Skip to main content

बंगाली (बेगानी) शादीमे "खुर्शीद" दिवाना

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 11/08/2024 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
बांगलादेशातील "बंधूनी" बांगला बंधू चा पुतळा पडून जो उन्माद चालवला आहे , देशाचं पंतप्रधानांच्या घरात घुसून त्यांचे ( ते सुद्धा स्त्री चे) अंत्वस्त्र फडकवणे ( बंगाल संस्कृतीचे हे घृणास्पद दृश्य ) असे "चाळे " केले ते बघून काही महा महिमानां "मोदींचे हि हेच होईल " "भारतात हेच होऊ शकते" अशी विधाने करावीशी वाटली .. हे विरोधक असे करून भाजप किंवा देशाचं पंतप्रधांनाचा अपमान करीत नसून अख्या देशाचा अपमान करीत आहेत , भारतात कशीहि असली (व्हॉ लाटा इल) तरी लोकशाही आहे , नसती तर २०२४ वर्षी निवडणूक झालय नसत्या , पत्रकार मोकळे नसते , १९७५ प्रमाणे सर्व विरोधक तुरुंगात असते , काँग्रेस वर बंदी असती वैगरे हे लोक हे विसरतात कि इतिहासात बघता १९७७ साली देशाची जनता इंदिरा गांधींवर नाराज होती पण जनतेने त्याना लोकशाही मार्गाने हटवले , जाऊन त्यांचं घरावर हल्ला नाही केला कि त्यापेक्षाही बीभत्स प्रकार केला नाही जो बांग्लादेशात झाला... एकवेळ पाकिस्तान परवडला सरळ तो काय करणार हे माहित तरी असते , पण हे "अहसनफररा मोश" बंगाल बंधू नको असे झालाय हे विसरतात कि एकाच धर्माचे असणाऱ्या गोऱ्या पंजाबी पाकिस्तानी मुसलमानांनी बंगाल्यांना काळे आणि बुटके म्हणून हिणवले होते आता या बेगानी शादीत "लीडर ऑफ ऑपॉसिझिशन" काय नाचतील ते बघणे नशिबी आहे ... हे राम

वाचने 5445
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

आरक्षण मुद्दा का होता तो तिकडे कसा काय आला. नक्की कशाला विरोध होता? हसीनाला का त्यांच्या पक्षाला? हसीना बाईंचं म्हणजे पंतप्रधानांचं घर लुटताना सुरक्षा रक्षक कुठे गेले? एका बाईने मात्र डायर ब्रांडची सूटकेस नेली. आनंदात एक फोटोही दिला.

कुठल्याच देशाचे सरकार अल्पसंख्याक समुदायाचे अशा परिस्थितीत रक्षण करू शकत नाहीत. त्यांना वाऱ्यावर सोडून देते. काही प्रश्न.... शेख हसिना यांना भारतात येणे सुरक्षित का वाटले ? मध्यपुर्व देशात का गेल्या नाहीत? साहेबांच्या देशात राजकीय शरणागत म्हणून का रहावेसे वाटले? सीमेवर जमा झालेल्या वंग हिन्दू बांधवांचे भविष्य काय? आशा वेळेस भारत हा हिन्दू देश आहे असे एतद्देशीय व पिडीतांना का वाटते? या प्रश्नांमधून कुठल्याच प्रकारचे राजकारण, धर्मकारण शोधू नये. पडलेले प्रश्न हे वस्तुस्थितीवर अवलंबून आहेत. @ संपादक- प्रतिसाद चुकीचा वाटल्यास सरळ उडवून टाकावा.

