फारच सुरेख लेख..
या क्रांतीसूर्यास माझे अभिवादन..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
सर्वसाक्षी, तुम्ही अत्यंत हृदयस्पर्शी लिहिले आहे. खुदिराम बोस यांच्या स्मृतिला लक्ष लक्ष अभिवादन. वयाच्या केवळ १८व्या वर्षी असे जीवन आणि त्याहून दिव्य असा मृत्यू. तुम्ही लिहिलेही छान आहे.
व्यक्त इतकेच करू शकतो आहे. बाकीच्या भावना व्यक्त करण्याच्या पलिकडच्या आहेत.
या लेखाच्या अनुषंगाने असा विचार मनात आला की शाळेत असताना याच खुदिरामांबद्दल धडा होता पण तो इतका नीरस पद्धतीने लिहिला आणि शिकवला गेला की मला प्रश्न पडला की हे तेच खुदिराम बोस का? जर शाळेत इतिहास असा लिहिला आणि शिकवला गेला तर? विद्यार्थ्यांना आवडेलच पण एक राष्ट्रिय भावनाही तयार होईल. नाही तर खुदिराम बोस फक्त बंगाल पुरतेच राहतात आणि वासुदेव बळवंत फडक्यांना वाली फक्त महाराष्ट्र.
http://en.wikipedia.org/wiki/Khudiram_Bose
बिपिन.
मिपाला श्रीमंत करणारा अतिशय सुरेख लेख....
काव्यपंक्तिही सुरेख, गाणं ही हृदयाला हात घालणारं!
अखेरची ओळ ही चटका लावणारी आहे. ’तॉखन जदि ना चिनते पारिश...’ कोट्यावधी लोकसंख्येच्या या देशात रोज हजारो-लाखो मुले जन्माला येतात; अग आई, त्यात तू मला नेमका कसा काय ओळखणार? तर मी सांगतो ती खूण लक्षात ठेव - ’देखबे गोलाय फाशी’....अगदी सोप आहे, ज्या बाळाच्या गळ्यावर फाशीच्या खुणा ताज्या दिसतील तोच मी!
नि:शब्द!
(नतमस्तक) तात्या.
अखेरची ओळ ही चटका लावणारी आहे. ’तॉखन जदि ना चिनते पारिश...’ कोट्यावधी लोकसंख्येच्या या देशात रोज हजारो-लाखो मुले जन्माला येतात; अग आई, त्यात तू मला नेमका कसा काय ओळखणार? तर मी सांगतो ती खूण लक्षात ठेव - ’देखबे गोलाय फाशी’....अगदी सोप आहे, ज्या बाळाच्या गळ्यावर फाशीच्या खुणा ताज्या दिसतील तोच मी!
खरंच चटका लावून गेली ही ओळ!
केवढं हे देशप्रेम आणि किती उदात्त त्याग केला या सर्व वीरांनी, म्हणून आज आपण स्वतंत्र देशात रहातो. त्या सर्वांना माझा विनम्र प्रणाम!
हुतात्मा खुदिराम आणि असंख्य क्रांतीकारकांच्या भावना व्यक्त करणारा अतिशय हृदयस्पर्शी लेख.
स्वत:च्या अवघ्या अस्तित्वाचीच स्वातंत्र्यासाठी होळी करणार्या क्रांतिसूर्याला नम्र अभिवादन,
स्वाती
वाचून अंगावर काटा आला...खूप भावस्पर्शी लेख आहे.
"त्या" लोंकाना जागा दाखवली पाहिजे, इ. इ. लिहिणार्यांनी जरा कविचे नाव काळजीपुर्व़ वाचावे.
या लेखाच्या अनुषंगाने असा विचार मनात आला की शाळेत असताना याच खुदिरामांबद्दल धडा होता पण तो इतका नीरस पद्धतीने लिहिला आणि शिकवला गेला की मला प्रश्न पडला की हे तेच खुदिराम बोस का? जर शाळेत इतिहास असा लिहिला आणि शिकवला गेला तर? विद्यार्थ्यांना आवडेलच पण एक राष्ट्रिय भावनाही तयार होईल. नाही तर खुदिराम बोस फक्त बंगाल पुरतेच राहतात आणि वासुदेव बळवंत फडक्यांना वाली फक्त महाराष्ट्र.
पंधरा ऑगस्टच्या निमीत्ताने अशाच एका विषयावर मी लेख लिहिणार होतो.आता त्याची आवश्यकता वाटत नाही.ह्या सुंदर लेखातून तुम्ही ते काम पूर्ण केले आहे.
आता ह्या पोवाड्यात मी फक्त जी जी रं जी म्हणणार आहे.
आत्मस्तुतीचा धोका पत्करून काही ओळी इथे देत आहे.
