Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शुक्रवार, 01/03/2019 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
एकीकडे भारतीय उपखंडात दाटून आलेले युद्धाचे ढग अजून निवळलेले नसताना, दुसरीकडे पश्चिम आशियात भरलेल्या इस्लामी देशांच्या सहकार्य परिषदेच्या उदघाटन समारंभात भारत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिला आहे. याप्रसंगी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी प्रभावी भाषणातून इस्लामी जगताशी मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहजीवनाचा संदेश दिला आहे. भाषणाचा मजकूर इथे आणि विडिओ इथे आहेत. २०१९ वर्ष हे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर निश्चितच मोठ्या उलथापालथीचं ठरेल असं मला व्यक्तिशः वाटतं. १. या महिन्यातच (३१ मार्चपर्यंत) भारताकडून पाकिस्तानला अजून एक धक्का दिला जाईल - अ. मौलाना मसूद अझरला पकडणे / मारणे आ. सर्जिकल स्ट्राइक ३.० इ. अजून असंच काहीतरी २. श्री नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान बनतील. - महाराष्ट्रातील विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणूका लोकसभेच्या निवडणुकीसोबतच होतील. ३. या वर्षाअखेरीपर्यंत पाकिस्तानचे किमान दोन तुकडे होतील. ४. इझ्रायल चे पंतप्रधान श्री.बेंजामिन नेतान्याहू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कदाचित पंतप्रधानपद सोडावे लागेल.

वाचने 95432
प्रतिक्रिया 180

प्रतिक्रिया

In reply to by डँबिस००७

ही पण एक राजकीय खेळी आहे. आपण चर्चा करू व विसरून जाऊ, पण असे नाही आहे. मागे एकदा मुशर्रफ एका जाहिर मुलाखतीत म्हणाला होता कि सारे जग ज्यांना अतिरेकी म्हणते ते पाकिस्तानात हीरो आहेत. दाऊद, ओसामा, अल बगदादी, अल जवाहिरी इत्यादि. कारण ते इस्लामच्या झेंड्याखाली लढत आहेत. भारतात पण नेमका हाच प्रोब्लेम आहे. येथील बहुतांश मुस्लिम पाकिस्तानला इस्लामचा रखवाला मानतो. मग जर याचा फायदा उठवायचा असेल तर अशी विधाने येणे स्वाभाविक आहे . दिग्गीला जेव्हा विचारले की तुम्ही ओसामाला जी का पुकारले ? तेव्हा मनोरंजक उत्तर मिळाले की मेल्यानंतर सर्व दुश्मनी संपुन जाते. आपल्याला इतिहासात दाखवला गेलेला अतिरेकी अफझलखां आता अफझलबाबा बनून दर्ग्यात विसावला आहे. तीस वर्षापूर्वी जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा काही बुरखादारी स्त्रियां त्याच्या कबरिवर चादर चढवून दुवा मागत होत्या.

In reply to by भंकस बाबा

अफझल खान हा कट्टर इस्लाम चा पाईक होता. इतकेच काय पण औरंगजेब हा देखील त्या अर्थाने मोठा होता. भारतातील सर्वात मोठा भू भाग त्याने एका राजवटी खाली आणला. राज्याचा खजीना रीता करणार्‍या बापाला त्याने सत्तेवरून हाकलले.

In reply to by डँबिस००७

शेवटी कितीही झाकले तरी खांग्रेस चा चेहरा वेळोवेळी उघडा पडतोच. मसुद अजहर सारख्या आतंकवाद्याला आदरार्थी संबोधन वापरून त्यांनी दाखवून दिले कि फक्त xxxx मतांसाठी हे कोणत्या थराला जातील. आणि बहुतांश xxxx समाज देखील अश्या आतंकवाद्याबद्दल एकतर सहानभूती बाळगून आहे किंवा तटस्थ आहे. फार कमी लोक यांच्याबद्दल नेगेटिव्ह मत बाळगतात. त्यामुळेच तर अश्या xxxx घटकाला खुश ठेवण्यासाठी वेळोवेळी अशी विधाने खांग्रेस कडून केली जातात. याआधी सुद्धा हाफिज सैद चा आदरार्थी उल्लेख झालेला आहे. त्याचबरोबर झाकीर नाईक सारख्या जहाल माणसाला देखील खांग्रेस शासनात वेळोवेळी मोठे केले गेले होते हि गोष्ट स्वतः ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या लोकांना कधीच समजली नाही. पण जेव्हा समजेल तेव्हा परत लढण्यासाठी जितकि ताकद लागेल तितकी ते कदाचित उभारू शकणार नाहीत..

1983 ला मुंबई मध्ये 12 बॉम्बस्फोट झालेले होते . पण मुस्लिम वस्त्या टार्गेट होवू नयेत म्हणून 13 वा स्फोट मुस्लिमवस्तीत झाल्याचा दावा करून दूरदृष्टि दाखवणारे तेव्हांचे मुख्यमंत्री पवार साहेब यांनी टाइगर मेमन सह इतर आरोपीच्या सूटकेसाठी कोर्टात केस लढणाऱ्या माजिद मेमन ला राकॉ तर्फे राज्यसभेचे सदस्यपद बहाल केले . त्या ' 13 ' व्या खोट्या स्फोटा बद्दल ना खंत ना खेद पण माजिद ला सदस्य करून मुस्लिम समाजात राकॉ चा टक्का वाढविण्याचा व्यवाहरिक प्रयत्न केला . अशाप्रकारे लांगुलचालन करण्याचे प्रयोग आज पर्यंत चालूच आहे .त्या समाजातील वादग्रस्त लोकांना अशी बक्षीशी देणारे नेते हिंदूच असतात .

ते जाणते राजे आहेत. महाराष्ट्राची त्यानी किती किती आणि कुठे कुठे वाट लावून ठेवली आहे ते त्यांच्या नंतर पन्नस वर्षात ही समजणार नाही लोकांना. सम्रक्षण मंत्री अस्ताना त्यानी जे जे हॉस्पिटल हल्ल्यातील आरोपीना स्वतःच्या चार्टर विमानात लिफ्ट दिली होती. हे त्यानीच कबूल केले आहे. किरकोळ चौकशी होऊन पुढे ते प्रकरण बंद झाले ते कायमचेच

शहीद इशरतजहां एम्बुलेंस सर्विस विसरलात!

हि गोष्ट स्वतः ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या लोकांना कधीच समजली नाही. पण जेव्हा समजेल तेव्हा परत लढण्यासाठी जितकि ताकद लागेल तितकी ते कदाचित उभारू शकणार नाहीत.. हे एकदम बरोबर बोललात !! हिंदु एकत्र कधीच नव्हते ! एकत्र होऊ शकत नाहीत !! कारण त्यांना त्यांच्या जातीत विभागायच काम शास्त्रशुद्ध पद्धतीने गेल्या २०० वर्षांपासुन करण्यात आलेल आहे. त्या अगोदरही छोट्या लालसे पोटी, खोट्या आत्मविश्वासा पोटी विश्वासघात करण्याच काम लोकांनी वेळोवेळी केलेल आहे. त्याची बरीच उदाहरण ईतीहासात सापडतील !! शरद पवार , सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील सारखे हिंदु द्वेष्टे नेते शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला लाभावेत ह्या सारख दु:ख नाही. जेंव्हा मुसलमान लोक काफिर विरोध करायला लागतील तेंव्हा ते कोणत्याही जाती, पोट जाती, पोट धर्मांचा मुलाहीजा ठेवणार नाहीत त्यांच्यासाठी सगळेच काफिर , सगळेच हिंदु !! हा एकच मार्ग आहे हिंदुंना एकत्र करण्याचा !!