शेख हसिना यांना भारतात येणे सुरक्षित का वाटले ? सर्वात पटकन म्हणून असले, दुसरा उपाय म्हणजे नेपाळ किंवा भूतान पण त्यापेक्षा भारत जास्त बरे हे तर्काने आलेच किंवा इतर देशांचं ढाक्यातील दुतावासात जाणे कदाचित धाक्का शहरात तसे जाणे त्यांना जास्त धोक्याचे वाटले असेल साहेबांच्या देशात राजकीय शरणागत म्हणून का रहावेसे वाटले? नंतर करतील हि कारण इंग्लड मध्ये पार्वेझ मुशरीफ यांनी पण आश्रय घेतलाच होताच कि , कदाचित साध्य इंग्लडच्या दावे सरकार असल्याने त्यांनी कानाडोळा केला असेल ( पाश्चिमात्य डाव्यान्न भारतातील उजवे सरकार आवडत नाही आणि हसीना पडल्या भारत सरकारच्या मित्र ) सीमेवर जमा झालेल्या वंग हिन्दू बांधवांचे भविष्य काय? याला विरोधकांनी "एक देशाचा प्रश्न " असे समजून मदत केली तरच सरकार करेल... भाजप ला कोंडीत पकडणायची संधी म्हणून या कडे बघितले जातंय मग भाजप कसे करणार , केले तर परत हिंदुत्ववादी म्हणून ९९ वाले बोम्ब मारणार मुस्लिम देश पॅलस्टीन ला मदत करतात ख्रिस्ती बहुल देश इस्राएल ला किंवा इतर ख्रिस्ती ( ऑस्ट्रेल्या ने मुस्लिम इंडोनेशियातील ख्रिस्ती बहुल असलेल्या ईस्ट तिमोर ला स्वतंत्र होण्यात मदत केली हे सर्व असून सुद्धा भारतीय विरोधक मात्र भारत सरकारने भारताबाहेरील हिंदूनं मासात केली कि पोटशूळ उठतो ... काय करणार ! आशा वेळेस भारत हा हिन्दू देश आहे असे एतद्देशीय व पिडीतांना का वाटते? हिंदू देश सोडून द्या हो ( आणि तसे नाही झाले तरी चालेल) पण हिंदूंना मान असलेले देश झाला तरी पुरे ,,, सामान नागरी कायंदा पण हिंदू जनतेलाच स्वतःचं पायावर धोंडा मारण्यात जास्त रस आहे, जगात २ अब्राहमीक धर्म आपापले झाकून ठेवता आणि आपण हिंदू मटार स्वतःचे उघडे कडून दाखवण्यात जास्त रस ठेवतात . काय बोलनार साला ख्रिस्ती देशाच पंतप्रधान रविवारी अभिमानाने चर्चात जातो पण भारतीय पंतप्रधान हिंदू मंदिरात गेलला तर विरोधकानं अल्सर होतो

असे कदापी नाही. भारताचे आजचे अंतरराष्ट्रीय स्थान व कणखर नेतृत्व (काही लोकांना शंका असेल मला नाही) व त्यांचे स्वताचे व्यक्तिगत संबध या मधून हा निर्णय घेतला असावा. गिव्हन ऑप्शन्स, मनोमन त्या स्वतःच इतरत्र कुठेही जाण्यास तयार होणार नाहीत. असे मला वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

शेख मुजीबूर रहमान यांच्या मृत्यूनंतर शेख हसिना बरीच वर्षे भारतातच राहात होत्या की.

तुम्ही दिलेल्या कारणासाठीच भारत हा नेपाळ / भूतान पेक्षा जास्त यौग्य वाटणे साहजिक आहे त्यांना हेच माझेही म्हणणे आहे फक्त त्या बहुतेक कायमचं तिथे राहतील असे वाटत नाही , बहुतेक इंग्लंड ला जातील असे वाटते किंवा निवृत्ती मुशारफ नि घेतली तशी

काश्मिर सीमेवरील दहशतवादाला भीक घालत नाही पाहून पाकड्यांची भारत आनी बांदे मधील लिब्राण्डू लोकांना हाताशी धरून नवा दहशतवाद आरंभलाय ! मोदींच्या नेतृत्वाखाली सगळं ठिकठाक आणि विकास सुरू आहे हे बघून काही नतद्रष्ट मंडळींना मळमळ होतेय ! आता आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी भारतीयांनी पुढं आलंच पाहिजे !

काही महा महिमानां "मोदींचे हि हेच होईल " "भारतात हेच होऊ शकते" अशी विधाने करावीशी वाटली
च्यायला, कोण बोललं हे आता ? हे लोक काही तुम्हाला तुमच्या देशात सुखाने जगू देत नाहीत. आपण ताण घेऊ नये. आपण अशा लोकांचे घर उन्हात बांधू. बाय द वे, या उन्हावरुन आठवलं आपल्या देशात पाऊस कसा पडतो आहे ? इकडे मराठवाड्यात दोन महिने झाले सालं नीट पाऊस नाही. धरणात पाणी नाही. पाण्याचा वापर प्रचंड वाढला आहे, भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे, पाण्याला गंभीरपणे घेतले पाहिजे. एवढे बोलून थांबतो. -दिलीप बिरुटे ( लैच बीझी असलेला )

