मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोकण रेल्वे - महाराष्ट्रासाठी!

कंजूस · · काथ्याकूट
कोकण रेल्वे खरोखरच महाराष्ट्रातील कोकणासाठी आहे का? ही रेल्वे म्हणजे रोहा ते मंगळूरू भाग. रोह्याअगोदर आणि मंगळुरूपुढे रेल्वे होतीच. मग घाट टाळून सह्याद्रीच्या पोटातून बोगदे खणून रेल्वे सुरू झाली. ताशी १५०किमी वेगानेही गाडी जाऊ शकणारे एकेरी मार्ग झाले. याचे श्रेय मधू दंडवते,श्रीधरन आणि प्रभूंना दिले गेले. जपानी तंत्रज्ञान विकत घेतल्याने श्रेयाची भानगड नाही. पण आता २०२२ जानेवारी नंतर काय झाले ते पाहा. महाराष्ट्रात फक्त कोकणात जाणाऱ्या गाड्या तीनच. १)पहिली जनता गाडी 10105 हिला 'दिवा-सावंतवाडी passenger' मधून 'सिंधुदूर्ग express' केली. पेण स्टेशन गाळले! पण सावंतवाडी पोहोचण्याच्या वेळापत्रकात काहीही बदल नाही. सोळापैकी पूर्वी दोन डबे आरक्षित होते ते सर्व आरक्षित केले. तिकिटे दुप्पट झाली. २)दादर -रत्नागिरी passenger ही passengerच ठेवली पण दादरऐवजी दिवा येथून सोडली. म्हणजे या दोन्ही गाड्यांसाठी दक्षिण आणि पश्चिम मुंबई उपनगरांतील प्रवाशांना लोकल ट्रेनने दिव्याला आले पाहिजे. ३)दादर - सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस 11003. यात काही बदल नाही. ४) सकाळी सहाच्या दरम्यान सुटणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस 12051 तेजस एक्सप्रेस 22119 डबलडेकर कुर्ला मडगाव 11085 या गोव्याच्या गाड्या आहेत. ५)इतर सर्व गाड्या कोकणातून पुढे कर्नाटक, केरळ जाणाऱ्या आहेत. फक्त कोकणच्या नाहीत. कोकण हा शब्द फक्त महाराष्ट्रात बोलतात- गोवा,कर्नाटक, केरळात नाही. ६) इथे जसे घाट नाहीत तसे गुजरातकडेही नाहीत. मग तिथे किती passenger गाड्या धावतात पाहा. मग असा प्रश्न येतो की रेल्वे मंडळात कुणी मराठी अधिकारी उरला नाही / कुणी नेता आता लक्ष घालत नाही?

वाचन 6195 प्रतिक्रिया 18