एक असाच काहीतरी अस्पष्ट विचार बरेच दिवस मनात चालला होता आज तो लिहुन काढला एव्हढच्
तुझी आठवण सांजवेळी,
मन माझे कातर करते |
हुदयातुन पुढे सरकत,
वेळीअवेळी डोळ्यात दाटते ||
पोटपाण्याच्या नित्यक्रमात,
काही तास निघुनही जातात |
कामाच्या गडबडगोंधळात,
काहि आठवणी विझुन जातात ||
दुपारच्या गडबडी नंतर,
संथ झुलत संध्याकाळ येते |
परत एकदा स्म्रुती जागवुन,
भावनांच्या म्रुगजळात नेते ||
पुन्हा मन पेटुन उठतं,
समंधालाही उधाण येतं |
चंद्र येतो सोबतिला अन्,
झुळुक वार्याची मंद वाहते ||
या मंद वार्याबरोबर,
आठवणीही कुंद होतात |
मला एकटाल्याच सोडुन,
कुठल्याकुठे वाहुन जातात ||
थोडे दिवस पुन्हा शांतता,
मिळत नाही कामातुन वेळ |
मोकळे झाल्यावर परत एकदा
दाटुन येते कातरवेळ ||
आठवणिंचा खेळ सारा,
येते भरती ओहोटी |
किनारे किती झिजावे,
बांधाची खरी कसोटी ||
लाटांच्या या मुक्त माराने,
किनारे टोकदार होतात |
थोडासा जरी धक्का लागला,
हातपाय कापत नेतात ||
संकटांची सोडून चींता,
सोडुन उधाणाची भिती ||
काढून टाक संरक्षक भिंत,
मिसळून जा लाटेसमती ||
सोडणार नाहीत आठवणी तुला,
परत येतील लाटेवरती |
अथांग मनाच्या सागरात,
क्वचित मिळतात माणिकमोती ||
येत राहते भरती ओहोटी,
पुन्हा गर्जून फेसाळ्ण्यासाठी |
वळुन मागे पाहता दिसतील,
कडूगोड आठवणगाठी ||
येइल परत पुन्हा संध्याकाळ,
आठवणिंना घेउन संगे |
मुक्त करुनी आठवणगाठी,
सोडुन दे त्या वार्यासंगे ||
चेतन
प्रतिक्रिया
2 Dec 2008 - 9:42 pm | प्राजु
छान आहे कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Dec 2008 - 9:58 am | चेतन
धन्यवाद प्राजु ताई
चेतन