स्वतःला प्रोफेसर म्हणवणाऱ्या माणसाला प्रतिवादी मुद्दा सुचू नये आणि तो नाय सुचलं कि लिहिणाऱ्याचा देश काढायचा,,, बर प्रो इकडे पाऊस पाणी मस्त आहे/ त्यामुळे रोज पॉट पण साफ होते शिवाय हगीनदारीची ची सोय पण उत्तम आहे तुमचं आजू बाजूला काय वणवा लागलाय तो बघा

In reply to by चौकस२१२

मस्त काळजी घ्या... =)) >>> तुमचं आजू बाजूला काय वणवा लागलाय तो बघा. आमचं जनरल मत असं आहे की, परदेशात बसून द्वेषाच्या काड्या सारणे कमी झाले की वणवा लागणार नाही. आपल्या बद्दल नाही म्हणत बरं का काका. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परदेशात बसून द्वेषाच्या काड्या सारणे कमी झाले की वणवा लागणार नाही. :) :) :)

परदेशात बसून द्वेषाच्या काड्या सारणे कमी झाले की वणवा लागणार नाही. ओह मी. बिरुटे काय द्वेषाचं काड्या घातल्यात? मी आ? खुर्शीद सारखा अनुभवी राजकारणी असली विधाने करतो , तर एक हिंदू म्हणून वाटले तर तुम्हाला काय झोंबतंय? आणि देशी परदेशी असले बाष्कळ मुद्दे बाजूला ठेवा मुद्याचा बोलता येत नसल कि हि गरळ ओकता ....

वाचत आहे... @चौकस २१२, जेंव्हा,वैचारिक मंथन करता येत नाही, तेंव्हा काही सदस्य, "मनोरंजक" प्रतिसाद देऊ शकतात. अशा सदस्यांना फाट्यावर मारणेच उत्तम...

मुक्त विहारि , तुम्ही म्हणताय ते पटतंय पण वळत नाही कारण चुकीचे आणि घाणेरडे आरोप आपल्याला सहन होत नाहीत म्हणून उत्तर देत राहतो आता पर्यंत मिपावर कधी भारताची बदनामी मी केलेली नाहीये , उलट केलं असले तर कौतिक आणि सध्या बांगलादेशातील हिंदू यावर भारतात बसून जे लोक बोलत आहेत तसेच मी लिहिले तर "परदेशातून लिहिता" असल्या बाष्कळ विधानाचा आता कंटाळा नाही तर राग यायला लागलाय एकवेळ हे प्रोफेश्वर म्हणले असते कि "बांगलादेशात असे काही घडतच नाहीये" तुम्ही कळते बोलताय तरीही हा प्रतिवाद ठीक आहे पण परदेशात राहून भारतात काड्या? हे काय काय घातल्या काड्या ? मतभेद जरूर असणार आणि कोण्ही कोणाचेही म्हणणे खोडून काढू शकतो पण स्वतःला प्रोफेसर म्हणनेणारी व्यक्ती या पातळीवर उतरते मग तुमचं देशातील हंगिन्दरी कशी काय असेल फालतू आणि ना शोभणारे मुक्तफळे उदाहलवाली जातात मिपा ची माफी मागून मी खालील लिहीत आहे प्रो बिरुटे तुम्ही माझ्यवरील असले बिनबुडाचे आरोप ताबडतोब थांबवा, लै झाल, हे वयक्तीक होतंय दुसरं जाहीर पण विचारतो कि हे महाशय संपादक मंडळावर आहेत कि नाही याचा खुलासा इतर संपादकांनी करावा .. कारण ते असतील तर मग पदाचा दुरुपयोग करीत आहेत ..

In reply to by चौकस२१२

ज्यू हा कुठल्याही देशात जन्माला आला तरी तो , इस्राएलचा नागरिक होतो. तसेच, भारताचा भले व्हावे, असे इच्छिणारे, मला तरी आवडतात, मग भले ही ते कुठल्याही देशात राहो. बाय द वे, सोरोस बद्दल जी काही माहिती मिळालेली आहे, ती इथे लिहिण्यात काही अर्थ नाही. बांगलादेश मध्ये, जे काही होत आहे, त्याची सुरुवात सुमारे ५-६ शतके आधी पासूनच झाली आहे आणि आता त्याला अंत तेंव्हाच होईल की जेंव्हा ते संपुर्णरित्या मुस्लीमराष्ट्र होईल आणि नंतर ही टोळधाड भारताच्या मागे लागणार. आझाद मैदान येथे झालेली लिटमस टेस्ट, पुरेशी बोलकी आहे... झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला जागे करण्यात , मी तरी माझा वेळ खर्च करणार नाही.

