बर्याच वेळा जी गोष्ट आपल्या हातुन निसटत आहे ती धरुन ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो. भाषा,तारुण्य. पैसा,सत्ता, सौंदर्य, आरोग्य वगैरे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
भोचकरावांनी इंदूरमधल्या मराठी समाजामधील वैशिष्ट्यांचे सविस्तर आणि सुंदर वर्णन केले आहे. माझे कांही आप्त इंदूरवासी आहेत. त्यांच्याबद्दल माझी जी संकल्पना आहे त्याच्याशी ते बरेच मिळतेजुळते आहे. भोचकराव हे स्वतः जुने इंदूरवासी आहेत की नवस्थलांतरित आहेत हे त्यांनी लिहिलेले नाही, पण त्यांच्या शुद्ध मराठी वरून त्यांनी मराठी भाषेचे शिक्षण घेतले असावे असे वाटते. त्यांनी इंदूरला इंदौर म्हंटलेले नाही.
भाषा हरवते म्हणजे काय असा प्रश्न मला नेहमी पडतो. आज जी शुध्द मराठी भाषा लिहिली जाते ती घरात कोणीसुध्दा बोलत नाही. 'झाले', 'गेले' या शब्दांचा बोलतांना 'झालं', 'गेलं' असाच उच्चार असतो, पण तोसुध्दा 'झालम्', 'गेलम्' यापेक्षा वेगळा असतो. मालवण पासून गोंदियापर्यंत आणि डहाणूपासून सोलापूरपर्यंत महाराष्ट्राच्या सलग प्रदेशातल्या बोलीभाषेतसुध्दा प्रचंड फरक दिसतो. इतकेच नव्हे तर इंदूर, ग्वाल्हेर, सागर आणि जबलपूरचे मराठी भाषिक त्यांच्या बोलीवरून वेगळे वाटतात. तंजावर आणि मंगलोरला शहाजी महाराजांच्या काळापासून स्थायिक झालेले मराठी लोक आहेत. त्यांची मराठी बोली तर मलासुध्दा अगम्य वाटते. मी मुंबईला आलो तेंव्हा माझ्या बोलण्यात 'वट्ट', 'हुम्म' यासारखे कानडी शब्द यायचे, मुंबईतल्या गुजराथी लोकांच्या बोलण्यातून 'वांधा', 'सरस' यासारखे शब्द आले तर हिंदीमधून 'सही' (स्वाक्षरी नव्हे), 'मस्त' वगैरे शब्द. आता त्यांचा समावेश मराठीत झाल्यासारखाच आहे. माझ्या लहानपणी कायम तोंडात असलेले 'सदरा', 'विजार' हे शब्द आता कोणाच्या बोलण्यात येतच नाहीत.
थोडक्यात सांगायचे झाले तर भाषा ही स्थळकाळानुसार बदलत असते. इंदूर असो किंवा तंजावूर, मॉरिशस किंवा लॉस एंजेलिस, तिथल्या मराठी माणसाला आपण 'मराठी' आहोत असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत तो अंशतः का होईना पण आपली एक स्वतंत्र अशी ओळख ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. याच्या अगदी दुसर्या टोकाला जाऊन पुण्यामुंबईत राहणारे पण संपूर्णपणे इंग्रजाळलेले महाभागसुध्दा क्वचित कधी दिसतात. त्यांना जर आपण 'मराठी' आहोत असे वाटतच
नसेल तर त्यांना मराठी भाषा येते की नाही याला फारसा अर्थ नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
लेख आवडला. प्रकाशरावांशी सहमत आहे. कुठल्याही ओळखीला (आयडेंटिटी) - सांस्कृतिक, धार्मिक वा अन्य - धोका निर्माण होतो किंवा तशी भावना असते, तेव्हा आपल्या मुळांना धरून ठेवण्याकडे अधिक कल असणे स्वाभाविक आहे. साठच्या दशकात तामिळनाडूत पेरियारांच्या प्रभावाखाली आपली हिंदू ओळख अमान्य करणार्या बहुजन समाजाचेच प्रतिनिधी जेव्हा श्रीलंकेत आपल्या धर्माला दुय्यम दर्जा मिळतो आहे म्हणून ती ओळख हिरीरीने मिरवतात; त्यामागचे कारण हेच असावे.
मद्रासमधल्या मराठी भाषकांचीही अशीच मानसिकता आहे हे मस्त कलन्दर यांनी लिहिलेल्या या लेखातील अनुभवावरून कळून येईल.
