मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसादक उत्क्रांत होतो का?

प्रभो · · काथ्याकूट
मिपावर यापुर्वी सिद्धहस्त लेखकांविषयी चर्चा झालेली आहे. मिपावर यापुर्वी सिद्धहस्त टवाळकांविषयी चर्चा झालेली आहे. पण मिपावर यापुर्वी सिद्धहस्त प्रतिसादकांविषयी चर्चा झालेली नाही. या प्रतिसादकांपैकी काही जण आजकाल फारसे प्रतिसाद लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच प्रतिसाद लिहितांना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत ज्यांचे प्रतिसाद आवडले त्या प्रतिसादकांसंदर्भात हा चर्चाविषय आहे. सध्या लिहीते असलेले तीन प्रतिसादक अवलिया, ||राजे|| आणि टारझन (फक्त तीन नावांची अनुमती असल्याने बाकीच्या कंपूने माफ करावे ही विनंती) हे या मिपावर लक्षवेधी आणि वाचनीय प्रतिसादलेखन करतांना आढळतात. तीन्हींची शैली, हाताळलेले विषय निराळे आहेत. नुकतीच अवलिया यांनी 'जियो' तर टारझन यांनी 'एक्सलंट' ही प्रतिसादमाला सुरू केलेली आहे. अवलियांचे 'वा! वा ! वा! छान' आणि राजेंच्या '+१' च्या प्रतिसादमाला प्रसिद्धच आहेत तसेच अपुर्णही. खुद्द या प्रतिसादकांना त्यांच्या प्रतिसादांच्या वैविध्याविषयी काय वाटते? वाचकांना त्यांच्या लेखनात काही बदल जाणवत आहेत का? थोडक्यात या प्रतिसादकांच्या प्रतिसादनात ते उत्क्रांत होत आहेत असे आपल्याला जाणवते का? अक्षय , ह घे बाबा... :)

वाचन 5058 प्रतिक्रिया 0