कितीही छोटा माणूस असू दे, आयुष्य ओवाळून टाकावी अशी एक तरी कविता तो लिहीत असतो,कधी बाळाच्या कानात कुर्र करून तर कधी आपडी-थापडी खेळून.आपल्या आयुष्याची कथा एका क्षणात सांगावी असा मोका प्रत्येकाला मिळतो.त्याची नोंद कुणि ठेवतं कुणि नाही ठेवत.इतिहास त्यांना लक्षात ठेवतो की नाही याची पर्वा नसते त्याच्या मनाला.
आपल्याला प्रत्येकाला एका छोट्या ठिपक्याएव्हढं आयुष्य मिळतं.आपण कधीच बाहेर येऊ शकत नाही त्या ठिपक्याच्या.पण ही माणसं विलक्षण असतात.ते त्या ठिपक्याच्या परीघावर येतात. त्या सिमारेषेला आव्हान देतात. त्या सिमांच्या रिंगणातून आयुष्याला बाहेर काढतात.त्या परिघाची रेघ बनवतात,नागमोडी वळणं बनवतात, बघता बघता कॅनव्हास पण मोठा होत जातो. रेषांची गती वाढते,आणि एका ठिपक्यातून सुंदर रांगोळी तयार होते यांच्या आयुष्यात येणार्या प्रत्येक माणसाच्या स्वागतासाठी.
स्वातंत्र्य दिनाच्या जवळपास हा लेख लिहून साधलेले औचीत्य कौतुकास्पद आहे.
पोवाडा तर चांगलाच होता. पण, 'जी जी रं' सुद्धा ग्रेट.
कितीही छोटा माणूस असू दे, आयुष्य ओवाळून टाकावी अशी एक तरी कविता तो लिहीत असतो,कधी बाळाच्या कानात कुर्र करून तर कधी आपडी-थापडी खेळून.आपल्या आयुष्याची कथा एका क्षणात सांगावी असा मोका प्रत्येकाला मिळतो.त्याची नोंद कुणि ठेवतं कुणि नाही ठेवत.इतिहास त्यांना लक्षात ठेवतो की नाही याची पर्वा नसते त्याच्या मनाला.
आपल्याला प्रत्येकाला एका छोट्या ठिपक्याएव्हढं आयुष्य मिळतं.आपण कधीच बाहेर येऊ शकत नाही त्या ठिपक्याच्या.पण ही माणसं विलक्षण असतात.ते त्या ठिपक्याच्या परीघावर येतात. त्या सिमारेषेला आव्हान देतात. त्या सिमांच्या रिंगणातून आयुष्याला बाहेर काढतात.त्या परिघाची रेघ बनवतात,नागमोडी वळणं बनवतात, बघता बघता कॅनव्हास पण मोठा होत जातो. रेषांची गती वाढते,आणि एका ठिपक्यातून सुंदर रांगोळी तयार होते यांच्या आयुष्यात येणार्या प्रत्येक माणसाच्या स्वागतासाठी.
क्या बात है..
बिपिन.
ते त्या ठिपक्याच्या परीघावर येतात. त्या सिमारेषेला आव्हान देतात. त्या सिमांच्या रिंगणातून आयुष्याला बाहेर काढतात.त्या परिघाची रेघ बनवतात,नागमोडी वळणं बनवतात, बघता बघता कॅनव्हास पण मोठा होत जातो. रेषांची गती वाढते,आणि एका ठिपक्यातून सुंदर रांगोळी तयार होते यांच्या आयुष्यात येणार्या प्रत्येक माणसाच्या स्वागतासाठी.
फारच सुंदर! क्या बात है!!
चतुरंग
सर्वसाक्शिजि तुमचा लेख वाचुन थरारल्यासारखे झाले. खुप सुन्दर. अशा गोश्टी जर मुलाना सान्गित्ल्या तर नक्किच
फायदा होइल. १५/८ अणि २६/१ ह्या दिव्साचे महत्व त्याना खरया अर्थाने कळेल असे वाटते. तसेच रामदास ह्यानि दिलेला प्रतिसाद पण मनाला भावला. अतिशय सुन्दर.
ऍक बार बिदाय दे माऽ, घुरे आशी!
आमि हाशी हाशी पोरबो फाशी देखबे भारतबाशी
मध्यमातली एक सुंदर विराणी!
'मा' या अक्षरावरची स्वरवेल अशी बंधली आहे की खरंच कुणा मुलाने आपल्या आईला हाक मारावी, मतृत्वाच्या कुशीत शिरावं, त्या पदराखाली मुसमुसत दडावं, अगदी शेवटचंच! आईच्या कुशीत शिरून ते मुसमुसणं महत्वाचं कारण मग जगासमोर हासत हासत फाशी जायला त्यामुळेच बळ येतं!
