माळी, शेतकरी आणि वनस्पतीशास्त्राचे पदवीधर परस्पर अवलंबित्व
सध्या दुष्काळाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर माझ्या मनात खालील प्रमाणे विचार चालू आहे.
माळी काम करणारे सर्वसाधारण पणे फळबागा, फुलबागा यामध्ये निष्णांत असतात. कलम करणे, माती तयार करणे, रोग आणि किडी ओळखणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे इत्यादी गोष्टी ती करीत असतात.
शेतकरी बांधव सर्वसाधारण पणे अन्नधान्याची निर्मिती, तेलबिया, फलबागा, फुलबागा इत्यादींना त्यांच्या क्षमतेप्रमाणे विकसित करत असतात. सर्वसाधारण पणे परंपरागत माहिती आणि न्यानावर अथवा सांगिव माहितीवर ते शेती करत असतात. अनेकदा मार्गदर्शनाच्या अभावी बर्याच न सुधारणार्या चूकाही होत असतात. जसे किटकनाशाकांचा अनिर्बंध वापर, कुपनलिकांचा प्रचंड वापर, चूकींचे पीक घेणे ( उसाची लागवड कमी पावसाच्या क्षेत्रात घेणे इत्यादी).
वनस्पती शास्त्राचे पदवीधर वनस्पती शास्त्राचा अभ्यास करत असतात त्यामध्ये, वनस्पतीचे प्रकार, त्यांचे वर्गीकरण, वाढीचे सूत्र इत्यादी इत्यादी.
वेळेच्या अभावी यावर बरेच काही लिहिता येऊ शकते, परन्तु माझ्या मते या तिघांनी जर एकत्र काम केले तर एक्मेकांच्या माहिती आणि अनूभवाचा उपयोग सर्वच समाजाला होऊ शकतो.
या मतामध्ये जर तथ्य असेल तर आजपर्यंत असा विचार का झाला नाही? आणि या पूढे हा विचार कसा पुढे नेता येईल.
कृपया आपापले मत व्यक्त करावे ही विनंती.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पावर नाय...
हेच म्हणतो.
तिन तिगाडा...काम बिगाडा.
विकिप्रकल्प जाहीरात
मुटे सरांच्या मताच्या