मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
प्रतिक्रिया
24 Jan 2015 - 12:09 pm | टवाळ कार्टा
हि स्ट्रेस टेस्टिंग आहे ना :)
24 Jan 2015 - 7:12 pm | खमक्या
थंडावला वाटतं धागा...
फिल्डींग लावली होती ना राव ८८८,९००,९९९ व१०००व्या प्रतिसादासाठी.... वाया जाणार असे दिसतेय.
24 Jan 2015 - 8:32 pm | पैसा
भांडण सुरू करा!
24 Jan 2015 - 8:40 pm | टवाळ कार्टा
खिक्क
24 Jan 2015 - 8:36 pm | टवाळ कार्टा
हे मिपाकरांचेच स्ट्रेस टेस्टींग झाले काय? ८००+ प्रतिसाद हा फक्त मिपाविक्रम आहे की यच्च्ययावत मराठी संस्थळांमधला विक्रम म्हणायचा?
रच्याकने एका मराठी माणसाला दुसर्या मराठी माणसाचा धागा इतका पॉपुलर झाला याची जळजळ नसेल ना??
24 Jan 2015 - 8:38 pm | पैसा
मायबोलीवर १००० प्रतिसादवाले धागे कमी नाहीत.
24 Jan 2015 - 8:40 pm | टवाळ कार्टा
काय सांगता...म्हणजे मिपा सोडून गेलेले इतके "अॅक्टिव्ह" होते ;)
24 Jan 2015 - 8:49 pm | पैसा
ये पीएस्पीओ नहीं जान्ता! कार्ट्या, मायबोली हे मराठीतलं आद्य संस्थ़ळ आहे. १९९६ पासून चालतंय.
24 Jan 2015 - 8:53 pm | हाडक्या
चालायचं हो पैसातै.. नवे पोरं ही.. ;)
24 Jan 2015 - 9:01 pm | टवाळ कार्टा
नया हय मय :)
24 Jan 2015 - 9:41 pm | खमक्या
आंतरजातीय विवाहास विरोध करुन स्वजातीय जोडीदार पहायला लावणारा समाज आंतरलिंगीय विवाहास प्रोत्साहन का बरे देतो? का नाही स्वलिंगीय विवाह करत??
स्वगत- १००० साठी काडी पुरेल का ही.
24 Jan 2015 - 10:12 pm | टवाळ कार्टा
मी लिहितो आहे ती काडी नाहीये पण वस्तुस्थिती आहे
मला सुटेबल वाटणार्या मुली जास्त करून ब्राम्हण जातीतल्याच मिळत होत्या मॅट्रिमोनी सायटींवर...पण त्यापैकी कोणीही जातीबाहेर लग्न करण्यास तयार नव्हते...कारण विचारले तर उत्तर "आई-बाबांना नाही चालणार"
24 Jan 2015 - 10:21 pm | खमक्या
तोच तर लोचा आहे राव. पहिला फिल्टर मुलीचे गुण हा लावण्याऐवजी जात/धर्म हा लावावा लागतोय. त्यातून ज्या उरतील त्यांच्यामधून निवडावी लागतेय.
24 Jan 2015 - 11:07 pm | टवाळ कार्टा
त्यापेक्षा वाईट म्हणजे व्यवस्थित शिकलेल्या मुलींचासुध्धा याला विरोध नाही
24 Jan 2015 - 10:28 pm | पैसा
जातीबाहेर लग्न करताना लोक अनेक कारणांनी पाय मागे घेतात. खाण्यापिण्यात आणि चालीरीतीमधे बदल, उच्चनीचतेची भावना, नातेवाईक स्वीकारतील का नाही याची शंका, अनेक गोष्टी असतात. त्याच्यापलीकडे विचार करणारे आणि जातीचा विचार न करणारे फार कमी.
या लग्ने जुळवणार्या साईट्स आणि मंडळांच्या उल्लेखावरून परिस्थिती किती बदलली आहे याची जाणीव झाली. मी लग्न केलं त्या काळात प्रेमविवाह झाला नाही तर ओळखीच्या कोणा काका मामा, आत्या, मावशी तर्फे त्यांच्या नात्यातली किंवा ओळखीची स्थळे सांगून यायची. त्यामुळे स्थळाची थोडीफार तरी माहिती मिळायची. गंमत म्हणजे ज्याचं जिचं लग्न जमत नसेल त्यांच्यासाठीच फक्त मंडळाचा वगैरे विचार व्हायचा. एकप्रकारे नाव नोंदवणे हे कमीपणाचं मानलं जायचं. तेव्हा रोहिणी नावाचं मासिक अशा स्थळांच्या छोट्या जाहिरातींसाठीच स्पेशल होतं असं आठवतंय.
24 Jan 2015 - 11:07 pm | टवाळ कार्टा
अरे पण शिकलेल्यांना काय धाड भरलीय...इतक्या मराठी संस्थळांवर लिहिणारे बाकी जगात हे बदलण्यासाठी काहिच करत नाहीत का?
24 Jan 2015 - 11:50 pm | हाडक्या
अगदी अगदी.. :)
24 Jan 2015 - 11:07 pm | टवाळ कार्टा
८८८ :)
24 Jan 2015 - 11:09 pm | टवाळ कार्टा
बाकी मी १०००, १००१ या प्रतिसादांच्या शर्यतीत नाहीये...हापिसात असणारै :(
माझा नंबर मी ७००, ८५० आणि ८८८ वर लावला आहे :)
24 Jan 2015 - 11:44 pm | हाडक्या
मंडळी, आता ९०० वा तरी आमाला मिळावा.. ८५० कडे डोले लवून बसलो होतो. हापिसातून घरी येस्तोवर ८६० दिसले. :(
आता ९०० आमच्यासाठी राखून ठेवा. नाय तर पारावरचा मुंजा १००० शिवाय सोडणार नाय तुमाला..
24 Jan 2015 - 11:44 pm | यसवायजी
पैलच स्थळ. मला एवढ़यात लग्न करायचच नाही म्हणून सांगितलं होतं. पत्रिका जुळली नहीं म्हणून क्यान्सल झालं. आता सांगताहेत की एकुलती १ मुलगी आहे, पुण्यात ५०००० पगार आहे, बाबाचे २ फ्लॅट आहेत कोल्हापुरात. पोरगी नाकी-डोळी निटस. विशेष म्हणजे त्यांना आवडला होता म्हणे मुलगा(फोटोतला). :D
च्यायला नशीबच झंडू..