आमि हाशी हाशी पोरबो फाशी देखबे भारतबाशी
'आमि हाशी हाशी' म्हणतांना दिदीने खास बंगाली ढंग आणि लयीचं वजन किती सुरेख सांभाळलं आहे! 'पोरबो फाशी' च्या स्वरावलीतली इन्टेन्सिटी जीव कासावीस करते. 'आई, बघ गं..' या हाकेतली जी आर्तता आहे ना, अगदी तीच आर्तता दिदीने 'देखबे' ह शब्द उच्चारताना दाखवली आहे! केवळ जबरदस्त!
आज दिवसभरात हे गाणं खूप वेळा ऐकलं, पुन्हा पुन्हा ऐकलं. छ्या! खूप अस्वस्थ करून टाकणारं गाणं!
म्हणून आत्ता हे चार शब्द खरडून थोडीशी अस्वस्थता इथे उतरवायचा प्रयत्न केला आहे!
(पुन्हा एकदा नि:शब्द!) तात्या.
तात्याशी सहमत.
खाली मनिषचा प्रतिसाद पाहून यूट्यूब वर ते गाणे ऐकायला गेलो, पण पूर्ण ऐकू नाही शकलो म्हणजे ऐकवलं नाही गेलं माझ्याच्याने. साक्षीजींचा लेख आणि त्या गाण्याची पूर्वपिठिका माहित झाल्याने, आणि लताबाईंनी इतके सुंदर गायल्याने, जो काही एकत्रित इफेक्ट आला तो फारच अस्वस्थ करणारा होता.
बिपिन.
आपल्या भावना समजल्या आणि मी त्यांच्याशी सहमत आहे.
(एक विनंती - कृपया मराठीतून प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करावा. मराठी टंकन अतिशय सोपे आहे. इथे मदत आहे.)
चतुरंग
सर्वसाक्षी..
इतका सुंदर लेख १५ ऑगस्टच्या निमित्ताने वाचायला मिळावा यासारखं सुदैव कोणतं!!!
केवढा तो त्याग, केवढी ती दुर्दम्य इच्छाशक्ती, केवढी ती मनाची तयारी... आणि केवढसं ते वय!!! आपला लेख वाचून अंगावर शहारे आले. अत्यंत हृदय स्पर्शी कथा आणि लेखसुद्धा. गाण्याची शेवटची ओळ तर सुन्न करून गेली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
केवढा तो त्याग, केवढी ती दुर्दम्य इच्छाशक्ती, केवढी ती मनाची तयारी... आणि केवढसं ते वय!!! आपला लेख वाचून अंगावर शहारे आले. अत्यंत हृदय स्पर्शी कथा आणि लेखसुद्धा.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
प्रत्येक ओळीवर असंख्य कविता ओवाळून टाकाव्यात..!
शेवटच्या ओळीसाठी प्रतिक्रिया न देणं उत्तम..!
देशाभिमानाने ओतप्रोत भरलेला लेख..!
सर्वसाक्षी तुमचे अनंत ऋणी आहोत..!
लोकसत्तेत भारत सरकार तर्फे वाहण्यात आलेली श्रध्दंजली व त्या वरील या ओळी वाचुन पुर्ण गाणं समजुन घेण्यची इच्छा होती , ते अचानक पुर्ण झाली.. धन्यवाद.
याच वाटेवरची -
मनी धीर धरी, शोक आवरी जननी
भेटेन नऊ महिन्यांनी....
अशी एक सुरेख कविता आहे..
निशब्द होतो मी जेव्हा जेव्हा क्रांतीवीरांची जिवनी वाचतो मी !
त्याच्या स्वप्नातील भारत शोधता शोधता तीळ तीळ मरतो मी !
असेल नसेल तेस्वाहा करुन देशासाठी प्राण देणा-याच्या समोर नतमस्तक मी !
डोळ्यात पाणी भरुन पुन्हा क्रांतीची वाट पहाणारा सामान्य नागरीक मी !!
नेहमीच तुमचे लेखन अस्वस्थ करुन जाते... धन्यवाद... काही ना काही कारणामुळे .. तुम्ही क्रांतीविरांची माहीती प्रकाशीत करता व त्या क्रांतीकारांचे विचार व जिवन नव्या पिढीला त्यांच्याच सामान्य भाषेत भेटत राहतात.. !
अनेकानेक धन्यवाद.
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
प्रतिक्रिया
फारच सुरेख
असेच म्हणतो
+१
अतिशय
सर्वसाक्ष
अतिशय सुरेख...
वंदन
साक्षीजी..
वा
असेच म्हणतो
दुवा दिसत
अंगावर काटा आला...
अशाच एका विषयावर मी लेख लिहिणार होतो.एका ठिपक्याची रांगोळी
पोवाडा तर
वा रामदासजी वा!
सर्वसाक्श
सर्वसाक्षी,
सुंदर लेख !!!
ऍक बार
तात्याशी
Sakshi
इत्यादी
वा..
हेच म्हणते
प्रत्येक
काय लिहू ??
यू ट्युब
धन्यवाद,
अतिशय
परवा..
निशब्द