" शरद पवार , सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील सारखे हिंदु द्वेष्टे नेते शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला लाभावेत ह्या सारख दु:ख नाही. "

चीन ने अपेक्षेप्रमाणेच मसूद अझहर प्रकरणात युनो मधे पाचर मारली आहे. या मुळे चीन चे पाकिस्तान प्रेम ( सीपेक च्या सुरक्षिततेसाठी असेल कदाचित ) लपून राहिलेले नाही. चीन ने सीपेक च्या रस्त्यासाठी स्वतःची फौज तैनात केली आहे. पाकिस्तान ची काहिही वात लागू देत चीन सीपेक आणि ग्वादर बंदराबाबत फारच संवेदनाशील आहे जैश चे लोक चीन मधील मुस्लीमांवरच्या अत्याचारांबद्दल का कधीच बोलत नाहीत?

In reply to by विजुभाऊ

चीन मध्ये रोजा पाळण्यावर देखील बंधने आहेत.. बुरखा आणि दाढीवर देखील बंदी आहे. हे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करतात आणि भारतात मुस्लिमांवर खूप खूप अन्याय होतात अश्या बोंबा मारणाऱ्या pakistan ला लाज कशी वाटत नाही?? लाज वाटणार तरी कशी म्हणा.. पूर्ण देश हा xxxx धर्माच्या च्या कॅन्सर ने ग्रस्त आहे. त्यामुळे विवेकबुद्धीने आणि अक्कल वापरून विचार करण्याची शक्ती ते केव्हाच गमावून बसलेत.

In reply to by बाप्पू

काही बोलल्यावर लाथच बसण्याची शक्यता जास्त आहे. रशिया, चीन , जपान व इज्राइल या देशाना मुस्लिमाबाबत सल्ले देण्याच्या भानगडित कोणी पड़त नाहीत , कोण जाणो , है लोक दोन रट्टे अजुन ठेवून देतील !

In reply to by भंकस बाबा

त्यांना खरं काय ते समजलंय.. जास्त मानवतावादी झालो तर अजुन काही शे वर्षांनी सर्व जाऊन हिरवे हिरवे गार गालिचे दिसतील हे माहितेय.. जपानने तर अघोषित वाळीतच टाकलेय यांना.. भारतात खूप लाड पुरवले जातात एकदा ठोकर खाऊन पण आजून जिरली नाहीये...

In reply to by विजुभाऊ

चीन ला पाकिस्तान किंवा इस्लाम बद्दल यत्किंचितही प्रेम नाही. त्यांना प्रेम आहे ते फक्त "चीन बद्दल". ते पाकिस्तानचा उपयोग करतात तो फक्त भारतावर दबाव ठेवण्यासाठी आणि आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्यासाठी. चीनचा बहुतांश व्यापार मलाक्काच्या सामुद्रधुनीतून चालतो. हा अतिशय चिंचोळा समुद्रमार्ग भारताने तेथील देशांशी मैत्री साधून बंद केला तर आपला व्यापार आणि आर्थिक हितसंबंध सुरळीत राहण्यासाठी पाकिस्तानातून थेट अरबी समुद्रात उतरण्यासाठी मार्ग मोकळा हवा म्हणून पाकिस्तानशी केलेली मैत्री आहे. त्यात चीनचा भरपूर फायदा होतो आहे आणि पाकिस्तान अधिकच कर्जबाजारी होतो आहे. हे तिथल्या मूर्ख लोकांना कळत नाही. पाकिस्तान म्हणजे १ % राज्यकर्ते (ज्यात उद्योजक, लष्करशहा आणि राजकारणी येतात) पाकिस्तानचा सर्व पैसा साधन संपत्ती हि या १ % लोकांकडे आहे आणि बाकी)९९ % जनता अडाणी आणी दरिद्री आहे.पाकिस्तान खड्ड्यात गेला तरी चालेल आमच्या हितसंबंधाना धक्का लागु नये अशीच इच्छा असलेला हा १ % वर्ग आहे.( भारतात सुद्धा असा वर्ग आहेच) त्यामुळे पाकिस्तान कर्जबाजारी तर आहेच पण दिवाळखोरीत निघाला तरी त्यांना काहीही घेणे देणे नाही. याचा चीन पुरेपूर उपयोग करून घेत आहे. त्यामुळे या वर्गाचा फायदा होईल असे धोरण ठेवून चीन पाकिस्तानला लूटत आहे. हा वर्ग पाकिस्तानी जनतेला धर्माच्या अफूच्या गोळीने गुंगवून आपला कार्यभाग साधून घेत आहे. जर काश्मीरवर मुसलमानांवर अत्याचार होतात म्हणून तेथील जिहादी काम करत आहेत तर त्याहूनही अनन्वित अत्याचार चीन शिंजियांग या प्रांतात करीत आहे परंतु तेथे जिहादींना पाठवण्याची हिम्मत पाकिस्तानी राज्यकर्ते करू शकत नाहीत. https://www.bbc.com/news/world-asia-china-45474279 शिंजियांग या प्रांतात १ कोटी १० लाख मुसलमान आहेत तर अक्ख्या जम्मू काश्मीर मध्ये ८० लाख मुसलमान आहेत. त्या पैकी ६७ लाख काश्मीर खोऱ्यात आहेत. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी मसूद अझर, हाफिज सैद सारखे मूर्ख पिसाळलेले कुत्रे पळून ठेवलेले आहेत. त्यांना इस्लामच्या नावाखाली भारतात किंवा अफगाणिस्तानात छू केले जाते. अफगाणिस्तानात जोवर अशांतता राहील तोवर तेथे अमेरिकेची सैन्य असेल आणि त्या सैन्याला रसद पुरवणे यासाठी लागणारी वाहतूक व्यवस्था,रसद पुरवठा या सर्वांची कंत्राटे या राजकारणी आणि लष्करशहांना मिळत राहतील. शिवाय तेथून येणारी अफू यावरचा मलिदा ही निःसंगपणे मिळत राहील अशी हि व्यवस्था आहे. यात अमेरिकेतील उद्योगपती यांची दुकानेसुद्धा चालत आहेत. यात फक्त पाकिस्तानमधील गरीब कोवळे तरुण धर्माच्या नावाखाली (जिहाद, ७२ हूर, जन्नत) उगाचच बळी पडत आहेत. त्याचे कुणालाही काहीही घेणे देणे नाही. यामुळेच अमेरिका काय, चीनच काय, रशिया सुद्धा पाकिस्तानविरुद्ध ठोस कार्यवाही करू इच्छित नाही.

In reply to by सुबोध खरे

प्रतिसाद आवडला. पण एक प्रश्न आहे. चीन आणि पाकिस्तान च्या 1% लोकांचा फायदा समजला पण अमेरिका आणि रशिया यांचा फायदा नेमका काय तो समजला नाही !! हत्यारांची बाजारपेठ हे एकमेव कारण असावे का? पण हत्यारे विकून किती पैसा मिळत असेल? आणि कितीतरी अमेरिकन सैनिक अफगाणिस्तान मध्ये विनाकारण मारले जातात त्यांच्या जीवाची काही किंमत नाही का?? म्हणजे अमेरिका आपल्या नागरिकांच्या आणि सैनिकांच्या सुरक्षितेबद्दल इतकी निष्काळजी आहे का? आणि पाकिस्तान आपल्याला उल्लू बनवतोय हे त्यांच्या लक्षात न येण्याजोगे उल्लू ते नक्कीच नाहीत तरीही पाकिस्तान ला इतकी मोठी आर्थिक मदत देण्याचे कारण काय? आणि अफगाणिस्तान मध्ये विनाकारण आपल्या सैनिकांना मारण्यासाठी पाठवण्याचे पण कारण काय?