आता म्हणतोय कसली पत्रिका बघताय? हिच्च पोरगी पाहिजे आपल्याला. तर कोण तयार नाही. मी काय करू आता? मिपाकरांनो.. F१ F१
24 Jan 2015 - 11:48 pm | हाडक्या
टका की कोणीतरी बोलले होते, पत्रिका फिक्स करून मिळते म्हणून.. बघा ट्राय मारून.
24 Jan 2015 - 11:49 pm | हाडक्या
आणि हो, ठरलं की आमाला बॅचलर पार्टीला बोलवायला विसरु नका.. (लग्नाला नाय बोलवलं तरी चालेल.. )
25 Jan 2015 - 9:31 am | टवाळ कार्टा
आमाला बॅचलर पार्टीला बोलवायला विसरु नका.. (लग्नाला नाय बोलवलं तरी चालेल.. ) >>> अग्दी अग्दी...जोर्दार अणुमोदन ;)
25 Jan 2015 - 9:30 am | टवाळ कार्टा
खिसा खाली करायची तयारी हवी त्यासाठी ;)
25 Jan 2015 - 9:32 am | टवाळ कार्टा
खिक्क...
25 Jan 2015 - 9:45 am | टवाळ कार्टा
लग्न करायचे नाही सांगितलेले अस्ताना पत्रिका बघितलीच कशाला? यावरून समजते की तुम्च्यात १ आदर्श नव्रा होण्याचे गुण आहेत ;)
ब्वॉर बघितल्यावर जर जुळली अस्ती तर काय केले अस्ते? म्हणजे बाकी लिहिलेले डिटेल्स माहीत नस्ताना...
आवडीनिवडी जुळतात की नाही ते महत्वाचे नाही??? आणि फोटोत नक्की तुम्हीच होता ना ;)
असेल हिम्मत तर लावा फोन त्या पार्टीला...थोडे गोड बोलून बघा अंदाज येतोय का...समोरची पार्टी तयार असेल तर घरच्यांसमोर सरळ सांगा "लग्न केले तर हिच्याशीच...हॉलमधे का मंदिरात ते तुम्ही ठरवा"
आणि असे नसेल कर्ता येत तर ही गोष्ट मिपावर लिहिल्यावर मिपाकरांचे जे काही प्रतिसाद येतील ते वेंजॉय करा ;)
- हा प्रतिसाद म.घे.न. = मनावर घेउ नका :)
26 Jan 2015 - 1:37 am | यसवायजी
@ लग्न करायचे नाही सांगितलेले अस्ताना पत्रिका बघितलीच कशाला >>
अरे मी नको म्हणत असताना घरच्यांनी पत्रिका बघितली. आता म्हणे, एकदा पत्रिका बघून नाही म्हटलं की पुन्हा विचार करायचा नाही. पुढे वाईट अनुभव आले तर पत्रिकेमुळे आले असं वाटतं 'म्हणे'. :))
@ आवडीनिवडी जुळतात की नाही ते महत्वाचे नाही? >>
एवढा सिरियस काहीच नाही बे मी. कसल्या आवडी निवडी? न भेटताच?
बाकी, "विषय" वाचला असतास (थोड़ा हातभार १००० साठी) तर एवढ शिरेस घेतलं नसतंस.
26 Jan 2015 - 2:39 am | टवाळ कार्टा
पुढच्या वेळी पत्रिका बघणे लास्टला ठेवा ;)
विषय वाचून आधी शिरेस प्रतिसाद द्यायचा...मग त्यात पाणी घालून पातळ करायचा =))
26 Jan 2015 - 1:27 am | सूड
मेल्या तरी दोघं दोघं जण कानी कपाळी ओरडून सांगत होतो!! आता का f1??
26 Jan 2015 - 1:39 am | यसवायजी
एक डाव माफ करा. फुडच्या डावाला तुमचा सल्ला डोक्याडोळ्यावर.
26 Jan 2015 - 2:40 am | टवाळ कार्टा
इतकेपण ऐकायचे नस्ते मिपाकरांचे ;)
26 Jan 2015 - 2:39 am | टवाळ कार्टा
खिक्क
24 Jan 2015 - 11:51 pm | हाडक्या
आणि हे ९००.. हुश्श्य..
25 Jan 2015 - 12:39 am | ५० फक्त
मुळात वधु वरांच्या अपेक्षा वेगळ्याच असतात, मुळ धाग्यात ज्या अपेक्षांवर चर्चेची अपेक्षा आहे त्या, वधु आणि वर या संबोधनाला प्राप्त होण्यासाठी असणा-या अपेक्षा आहेत.
लग्न ठरण्याआधी मुलगी दाखवायची अन मुलगा पाहायचा अशीच व्यक्ती असते, एकदा का लग्न कुणाशी करायचं ठरलं की मग ते वधु आणि वर होतात.
आता या शिक्षण - करियर - पैसा कमावणे आणि आपला संसार किंवा कुटुंब सुरु करणे या गोंधळात अडकलेल्या मुला मुलीच्या आपल्या भावी आयुष्याच्या बद्दल काही स्वप्नं असतात, काही मतं असतात. यापैकी स्वप्नं मनातुन आलेली असतात तर मतं ब-याचदा लाद्लेली असतात.
लग्न ठरवण्यासाठीच्या भेटींमध्ये बोललं जाते ते बहुधा या मतांबद्द्द्लच, फार क्वचितवेळा स्वप्नांचा उच्चार होतो, अगदी प्रेम करणारे दोघं स्वताचं लग्न स्वत ठरवत असले तरी. प्रेम विवाहात, तथाकथित कोर्ट्शिपच्या काळात या स्वप्नांबद्दल कधीतरी विषय निघालेला असतो पण अॅरेंज्ड पद्धतीत तेवढा वेळ दिला जातोच असं नाही.
अशा भेटींमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे साधारणपणे ' तुम्हांला / तुला काय वाटतं ? अशा प्रकारचे असतात. किंवा एक विशलिस्ट असते, आता विशलिस्ट मधला प्रत्येक मुद्दा पुर्ण झालाच पाहिजे असं नसतं, पण उद्या वेळ पडलीच तर वाद घालायला असावेत म्हणुन काही गोष्टी घुसडलेल्या असतात.
तसंच या अपेक्षा वाढायला आपण किंवा आपली मागची एक पिढी देखील जबाबदार आहे, ते नाही का उपग्रह सोडणारी रॉकेट दोन- तीन टप्प्याची असतात, पहिला टप्पा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडायला , दुसरा वातावरणाच्या बाहेर पडायला, तिसरा जास्तीचा वेग घ्यायला आणी चवथा त्या उपग्रहाला त्याच्या स्थिर कक्षेत पोहोचवायला. आता एका पिढिनं आपल्या पुढल्या पिढिला जन्माला घालण्यापुर्वी एक दोन टप्पे पार केले होते, पण नंतर जेंव्हा या पुढच्या पिढिला पुढें सरकायची वेळ आली तेंव्हा त्यांनी पुन्हा पहिल्या टप्प्या पासुन सुरुवात करावी ही अपेक्षा चुक आहे ना. ती पिढी ज्या टप्प्यावर आहे तिथुन पुढचाच विचार करणार.