In reply to by मुक्त विहारि

सोरोस बद्दल जी काही माहिती मिळालेली आहे, ती इथे लिहिण्यात काही अर्थ नाही.
मुविकाका विषय मोठा आहे पण ती माहिती नविन लेखात इथे अवश्य लिहा. ह्या अँटीफा वाल्यांचे आणि भारतातील त्यांच्या चट्ट्या बट्ट्यांचे वस्त्रहरण करणे ही काळाची गरज आहे. जनहितासाठी त्यावर लिहिण्याचे मनावर घ्याच!

In reply to by टर्मीनेटर

नक्की लिहावे. फक्त व्यवस्थित फॅक्ट चेक करून लिहा, पुरावे वैगेरे गोळा करून नाहीतर दुसऱ्याचेच वस्त्रहरण होईल.

In reply to by टर्मीनेटर

तुम्हाला वैयक्तिक काही माहिती हवी असेल तर, George Soros बद्दल बरीच छापील माहिती मिळेल... एक लिंक पाठवतो..... https://www.aajtak.in/business/news/story/who-is-george-soros-know-all-… ---- वरील लेखातील, काही वाक्ये थोडी नजरे खालून घातलीत तर उत्तम... ----- अब आपको बताते हैं कि जॉर्ज सोरोस ने कब-कब भारत को निशाने पर लिया है. - भारत में नागरिकता संशोधन कानून और कश्मीर से आर्टिकल 370 हटाए जाने को लेकर जॉर्ज सोरोस ने पीएम मोदी पर निशाना साधा था. सोरोस का आरोप था कि भारत हिंदू राष्ट्र बनने की ओर बढ़ रहा है. (पाकिस्तानी, रोहिंग्या मुस्लीम आणि बांगलादेशी मुस्लीम, हे भारतातील जनतेला त्राही त्राही करुन सोडतील, हे आपल्याला चालेल का?) - पिछले साल जनवरी में जब हिंडनबर्ग से अडानी ग्रुप पर सवाल उठाया तो हाथ सेंकने के लिए जॉर्ज सोरोस भी सामने आ गए थे. जॉर्ज सोरोस ने अडानी मुद्दे के बहाने फिर पीएम मोदी पर निशाना साधा था. सोरोस ने दावा किया था कि अडानी के मुद्दे पर भारत में एक लोकतांत्रिक परिवर्तन होगा. (अडानी असो किंवा अंबानी, हे भारतीय उद्यागपती आहेत. इथला बराचसा पैसा इथेच राहील. हा माणूस मल्ल्या गृप बद्दल मात्र मौन बाळगून आहे.) - वैसे जॉर्ज सोरोस बेतुके बयान देने में भी पीछे नहीं रहते हैं. बीते दिनों उन्होंने म्यूनिख सिक्योरिटी कॉन्फ्रेंस में कहा था कि भारत एक लोकतांत्रिक देश है, लेकिन नरेंद्र मोदी लोकतांत्रिक नहीं हैं. मोदी के तेजी से बड़ा नेता बनने के पीछे अहम वजह मुस्लिमों के साथ की गई हिंसा है. (मग हाच माणूस, बांगला देशातील हिंदू हत्याकांडा प्रकरणी मौन बाळगून आहे...) - इससे पहले 2020 में जॉर्ज ने कहा था कि मोदी के नेतृत्व में भारत तानाशाही व्यवस्था की ओर बढ़ रहा है. ये बयान उन्होंने वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में दिया था. उन्होंने जम्मू-कश्मीर से आर्टिकल 370 हटाने और नागरिकता संशोधन कानून (CAA) का भी खुलकर विरोध किया था. (370 कायदा रद्द झाल्या मुळे, आज इतर राज्यातील जनता देखील काश्मीर मध्ये जागा विकत घेऊ शकते...) ----- बाय द वे... 1992 में बैंक ऑफ इंग्लैंड को बर्बाद करने के लिए जॉर्ज सोरोस को कसूरवार माना जाता है. -------- यू ट्यूब वर एक बरा व्हिडिओ आहे.. https://www.youtube.com/live/4nTjYS_VP8I?si=hSclzzrrjlixCYYk

In reply to by चौकस२१२

दुसरं जाहीर पण विचारतो कि हे महाशय संपादक मंडळावर आहेत कि नाही याचा खुलासा इतर संपादकांनी करावा .. कारण ते असतील तर मग पदाचा दुरुपयोग करीत आहेत ..
असा थेट कासोट्याला हात घालायचा नसतो! --- एकूणच प्रतिसादांशी असहमत नाही.