In reply to by बाप्पू

त्याचे कारण अर्थातच आहे पाकिस्तानचे आणि अफगाणिस्थानचे भूराजकीय स्थान.. चीन, भारत, रशिया आणि मध्यपुर्व या सगळ्या ठिकाणांपासून किंवा सगळीकडे लक्श्य ठेवण्यासाठी पाकिथानच्या भूमीचा उपयोग होतो.. त्यामुळे पाकिस्तानला कायमच अ‍ॅड्व्हाण्टेज आहे.. आणि ते पण या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतायत. त्यामुळेच मी इथेच कुठेतरी लिहिले होते, की पाकिस्तान पडणे कोणाला परवडणारे नाही. पण डोईजड होणे देखील परवडणारे नाही. भारत पाकिस्तान, म्हणजेच पर्यायाने काश्मीर प्रश्न धुमसत राहणे यातच या सगळ्या महासत्तांचे हित सामावले आहे. आणि अर्थातच भारताच्या राज्यकर्त्यांना पण हे माहीत आहे. पाकिस्तान विरुद्ध या सगळ्या देशांपैकी कोणीही ठाम भूमिका घेणे म्हणजे ही समीकरणे बदलणे, आणि के तेव्हाच शक्य होइल जेव्हा भारत कोणत्यातरी एका बाजुला झुकेल. सध्या हा बदल दिसतोय याचे कारण देखील हेच आहे. बदलत्या परिस्थितीत जर भारत आपल्या बाजूने ठामपणे उभा राहिला तर पाकिस्तानची लोकाना असलेली गरज कमी होईल.. भारत हा पुर्वीपासुन तसा बेभरवशी म्हणून ओळखला जातो.. म्हणजे नैतिकदृष्ट्या आपण असू देखील भरवशाचे, पण जेव्हा मैत्री निभावायची वेळ येते तेव्हा नैतिकता मध्ये आणायची नसते. महत्वाचे म्हणजे तुम्ही सदासर्वकाळ कुंपणावर बसुन राहू शकत नाही हे कळले पाहिजे. (वटवाघुळांची गोष्ट माहीत असेलच) दुर्दैवाने या गोष्टी राज्यकर्त्याना इतके दिवस कळत नव्हत्या. सध्याच्या राज्यकर्त्याना हे माहितेय, आणि आपल्या वागण्यातून ते हे दाखवून पण देतायत. त्याचाच परिणाम पाकिस्तानबद्दलच्या बदलत्या धोरणात दिसतोय. पण आपले धोरण खरेच बदलले आहे हे आपल्या नवीन मित्रांना पटवून देणे देखील तितकेच आवश्यक आहे, तसे झाले नाही तर त्यांना विश्वास वाटणार नाही.. आणि त्यामुळे दृश्य परिणाम नीट दिसायला अजून ३-४ वर्षे तरी जातील. तेदेखील जर हेच सरकार पुन्हा आले तर. नाहीतर कठीण आहे. पण आहे हेच सरकार आणि तेच धोरण परत आले तर मात्र पाकिस्थान प्रश्न पुढच्या ४-५ वर्षात मिटेल हे नक्की.

जैश चे लोक चीन मधील मुस्लीमांवरच्या अत्याचारांबद्दल का कधीच बोलत नाहीत? क्रिस्टीयन फेअर नावाच्या अमेरिकन लेखिकेच्या नुसार : पाकिस्तानात वेगवेगळ्या दशहतवादाचे विचार गट आहेत. लश्कर तैय्यबा हा त्यातला पहीला गट. ह्या गटाच्या विचारसरणी नुसार पाकिस्तान मधल्या हिंदुंची हत्या करण त्यांना मान्य नाही. पण भारतातल्या मुसलमानांची हत्या कोणत्याही घातपाताच्या वेळेला कोलॅटरल डॅमेज म्हणुन झालेली चालते ! जैशचे लोक कोंणालाही कुठेही मारु शकतात त्यांच्या विचारसरणीत तत्व वैगेरे नाहीत. ते लोक भारता विरुद्ध तसेच अफघाणीस्तान विरुद्ध ही घातपात करत असतात. क्रिस्टीयन फेअर ने विपुल लेखन केलेले आहे. छान पैकी उर्दु बोलणारी अमेरिकन महीला क्रिस्टीयन फेअर ही पाकिस्तान मध्ये काही वर्षे राहुन वेगवेगळ्या दशहतवादी संघटनेवर संशोधन कार्य करत होती. तिने स्प ष्ट लिहीलेल होत की पाकिस्तान अमेरि केला मामा बनवत आहे. अमेरिकेचा पैसा घेऊन अफघानीस्तान मध्ये अमेरिकन सैन्याविरुद्ध तालिबानलाच मदत करत आहे . हे सर्व स्पष्ट असताना अमेरिकन सरकार ने काहीही केले नाही त्यामुळे कित्येक अमेरिकन सैनिक मारले गेले व तालिबान वरचढ ठरले. ईतक लिहील्या नंतर शेवटी तिला पाकिस्तानातुन हाकलुन दिलेले होते. आता ती अमेरिकेत आहे. https://en.wikipedia.org/wiki/C._Christine_Fair पाकिस्तान मध्ये हिंदु द्वेष हा लहान पणा पासुन शिकवला जातो, संस्काराचाच तो एक भाग आहे. ईथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे. पाकिस्तान निर्माण कोणी केला ? पाकिस्तान निर्माण केला मुस्लिम लिगच्या लोकांनी . जेंव्हा १९४६ -४७ साली निवडणुका झाल्या त्यावेळेला दोन पक्ष होते. काँग्रेस व दुसरा मुस्लिम लीग . मुस्लिम लीगला सपोर्ट करणारे जास्तीत जास्त लोक हे उत्तर प्रदेश, बिहार मधले नवाब व त्यांचे नोकरदार लोक होते. त्यांना देशावर रा ज्य कराय चे डोहाळे लागलेले होते. भारतावर सुशिक्षीत हिदु राज्य करणार आणी अश्या काफिर हिंदुच्या हाताखाली रहायच पचनी पडत नव्हत म्हणुन त्यांनी वेगळ्या देशाची मागणी केली व देशाची फाळणी झाली. मुळात पाकिस्तान बनला सिंध, पंजाब व बलुचीस्तानच्या भाग घेऊन. ह्या बलुचीस्तान हा वेगळा देश होता. सिंधु प्रदेश व पंजा ब मध्ये मुस्लिम जन संख्या विषेश नव्हती व मुस्लिम लीगला जनाधार नव्हता. सिंध मध्ये सिधी तर पंजाब मध्ये पंजाबी बोलली जायची. उर्दुला त्यावेळच्या समाजात स्थान नव्हत. जेंव्हा पाकिस्तान बनला तेंव्हा ईथले उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व बिहार मधले मुसलमान भारत देश सोडुन पाकिस्तानात जाऊन राहीले. मुळात पाकिस्तानच्या हिंदु द्वेषाच मुळ ईथे आहे. ह्या स्थलांतरीत लोकांनी पाकिस्तानात प्रवेशच सरकार स्थापन करायच्या महत्वाकांक्षेने केलेला असल्याने भराभर ह्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व बिहारच्या उर्दु भाषीक लोकांनी सरकारातल्या महत्वाच्या जागा भरल्या व महत्च्वाचे निर्णय घेतले. पाकिस्तानची राज्य भाषा ही उर्दु का झाली हे त्याच महत्वाच कारण आहे. पण पंजाब मधल्या दणकट लोकांचे मनोधर्य खचण्यासाठी पंजाबी व सिंधी भाषेला बँन करण्यात आले. पंजाबी व सिंधी लोकांनी त्याच्या मायबोलीत बोलण मुश्किल झाल.