घरं तर मुलाच्या बापानी घेउन ठेवली असतील ना, आता आपल्या साठी चारचाकी अन झालीच किंवा होउ दिलीच तर त्या पोरांच्या शिक्षणं / ऐशआरामाची सोय मुलगा करु शकतो का नाही याचीच काळजी मुलगी करणार, ती कशाला विचार करते हा पोरगा भाड्यानं घर घेउन राहु शकतो का / वेळेवर एसटी रेल्वेची रिझर्वेशन करु शकतो का काय याची ? बेंन्टेक्स्च्या बांगड्या न मंगळ्सुत्रं घालुन तिच्या आईनं कित्येक सण समारंभ मिरवुन पार नेलेलं असतात, ज्या मुलीचे ८वे -९वे वाढदिवस १ ग्रॅ. सोन्याचे दागिने नाहीतर मायक्रोकॅरेट च्या हि-याच्या पेडंट्नं होत असतील, किंवा जी पोरं १०-१२व्या वर्षीच सिंगापुर / दुबई फिरुन येत असतील, त्या पिढीतल्या मुला मुलींनी का अपेक्षा वाढवुन ठेवुन नयेत.
ही चर्चा झाली भौतिक अपेक्षांबद्दल, पण वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे या अपेक्षा पुर्ण करुन / होउन सुरु झालेले संसार परस्परांच्य अवास्तव / अनपेक्षित / विक्षिप्त / अनैसर्गिक शरीरसुखाच्या अपेक्षा एकमेकांना न पेलवल्या गेल्यानं मोडकळीस येतात हे भयावह वास्तव होउ पाहात आहे.
25 Jan 2015 - 1:30 am | मुक्त विहारि
छान प्रतिसाद...
धन्यवाद...
25 Jan 2015 - 9:33 am | टवाळ कार्टा
काही पटले काही नाही पटले
25 Jan 2015 - 8:08 pm | पैसा
प्रतिसाद आवडला.
25 Jan 2015 - 9:23 pm | बॅटमॅन
टिपिकल पण्णास प्रतिसाद. ट्रूथ इज़ अ डिष बेष्ट सर्व्ह्ड हार्ड & फास्ट.
25 Jan 2015 - 9:41 pm | श्रीरंग_जोशी
धाग्याचे शीर्षक 'उपवर मुला मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?' असे हवे होते हे तुम्हीच सर्वप्रथम लक्षात आणून दिले.
ही सर्व चर्चा वाचणार्या उपवर मुला मुलींपैकी काहींनी आपल्या अपेक्षा वास्तविकतेच्या जवळ नेल्यास ते या महाचर्चेचे यश म्हणता येईल.
मला अशी आशा आहे की असे कुणी मिपाकर असल्यास किंवा वाचनमात्र मिपाकर असल्यास सदस्यत्व घेऊन भविष्यात या धाग्यावर परत येऊन त्यांना या चर्चेचा लाभ कसा झाला याबाबत लिहितील.
26 Jan 2015 - 3:49 pm | अत्रुप्त आत्मा
>>> ++++++++++++११११११११११११११११ हेचते- (गेल्या १५ वर्षातल्या..) बहुसंख्य घट्स्फोटांचं बीज! कारण तेच..,मागे उल्लेख केलेलं.. विवाहीत होताना.. जात्/शिक्षण/पैसा/(तथाकथित सामाजिक)प्रतिष्ठा... या निरर्थक गोष्टी(च) पहातात...आणि परस्परांच्या व्यक्तिमत्वांची अनुरूपता व प्रीती ह्या सहजीवनाला अत्यंत आवश्यक पाहाण्याच्या-गोष्टी पहात(च) नाहित.
बेसिक मधे(च) खाल्ला मार्,की पुढे सगळ्यालाच लागणार 'खार'!
(पत्रिकेच्या निमित्तानी (जातकांच्या..) घट्स्फोटीत केसेस ट्रेस केलेला..)
आत्मू ! :)
26 Jan 2015 - 3:56 pm | टवाळ कार्टा
पण बुवा....या बाबतीतले स्किल समजणार कसे?? ;)
25 Jan 2015 - 6:24 pm | टवाळ कार्टा
दम्ले का सग्ळे? छ्या पुर्वीचे मिपा राहिले नाही आता ;)
25 Jan 2015 - 7:12 pm | खमक्या
थोड्यासाठी सहस्रप्रतिसादकी धाग्याचा मान हुकतोय मुविंचा, असे दिसतेय.
25 Jan 2015 - 10:19 pm | समिर२०
९१५
25 Jan 2015 - 10:29 pm | खटपट्या
सर्व काड्या टाकून चोथा करुन झालाय..
नविन काडीपण कोणी टाकत नाहीये..
25 Jan 2015 - 10:49 pm | बॅटमॅन
तेन्सहन नको घेउ.
25 Jan 2015 - 11:09 pm | टवाळ कार्टा
"तेन्सहन" हा का ही ;)
25 Jan 2015 - 11:27 pm | खटपट्या
टेन्शन म्हंजे आता १००० जवळ आलेत आणी सगळे थंड पडलेत. बाकी कोणीतरी म्हणाले की मायबोलीवर हजारी धागे येउन गेलेत म्हणून. बघायला पाहीजे. पण तेथील प्रतीसाद नक्कीच गोग्गोड असणार. इथल्यासारखे वर्मी घाव करणारे नसणार असे वाटतेय. कोणाला माहीत असल्यास माबोवरील हजारी धाग्याची लिन्क देईल काय?
25 Jan 2015 - 11:33 pm | टवाळ कार्टा
खिक्क
26 Jan 2015 - 12:32 am | अत्रन्गि पाउस
म्हणजे शेवटी वधूवरांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत ...
परंतु सॉक्रेटीसच्या आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा नियम बघता पुढील २५ वर्षात गुणात्मक वाढ कशी आणि कुठे होईल ??
आणि वधुवधू आणि वरवर ह्या विवाहांच्या अपेक्षांचा विचार पुरेसा किंवा अजिबात झाला नाही ह्या चा निषेध
ह्या ह्या ह्या
26 Jan 2015 - 3:30 pm | बॅटमॅन
एकदम समीक्षकी कोट चढवलात की ओ =))
26 Jan 2015 - 3:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
लग्नात वधुवरांचे आईवडिल आणि नातेवाईक आपली हौसमौज पुरवून घेतात असे ऐकले होते....
