डोळ्यांत क्षितिजाच्या व्याकूळ होता जीव
पाऊली अश्रूंच्या होता घायाळ भाव
गात्रात दु़़खाने केला होता निवारा
थरथर प्राणांची पाहत कापत होता वारा
कातर सुराने निशब्द झाल्या होत्या संवेदना
पंखात पापण्यांच्या होत्या हळव्या खुुणा
अशा संध्येकाठी एकांत होता बुडाला
तू जाताना सायंतारा तमांत होता निजला