नसूनी तयात
भिती वाटता जीव काहूर राही न जाणे कसे काय होणार काही विचारात गुंतून डोके सदाही उरी दाटता भाव आभास पाही
खरे काय ते की मनाचाच कावा कुणी ओळखावे कसे सांग देवा जिवाचा मुठीतून आकांत धावा धगत्या मनाला कसे शांत ठेवा
भिताना मनाची मनालाच याही हताश क्षणाची असे होत लाही रडूनी नसे साध्य इच्छाच काही मनी आसवांना जगी अंत नाही
दिसे स्वर्ग बाहेर पाताळ आत अडोसाच नाही उभा वादळात निमूट स्वतः पाहिले मी मनात दिसूनी मला मी नसूनी तयात
धगत्या मनाला कसे शांत ठेवा
मनःपूर्वक आभार
अगदी गेय झाली आहे कविता
हो, अगदी बरोबर
भुजंगप्रयातातली वृत्तबद्ध कविता आवडली.
आभारी आहे