लग्नासंबंधीच्या धाग्यावर प्रतिसादक आपली हौसमौज पुरवून घेत आहेत हे पहात आहे +D
26 Jan 2015 - 7:53 am | अजया
इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत ती पत्रिका बघतात का? जातीला प्राधान्य देतात का? स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात? नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का? किती मुलाना स्वयंपाक करता येतो? घरातल्या सणवाराला काय काय करतात हे माहित असते आणि मदत करायला जमते?
काय म्हणता?
26 Jan 2015 - 9:34 am | सूड
इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत ती पत्रिका बघतात का?
-हो.
जातीला प्राधान्य देतात का?
-हो. (कारण शिक्षणानंतर ही एक अशी गोष्ट असते जी भांडणं झाल्यावर लोक हिणवायला वापरतात! आधी कितीही जातीयवादी नसल्याचे गोडवे गायले तरी.)
स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात?
-नंतर वितुष्ट येण्यापेक्षा आधी शिस्तीत बाजूला व्हावं!!
नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का?
-केलं तर उत्तम!! बडेजाव म्हणून नाही पण शिक्षणनोकरी सांभाळून आम्ही दोघांनी (मी आणि भाऊ) सगळे सणवार अगदी रीतभातीसकट व्यवस्थित पार पाडले आहेत. मग ते पक्ष असो की नवरात्र!! अर्थात त्यात कोणाला खूश करायचा हेतू नव्हता.
किती मुलाना स्वयंपाक करता येतो?
-हल्ली बर्याच मुलांना करता येतो. मुलींना चहा ठेवता आला तरी फार झालं.
घरातल्या सणवाराला काय काय करतात हे माहित असते आणि मदत करायला जमते? काय म्हणता?
-सगळं माहित आहे. (निदान मला तरी)
26 Jan 2015 - 10:18 am | ५० फक्त
हे सगळे प्रश्न, लग्न न झालेले पण लग्न करु इच्छिणारे आणि लग्न न करु इच्छिणारे अशा गटात विभागला गेला तर बरं होईल..
अकारण आणि उपद्रवी वाढलेल्या सोशल आणि नॉक सोशिक मिडियाचा हा अजुन एक दुष्परिणाम आहे, नवरा बायको किंवा बायकोचा मुर्खपणा, बायकोचा आक्रस्ताळीपणा, हटवादीपणा, पैशाची हाव आणि याला उत्तर / उतारा म्हणुन नव-याचा बाहेरख्यालीपणा, दारुडेपणा, खोटारडेपणा असा बेस असलेले, अर्थात याला काहीसा वास्तवाचा आधार असलेले विनोद चेपु / वाअ वा इतर मिडियावर पसरतात, आणि मग या आभासी जगाला सत्य मानुन चालणा-या या पिढिला आपल्या लग्नोपरांत वैयक्तिक सुरक्षेसाठी जास्ती काळजीपुर्वक राहावे असे वाटले तर त्यात गैर काय ?
मुलांसाठी, ज्यांचं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पाय-यांपेकी पहिल्या दोन पाय-या स्वप्रमाणित करुन यशस्वीरीत्या चढुन झालेल्या आहेत, त्यांच्या तिस-या पायरीबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या असतात, ही पायरी सगळ्यात उंच आणि लांबीला देखील सगळ्यात जास्त आहे, इथं या छोट्या आयुष्याचा फार मोठा काळ घालवावा लागतो. हा दोन शरीरांच्या मिलनाचा खेळ आहे, असं जे समजलं जातं तसं नव्हतं, नाही आणि नसणार, अगदी एकरात्रसंबंधांचे पुरस्कर्ते देखिल या संबंधांच्या नंतर तयार होणा-या भावनिक / आर्थिक गुंतागुंतीतुन सुटु शकत नाहीत.
ह्या तिस-या पायरीवरच पुढचं आयुष्य, पुढची पिढी, भावी समाज आणि मग देश वगैरे उभे राहतात, पाहता पाहता ही पायरी दोन शरीरांमधली वैयक्तिक बाब न राहता खुलेपणानं मान्य करुन किंवा दबक्या आवाजातल्या अमान्यतेसह एक कुटुंब, एक जात, एक धर्म उभा करत असते, आणि हे मान्य न करण्याचा फसवेपणा किंवा दुटप्पीपणाच बाकीच्या अवास्तव अपेक्षांना जन्म देतो.
मुलींच्या बाबतीत पहिल्या थोडंसं वेगळं असतं, त्यांच्या करिता धर्माच्या दोन व्याख्या होतात एक लग्नपुर्व आणि एक लग्नपश्चात, अर्थ हा भाग पण दोन प्रकारे येतो, एक पैसा कमावणे किंवा त्यासाठी मदत करणे, आणि मिळणा-या पैशात घर चालवणे, मग येणारी मोठी तिसरी पायरी, जी या ना त्या कारणाने पहिल्या दोन पाय-यांचा भाग बनते आणि हे ओव्हरलॅपिंग असं होतं की पहिलीचा कोणता भाग तिसरी पायरी आहे आणि तिसरीचा किती भाग दुसरीला सावरतो आहे हे कधीच स्पष्ट होत नाही, आणि मग आठवते एक असंच सोशल मिडियानं प्रसिद्ध केलेलं वचन
'when in doubt, then fire all' आणि हे फायर ऑलच मग अपेक्षा वाढवायला कारणीभुत होतं,
जसं महान पतिव्रता सावित्रीनं केलं होतंं, नुसता नवरा कशाला मागा जिवंत करुन त्यापेक्षा नवरा, पोरं, आजारी न पडणारे सासु सासरे, पैसा संपत्ती, सत्ता सगळं एकत्रच, आणि हल्ली तर सावित्रीच्या लेकी हा एक नविन शब्दप्रयोग रुढ केला गेला आहे, अर्थात याला संदर्भ मा. सावित्रीबाई फुलेंचा आहे आणि त्यांच्या बद्दल संपुर्ण आदर आहे याची दखल घ्यावी.
ह्या तिस-या पायरीवरच पुढचं आयुष्य, पुढची पिढी, भावी समाज आणि मग देश वगैरे उभे राहतात, पाहता पाहता ही पायरी दोन शरीरांमधली वैयक्तिक बाब न राहता खुलेपणानं मान्य करुन किंवा दबक्या आवाजातल्या अमान्यतेसह एक कुटुंब, एक जात, एक धर्म उभा करत असते, आणि हे मान्य न करण्याचा फसवेपणा किंवा दुटप्पीपणाच बाकीच्या अवास्तव अपेक्षांना जन्म देतो.
