खालील मेसेज व्हॉट्स अॅप वरून झाले होते. त्यातून या चित्रावर काही भाष्य केले गेले होते तेही सादर...
१. Shashikant Oak : मला जास्त आवडले ते जयाजी शिंदे यांच्या शिकारीला जातानाचे पेंटिंग.
मनोज दाणी : ho surekh ahe te, hence right at the front
एडविन लॉर्ड्स वीक्स यांचे पुर्ण चित्र मनोज दाणींनी मला पाठवले.
Shashikant Oak : हातावर ससाणे धारी रक्षक इतका स्मार्ट दाखवलाय. मागील भागातील सजावट पाहता राजवाड्यातून ते बाहेर पडले असावेत.
मनोज दाणी : हो.
Shashikant Oak : पायी चाललेल्या हुजऱ्याची एका हाताने घोड्यावर हाताची ठेवण जवळीक दाखवते. राजा शिकार करताना असे शिपाई देखील नेम धरून सावजाला टिपतात. पण नाव होते महाराजांच्या नेमबाजीचे! अर्थात हे जयाजीरावांच्या बाबत असेल असे नाही...
२. Shashikant Oak :सावलीच्या तिरकेपणातून सकाळचे११ नंतरच्या वेळी ते असेल का?
मनोज दाणी : हो असेल
मनोज दाणी : एक एक माणूस पाहण्यासारखा आहे
३.
हवेलीच्या गच्चीवरील कलाकुसर आणि पोपटांच्या बसण्याने नैसर्गिक उठाव आला आहे.
४.
Shashikant Oak :पूर्ण चित्र फारच प्रभावी आहे. फुटपाथवरील सावलीत बसून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांसाठी (सध्याच्या पानठेल्यांप्रमाणे?)हुक्का पाणी करायची सोय आवडली. रस्ता सिमेंटच्या चौकटी सारखा आहे!
शिवाय नाच गाणी करणाऱ्या किंवा साहसी खेळ करून लोकरंजन करणारे कलाकार शक्यतो राजेसाहेबांच्या नजरेत दिसावे असे वाटून मुलीला पुढे केले गेले असावे असा आभास वाटतो.
मनोज दाणी: हो.
५.
प्रतिक्रिया
14 Mar 2021 - 5:54 pm | खटपट्या
चित्रे दिसत नाहीत
14 Mar 2021 - 6:06 pm | चौथा कोनाडा
मला दिसले.
14 Mar 2021 - 6:08 pm | चौथा कोनाडा
मनोज दाणी यांनी पाठवलेले भारी पेंटींग आहे.
टप्प्याटप्प्याने केलेले तपशिलवार रसग्रहण आवडले.
+१
16 Mar 2021 - 3:14 pm | चलत मुसाफिर
पानिपत मोहिमेचा जमाखर्च, व्यूहरचना, ताळेबंद यावर दाणी यांनी फारच छान लाहिले आहे. पुस्तकात दिलेली जुनी तैलचित्रेही अफाट आहेत
21 Mar 2021 - 1:31 pm | तुषार काळभोर
बीबीसी मराठी वर काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता.
कोल्हापूरच्या बहीणभावांनी ग्वाल्हेरवर राज्य केलं तेव्हा...
लेख ज्या जयाजिराव शिंदे यांच्याविषयी आहे, ते जनकोजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी ताराबाई यांचे दत्तक पुत्र. स्वतः जनकोजी शिंदे हे दौलतराव शिंदे आणि बायजाबाई शिंदे यांचे दत्तक पुत्र. १८५७ च्या उठावाआधी जनकोजी व बायजाबाई यांचे प्रशासनातील प्रभावा वरून बिनसले आणि जनकोजी यांनी बंड केले. बायजाबाई शिंदे यांना ग्वाल्हेर सोडावे लागले. पुढे १८५७ च्या उठावा नंतर बायजाबाई यांनी जिवाजिराव यांच्याशी जुळवून घेतले.
या बायजाबाई कोल्हापूरच्या घाटगे घराण्यातील. दौलतराव शिंदेंच्या कार्यकाळात बायजाबाई यांचे बंधू हिंदुराव घाटगे यांचं दरबारात वजन होतं. जनकोजी यांच्या उठावानंतर हिंदुराव दिल्लीला स्थायिक झाले. तिथे त्यांचा मोठा वाडा होता. त्या जागेवर आता हिंदुराव हॉस्पिटल आहे.
24 Mar 2021 - 12:13 am | शशिकांत ओक
सुळसुळाट का असावा?
निपुत्रिक असणे हा राजघराण्यांना शाप असावा कि काय न कळे?
बहुतेक दत्तक मुले मोठेपणी कर्तबगार, साहसी, लोक कल्याण कारी राजे म्हणून प्रसिद्ध आहेत...