शाळेच्या मैदानावर राजू आणि चिंटूची चांगलीच जमली.राजूने क्रिकेट खेळताखेळता चिंटूला भरमसाठ शिव्या दिल्या.आणि तुझा बाप मरेल असा घणाघाती शापही दिला.तुम्हाला वाटेल शाप फक्त महाभारात ,रामायणातच होते कि काय,आजच्या युगात आधुनिक भारतातही शाप आहेत आणि ते लागूही पडतात.
राजूच्या जिभेवर म्हणे तीळ आहे .तो जे बोलतो ते खरे होते.बाकी काही खरे होऊ दे अथवा न होऊ दे ,पण जेव्हा राजू संतापाने कोणाला तुझा बाप मरेल असा शाप देतो त्यावेळी मात्र सारेच टरकतात.कारण दुस-या दिवशी बाप वर रवाना झालेला असतो.अशी अनेक उदाहरणे घडल्यामुळे मैदानावर सुरु असलेला क्रिकेटचा डाव अचानक थांबला.फिल्डर जागच्याजागी उभे राहिले.कारण राजूने चिंटुला संतापाने शाप दिला होता.क्रिकेटची इनिंग तेथेच संपली .जो तो आपल्या घरी गेला आणि दुस-या दिवशी चिंटुच्या बाबांची इनिंग संपली होती.
मैदानावरची हि घटना शाळेत कुणीतरी वर्गशिक्षक तुकाराम शिंदे यांना सांगितली.तुकाराम शिंदे भडक डोक्याचे त्यांनी राजूला स्टंपने बदडला.राजु रडरड रडला.संतापाच्या भरात तो ओरडला ‘सर मला मारताय तुमचा बाप मरेल .‘ संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलेले शिंदे सर दुस-या दिवशी गावी निघून गेले.सांगलीवरून वडील वारल्याचा फोन आल्याची बातमी शाळेत पसरली आणि शाळेला एक दिवसाची सुट्टी मिळाल्यांने मुले आनंदाने घरी निघून गेली.
१५ दिवसांनी शाळेत परतलेल्या शिंदे सरांनी सर्व इतिहास मुख्याध्यापक रघुवीर पवार यांना सांगितला.पवारांनी राजूच्या वडीलांना निरोप पाठवला,मुलाच्या कर्तृत्वाचे पाढे त्यांनी राजूचे वडील शंकरराव यांच्या पुढे वाचले.‘असे अनेक प्रकार आपल्या मुलाच्या बाबतीत घडले आहेत यापुढे लक्ष्य ठेवा‘ अशी तंबी राजूच्या वडीलांना मुख्याध्यापकांनी दिली.कुठूनतरी राजूच्या कानावर ही बातमी गेली.त्यानी या रघुवीर मास्तरचा म्हातारा मरतो कि नाही बघ अशी वल्गना वर्गात केली.आणि दुस-या दिवशी रघुवीर पवार यांचे वडील कैलासवासी झाले.