26 Jan 2015 - 10:23 am | टवाळ कार्टा
मुलींना चहा ठेवता आला तरी फार झालं.
अर्रे चहा पिणे is so downmarket u know....आजकाल बरिस्ता / स्टारबक्स यांची चलती आहे
26 Jan 2015 - 10:30 am | पैसा
सकाळ संध्याकाळ बरिस्ता/शीशीडी/स्टारबक्स??
26 Jan 2015 - 10:47 am | टवाळ कार्टा
हे मी स्वतः बघितले आहे
26 Jan 2015 - 11:05 am | सूड
शक्यता नाकारता येत नाही.
26 Jan 2015 - 2:13 pm | पैसा
रोज नुसत्या कॉफीला २००/३०० घालायचे असतील तर ५०००० पगार कसा पुरेल?
26 Jan 2015 - 3:00 pm | टवाळ कार्टा
हाच प्रश्न जर मुलाने मुलीला विचारला तर उत्तर येते की स्वतः कमवून घेतोय ना
27 Jan 2015 - 3:30 pm | सूड
हा विचार झाला असता तर कशाला हवं होतं!! आमच्या आधीच्या किंवा त्याही आधीच्या पीढीतल्या बायका अमुक एक पदार्थ बाहेर खाल्ला मग, बाहेर पैसे घालवण्यापेक्षा तो पदार्थ घरी कसा बनवता येईल असा विचार करायच्या. आता मान्य आहे तुम्ही बिझी असता पण वरणभात पण घरी बनवायला त्रासिक वाटत असेल तर काय म्हणावं!! सणावाराचा तर विचारच सोडून द्या!! निम्म्या जणींना अमुक एक पदार्थ कसा बनवायचा हे माहीत नसतं आणि ज्यांना माहीत असतं त्यांना 'कोण एवढा घाट घालणार' असा प्रश्न पडतो. 'आपल्या' माणसांसाठी 'आपण' काहीतरी बनवण्यात एक आनंद असतो तो फार थोड्या जणींना समजतो. उरलेल्या बाजारातून विकतची पाकिटं आणण्यावर समाधान मानतात!! मग अर्थातच अशा पोरींना अगदी कुबेर जरी शोधून दिला तरी त्याला शंख घेऊन दारोदार फिरायला लावतील.
आता प्रश्न येईल मग मुलांनी शिकावं, हरकत काहीच नाही शिकायला स्वयंपाक!! ज्यांच्या नवर्यांना येतो स्वयंपाक त्यातल्या काही जणी नवर्याला घाण्याला जुंपून गाव कोळपत फिरायला कमी करणार नाहीत याचा काय भरवसा? अशा वेळी दोघांनी सांभाळयचं, दोघांचा संसार हे फक्त स्वत:ला कव्हर करायला वापरलं जातं. आणि आता मुलाला जर स्वयंपाक येतच असेल तर मग त्याने असली धोंड पदरात (पक्षी, सदर्यात) पाडून घेताना दोनदा विचार केला तर काहीच हरकत नाही!!
26 Jan 2015 - 10:21 am | टवाळ कार्टा
यासाठी माझ्यापुरती उत्तर्रे...
इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत ती पत्रिका बघतात का?
मी बघत नाही आणि घरच्यांनासुध्धा बघू देत नाही...मुलीकडच्यांना बघायची असेल तर खुशाल बघूदेत
जातीला प्राधान्य देतात का?
मला शष्प फरक पडत नाही...आणि घरच्यांचे जे काही थोडेफार नखरे असतील ते कमी करण्याची कपॅसिटी आहे
स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात?
गरज असेल तरच रहावे...शक्यतो एकाच बिल्डिंगमध्ये २ घरे असतील तर तो सुवर्णमध्य असेल
नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का?
ऑफिसची कामे करून घरची कामे स्वतःच करावी हे मला पटत नाही...सरळ धु जमत असेल तर घरकाम/धुणीभांडी करायला बाई असावी...स्वयंपाक आला पाहीजे (अग्दी सुगरण नसेल तरी खाण्यालायक बनवण्याइतके) पण रोज केलाच पाहीजे असी अपेक्षा नाही
सणवार करायला सुट्टी टाकायची आवश्यकता जवळजवळ नसतेच...पण जर सुट्टी नसेल तर घ्यावीशी वाटली तर घ्यावी...नाही घ्यावीशी वाटली/नसेल मिळत तरी हरकत नाही...आजच्या जॉब मार्केट्मध्ये सणवार करायला सुट्टी मिळेल की नाही ते बॉस/क्लाएंट नावाचा प्राणी ठरवतो
किती मुलाना स्वयंपाक करता येतो?
अगदी सग्ळा नाही तरी बॅचलर असताना जितके लागते ते बनवता येते :)
घरातल्या सणवाराला काय काय करतात हे माहित असते आणि मदत करायला जमते?
मलाच डाऊट आहे मला सग्ळे माहीत आहे का...मुलीला माहीत नसेल तर हा तिचा दोष नाही....तिच्या आईवडलांचा दोष आहे (माझ्याघरी सगळे व्यवस्थित करतात पण मला काही गोष्टी अंधश्रध्धा या प्रकारातल्या वाटतात त्यामुळे मी करत नाही)
26 Jan 2015 - 8:08 am | खमक्या
अजयाताई, अहं लग्नाळू अस्ति.
घरचे पत्रिका बघून जुळत असेल तरच मुलगी पहायला आस्मादिकांना घेऊन जातात. मी विज्ञानाचा प्राध्यापक असूनही काही करू शकत नाही याचा खेद वाटतो.
जातीला प्राधान्य देतात का?
मी एक मस्त प्रस्ताव आणला होता. पण मुलगी परजातीतील असल्यामुळे प्रस्ताव धुडकावून लावण्यात आला आहे.
स्वतंत्र राहाण्याबाबत काय
विचार करतात?
पिताश्री नोकरीतून निवृत्त होऊन शेती करताहेत. माझे नोकरीचे ठिकाण जवळ नसल्यामुळे स्वतंत्रच रहावे लागणार आहे.
नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन
सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार
सुट्ट्या घेऊन करावे का?
नाही.
किती मुलाना स्वयंपाक करता येतो?
मला तरी नाही येत.
26 Jan 2015 - 10:24 am | टवाळ कार्टा
मला व्यनी कर्ता का? ;)
26 Jan 2015 - 1:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुला प्रस्ताव हवाय का मुलीचा पत्ता? =))
26 Jan 2015 - 3:01 pm | टवाळ कार्टा
मुलीचे नाव आणि मुलगी स्वकमाइकरता काय करते इतके सुरवातीला समजले तरी चालेल
26 Jan 2015 - 8:27 am | अजया
नविन प्रश्न तयार झाले आता!!
