तु !
एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र...
************************************
किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ? तु म्हणजे मी व मी म्हणजे तु असेच तु कधी तरी आनंदात गात असे, तुझ्या व माझ्यात काहीच फरक नाही, तु येथे नसून ही जगत आहेस व मी असून ही नसल्यासारखा आहे........रणरणत्या उन्हामध्ये, दुपारी घोंगावत असलेल्या गरम हवा मध्ये तर कधी भर मुसळधार पावसामध्ये मी आपले, जगणे मरणे विसरुन तुझ्या मागे धावत असे, कधी सावली मध्ये तर कधी भर दुपारी तुला पाहताना, तर कधी तुझ्या नकळत झालेल्या स्पर्शामुळे अंगावर रोम रोम उभे होता ना, तर कधी असेच भिजलेला तुझा समोर येताना..... तुला सकाळ सकाळी पाहताना, खरं तर ह्या शब्दांना, ह्या आठवणींना आता काहीच किंमत राहीली नाही आहे मला माहीत आहे, तरी ही कधी कधी तूझी आठवण येते, असेच जेव्हा मी नदीच्या काठी बसलेला असताना, तरी कधी मंदिरासमोर उभे असताना, कळत नकळत तुझा विचार करताना, काही क्षण थबकतात तुझ्या माझ्यासाठी, अचानक एक वादळ येते व सर्व काही हवेमध्ये भिरकाकून देते, आजकाल त्याची सवय झाली आहे, अशी अनेक वादळे... ऋतु मी पाहिली जिवनामध्ये, अथांग तुझ्या आठवणी मध्ये.. तु कोठे तरी हरवली आहेस हे माहीत असून देखील तुला शोधताना.......
तुझ्या अस्तित्वाशिवाय जगणे सध्या मी शिकलो आहे, काही असावे अथवा नसावे त्याशिवाय हरणे, जिंकणे मी शिकलो आहे, माहीत नाही का जगतो आहे पण उद्या सकाळ होणार आहे हे माहीत असून ही अंधकारात काहीतरी शोधतो आहे, काय हरवले हे माहीत नाही पण काही तरी मुल्यवान होते, तुझ्या व माझ्याबद्दल होते, जे हरवले आहे, जरुर ते काही क्षण असावेत, पण ते माझे व तुझे होते, ज्यांची किंमत जगातील कुठलीच गोष्ट करु शकत नाही, ते क्षण मातीमोल झाले होते, ह्याला तु जबाबदार नाहीस, ना तु कारण, हे तुला ही माहीत आहे व मला ही, तरी ही असेच कधी तर काही शब्द असेच कळत न कळत बाहेर पडतात... तु जे काही मागीतलेस ते दिले, काही शब्द, काही वचने तर कधी श्वास माझा , तुला हवे ह्या विचारानंतर तर माझ्याकडे काही प्रश्नच नव्हता नकार देण्याचा, तु मागितलेस तर जीव ही देण्याचा मी शपथा खाल्या. जेव्हा तुच माझ्या सोबत नव्हतीस... अशीच अधांतरी मला सोडुन गेली होतीस, तेव्हा देखील मी तुझ्याशिवाय जगण्यापेक्षा म्हणजे मरणे काय वाईट हा विचार केला, पण तरी ही जगतो आहे, कधी कळत न कळत वचन दिले होते तुला, त्याची सजा अशी मिळेल, माझ्या हे कधी मनात देखील आले नव्हते...पण तु दिले ती सजा जगणे, व आपले सर्वस्व वाहते बघणे हेच माझा नशीबी आहे.... तिळ तिळ मरणे ह्याचा अर्थ आज ऊमजला आहे.... मला !
कधी तू विचार केलास माझा ? तु गेल्यावर मी जगेन, मरेन ह्याचा विचार तरी आला तुझ्या मनात ? ह्या प्रश्नाने आजकाल जगणे अवघड केले आहे, हे जगणे पण एक कर्ज आहे, तुझ्या शिवाय जगणे म्हणजे सध्या तुझ्याकडे रोज एक अर्ज आहे... कधी तरी तुला पाहीन व मग जाईन ही इच्छा मनात होती.. तसे पाहता नेहमी मी काहीच मागत नाही. त्याच्याकडे जो नेहमी म्हणतो मी आहे ना... जेव्हा मी तुझ्यापाठीशी तेव्हा तुला कसली काळजी ! खरंच सध्या काळजी नाही, खरंच काळजी नाही, तिळ तिळ मरताना मी कधी संपून गेलो हे कळालेच नाही, का तुला त्रास द्यावा ह्या विचाराने कधी तुझ्याजवळ आलोच नाही... जेव्हा आलो तेव्हा माझे विचार माझे राहिलेच नाही, तु माझ्यापासून दुर जाताना तुला काय वाटले हे माहीत नाही पण तु दुर गेलीस..... तो क्षण...कधी माझ्यातील मलाच मारुन गेला हे कळालेच नाही.....असे का केले नशीबाने माझ्या बरोबर हा प्रश्न कधी विचारलाच नाही, तरी ही मी तुझ्यासाठी... हरणे सोडलेच नाही, कधी बाईकवरुन तर कधी गाडीवरुन जिवनाची पैज लावणे सोडलेच नाही, तुझ्या बरोबर तो मत्यु ही सध्या माझ्या पासून दुर राहतो, जेव्हा जेव्हा आपलसं केले त्याला तेव्हा तेव्हा तो माझा पासून दुर गेला..... संपवावे स्वत:ला... हा मार्ग मिळालाच नाही...असं नाही, पण आत्महत्या म्हणजे आत्मा गहाण ठेवण्यासारखं...... पुन्हा येथेच यावे लागेल, ज्या दुख: पासून, ज्या आठवणी पासून पळतो आहे... या दुख:ला, त्या आठवणींना पुन्हा आपलंस करण्यासारखं ! राहिलेल्या श्वासांचा हिशोब येथेच द्यावा लागेल, काही क्षणांना येथेच संपावे लागेल, मुक्ती मिळेल का नाही... हे माहीत नाही त्यामुळे स्वत: मरणे सध्या टाळत आहे..... ह्यामुळे अजून संपलो नाही। कधी तरी मृत्यु आपलाच समजून घेईल व आपल्या मिठीत घेईल....त्या क्षणाची वाट पाहत उभा आहे मी ..... असाच निशब्द.... जसा आपल्या पहिल्या भेटीत होतो......!
**************
वाचन
5083
प्रतिक्रिया
17