इथेही उत्तर भारतीय मनोवृत्ती दाखवली त्यानी. मुंबैतही हिंदी भाषेच्यासाठी मराठी न बोलण्याची वेळ आणवतात सर्वांवर. चिन ने मसूदच्या बंदीवर आडकाठी केली. त्यामुळे सुषमा स्वराज यानी जे वक्तव्य केले ते कितपत खरे करतील? शून्य टक्के शक्यता आहे

मुस्लिम समाज इतका ढवळून निघाला आहे की त्या न्यूझीलंड हल्ल्या बद्दल संवेदना व्यक्त करताना " कश्मीरी मुस्लिम वर भारतीय लश्कर अत्यचार करत आहे " ट्विटर वर टेप लावत आहेत . कश्मीर मधून हिंदू पंडितनां निर्वासित केले गेले आणि पंडिता वरील अत्याचार या वरुन वाद चालला आहे . शेवटी क़ाय तुम्ही आम्ही कितीही दुःख व्यक्त केले तरी ' त्यांचे ' शेपुट कधीच सरळ होणार नाही .

In reply to by ट्रम्प

न्युझीलँड मध्ये ४९ जीव घेणार्या माणसाला तिथली, युरोपातील मिडिया अतिरेकी संबोधायच कटाक्षाने टाळत आहे ! अतिरेक्या ऐवजी व्हाईट सुप्रेमिस्ट सारखे नविन शब्द योजत आहे ! गोर्या माथेफिरुने असा नर संहार करण्याचे कमी उदाहरण आहे ! कदाचीत अमेरिकेत वर्षा दोन वर्षांत असे प्रकार होत असतात पण जगातील कोणतीही मिडीया गोर्या माणसाला "अतिरेकी" कधीही म्हणत नाही, ह्याच्या विरुद्ध एकही नर संहार न करताही हिंदु लोकांवर देशातल्याच हिंदु नेत्यांनी व मिडीयाने अतिरेकी ठरवलय !!

In reply to by डँबिस००७

लौ ऑफ कर्मा.. अश्या घटना वाढतच जातील.. स्पेशली युरोप मध्ये. "त्यांनी" जे पेरले तेच उगवणार. बाकी त्याला आतंकवादी न म्हणता माथेफिरू म्हणणे योग्य ठरेलं. त्याने कोणत्याही धर्म कार्यासाठी आणि कोणतेही पुस्तक वाचून प्रेरित होऊन मुस्लिमांना मारले नाहीये..

In reply to by बाप्पू

बाप्पू, कर्मसिद्धांत कितीही खरा असला तरीही निरपराध्यांच्या हत्यांचा नेहमी निषेधच करावा. चोर सोडून संन्याशाला सुळी चढवलं जातंय. त्याचा निषेध केलाच पाहिजे. त्यामुळे मी या हत्याकांडाचा तीव्र निषेध करीत आहे. आ.न., -गा.पै.

भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक ३.० केला. सगळ्या जगाचे लक्ष पुलवामा हल्ला आणि बालाकोट मधले ऑपरेशन याकडे लागले असताना आपल्या आर्मीने म्यानमार सैन्याच्या सोबत फेब्रुवारी १७ ते मार्च २ एवढे प्रदीर्घ ऑपरेशन केले. यात आराकान आर्मी तसेच नागा मिलिटन्टसचे कॅम्पस उध्वस्त करण्यात आले. आराकान आर्मीला चीनचा पाठिंबा होता आणि त्या लोकांना चीनने प्रशिक्षणही दिले होते. जवळपास ३००० मिलिटन्टस या आराकान आर्मीत आहेत असे म्हणतात. भारत आणि म्यानमारला जोडणाऱ्या मल्टीमोडल ट्रान्सीट Kaladan Project उध्वस्त करण्याचा यांचा प्लॅन होता आणि त्याला काउंटर स्ट्राईक म्हणून आपल्या सैन्याने हे ऑपरेशन केले. सर्व सैनिकांचे आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन. भारतीय सैन्य आता मोकळेपणाने कारवाया करत आहे हे अतिशय चांगले आहे.

In reply to by ट्रेड मार्क

ट्रेड मार्क, माहितीबद्दल धन्यवाद! भारतीय सैन्याचं दणदणीत अभिनंदन. दणदणीत अशासाठी की एकाच वेळेस दोन युद्धं लढायची क्षमता भारत बाळगू पहात आहे. पहिला टप्पा म्हणजे एकाच वेळेस दोन ठिकाणी आत्मविश्वासपूर्ण कारवाई करणे. आ.न., -गा.पै.

In reply to by ट्रेड मार्क

जबरदस्त बातमी ! भारतीय सैन्याला मोकळीक देताच नक्षलवादी , अतिरेकी कारवाया करणारे त्यांचे बोलवते धनी सगळेच गायब झालेले आहे. नक्षलवाद्याचे खरे मालक अर्बन नक्षलवादी सुद्धा आता जेर बंद होत आहेत. अच्छे दिन खरच यायला लागलेत !! २०१९ च्या नंतर सुद्धा मोकळा श्वास घ्यायचा असेल तर अश्या कणखर नेतृत्वाची देशाता अत्यंत खरी गरज आहे.

एक मात्र नक्की पुढील निवडणूकी नंतर मोदी पंतप्रधान पदी पुन्हा येतील यात शंका नाही . येणाऱ्या निवडणूकी च्या धामधुमित अतेरिकी , नक्षलवादी , सक्रिय होवून हिंसाचार घडवीन्या च्या शक्यते ला मोदी आणि आपली फौज लगाम लावत आहे . अशा प्रकारचा दूरदृष्टिपणा, निर्णयक्षमता असलेला पंतप्रधान आपल्याला लाभला हे आपले आणि तमाम विरोधकांचे भाग्य आहे . नाहीतर ते पूर्वीच्या मिळमिळीत ममो च्या काळात सकाळी कामावर गेलेली व्यक्ति लोकल , बस च्या बॉम्बस्फोटात स्वर्गवासी होण्याची शक्यता होती . मिपावरिल काही पुरोगम्या नां हे विधान नक्कीच अतिरंजित वाटेल!!!!

In reply to by ट्रम्प

मिपावर आताशी फुरोगामी राहिलेच कुठे? तुम्ही आम्ही टोचुन टोचुन घालवले बहुतेक सगळे! बाकी एयरस्ट्राईकनंतर काही फूदफुदत होते पण जेव्हा एयरस्ट्राइक झाला व त्यात अतिरेकी अल्लाघरी गेले हे स्पष्ट झाल्यावर उरलेसुरले स्वर्गवासी झाले.

In reply to by भंकस बाबा

जेंव्हा मिपावर टिकून राहतात तेंव्हा ते संपादक मंडळाच्या सचोटीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करतात. तसेही संपादक मंडळ अधून मधून जे इशारे देत असते ते केवळ वैधानिक स्वरूपाचे असतात हे एव्हाना सर्वांना समजले असेलच.

In reply to by सर टोबी

तथाकथित पुरोगम्या नां चर्चे साठी आमंत्रण होते ते !!! पण कुंद , ढगाळ वातावरण असल्या शिवाय मैदानात उतरायचे नाही ही त्यांची खासियत आहे .

In reply to by सर टोबी

आत्ताच वाट्सएपवर एक फेसबुक कंटेंट वायरल झाले आहे त्यात मनोहर पर्रिकर यांचे देहावसान झाल्याच्या बातमीला आपले शांतिप्रिय समाजाचे तरुण हसण्याची पोस्ट टाकून आपली लायकी दाखवत आहेत. त्यामुळे संपादक मंडळाने क़ाय करावे ह्याचा सल्ला देणे सोडून आपला शांतिप्रिय समाज व त्याला प्रोत्साहन देणारे पप्पू यांची चिंता करावी

कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात ७ जागा सपा , बसपा व रा लो आ साठी सोडल्या आहेत !! महागठबंधन झालेल नसताना असा उदारपणा कश्या साठी ?