तुमच्या होणार्या जोडीदाराच्या निवडीत तुमचा रोल नक्की काय? एखाद्या अावडलेल्या प्रपोजलला फक्त जातीचा निकष लावणे किती योग्य?आई वडलांचा या सर्व प्रोसिजरमध्ये कितपत इंडल्जन्स हवा?
26 Jan 2015 - 10:29 am | टवाळ कार्टा
सग्ळ्यात महत्वाचा...veto power
जातीमुळे शष्प फरक पडतो पण ही वस्तुस्थितीसुध्धा बघा
असायलाच हवा पण आधी स्वतःची पसंती मग आई-बाबांची पसंती बाकी गेले तेल लावत या क्रमाने
26 Jan 2015 - 11:10 am | अजया
प्रामाणिक उत्तरं सूड,टका ,खमक्या *HAPPY*
खरं तर यावर लग्न झालेल्यानी पण लिहायला हरकत नसावी,अापल्या तेव्हा काय अपेक्षा होत्या,त्यांचं पुढे काय झालं!!
26 Jan 2015 - 11:16 am | टवाळ कार्टा
ओ तै...प्रामाणिक उत्तरं आज्काल कोणी अॅसेट मानत नाही...मुविंनी धाग्यात लिहिल्याप्रमाणे कमीत कमी ७५००० महिना पगार + स्वताचे घर + लग्नानंतर वेगळे रहायला सुट + गाडी असे असेल तर उत्तरे प्रामाणिक नस्ली तरी चाल्तात हे मी स्वानुभवावरुन सांग्तो
26 Jan 2015 - 2:28 pm | खमक्या
प्रामाणिकपणा हा ॲसेट तर नाहीच, उलट प्रामाणिकपणा म्हणजे भोळसटपणाचे लक्षण मानले जाऊ लागलेय.
अजयाताई, माझे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत माझा रोल अगदीच शुन्य नाही हं. घरातल्यांनी शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींमधून वधू निवडण्याचे अधिकार दिलेत ना मला. आणि या अधिकाराचे वर्णन 'आम्ही अंतिम अधिकार तुला दिलाय' अशा शब्दांत केले जातेय. एखादी शॉर्टलिस्ट केलेली मुलगी नाकारण्याचा अधिकार आहे मला. पण बाकीच्यांनी शॉर्टलिस्ट न केलेली मुलगी शॉर्टलिस्ट करण्याचे अधिकार नाहीत मला. अजूनही आपल्या समाजात जात, भावकी इ. गोष्टी फार खोलवर रुजलेल्या आहेत. खुप पालकांना मुलाच्या प्रेमविवाहाला मान्यता द्यायची इच्छा असूनही समाज, भावकी यांच्या भीतीने ती देता येत नाही. याचा अनुभव घेतोय मी सध्या.
26 Jan 2015 - 3:03 pm | टवाळ कार्टा
आणि तेसुध्धा मुलींकडून...त्यांच्या पालकांकडून नाही
=)) घरात मेणबत्ती मोर्चा न्या एकट्याचा =))
26 Jan 2015 - 3:11 pm | अजया
या आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या गोष्टीत तुम्ही तुमचा से नाही वापरणार तर कधी वापरणार?शेवटी निवड करायला चुकलो तर माझी चूक मी जवाबदारी घेईन असा अॅटिट्युड का नसावा,मुलाचा किंवा मुलीचा देखिल?
आई वडिलांचा अादर राखणं आणि लग्नाच्या बाबतीत त्यांच्या अर्ध्या आज्ञेत राहुन स्वतःच्या मनाशी तडजोड करणं ,मग हळहळणं या दोन गोष्टी वेगळ्या करता नाही येणार का? का हा तुमचा डिफेन्स असतो होऊ दे त्यांच्या मनासारखं असा काही किंवा कटकटीपासुन पळून जाणे?
26 Jan 2015 - 3:25 pm | टवाळ कार्टा
प्रचंड सहमत...नाहीतर लग्नानंतर गपगुमान नंदीबैल / ताटाखालचे मांजर बनतात समस्त नव्रे
26 Jan 2015 - 11:35 am | अजया
जमाना बदल गया है और वो भी!
अाम्ही दोघांनी शुन्यापासून सुरुवात केली आणि सतरा वर्षात तावुन सुलाखुन निघत बरीच प्रगती केली जी करता करता एकमेकांचे बेस्ट फ्रेन्ड्स होऊन गेलो.आधीच सर्व रेडिमेड मिळालेल्या नात्यात हे दोघांनी काडी काडी जमवुन घरटं उभं करण्याची मजा,तिचा सार्थ अभिमान कसं येणार!
26 Jan 2015 - 2:06 pm | पैसा
आताच्या पिढीकडे वेळ नाहीये. आता लग्नाचं वयसुद्धा साधारण २५ च्या पुढे, मुलींसाठी तीस हेच खरं. आपण २२/२३ च्या वयात लग्न करून मोकळे होत होतो. त्यामुळे तेव्हा आपल्याजवळ काही नसायचं यात विशेष वाटत नव्हतं. मी लहान असताना तर घरात टीव्ही, फ्रीज, फोन काहीच नव्हतं. मोबाईल, लॅपटॉप गाड्या तर सोडूनच दे. त्यामुळे लग्न करून आयुष्याची सुरुवात करताना हातात काही नसलं तरी फिकीर वाटत नव्हती. आईवडिलांनी जसं काडी काडी करून घर उभं केलं तसंच आपल्याला करायचं आहे ही जाणीव होती. आता ५० फक्त म्हणाला तसं टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, गाडी इ. घरात असणं आवश्यक आहे त्याच्यापुढचं काय ते आपण मिळवायचं ही या पिढीची भावना असणार. त्यामुळे घरात "चमचे वाट्या" गोळा करत बसायला त्यांच्याकडे वेळ नसणारच. शिवाय ३० च्या पुढे संसार सुरू करायचा तर सगळं गोळा करायचं, मुलं वाढवायची यासाठी वेळ कमी उरतो. एकूणच दिवसाचे १२/१२ तास काम करणारं पब्लिक आजूबाजूला बघून मला थक्क व्हायला होतं. घर, बायको, मुलं यांच्यासाठी हे कुठून कसा वेळ काढणार कळत नाही.
26 Jan 2015 - 2:40 pm | अजया
अगदी अगदी ताई.वेळ नाही,घाई मात्र आहे.दुसर्यांशी स्पर्धा आहे.तडजोडीची तयारी नाही.आणि दोघांचीही वयाची तिशी येताना बर्याच बाबतीत मतं ठाम झाली आहेत.
