चिमणीची) तरी, मलाही नीट आठवत नाही की, मी बाबांना खरंच असं बोलले होते का? बहुतेक नसावेच. कारण मुलगी ही वडिलांना मुलापेक्षा जास्ती लाडकी असते. तशी मिहि आहे. आणि खरं सांगायचं तर जरा जास्तीच आहे.
आणि बाबांनी माझ्याकडे असहाय कटाक्ष टाकला तो, मी त्यांना तसे बोलले म्हणून नाही तर, त्यांनी इतका खटाटोप करूनही चिऊताईने घरटे बांधले म्हणून... :)
असे मला वाटते.
बाकी तुम्ही म्हणता त्याचाशी मी पूर्णपणे सहमत आहे. बाबा लोक असतातच असे... मूकपणे रडणारे..
- (सर्वव्यापी)प्राजु
आमच्या वाड्यात तर चिमण्यांची असंख्य घरटी असत. त्यातली अंडी, नंतर येणारी पिले, क्वचित मांजराने कावेबाज हल्ला करुन मारुन टाकलेले एखादे पिलू असे कितीतरी दिसे.
प्राजूच्या त्या चिमणीने त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
ह्या चिउ-काउचं आपल्या जीवनात एक वेगळंच स्थान असतं.
अगदी लहानपणीच वरणभात खाताना एक घास चिऊचा पासून त्यांची सोबत असते ती बघता बघता कधी मागे पडते ते कळतही नाही.
मग आपल्या मुलांच्या वेळेला परत एकदा ती येतात ती त्यांच बालपण संपलं की जातात.
त्यानंतर ती अशा लेखातूनच भेटतात आणि मनातला एक निरागस, हळवा कप्पा थोडासा किलकिला होतो.
चतुरंग
प्राजु मस्तच लिहिले आहेस.
आमच्याकडे तर चिमण्या इतक्या होत्या की त्यांनी अगदी नकोसे करून सोडलेले होते. आमचे घर दोन्ही बाजूला उतरत्या छपरांचे होते. त्यामुळे घराचा मध्यभाग हा जवळ जवळ १५ फूट उंच होता आणि त्या मध्यभागात चांगली ऐसपैस जागा होती. त्या ठिकाणी कितीतरी चिमण्यांच्या पिढ्या नांदल्या ह्याची गणती नाही. कैक वेळेला ह्या चिमण्यांची सामुदायिक सभा होत असे. मग घरातल्या निरनिराळ्या ठिकाणी बसून त्यांचा चिवचिवाट चालायचा. तो कधी कधी ऐकण्यासारखा असायचा. मग मधेच काय व्हायचे माहित नाही पण आपल्याकडे हल्ली जसे विधानसभेत/लोकसभेत सभासद आपापसात मारामार्या करतात ना अगदी तसे व्हायचे. त्या चिमण्यांच्यात दोन तट पडायचे आणि मग अक्षरशः चिवचिवाट करत मारामार्या चालायच्या. एकमेकांशी मारामारी करताना जोडी-जोडीने धाडकन येऊन जमिनीवर पडायच्या. त्यात एखादी चिमणी जखमी व्हायची. मग तिच्यावर इतर चिमण्या सामुदायिक हल्ला करून तिला बेजार करायचे.
हे सगळे पाहताना आधी जरी गंमत वाटायची तरी नंतर नंतर आम्ही त्यांना 'भुर्रर्र्-फुर्रर्र' वगैरे करून हुसकुन लावायचो.
खरे तर ह्या बद्दल लिहिण्यासारखे बरेच आहे. पण इथेच थांबतो.
तुझ्या ह्या लेखामुळे जुन्या आठवणी चाळवल्या आणि थेट त्या चिऊ-काऊच्या राज्यात पोचलो.
प्राजु, लेख छान झालय. तुझ्या या लेखाने बहुतेकांच्या लहानपणाच्या आठवणी ताज्या केल्या ! आमच्या घराच्या छोट्याश्या व्हरांड्यात बदाम, पारिजातक, कन्हेर, तुळस अश्या वेगवेगळ्या झाडान्ची गर्दी होती त्यामुळे चिमण्या खुप असत. साधारण उन्हाळ्याच्या दिवसात त्या चिमण्या जवळच ठेवलेल्या आमच्या ड्रमातले पाणी किंवा जमिनीवर सांडलेले सांडपाणी प्यायच्या, मी जमेल तेव्हढी बोळकी जमा करुन त्यात प्यायचे पाणी भरुन थोड्याथोड्या अंतरावर ठेवुन द्यायचो, मला वाटायचे चिमण्या आपले दिलेले स्वच्छ पाणी पितील तर त्यांना काविळ होणार नाही. (मराठवाड्यात उन्हाळ्यात हमखास काविळीची साथ येते). ना आता चिमण्या राहिल्या ना ती निरागसता. आणी हो ती उन्हाळ्यात असणारी गर्द गार झाडांची सावली अनुभवुन पण बराच काळ लोटला असावा, दुपारचे मी म्हणनारे उन, जरासे विसावलेले घर, तुरळक कुठुनतरी येणारा मंदसा टीव्ही चा आवाज, अन आम्हा भावंडाचे त्या गर्द झाडांच्या सावलीत रमलेले खेळ !!
छ्या बॉ ... गेलेच ते दिवस.
प्रतिक्रिया
चिव चिव...
उत्कंठावर्धक...
छान लेख..
घरं कौलारू....
शिर्षक
आवडले!
धन्यवाद! हे वाचून ....
ग्रेस
छान विषय.
अबब
गैरसमज
चिउताई
सुंदर..
हेच म्हणतो....
मस्त लिहिले आहेस..
सुंदर
चिऊताई, चिऊताई, दार उघड!
डांबिसकाक
सुरेख आठवणी. ......
छोटेखानी छान स्फुट!
प्राजुताई,
छान!
लहानपण
..
सुंदर
धन्यवाद..