In reply to by डँबिस००७

डँबिस००७, रालोआसाठी जागा सोडल्या म्हणजे काँग्रेसही मोदींना सामील वाटते? पण सप, बसपना जागा सोडतांना नफा ना तोटा तत्त्वावर असाव्यात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कॉंग्रेस, उत्तरप्रदेशातील सर्व लोकसभा जागावर आपले उमेदवार उतरवायला मोकळे आहेत !! मायावतीने कॉंग्रसला सुनावले !

कॉंग्रेसची आयटी सेल प्रमुख असलेल्या दिव्या स्पंदना ने सगळ्याच सिमा रेषा ओलांडलेल्या आहेत ! मा. श्री मोदीजींना आपले अमुल्य मत देणार्यात २/३ मुर्ख लोक आहेत , युद्ध सुरु व्हायच्या अगोदरच हार मानुन मोकळे झालेली दिसत आहे !!

In reply to by डँबिस००७

काँग्रेस प्रवक्ते पावन खेरा यांनी एका चर्चेत आक्षेपार्ह विधान केले. मोदी मधला म = मसूद अझर, ओ = ओसामा, द = दाऊद आणि आय = आयएसआय असे म्हणाले. तिथल्यातिथे प्रेक्षकांनीसुद्धा आक्षेप घेऊनही त्यांनी ना माफी मागितली ना आपले विधान मागे घेतले. काँग्रेसींनी स्वतःचीच कबर खणायचा विडा उचललेला दिसतोय.

In reply to by ट्रेड मार्क

मोदींना मौत का सौदागर म्हणणे मागच्या वेळेला काँग्रेस ला खूप महागात पडले होते.. यावेळीही अश्या बिनबुडाच्या आरोपांमुळे मोदींनाच फायदा होईल. Pavam khera हा पुन्हा एकदा हिंदूंच्यावर इंडिरेक्टली दहशतवादी असा ठपका लावू पाहतोय आणि त्याद्वारे मुस्लिम मातांना आकर्षित करतोय... पण खरंच हिंदू दहशतवादी असतें तर हि हिरवी जाहिरीली पिलावळ 1947 नंतर इथे वासाला पण शिल्लक ठेवली नसती असो. हिंदू मतदार हा असला अपमान सहन करणार नाहीत आणि याचे उत्तर मतपेटी तुन देतील हि अपेक्षा. त्याचबरोबर सुशिक्षित आणि लिबरल मुस्लिम्स देखील या विचाराचे खंडन करतील हि अपेक्षा. बाकी झोपलेल्या हिंदू कडून आणि मदरसा छाप मुस्लिम लोकांकडून काहीही अपेक्षा नाही.

देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. !

पररीकरांना श्रद्धांजली ! अकाली वयात गेले. ६३ हे जाण्याचे वय नाही. :-( त्यांना शांती लाभो. -गा.पै.

बारामती चे जाणते राजे बालाकोट सर्जिकल स्ट्राइक नंतर पप्पू, माया ,ममता च्या सूरत सुर मिसळून " पुरावे कुठय !! " विचारताना सर्वानीं पाहिले होते . तेच जाणते राजे काल पिंपरी मध्ये पुतण्याच्या प्रचराचा शुभारंभ कार्यक्रमा ला हजर होते , त्या वेळी " सर्जिकल स्ट्राइक चा सल्ला मीच दिला होता " असे सांगून ऐकणाऱ्या कार्यकर्त्या च्या पोटात गोळा आणला . आता कार्यकर्त्यानां प्रश्न पडला असेल ' सर्जिकल स्ट्राइक झालीच नाही ' अस प्रचारात सांगायचे कसे कारण की आपल्या नेत्यानेच पुन्हा एकदा यू मारला आहे . बर चला जाणत्या राजा चे सोडून देवूया !!! सेने तुन भावुबंदीकि चे भांडण करुण बाहेर पडलेला वाघ , ज्या मध्ये तमाम महाराष्ट्र बाळासाहेबांना पाहतो तो वाघ , इतर पक्षातील गाढवां सामोर मोदींवर अर्वाच्य भाषेत हल्ले करतोय कशासाठी तर ठगबंधन च्या अघाडीत घ्यावे म्हणून . त्या वाघाच्या पक्षाला लोक मतदान करत नव्हती !! पण एक निर्भिड नेता म्हणून तमाम महाराष्ट्रियांच्या मनात आदर होता तो त्याने घालवला . एक वेळेस मोदी विरोध समजू शकलो असतो पण , चोरांच्या मांडीला मांडी लावून बसन्या साठी कुठल्या थराला आपण चालालोय हे त्याला समजत नसल्याने त्याचा राजकीय आत्मघात निश्चित वाटतो .

In reply to by महेश हतोळकर

" भारतीय सैन्याचा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको असं मत शरद पवार यानी व्यक्त केलं आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर संरक्षण विषयक कारवाईचे राजकारण होऊ नये असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. " हे त्यांनी पप्पू , केजरी,ममता , माया, यांना का नाही सांगितले ?

In reply to by ट्रम्प

राज ठाकरे यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेऊन स्वतःची एखादी खळ्ळ खट्याक गुंड कंपनी काढावी किंवा गल्लो गल्ली नक्कला करायचे कार्यक्रम घ्यावेत. त्यांची भाषणे फक्त ऐकायला गोड गोड वाटतात पण आजपर्यंत त्यांनी कोणत्याही भूमिकेवर कधीच फर्म भूमिका घेतली नाही. मग ते टोल, मराठी चा मुद्दा, पाकिस्तानि कलाकार विरोध किंवा अजुन कोणतेही आंदोलन असो. प्रत्येक वेळेला राज ठाकरे यांची भूमिका संशयास्पद आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक येथे सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून मनसे आले तरीही एक रोल मॉडेल जिल्हा अशी ओळख बनवण्यात ते सपशेल फेल झाले.. ज्या छगन भुजबळ ला शिव्या घालून निवडून आले त्यांच्याच आसपास मनसे नगरसेवक घुटमळत राहिले. आत्ता पण लोकसभा निवडणुकीआधी राज आणि राष्ट्रवादी यांच्या अनेक गुप्त वाटाघाटी अयशस्वी झाल्या, आणि ते आघाडीत सामील होता होता राहिले. आता माझ्यामते निवडणूक न लढवता फक्त बाहेरून पाठिंबा देऊन फक्त मोदी आणि भाजप विरुद्ध वातावरण तयार करण्याची सुपारी राज ठाकरे आणि कंपनीने घेतलीये..!! राज ठाकरे किंवा मनसे हे नाव ऐकले तरी आता आमच्या कोल्हापूरकडच्या दोन म्हणी आठवतात 1) भेळ तिकडे खेळ 2) खोबरं तिकडं चांगभलं... !!

In reply to by बाप्पू

मी मिपवरच कुणाची तरी कमेंट वाचली होती कि नाशीकमधे मनसेने बरच चांगलं काम केलं होतं म्हणुन. अर्थात, राज्यात-केंद्रात त्यांचं काहि वजन नसल्यामुळे नाशीकमधल्या कामाला आपसुक मर्यादा होत्या.

In reply to by आनन्दा

चांगल काम?? जसे कि ?? जरा स्पष्ट कराल काय?? MNS मोठा पक्ष असला तरी लवकरच जवळपास निम्मे नगरसेवक bjp, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या गोटात गेले. हे मनसे चे अपयश म्हणावे लागेल.. राष्ट्रवादी काँग्रेस वर टीका आणि छगन भुजबळ यांची नक्कल करून सत्तेत आलेल्या पक्षाने शेवटी त्यांच्याच हातात हात घेऊन राजकारण केले. बाकी काम म्हणायचं झाले तर फक्त गोदा पार्क एवढेच काय ते नवीन झाले.. बाकी सर्व जैसे थेच आहे..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नीरव, मल्या वगैरे मंडळींच्या बाबतीत काहि ठोस घडलं तर 'चौकीदार' प्रचाराला बरच पाठबळ मिळेल.

