श्रीराम आणि श्रीकृष्ण
श्रीराम आणि श्रीकृष्ण
खूप दिवसांपूर्वी SVBC चॅनेल वर रात्री ११ वाजता प्रेमा पांडुरंग ह्यांचे भागवतावरचे प्रवचन लागायचे फारच ओघवत्या भाषेत आणि सुंदर रसाळ पद्धतीने सांगायच्या
(त्यांच्याबद्दल माहिती https://lightinnerlight.com/teachers/smt-dr-prema-pandurang/ इथे मिळेल )
त्यांच्याच प्रवचनात एकदा श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्यांच्या जीवनाची आणि कार्यपद्धतीची तुलना आली. अत्यंत साधी उदाहरण देऊन त्यांनी दोघांमधला फरक स्पष्ट केला होता
उदा. एखाद्या ठिकाणी श्रीराम गेले असतील तर ते शांतपणे सगळे अटेंड करतील पण तेच श्रीकृष्ण गेला तर स्वतःचा प्रभाव वापरून सगळ्यांना आपल्या मागे मागे करायला लावतील तसेच अवतारसमाप्तीच्या वेळेस रामाला कोणीही जाऊ देत नव्हते सगळे शोकात बुडाले होते पण श्रीकृष्णाच्या अवतारसमाप्तीच्या वेळेस कोणाला माहिती सुद्धा नव्हते शांतपणे व्याधाचा बाण लागून अवतारसमाप्ती झाली
ह्यावरूनच श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्यांची तुलना करावीशी वाटली खूप लोकांनी केलीये माझा पण प्रयत्न
श्रीराम
मर्यादापुरुषोत्तम ,एकवचनी एकपत्नीव्रती आणि सगळ्या बाजूने आदर्श (सरळसोट )व्यक्तिमत्व. कुठेही नाव ठेवायला म्हणून इतकीही जागा नाही.
पण कुळाभिमान आणि वचनपूर्तीसाठी स्वतःच्या प्रिय व्यक्तींना पण जुंपले त्यांना सहन करावयास लावले काहीही चूक नसताना.
वरवर दुःखी असून देखील अंतर्यामी एक प्रकारची शांती आणि ठामपणा दिसून येतो (दुसऱ्यांच्या वचनपूर्तीसाठी त्रास सहन करावा लागण्यामुळे स्वतःवर काही दोष (guilt) नाही
तसेच पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब.(त्रेतायुग )
पूर्ण श्रीराम कथेत स्त्रियांवर अन्याय ठिकठिकाणी दिसून येतो. (अहिल्या उद्धारापासून ते सीतेच्या अग्निपरीक्षेपर्यंत )
सगळे गुण/महत्ता हे स्त्रियांच्या बलिदानावर आधारलेले वाटतात .
श्रीरामांसमोर प्रार्थना करताना आपण त्यांच्या perfectionism आणि गुणांसमोर नतमस्तक होतो पण आपल्याबाबतीत असे काही (वनवास इ. )होऊ देऊ नको असेच मागणे मागतो
श्रीकृष्ण
लहानपणापासून माखनचोर,धूर्त राजकारणी ,बहुपत्नीत्त्व आणि एक पाताळयंत्री manipulative (गुंतागुतीचे) व्यक्तिमत्व.
पण स्वतःसाठी प्रिय व्यक्तींना काहीही सहन करावे नाही लागले
नेहमी आयुष्यातील स्त्रियांना निर्णयस्वातंत्र्य देऊन त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले (राधा,कुंती, droupadi,अष्टपत्नी-रुक्मिणी ने प्रथम पुढाकार घेऊन
श्रीकृष्णांना पात्र पाठवले होते,सत्यभामेने त्यांचे दान केले अशा अनेक कथा आहेत)
सामर्थ्य असूनदेखील स्वतःच्या कुळाचा नाश बघावा लागला वरवर सुखी संपन्न असूनदेखील अंतर्यामी सदैव साऱ्यांची चिंता आणि duukh सहन करावे लागले
बरीच राजकारणे,कारस्थाने स्वतः केल्यामुळे एकप्रकारचा guilt
श्रीकृष्णकथेत स्त्रियांवर अन्याय झालेला दिसून येत नाही (जो काही झालाय तो त्यांच्या स्वतःच्या कर्मानुसार)
थोड्याश्या प्रमाणात स्त्रीप्रधान संस्कृतीची सुरुवात (द्वापारयुग)
श्रीकृष्णांसमोर प्रार्थना करताना आपण त्यांच्यासारखे का नाही हा प्रश्न पडतो
ह्याबद्दल इतरांची मते वाचावयास आवडतील (चावून चोथा झालेला तरीही एव्हरग्रीन विषय आहे)
अवांतर-श्रीराम म्हणजे शिस्तबद्ध पाश्चात्य तर श्रीकृष्ण म्हणजे जुगाडू भारतीय असे वाटते
तसेच श्रीरामावतारात जे काही राहीले त्याची सगळी कसर श्रीकृष्ण अवतारात भरून काढली असेही मानण्यास जागा आहे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा हा..
धन्यवाद
साधा फंडाये !
+१११
पण स्वतःसाठी प्रिय व्यक्तींना
काही प्रमाणात सहमत
पूर्ण बालपण त्यांच्या सहवासात
"श्रीराम म्हणजे शिस्तबद्ध
श्रीराम व श्रीकृष्ण
एका नाण्याच्या दोन बाजू नाही वाटत
ठिक आहे.