Skip to main content

प्रकटन

नोहा चा आर्क

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 01/10/2010 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
१९६४ पासुन ऐकतोय. महापुर येणार. जग बुडणार. अजुन तरी बुडलेले नाही. बुडेल तेंव्हा बुडेल. पण समजा यदाकदाचित बुडालेच तर नोहाला प्रश्न पडेल? स्पिसिस(नमुने)म्हणुन कुणाकुणाला बोटीवर न्यायचे. पुढच्या युगात उपयोगी पडेल असे कुठ्कुठले मिपावरील नमुने तो आपल्या बोटीवर नेइल? नुसते नाव सांगु नका. कारणे पण सांगा.

आपण मुर्खात मोडतो का शहाण्यात ?

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 30/09/2010 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने मला हा लेख परत एकदा प्रकाशीत करावा लागत आहे. म्ह्नजे तो आत्त मिपा वर आहे असे नाही कारण मी तो काढला होता पण तो एवढ्या लवकर परत टाकावा लागेल असे वाटले नव्हते. त्याच बरोबर दुसरा पण टाकत आहे. " "जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी पडतो.

माझं काय चुकलं?

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 30/09/2010 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. सगळ अगदीच सामान्य. अशाच घरात माझा जन्म झाला.. लहानपणाचं आयुष्य आजुबाजुचं जग बघत बघत मोठं झालं, कधी गरीबी कधी श्रीमंती, म्हणजे कधी साधी भाजी पोळी तर कधी पुरणपोळी अशा अर्थाने. भारतात जन्म घेतलास म्हणजे मार्बल्स्,विटी-दांडू, क्रिकेट आवडायलाच हवे असा मनावर एक कोरला गेलेला ईतिहास, मला बास्केटबॉल आवडायचं. आयुष्य म्हणजे जे आपले आई-बाबा, शेजारी जगताहेत तेच असतं असा परिस्थितीचा आग्रह. पण मला हे कधीच पटत नव्हतं, हे असं नको- असं असायला हवं अशी माझी जिज्ञासा आणि अपेक्षा. त्यामुळे घरात आणि घरा बाहेर मी नेहमीच एक रेबल (ईंग्रजी).

माहिती हवी आहे.( दिल्लीतील हॉटेल बद्दल)

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 29/09/2010 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मला आपणाकडून एक मदत पाहिजे आहे. माझे आई-बाबा ( वय सत्तरीच्या पुढे) नोव्हेंबर मधे दिल्ली, जालंदर ,चंदिगड, अमृतसरला जाणार आहेत. आईला जालंदरला तिच्या लेखनाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. तिकडची रहाण्याची सोय आयोजकांनी केली आहे . मात्र दिल्ली, चंदिगड त्याढिकाणी रहाण्याची सोय असलेली चांगली हॉटेल्स ( महाराष्ट्र मंडळ वगैरे ) माहित नाहीत . ज्यांना काही यासंबंधी माहित असेल तर कृपया माहिती द्यावी . धन्यवाद अमोल केळकर

मुंजा

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 28/09/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
"दोन चार दिवसाकरता सर्व बाजुला ठेव आणि जाउन ये. पण करु काय तिकडे जाउन? "माहीत असलेले काहीही करु नकोस. फक्त जा. जे होइल ते आत्तपर्यंत जे झाले त्यापेक्षा वेगळे असेल." अरे बाबा, डोक्यावर ४ कलर ब्रोशर ची डिलीवरी आहे. ते सोडुन ३ दिवस....? एक्झिबिशन ची डेड लाइन आहे." " विझ्युअलायझेशन झाले आहे ना?तु फायनल कॉपी ओके कर. प्रिंटींग मी बघुन घेतो. प्रेस ला अ‍ॅडवान्स दे म्हणजे ऐनवेळी नडणार नाहीत". नंतर गेले तर चालणार नाही का? "आठ दिवसानी बँगलोर. मग २५ डीसेंबर ला मुंबई. जाणार का तु बॅगलोर ला.?" नको. च्यायला यायला जायला ३ दिवस. पण.. "आता पण बिण काहीही नाही. हे ठरले. आर्टीस्टला दोनशे रुपये जास्त दे.

शिरिष कणेकर

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी सोमवार, 27/09/2010 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
मला खूप आवडलं म्हणुन येथे दिलं आहे. धोरणात बसत नसेल तर खुशाल उडवा. जरा वाचा आणि विचार करा .......... राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं . शूर असावं तर राणा प्रतापसारखं. स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं. देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं. कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं . हुशार असावं तर बिरबलासारखं . धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं. करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं. सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख. राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं. बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं. समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.

एका नव्या सभ्यतेची ओळख.

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 26/09/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, एकदा असाच मनात विचार आला, आपण काय जपुन ठेवतो बरं? पैसा? माणसं? सुखं? ईतर काही? नाही.. मग काय? तर आठवणी. ज्या कायम सोबत राहतात, अगदी मरेपर्यंत. बाकी सगळं क्षणिक. नाही का? ************************************************** आज नविनच लोकांना भेटलो, कधी विचारच काय तर कल्पना सुद्धा केली नव्हती. एका मित्राला भेटायला काय गेलो आणि एक नविन विश्व पाहुन आलो. शनिवार रात्र म्हणुन पार्टी चालु होती तिथे, नविन चेहरे, नविन लोकं, खरं तर मित्राला बरोबर घेउन लगेच निघायचे होते तिथुन पण हे लोकं एवढे आग्रही होते की मला तिथे तास दोन तास थांबायला भाग पडलं. पहिल्यांदाच मार्गारिटा प्याली, आवडली.

स्मृतिभ्रंश!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 25/09/2010 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी खूप वाईट आहे. गांभीर्यानं दखल घेण्याजोगी आहे. चिंता करायला लावणारी आहे. खचवून टाकणारी आहे. माझ्या मोबाईलमधल्या "सॉफ्टवेअर'चं काल दि. 23 रोजी निधन झालं. अनंत चतुर्दशीनंतरच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज त्याचं "विसर्जन' करायला मला भाग पडलं. सॉफ्टवेअर बदलून घेणं किंवा त्यासाठी आलेला अडीचशे रुपये खर्च, हे दुःखाचं कारण नसून, माझ्या खात्यातील सर्व संपर्कही सॉफ्टवेअरसोबत गंगेला मिळाले, हे आहे! काल रात्री काम करताना वरिष्ठांचे धपाधप पाच-सहा एसएमएस आले. बहुधा त्याचा ताण सहन न झाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, मोबाईलनं अचानक मान टाकली. सुरूच होईना. थोडासा "डिस्प्ले' येऊन गायब होत होता.

पुढल्या वर्षी लौक्कर या...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 22/09/2010 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याच्या कृपाशीर्वादाने मिपा सुरू झाले तो आमचे लाडके दैवत असलेला लालबागचा राजा मुंबैचा मुक्काम आटपून आज निघाला.. लालबागच्या राजाचा रुबाब अन् त्याची शान.. लै भारी.. सर्व मिपाकरांतर्फे त्याला अलविदा.. बाय बाय.. टाटा..:) गंपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लौक्कर या!