In reply to by अर्धवटराव

निरव मोदीच्या भारतातील आणि परदेशातील मालमत्ता ED ने ताब्यात घेतल्या आहेत. तसेच वर डॉ. साहेबांनी दिलेल्या लिंकप्रमाणे लंडन कोर्टाने अटक वॉरंट काढलंय. मल्ल्याच्या जवळपास १२,००० कोटींच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. मल्ल्याला पण भारतात पाठवावे असे इंग्लंडच्या जजने सांगितले आहे. म्हणजे या दोघांनी जे आर्थिक घोटाळे केले त्यापेक्षा जास्त किमतीच्या असेट्स जप्त केल्या आहेत. एवढेच नव्हे तर ब्रिटन आणि भारत यांच्यात अश्या भारतीयांना इंग्लंडमधून परत पाठवायचा कुठलाही करार नाहीये. खरं तर २००२ पासून भारताने २८ फुजिटिव्हना परत पाठवायची मागणी केली पण त्यातील फक्त एकाच व्यक्तीला परत आणता आले. १० वर्षात ममो सरकारला नीट पाठपुरावा सुद्धा करता आला नाही. तिथे मोदी सरकारने या दोन मोठ्या अपराध्यांना कोर्टाकडून परत पाठवायची ऑर्डर मिळवली. याचं काहीच श्रेय मोदी सरकारने केलेल्या पाठपुराव्याला द्यायचं नाही? तसेच बाकी आर्थिक घोटाळे करणाऱ्यांच्या मालमत्ता किती जप्त केल्या ते इथे बघा.

In reply to by ट्रेड मार्क

मल्या आणि निरव मंडळी तिहारमधे बसलेले बघणं. रिकव्हरी आकडेवारी काहिही असली तरी 'चौकीदार' प्रचारावर त्याचा परिणाम होणार नाहि.

In reply to by अर्धवटराव

मल्या आणि निरव मंडळी तिहारमधे बसलेले बघणं. व्यक्तीला नुसतं जेलमध्ये टाकण्यापेक्षा पैसे वसूल होणं जास्त महत्वाचं आहे. विलफुल डिफॉल्टर असेल तर दोन्ही व्हायला पाहिजे. उद्या समजा एखाद्याने १०-१५००० कोटी बुडवले आणि नंतर हात वर केले. तर त्याला जेल मध्ये टाकून तुम्हाला बदला घेतल्याचे समाधान मिळेल पण पैसे गेले ते गेलेच ना? या दोघांच्या केस मध्ये दोन्ही होतंय ना? मालमत्ता तर जप्त केलीच आहे. वर त्यांना जेलमध्ये टाकायचे पण पूर्ण प्रयत्न केले आहेत. रिकव्हरी आकडेवारी काहिही असली तरी 'चौकीदार' प्रचारावर त्याचा परिणाम होणार नाहि. काही झालं तरी आपल्याला चौकीदार नकोच आहे. गंगा की बेटी चा भाऊ आहे ना, आपल्याला तर तोच पाहिजे.

In reply to by ट्रेड मार्क

व्यक्तीला नुसतं जेलमध्ये टाकण्यापेक्षा पैसे वसूल होणं जास्त महत्वाचं आहे
त्यापेक्षा अशा भामट्यांना वेळीच ओळखुन त्यांच्यावर पायबंद घालणं आणखी जास्त महत्वाचं असावं ना? गेले कि दोघेही सरकारच्या हातावर तुरी देऊन. कितीही कारणं द्या, पण ते व्हिजीलन्सचं, पर्यायाने सरकारचं फेल्युअर आहे हे तरी मान्य व्हावं.
या दोघांच्या केस मध्ये दोन्ही होतंय ना? मालमत्ता तर जप्त केलीच आहे. वर त्यांना जेलमध्ये टाकायचे पण पूर्ण प्रयत्न केले आहेत.
परत सांगतो. त्या प्रयत्नाचा 'चौकिदार' प्रचारावर परिणाम व्हायचा असेल तर त्यांना प्रत्यक्ष बिहाण्ड द बार्स दाखवायला लागेल.
काही झालं तरी आपल्याला चौकीदार नकोच आहे. गंगा की बेटी चा भाऊ आहे ना, आपल्याला तर तोच पाहिजे.
त्यावर आमचा काहि कंट्रोल नाहि. तसं आम्हाला फुल मेजॉरटीतले बारामतीकर काका पाहिजे. पण त्यांचं संख्याबळ दोन आकडे देखील पार करत नाहि :(

In reply to by अर्धवटराव

तुमचा मूळ मुद्दा निरव आणि मल्ल्याला शिक्षा होणं हा होता. त्यासाठी काय काय केलं आहे हे मी तुम्हाला पुराव्यांसहित दाखवून दिलं आहे. आता तुमचा पुढचा मुद्दा असा आहे की अश्या लोकांना वेळीच ओळखून उपाययोजना करणे. तर पहिली गोष्ट म्हणजे मुद्दाम घोटाळे करणारे आणि काही कारणाने आर्थिक अडचणीत येऊन डबघाईला आल्याने कर्जफेड करता न येणारे असे दोन प्रकारचे लोक वेगळे काढायला लागतील. तर मुद्दाम घोटाळे करणाऱ्यांत, म्हणजे नियमातील त्रुटींचा गैरवापर करून वा बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून घोटाळे करणाऱ्यांमध्ये निरव मोदी मोडतो. मिपावरील या लेखात आणि त्यावरील प्रतिसादांमध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळेल. हे घोटाळे मुख्यतः बँक अधिकाऱ्यांना किंवा सरकारी बाबूंना हाताशी धरून केले जातात. पण निरव मोदीच्या केसमध्ये हे प्रकरण २०११ मध्ये चालू झालं. त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून Letter of credit चा गैरवापर चालू केला. ही रक्कम वाढतवाढत ११००० कोटींपर्यंत गेली. आता इतके वर्ष निवांत घोटाळा चाललेला असताना एकदम निरवला पळून जायची का वेळ आली? मल्ल्याची केस तर अजूनच वेगळी आहे. माझ्यामते तरी त्याने घोटाळा असा केला नव्हता, कदाचित चुकीच्या निर्णयांमुळे व परिस्थितीमुळे तो गाळात गेला. पण तो पूर्णपणे वेगळा आणि मोठा विषय आहे. मिपावरच कुठेतरी मी एक प्रतिसाद लिहिला होता, पण आता शोधायला लागेल. मुख्य मुद्दा उपाययोजना केली आहे का? KYC नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः Ministry of Corporate Affairs ने DeMo मधील संशयास्पद आणि इतर उत्खनन करून ३ एक लाख कंपन्या रडारमध्ये आणल्या आहेत. पण मला विचाराल तर देशातल्या प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. "मै भी चौकीदार" म्हणजे लगेच बिल्डिंगखाली जाऊन रखवाली करणे नसून जे बघताय, ऐकताय, अनुभवताय तिथे सजग रहाणे आहे. माझ्या बँकेतल्या अनुभवावरून मी सांगू शकतो की ९० टक्के घोटाळे बँक अधिकारीच थांबवू शकतात. अगदी सुरूच होऊ न देणे ही जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण निदान वाढू तरी नये याची काळजी तर घेऊच शकतो. घोटाळे करून पळून गेलेल्यांसाठी आणि भविष्यात असेल कोणी पळून गेले तर उपाय म्हणून २०१८ मध्ये मोदी सरकारने Fugitive Economic Offenders Act आणला. थोडं गुगलून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. आता पुढचा प्रश्न येऊ शकेल म्हणून आधीच उत्तर देतो. निरव मोदीला पळून का जाऊ दिलं? तर एकूण टाइमलाईन बघितलीत तर निरव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच भारताबाहेर गेला होता. तोपर्यंत त्याच्याविरोधात कुठलीही ऑफिशिअल कम्प्लेंट नव्हती. २९ जानेवारीला पीएनबीने तक्रार दाखल केली आणि हे समजल्यावर निरव भारतात यायलाच तयार झाला नाही. तो इंग्लंडला यासाठीच गेला की आत्तापर्यंत इंग्लंडच्या स्थानिक कायद्यांचा वापर करून असे अपराधी सहज स्वतःला वाचवत होते. फेब्रुवारी २०१८ पासून ते मार्च २०१९ या १३ महिन्यांत निरवविरुद्ध सगळे पुरावे गोळा करून त्याची सगळी संपत्ती जप्त करणे आणि त्याला इंग्लंडमध्ये अटक करवणे ही कामगिरी तुम्हाला चांगली वाटत नाही? विशेषतः २००२ पासून २८ लोक तिथे उजळमाथ्याने वावरत आहेत, ज्यांना उच्चविद्याविभूषित इंग्लंडमध्येच शिकलेले पंतप्रधान काहीच करू शकले नाहीत या पार्श्वभूमीवर ही कामगिरी अधिकच चांगली वाटते. म्हणजे मला तरी वाटते, प्रत्येकाला आपले मत असते आणि ते विरोधी पण असू शकते. तसेच मोदी द्वेष करण्याचा लोकशाहीने हक्क दिलेलाच आहे. नरेंद्र मोदींनी हे २०१९ च्या निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून केलं असं म्हणलं तरी ११००० कोटी निरवकडून आणि १२००० कोटी मल्ल्याकडून जप्त झाले आहेत आणि त्यांना दोघांनाही अटक करवून भारतात आणण्याची सोय पण झाली आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. त्याचबरोबर पुढील घोटाळेबहाद्दरांना पण संदेश मिळालाच असेल. आता रागाला किंवा बारामतीच्या काकांना आणून परिस्थिती परत २०१४च्या आधीची आणायची का कसे हे आपण आपले ठरवा. बाकी बारामतीच्या काकांना एकही सीट जरी नाही मिळाली तरी ते पंप्र होऊ शकतात हे नमूद करू इच्छितो.

