अरूंधतीतै, तुम्ही खरंच नशीबवान आहात...
माझ्या बाबतीतही अशीच एक घटना घडली होती.
८८-८९ मध्ये मी दिल्लीत होतो. राहायला गोल मार्केट परिसरात आणि तिथून नेहमी बसने संसदभवन मार्गावरील माझ्या कार्यालयात जात असे. तो काळ म्हणजे खलिस्तानी चळवळीचा बहराचा काळ होता. दिल्लीत अधून मधून बाँबस्फोट होत असत. असेच एक दिवस मी बस थांब्यावर येईपर्यंत माझ्या नजरेसमोर माझी बस धडधडत निघून गेली. त्यानंतरची बस साधारण अर्ध्या तासाने होती म्हणून मी चालतच निघालो. मी माझ्या कार्यालयाच्या जवळ पोहोचलो आणि मला कळले की रस्ता, वाहतुक पोलिसांनी बंद केलाय. थोडी चौकशी केल्यावर कळले...की बसमध्ये बाँबस्फोट झालाय...बरेच जण मेले/जखमी झालेत. लांबून ती भग्न बस दिसत होती...तिच्यावरचा मार्गक्रमांक वाचला..तो मात्र शाबूत होता...(त्यावेळी दिल्लीत बसवर खूप ठळक अक्षरात पुढे आणि मागे मार्गक्रमांक लिहायचे..आता सद्द्या काय आहे माहित नाही.
....योगायोगाने ती तीच बस होती...जी मला न घेताच निघून गेली होती. :(
त्या विलक्षण योगायोगाचा विसर मला आजही पडलेला नाहीये.
देवसाहेब;
विषारी झाडांना फुले, फळे आली तरी त्याला बहर आला असे म्हणत नाहीत. वाक्य खटकले म्हणून लिहिले.
ति. माणूसघाणे(री)
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
देवसाहेब, तेव्हा मला खरंच जाणवले की आपली घरी कोणीतरी काळजी करत असते, देवाकडे :) आपण सुखरूप राहावे म्हणून प्रार्थना करत असते....त्या प्रार्थनेत किती ताकद असते ते अशा प्रसंगातून गेल्यावरच कळते!
तुमचा अनुभवही तितकाच अंगावर काटे आणणारा..... बचावलात!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
पण एकूणच काळ आणि वेळ एकत्र आल्याशिवाय आपल्याला इथून सुटका नाही. ;)
असाच एक प्रसंग म्हणजे..मुंबईत एकाच वेळी घडलेले बॉंबस्फोट...बाबरी पतनानंतर मुंबईत जे घडले ...
त्याच दिवशी मी मुंबई शेयर बाजारच्या इमारतीत जाऊन परत चर्चगेटला आलो..तिथे माझा एक मित्र भेटला...त्याने विचारले मला...शेयर बाजारात बॉंबस्फोट झाला ना...नक्की काय झाले सांग ना.
मी त्याच्याकडे वेड्यासारखा पाहात राहिलो...म्हटलं नाही रे...आत्ताच तर मी तिथून येतोय...तर म्हणाला...काही तरीच काय? आत्ता बातमी आलेय की तिथे बॉंबस्फोट झालाय...तळघरात...जिथे पार्किंग होतं....
आता आश्चर्य करण्याची पाळी माझी होती.
तसाच त्याला बरोबर घेऊन परत फिरलो आणि शेयर बाजाराची वाट धरली...ते चित्र फारच भीषण होतं. :(
मध्यंतरी मी तिथून निघून जरा वाट वाकडी करून माझ्या एका मित्राला भेटायला गेलो होतो आणि मधल्या काळात बहुधा ही घटना घडलेली असावी...तरीही फार नाही पण मधे जेमतेम १५-२० मिनिटांचा वेळ गेला असावा.
एकदा ह्यावर सविस्तर लिहावं लागेल.
अनुभवकथन आवडले.
माझ्याही बाबतीत दोनेक वेळा असाच काहिसा अनुभव आला.
एकदा कोल्हापुरला जात होतो. स्वारगेटला एका बस मध्ये चढलो,बस ब-यापैकी रिकामी होती परंतु का कोणास ठावूक त्या बस मधुन खाली उतरून दुसरी उशीराची बस पकडली. नंतर वाटेत ह्या आधीच्या बसचा अपघात झालेला दिसला.
अभिज्ञ.
प्रतिक्रिया
नशीबवान आहात.
???
देवसाहेब,
खरं आहे तुमचं म्हणणं!
अनुभवकथन
बापरे!
लेखनशैली
लेखन आवडलं!
अरुंधती ताई
अस्साच बोल्तो !
अनुभव!
धन्यवाद!