मराठी
इंग्रजी
बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.
सामर्थ्यदाता : गमभन
Powered by gamabhana
अंतरीच्या कळा
प्रेषक नेहमी आनंदी ( शुक्र, 10/30/2009 - 11:16) .
नभी आसवांचे तळे दाटलेले
मुक्यानेच डोळ्यात पाणावलेले
निघालाच त्या आठवांचा फुलोरा
कधी साठताना मनी टोचलेले
.
असे मीलनाने खुशीच्या महाली
तरी अंतरीच्या कळा सोसलेले
,,
सुखाची करू कामना मी कितीही
नशीबात दुःख असे साचलेले
न चिता मनी ना जिवाची खुशाली
तुला आज मी प्राण हे वाहलेले
प्रसन्ना जीके
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती




मात्रांचा घोळ नाहीसा करता येईल जर
खालील बदलाचा विचार केला तर -
चौथ्या कडव्यात दुसरी ओळ -
बदलून
"नशीबी असे दुःख ते साचलेले"
शेवटच्या कडव्यातल्या पहिल्या ओळीत "चिंता" म्हणायचं होतं का? "चिंता" केल्याने अर्थबोधही होतो आणि वृत्तातही बसतं.
बाकी कविता झकास आहे.
आपला,

(वृत्तप्रेमी) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
कविता
कविता आवडली.
न चिता मनी ना जिवाची खुशाली
हे बहुधा चिंता
असे असावे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/