हाच मुळात मोठा रोचक प्रश्न आहे. "नेतिनेति"चा नियम लावायचा झाल्यास अस्तित्व म्हणजे निव्वळ मराठी भाषा असे बिलकुल नाही. मराठी भाषेशिवाय मराठी माणूस ही मरणप्राय कल्पना वाटली तरीही निव्वळ भाषा येत नाही म्हणून 'तू मराठी नाय बां' असे म्हणून एनआरएमच्या पुढच्या पिढ्यांना हिणविणे योग्य होणार नाही.
आईवडील मराठीत बोलणार आणि मुले हिंदीत हा प्रकार दिल्लीतील मराठी मंडळीत (किंबहुना तसा तो मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या सगळ्याच ठि़काणी) आढळतो हे पाहण्यात आहे.
लेखातील इंदूर वर्णन आवडले... समाज चित्र आणि लेखकाचे विचार चांगले मांडले आहेत. धन्यवाद!
(इंदूरला जाण्याचा योग लवकरच साधायला हवा या विचारात गढलेला) एकलव्य
परवा कविवर्य महाराष्ट्रभूषण श्री.मंगेश पाडगावकर ठाणे येथे आमच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना जेव्हा मराठी भाषेचे भवितव्य काय ? हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी छातीठोकपणे सांगितले
"की काही मूठभर लोकांच्या कारवायांमुळे मराठी भाषा मरणार नाही "
आणी हे सांगताना त्यांनी मध्य प्रदेशचेच उदाहरण दिले.
बाकी लेख छानच . मस्त जमलाय.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
मराठी भाषा अजूनही इतर प्रातांत चांगली बोलल्या जाते, ही एक मराठी माणसाला आनंद देणारी गोष्ट. सांस्कृतिक-सामाजिक आणि राजकारणातही मराठी टीकून आहे, त्याचा घेतलेला धावता आढावा, आवडला.
भाषेत बदल हे साहजिक आहेत आणि असे बदल स्वीकारले पाहिजेत. उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते.
-दिलीप बिरुटे
प्रतिसादाच्या बॉक्सची लांबी, लैच लांबल्यासारखी वाटते
लेख आवडला.
उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते.
शंभर टक्के सहमत. मराठीने सोवळेपणा सोडला, तरच तिची वाढ होईल.
यादी मराठी म्हनजे देवनागरी ..?
जगमोहन प्यारे जी,
देवनागरी ही लिपी आणि या लिपीत मराठी, हिंदी, नेपाळी या भाषा लिहिल्या जातात. आपण संस्कृतही याच भाषेत लिहितो. अरगद म्हणजे काय आपल्याला माहित आहे काय? त्याला मराठीत तूरडाळ म्हणतात ! हा फक्त मासला. वाणसामानात अनेक वस्तू आहेत, ज्यांना हिंदीत 'कम्प्लिट' वेगळी नावं आहेत. वानगीदाखल माझा या विषयावरचा हा लेख वाचावा.
http://www.misalpav.com/node/4037
बाकी प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
लेख एकदम सुंदर.
भाषा आणि संस्कृती या बाबत विचार करता मला नेहमीच आज आसपास शहरी लोकांच्या तोंडी असणारी मराठी आणि त्यांचे वागणे विचारात टाकते. इंग्रजी, हिंदी मिश्रित बोलणे ते सुद्धा इंग्रजी लकबीने हे संस्कृती पासून दुरावणे आहे की वाढदिवसाला केक कापण्यासारख्या प्रथा (हे एक उदाहरण म्हणून) अंगीकारणे हे संस्कृतीपासून दूर जाणे आहे हे मला कळत नाही. आपल्या लेखात वर्णन केलेले लोक बोली वेगळी बोलत असले तरी रीती-रिवाजांना जास्त चिकटून आहेत आणि ते आशादायक आहे असा सूर दिसतो.
-- लिखाळ.
मराठी लँग्वेजचं फ्युचंर मध्ये काय होणार गॉड नोज !
प्रतिक्रिया
उत्तम माहिती
लेख
+१
लेख
भाषा हरवली म्हणजे नेमके काय?
भाषा/अस्तित्व
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अस्तित्व म्हणजे काय?
परवा
लेख आवडला.
आवडला
यादी
मराठी म्हनजे देवनागरी ..?
मध्यप्रदेशातील अनुभव
लेख एकदम