In reply to by ट्रेड मार्क

माझा मुळ मुद्दा "नीरव, मल्या वगैरे मंडळींच्या बाबतीत काहि ठोस घडलं तर 'चौकीदार' प्रचाराला बरच पाठबळ मिळेल." इतका साधा होता. खरं तर त्यात 'मुद्दा' म्हणण्यासारखं फार कहि क्रिप्टीक नाहि. निवडणुकीच्या हंगामात एखादं प्रचारतंत्र कसं इफेक्टीव्ह होतं याचा सिंपल अंदाज आहे तो. आर्थीक घोटाळे ओळखण्यातल्या मर्यादा, उपाययोजना, वगैरे साठी सरकारने काय केलं याचं इथे कितीही विवेचन केलं तरी हीच सगळी जंत्री 'चौकीदार' प्रचाराच्यामागे भक्कमपणे उभी केली जात नाहि, कारण जोपर्यंत नीरव साहेब भारतातल्या गजाआड जात नाहि तोपर्यंत त्याचा काहि उपयोग नाहि हे सरकारलादेखील माहित आहे (हा आमचा अंदाज). तिच गोष्ट निरव देशाबाहेर कसा गेला याबाबतीत देखील खरी आहे. माल्याजींचं देशांतर हे मोदी सरकारचं अपयश आहे असं मला आजही वाटतं. राहिला मुद्दा राजकारण्यांवर राग-लोभ-द्वेषाचा... जनतेकरता भलेही या भावना असतील, पण राजकारण्यांसाठी ते भांडवल असतं. पब्लीकने आपलं रक्तं कोणासाठी आणि किती आटवायचं हे आपलं आपण ठरवावं (ते मॅनेज करण हा देखील राजकार्‍यांचा आवडता उद्योग) बारामतीकर काका फॉर्मेलिटी म्हणुन पंप्र बनु नयेत... सरकार चालवताना ते टिकवायची कटकट त्यांच्या डोक्याला नसावी. त्यांचं डोकॅलिटीचं पोटेन्शीअलचं उगाच खर्च होतं अशाने. असो.

In reply to by अर्धवटराव

बारामतीकर काका आणी पंप्र ... गेले ते दिवस, राहील्या त्या आठ्वणी ;) ४-५ (किंवा अजुन कमीच) सिटा मिळवून कोणी पंप्र बनेल असं वाटत नाही. दिदी, बहन आणी बाबू ना नक्कीच ह्यांच्यापेक्शा जास्त सिटा मिळतील

In reply to by अर्धवटराव

माझा पण ठोस म्हणजे नक्की काय हाच तर प्रश्न आहे. एखाद्या प्रकरणात कारवाई करताना प्रत्येकाला कामं आखून दिलेली आहेत. जसं की जो व्हिक्टीम आहे त्याने तक्रार दाखल केली पाहिजे, ती पण वेळेत केली तर आरोपीला पटकन पकडता येतं. तक्रार दाखल केल्यावर शोधकार्य, पुरावे गोळा करणे वगैरे पोलिसांकडे आहे. नंतर त्या पुराव्यांच्या आधारे शिक्षा करणे कोर्टाच्या हातात आहे. निरव काय किंवा मल्ल्या काय, दोन्ही केस मध्ये बँकांनी तक्रार दाखल करायला पण उशीर केला. भारताबाहेरही उद्योगधंदे असलेल्या दोघांना तक्रार नसताना कोणत्या कलमाखाली परदेशात जायला अडवायला पाहिजे होते? लगेच प्रतिष्ठित बिझनेसमनना उगाच त्रास दिला जातोय आणि सरकार फॅसिस्ट आहे म्हणून आरडाओरडा नसता झाला? असो. एकदा तक्रार रुजू झाल्यावर त्यावर कारवाई करणे हे सरकारी संस्थांचे काम होते, ते त्यांनी व्यवस्थित केले. त्यात सरकारने कुठेही हस्तक्षेप केला नाही किंवा अडथळा आणला नाही. उलट जिथे हे लोक कायद्यातील त्रुटींचा वापर करून सुटू शकले असते तिथे कायदे बदलले. त्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी नवीन कायदे बनवणे, इतर देशांशी बोलणी करून त्या देशांना पण या लोकांना जेरबंद करण्यासाठी मनवणे हे सर्व केले. आता या पुढची कारवाई कोण करणार आहे? तर कोर्ट. सगळे पुरावे अभ्यासून दोन्ही बाजू ऐकून त्यावरून निवाडा करणे हे कोर्टाचे काम आहे ना? पण उद्या निरव किंवा मल्ल्याची केस कपिल सिब्बल किंवा प्रशांत भूषण सारख्या वकिलांनी घेऊन हिकमती करून यांना सोडवले तर त्याला मोदी जबाबदार? निरव तसाही इंग्लंडमधल्या जेलमध्ये आहे. पण निवडणुकीच्या आधी भारतात आणून त्याला इथल्या जेलमध्ये बघितलं तरच मोदींनी काहीतरी केलं म्हणेन. किंवा न्यायालयीन कोठडीत असेल तर त्याला जेव्हा कोर्ट शिक्षा सुनावलं तेव्हाच, किंवा मी त्याला तिहार जेल मध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेला बघीन तेव्हाच मानीन की मोदींनी काहीतरी केलं. असं असेल तर मग राहूच दे... माझ्या मते सरकारने आणि सरकारी संस्थांनी त्यांच्या परिघात जेवढे करायचे होते ते केले आहे. आता लोकांना जर ते समजत नसेल किंवा समजून घ्यायचे नसेल तर नसेल. नुकसान कोणाचं आहे? त्याहीपुढे जाऊन अश्या प्रकरणांमुळे एकूणच बिझनेस करणाऱ्यांच्या मनात काय येत असेल? तसेही सर्वसामान्य लोकांना बिझनेसमन म्हणले की फसवणूक करणारे वाटतात. पण खरंच सगळे तसे आहेत का? तुम्ही आम्ही व ८०% नोकरी करणारी लोकं ही कोणीतरी बिझनेस चालू करतो आणि आपल्याला नोकरी देतो म्हणून तर आपल्या गरज भागतात. अगदी ९-६ जे नेमून दिलेलं आहे काम करून घरी जाणे हे कुठल्याच बिझनेसमन ला शक्य नाहीये. त्याचा धंदा करण्यासाठी, वाढवण्यासाठी त्याला ज्या गोष्टी करायला लागतात त्याला पर्याय नाहीये. पण म्हणून जर सगळे बिझनेसमन चोर आणि जेवढा मोठा बिझनेस तेवढा मोठा चोर अशी मानसिकता तयार होत असेल तर ते खूप धोकादायक आहे. नितीन गडकरींचा हा व्हिडीओ बघा, याच विषयावर त्यांनी भाष्य केलं आहे.