यथावकाश राजूचा दाखला शाळेतून काढून त्याच्या घरी पाठवण्यात आला.राजूचा मोठा भाऊ प्रविण शाळेत गेला त्यांनी मुख्याध्यापकांना भरपूर समजावले कुणीही ऐकले नाही.कारण राजूचा अनुभव शाळा, गाव ,मित्र सर्वांनाच आला होता.अनेकांनी हे कार्ट मरत का नाही ?असे जाहीर प्रकटनही केले होते. राजुचे नाव अखेर शाळेतून काढण्यात आले.या प्रकारामुळे राजुचा भाऊ खूप संतापला.त्यांनी घरामध्ये राजुला बेदम बदडले.राजूमुळे सर्वांना मनस्ताप सहन कारावा लागला होता याची चिड मारा्तांन त्याच्या मनात होती.मार खाऊन सुजलेला राजू कोप-यातून हळूच बोलला ‘दादा मला मारतोस तुझा पण बाप मरेल. झालं.....सत्यानाश...राजूच्या या वाक्याने प्रविणच्या हातातली काठी खाली पडली.राजूचे बाबा शंकरराव धाडकन खुर्चीत बसले.आईने थेट हुंदकाच दिला.आणि घरात सर्वत्र नीरव शांतता पसरली.आपले बाबा मरणार या कल्पनेने प्रविणला वाईट वाटले.आपण जाणार या भावनेतून शंकरराव खुर्चीत विमनस्क बसले होते.रात्री घरी कोणीही जेवले नाही.पाण्याचा थेंबही पोटात गेला नाही.राजूची आत्तापर्यंतची भविष्यवाणी खरी ठरली होती.त्यामुळे सर्व कुटुंब चिंतेत होते.शंकरराव सारखे आपल्या छातीला हात लावून स्वत:ला तपासून पाहात होते.पंखा पडून मरायला होईल या भितीने ते पंख्यापासून दूर जाऊन बसले.रात्रीच दोन वाजले तरी शंकररावांना झोप नाही.घरात मोठा लाईट लावून ठेवलेला होता. छातीत धडधड सुरु होती.
पहाटे पहाटे राजूचे बाबा शंकरराव यांना डोळा लागला.
तेवढ्यात राजूची आई त्यांना उठवू लागली.
‘ अहो उठा, झोपलात काय ? शेजारचे गणपतराव मेले.
............
सुनिल पाटकर
प्रतिक्रिया
18 Aug 2010 - 3:46 pm | मी ऋचा
लै भारी!
18 Aug 2010 - 3:49 pm | अनाम
=)) =)) =)) =))
तुफान हसलो राव.
18 Aug 2010 - 3:50 pm | परिकथेतील राजकुमार
मालक, चिडू नका पण हि कथा आता विनोद, चारोळी, किस्सा अशा सगळ्या प्रकारात १००० वेळा वाचुन चावुन चोथा झाली आहे.
असो...
18 Aug 2010 - 3:54 pm | अनाम
सहमत.
पण तरी सुध्धा पुन्हा हसु आलच .:)
18 Aug 2010 - 6:56 pm | कानडाऊ योगेशु
सहमत.
असेच कथासूत्र असलेल्या जोक्स मध्ये दूधवाला,वॉचमन इ.इ मरत असतो.
पण चार ओळीच्या विनोदाला कथेचा बाज देऊन रंगतदार बनवले आहे.
18 Aug 2010 - 3:51 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
:)
18 Aug 2010 - 4:09 pm | मृत्युन्जय
हाहाहाहाहाहाहाहाहाहा. खुपच छान रंगवला आहे हा विनोद. आधी पण ऐकला होता. पण याचे कथेत रुपांतर लैच भारी
18 Aug 2010 - 4:11 pm | अनुराग
नक्कि काय म्हनायचेय ते कळाले. त्यासाटि खुप बापाना मरावे लागले.
18 Aug 2010 - 5:04 pm | बिपिन कार्यकर्ते
हसू नाही आले. आणि अशा प्रकारचे विनोद मला व्यक्तिशः अयोग्य वाटतात.
18 Aug 2010 - 5:33 pm | अर्धवट
+१
असेच म्हणतो
मला वाटलं मीच एकटा आहे का काय असा..
18 Aug 2010 - 6:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही. तुमच्यासारखेही बरेच लोक आहेत मिपावर!
18 Aug 2010 - 8:10 pm | मस्त कलंदर
अगदी अगदी...
18 Aug 2010 - 5:37 pm | विजुभाऊ
अर्ध्याशी अर्धा सहमत
विजुभौ पूर्णवटराव
18 Aug 2010 - 5:42 pm | नावातकायआहे
आयला ई.२ री तु़कडि फ दर्जा....
गनपतराव
18 Aug 2010 - 5:57 pm | सचिन कुलकर्णी
जबराट आहे राव.
कुणी निन्दा, कुणी वन्दा | आमचा हसवण्याचा धन्दा ||
चालू द्या..
18 Aug 2010 - 6:39 pm | आर आर
धमाल आली राव......