भुमीपुत्रच भूमीहीन झालाय,
दाही दिशांना वणवण फिरतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज
उपासमारीने मरतोय.
शेतक-याचा पोर उपाशी
शेतक-याच्या देशामध्ये.
कुपोषणाच्या वेषात
बालमृत्यू थैमान घालतोय.
बँकांकडून कर्ज घेतले
दुष्काळाने लादली नादारी.
घाव हा दुहेरी प्रवृत्त
आत्महत्येला करतोय.
सरकारी अनुदाने होत आहेत
मंत्र्यांच्या तिजोरीत बंद.
कर्जवसुलीसाठी शेतक-यांच्या
घरादारावर नांगर फिरतोय.
श्रीमंतांच्या, हिरोन्च्या भल्यासाठी
नवस सायास केले जातात.
गरीब शेतक-याला आपण
पद्धतशीर विसरतोय.