In reply to by ट्रेड मार्क

एखाद्या प्रकरणात कारवाई करताना प्रत्येकाला कामं आखून दिलेली आहेत. जसं की जो व्हिक्टीम आहे त्याने तक्रार दाखल केली पाहिजे, ती पण वेळेत केली तर आरोपीला पटकन पकडता येतं. तक्रार दाखल केल्यावर शोधकार्य, पुरावे गोळा करणे वगैरे पोलिसांकडे आहे. नंतर त्या पुराव्यांच्या आधारे शिक्षा करणे कोर्टाच्या हातात आहे.
चौकीदारी प्रचाराच्या शिडात अजुन म्हणावं तसं वारं का शिरलं नाहि हे कळत नव्हतं... आता कळलं... प्रत्येकाला आखुन दिलेल्या कामात चौकीदाराला वगळण्यात आलं. त्यामुळे तो बसला बिचारा विडी ओढत. अवांतरः हिकमती वकीलांची लिस्ट थोडी त्रोटक वाटली. आमच्या फेव्हरेट लिस्ट मधे बारामतीकरांनंतर अगदी काहि नंबरांनी गडकरी साहेब पण येतात. किंबहुना बारामतीकरांच्या पदचिन्हांचा मागोवा घेणार प्रत्येक यात्री कधीना कधी आमच्या फेवरेट लिस्टमधे येतोच. त्यात मोदिही आले.

In reply to by अर्धवटराव

डोळ्याकडून संदेश जिथे जातो ते अर्धवट उघडलं असेल तर उपयोग कसा होईल? बाकी तुम्ही चौकीदाराच्या काळजीने खंगू नका हो. चौकीदार आणि त्याचा साथीदार लै ड्याम्बीस आहेत, कुठे काय करतील याचा भरवसा नाही. तुम्ही आपली बारामतीकरांची काळजी घ्या, वय झालंय त्यांचं. त्यांना पंप्र बनवण्यासाठी पूर्ण फिल्डिंग लावा की. अवांतर मध्ये - हिकमती वकिलांची लिस्ट अशी नव्हती दिली, फक्त उदाहरणादाखल दोन नावं दिली. पण त्रोटक वाटत असेल तर तुम्ही नावं जोडायला माझी हरकत नाही.

In reply to by अर्धवटराव

तेच तर.. त्यांनी बुडवलेल्या पैशाच्या दहापट जरी वसुली झाली तरी खांग्रेस वाले आणि गुलाम लोक हे " चौकीदार चोर है " असेच बोंबलत बसणार. आणि कोर्टात सिद्ध करायची वेळ आली कि xxx ला पाय लावून पाळणार.. मला असा वाटतंय कि काँग्रेस आणि एकूणच विरोधी पक्ष लोकांना आश्वासने किंवा समस्यांचे सोल्युशन देण्यापेक्षा मोदींची नकारात्मक इमेज बनवून मते मिळवू पाहतायेत. अगदी याउलट 2014 मध्ये मोदींचा प्रचार हा मुख्यतः जनतेला अश्वस्त करणे आणि समस्यांचे सोल्युशन देणे यावर बेस्ड होता.

In reply to by बाप्पू

चौकीदाराच्या चोरीची टिवटिव मी प्रत्यक्ष फॉलो करत नाहिए. पण जे काहि थोडंफार वाचण्यात येतं त्यामधे तरी या चोरीचा प्रतिवाद रिकव्हरी/जप्ती चे आकडे जोरकसपणे मांडुन केलेला दिसत नाहि. बाकि रेटुन बोलायची गुजराथी स्कील २०१४ मधे भरपूर बघितली आहे. २०१९मधे विरुद्धबाजुने त्याचा पुनःप्रत्यय आल्यास नवल वाटायला नको. शिवाय, सध्याच्या विरोधीपक्षाला त्याचा काहि फायदा होईल असं वाटत नाहि... झालं तर नुकसानच होईल. कुंपणावरचे, युपीएकडे सरकलेले लोकं परत मोदिंकडे वळल्याची काहि उदाहरणं स्वतः बघतोय. अर्थात, ति प्रातिनीधीक म्हणावी इतकी मोलाची नाहित :)

लोकहो, अमित शहांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना व भाजप युतीची घोषणा केली. फारसे आढेवेढे न घेता चटकन युतीची घोषणा झाली. अमित शहांनी इतक्या सफाईदारपणे काम तडीस नेलं याबद्दल त्यांचं कौतुक आहे. घोषणेच्या वेळेस उद्धव ठाकऱ्यांच्या उजव्या बाजूस मनोहरपंत जोशी होते. गेल्या अनेक वर्षांपासून पंतांना शिवसेनेत काहीच काम नसतं असं लोकं म्हणतात. तरीपण या प्रसंगी त्यांना पाचारण करण्यात आलं. यावरून पंतांनी युतीसाठी पडद्याआड महत्त्वाची भूमिका बजावलेली असावीसं दिसतंय. ही भूमिका काय असावी याच्या विचारात होतो. तर जाणवलं की अमित शहांनी बहुधा निवडणुकीसाठी पैसा पुरवण्याची हमी घेतली असावी. नोटाबंदीनंतर अमित शहांच्या बँकेत बरीच रक्कम गोळा झाली होती असा आरोप केला जातो (संदर्भ : https://aajtak.intoday.in/story/amit-shah-bank-director-demonetisation-…). तर तो खरा असण्याची शक्यता आहे. या तर्कास वरकरणी धक्का देणारी घटना काल घडली. पंतांचे चिरंजीव उन्मेष जोशी हे अन्यांसह हमीदार असलेल्या कोहिनूर शैक्षणिक न्यासाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ६८ कोटी रुपयांची कर्जफेड करता आली नाही म्हणे. पंतांसाठी सत्तरेक कोटी हा अत्यंत किरकोळ आकडा आहे. त्यामुळे उपरोक्त जप्ती ही लुटुपुटूची कारवाई वाटते. युतीमध्ये असा हा कोहिनूर जोड (= कनेक्शन) आहे. आ.न., -गा.पै.

बुधवार सकाळी निरव मोदीला लंडन मध्ये अटक करण्यात आलेली आहे. अटक झाल्यावर आता त्याला लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी हालचाली सुरु झालेल्या असतील ! ह्या बातमीने काँग्रेसच्या तोंडच पाणी पळालेल असेल !! https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/pnb-scam-ni…