मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव

वडगावकर · · जनातलं, मनातलं
लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... ) वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की... भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे. गेल्या दोन अडीच वर्षात साधारण १०/११ जणांची पाकिस्तानात हत्या झालीये. त्या सगळ्या हत्यांमध्ये एक सूत्र सामान आहे , हे सगळे कार्यकर्ते भारतविरोधी प्रचारामध्ये किंवा प्रत्यक्ष वा अ-प्रत्यक्ष कारवायांमध्ये गुंतलेले होते ईस मे रा की साजिश है (रॉ नाही बरका) पाकिस्तानी चॅनेल्स कंठशोष करून सांगतायेत... कॅनडा मध्ये हरदीप सिंग निज्जर ची हत्या....अननोन गनमॅन येतायेत आणी ठोकून जातायेत रॉ ही संघटना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे धीट बनली असल्याचे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानतात. त्यामुळेच निव्वळ हेरगिरीपुरते सीमित न राहता रॉ त्यापलीकडे जाऊन कारवायादेखील करू लागल्याचे या वर्गाचे म्हणणे आहे. रॉ चा दबदबा गेल्या काही वर्षांमध्ये विलक्षण वाढला असल्याचे भारतविरोधी गटही मान्य करतात. पण भारताने ताबडतोब आपले स्पष्टीकरण दिले आणी अर्थातच कानावर हात ठेवले आम्ही गौतम बुद्ध आणी गांधींच्या तत्वा चालणारा लोकशाही देश आहोत आणी आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय कायदे आणि संकेतांचे पालन करण्याचे धोरण कटाक्षाने राबवले आहे हिंसा और हम?...ना बाबा ना... हम तो अहिंसा के पुजारी है भैया तर मंडळी, आपले समर्थ रामदास स्वामी सांगूनच गेले आहेत की... हुंब्यासी हुंबा लाउनी द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा | लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी ठाकूर बलदेव सिंग के शब्दो मे बोलनेका बोलेतो...लोहा ही लोहे को काटता है और अजित डोभाल के शब्दो मे बोलनेका बोलेतो....मौनं सर्वार्थ साधनम्, अर्थात.... मौन रहने से सभी कार्य पूर्ण होते है जमतारा चा फेमस डायलॉग आठवला... "सबका नंबर आयेगा"

वाचन 22891 प्रतिक्रिया 105