बावीसाव्या वर्षी लग्न केलं तेव्हा अपेक्षाच कमी होत्या.दोघांचाही आपापल्या डिग्रीवर विश्वास होता.दोघं मिळुन काहीतरी छान करु अशी उर्मी .हे मिळून एक एक माईलस्टोन गाठत जाणं, अजूनही हे मला आवडतं.तेच दोघांना एक करत जातं असं वाटतं.
26 Jan 2015 - 3:04 pm | टवाळ कार्टा
हे होण्यासाठी तुमच्या पिढीचा काहिच हातभर नाही???
26 Jan 2015 - 3:31 pm | बॅटमॅन
अगदी असेच म्हणतो. पन्नासरावांचा प्रतिसाद नेमका आहे. स्वतःच्याच पिढीच्या शिकवणीचा परिणाम दिसला की ऑड वाटतं, त्यातला स्वतःचा रोल मात्र दिसत नाही.
26 Jan 2015 - 3:36 pm | टवाळ कार्टा
यावर "आले मोठे आम्हाला शिकवणारे" असा प्रतिसाद येतो :)
26 Jan 2015 - 3:40 pm | बॅटमॅन
सत्य पचत नसेल तर असेच प्रतिसाद येतात. :)
26 Jan 2015 - 3:42 pm | यसवायजी
सगळ्यांनाच कसं डक-आप्पम पचणार? ;)
26 Jan 2015 - 3:45 pm | टवाळ कार्टा
डक-आप्पम म्हणजे???
26 Jan 2015 - 3:51 pm | यसवायजी
ब्याट्याला विचार
& countdown starts.. 10..
26 Jan 2015 - 3:52 pm | टवाळ कार्टा
व्यनी करा की
& countdown starts.. ९
27 Jan 2015 - 2:55 pm | सूड
लिखाण डक असलं तरी उच्चारी 'डाक' आहे असे निरीक्षणाअंती नमूद करतो. ;)
27 Jan 2015 - 3:06 pm | बॅटमॅन
हा हा हा, 'आ'गदी 'आ'गदी ;)
26 Jan 2015 - 3:53 pm | अजया
काय म्हणताय जरा विस्कटा बरं! आमच्या पिढीमुळे पुढची पिढी असा विचार करते असं का? मला खरंच नाही समजलं!
26 Jan 2015 - 3:56 pm | टवाळ कार्टा
थांबा जरा...१००० होउदे आता ;)
26 Jan 2015 - 4:57 pm | पैसा
आधीच्या पिढीने खूप मोठे बदल पाहिले आणि पचवले. आपल्याकडे जे नव्हतं ते मुलांना द्यावं या कल्पनेने त्यांनी नको इतके रेडीमेड आयुष्य मुलांना द्यायला सुरुवात केली. साहजिकच प्रत्येक गोष्टीत मुलं आईबापावर जास्तच अवलंबून रहायला लागली. आताही "आताच्या परिस्थितीला आधीची पिढी कारण आहे" म्हणत कळत नकळत तुम्ही आधीच्या पिढीकडे बघता आहात. शिवाय आधीची पिढीही मुले फक्त शारीरिक दृष्टीने मोठी झाली तरी मनाने आणि भावनिक दृष्ट्या आपली "बाळे" आहेत असे समजून वागतात. मुलांनाही ते सोयीचं असतं. मुलगी निवडताना आईवडिलांचा निर्णय स्वीकारला की आयुष्य सोपं होतंच. पण उद्या समजा नाही जमलं तर खापर फोडायलाही एक हक्काचा दगड असतो.
मुलींची संख्या कमी झाल्यामुळे जर मुलींना जास्त मागणी आली असेल तर त्याला कारणही ही आधीची पिढी आहे, कारण त्यांच्याच काळात मुलींचे गर्भ नाहीसे करायची फ्याशन रूजली आणि फोफावली. माहितीचा विस्फोट आणि आर्थिक सुबत्ता यांच्याच काळात आली. आपल्याकडे अमेरिकन लाईफस्टाईल चांगलेच मूळ धरते आहे, पण त्यांच्याकडे असलेली श्रमप्रतिष्ठा आणि मुलांनी १६/१७ व्या वर्षी स्वतंत्र होऊन आपले आयुष्य सुरू करायची पद्धत मात्र स्वीकारली जात नाही. कारण ते न स्वीकारणं दोघांच्याही फायद्याचं आहे. याला आईबाप आणि मुले दोघेही कारण आहेत.
26 Jan 2015 - 5:03 pm | टवाळ कार्टा
अग्दी सहमत
26 Jan 2015 - 9:27 pm | एस
शेवटच्या परिच्छेदाशी सहमत. बादवे, खूपजण असे विचार मांडतात. प्रत्यक्ष कितीजण आचरणात आणतात हे गंमतीशीर आहे.
26 Jan 2015 - 10:36 pm | पैसा
प्रामाणिकपणे सांगायचं तर मी पण आचरणात आणत नाही. कारण हेच की ते आमच्या घरात एकूणच अमेरिकन स्टायली फारशा प्रचलित नाहीत, कारण अमेरिकन लाईफस्टाईल माझी आवडती नाही. अर्थात इतर सगळी मुलं प्रोटेक्टेड वातावरणात असताना माझ्याच मुलांना "उघड्यावर टाकणे" त्यांच्यावर अन्याय असेल. कारण आताच त्यांना स्वतंत्रपणे जगायला लावले तर ती इतर मुलांबरोबर स्पर्धेत मागे पडतील. भारतातल्या पद्धतीप्रमाणे त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलं ही आमची जबाबदारी आहे. मात्र मुलांना स्वतंत्रपणे चांगलं वाईट ठरवता आलं पाहिजे आणि ती इमोशनली आपल्यावर अवलंबून नसतील याचीही काळजी मी घेते.
26 Jan 2015 - 11:14 pm | सुबोध खरे
+१००
27 Jan 2015 - 8:08 am | एस
आपल्या दृष्टिकोनाशी मी असहमत आहे, पण विषय लग्नासंबंधी असताना पॅरेंटिंगकडे गाडी जाईन, त्यामुळे थांबतो.
27 Jan 2015 - 4:48 pm | विवेक्पूजा
अजयाताई,
+११११११११
26 Jan 2015 - 1:33 pm | नेत्रेश
मुवि,अभिनंदन !
26 Jan 2015 - 1:34 pm | नेत्रेश
९४४
26 Jan 2015 - 2:05 pm | जेपी
माझ्यासाठी लग्न आणी संसार म्हणजे 'एक घरट बांधायच ,दोन अंडी घालुन त्यांना उबवत बसायच 'एवढा टिपीकल विचार करत नाही.
एकच आयुष्य आहे आणी बरच काही करायचय.
(ठाम )जेपी
26 Jan 2015 - 2:25 pm | अजया
मग काय विचार आहेत ते मांड बघू जेपी.आम्हाला पण कळू दे.
26 Jan 2015 - 2:37 pm | जेपी
थोडे महिने थांबा .
फक्त विचार मांडुन नाही करुन पण दाखवेन.
:-)
26 Jan 2015 - 3:05 pm | टवाळ कार्टा
तु आता डायरेक्ट पाळणा हलवल्यावरच मिपावर लेख टाक =))
26 Jan 2015 - 3:30 pm | अजया
असंच वाटतंय खरं =))
28 Jan 2015 - 11:46 am | इरसाल
ज्याच्या हाती पाळण्याची दोरी तो मिपाला उद्धारी !!
26 Jan 2015 - 3:02 pm | कपिलमुनी
किती लग्ने करणारे हा जेपी?
26 Jan 2015 - 3:12 pm | जेपी
=))
कपिलमुनी,
एकासाठीच किती काथ्थाकुटला जातोय ते पहा.
एकच झेपेल मला. *wink*
26 Jan 2015 - 3:26 pm | टवाळ कार्टा
=))
धर्म बदल रे त्या आधी
26 Jan 2015 - 3:29 pm | जेपी
माताय आता धर्म कुठुन आला इथे.
(धर्म=यम)
26 Jan 2015 - 3:56 pm | टवाळ कार्टा
अभ्यास वाढव ;)
26 Jan 2015 - 2:18 pm | सिरुसेरि
बरयाचशा प्रतिसादांचा सूर हा एकतर्फी , एकांगी असा वाटतो आहे . आजच्या काळातील उपवर मुलांची एकुण अवस्था ही दयनीय आहे असाच मतप्रवाह दिसतो आहे . काल परवा पर्यंत मुले राज्यकर्ती होती . तर आता लग्नाच्या बाजारात / प्रक्रियेत मुलींचे पारडे जड आहे . आतापर्यंत स्त्रीवर्गाने / मुलींनी बालविवाह , अकाली मात्रुत्व , बालविधवा , अकाली वैधव्य , केशवपन , सती , हुंडाबळी , मारहाण ,लग्न मोडणे ,मानापमान हे त्रास , अन्याय सहन केले. कदाचित याच स्त्रिया / मुली पुनर्जन्म घेऊन रुबाबात 2 wheeler , 4 wheeler , flights , rockets मधून मिरवत आहेत .पुरुष वर्गाला धडा शिकवत आहेत. गतकाळातील राहून गेलेले जगणे जगत आहेत . याच संदर्भात जुना प्रतिसाद परत जोडतो आहे . पुनर्जन्म वगैरे कल्पना सोडल्या तरिही इतर मुद्द्यांवर गंभीरपणे विचार करता येइल . ---------------------------------------------------- लेख व प्रतिसाद हे जरी "वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?" या विषयावर असले तरी एकूण सूर हा "हल्लीच्या मूलींच्या / वधू पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत" असाच वाटत आहे . अविवाहीत मुलींचे कमी संख्या प्रमाण हे एक त्यामागचे मुख्य कारण असेल तर हि एकंदर परिस्थिती मुलांनी / वर पक्षाच्या लोकांनीही वेळीच ओळखली पाहिजे . व त्याप्रमाणे आपल्या अपेक्षा जर कालबाह्य , अवास्तव असतील तर त्यांत आधीच बदल केले पाहिजेत ( उदाहरणार्थ- पत्रिका ,ठराविक जात , पोटजात यांचा आग्रह ). तसेच आपल्या समाजात चूकीच्या लग्नाच्या बळी ठरलेल्या व फसवणूक झालेल्या घट्स्फोटीत मुलींचेह प्रमाण जास्त आहे . तसेच दुर्दैवाने अकालीच वैधव्य आलेल्या मुलींचेही बरेच प्रमाण आहे .या मुलींचाही लग्नासाठी मुलांनी व वर पक्षाच्या लोकांनीही मनापासून व गंभिरपणे सविस्तर विचार केला पाहिजे . या गोष्टी मनापासून व खरया प्रेमानेच घडाव्यात. त्यामागे कोणताही उपकाराचा किंवा समाज सुधारणेचा हेतू नसावा .
26 Jan 2015 - 3:05 pm | टवाळ कार्टा
धाग्याचा उद्देश वाढलेल्या अवास्तव अपेक्षा असा आहे नं :)
26 Jan 2015 - 3:56 pm | हाडक्या
सिरुसेरि, प्रथम कल्पना म्हणून तरी एका पिढीच्या अन्यायाचा बदला पुढच्या पिढीकडून वसूल करण्याची कल्पनाच मला अतिशय अन्यायकारक वाटते. तसेही, स्त्रीच्या अन्यायासाठी स्त्रीयाच (सासू, इतर नातेवाईक जणी, शेजारणी) जास्त जबाबदार होत्या, आहेत आणि राहतील असे वाटते. उदाहरण म्हणून विधवा विवाहाचे घ्या.
यात मुलांच्या घरातील महिला किती पुढाकार घेतील हो ? अगदी शिकल्या-सवरलेल्या आजच्या काळातल्या मुलीपण आपल्या भावासाठी अशा प्रस्तावांचा किती विचार करतील ?
एक प्रसंग, एक चांगली उच्चशिक्षित मुलगी की जिने या सगळ्या अपेक्षा (काय ते पगार, फ्लॅट, गाडी वगैरे) मांडून लग्न केले, स्वतःही जॉब करते, तिच्या बाळाच्या कार्यक्रमास तिने तिच्या सख्ख्या काकूस बोलावणे टाळले कारण काय तर तिला मूल नाही. याला तिचा नवरादेखील काही करु शकला नाही कारण घरातल्या सगळ्याच बायकांचे यावर एकमत होते (हा धक्काच होता त्याला!).
जर स्त्री-पुरुष हा किमान भेद गृहित धरला तरी स्त्री दुसर्या स्त्रीला कशी वागणूक देते ते सगळ्यात आधी महत्त्वाचे आहे.
त्यात सुधारणा जास्त महत्त्वाची आहे. बाकी सगळे बोलायला ठीकच.
26 Jan 2015 - 9:09 pm | सिरुसेरि
"प्रथम कल्पना म्हणून तरी एका पिढीच्या अन्यायाचा बदला पुढच्या पिढीकडून वसूल करण्याची कल्पनाच मला अतिशय अन्यायकारक वाटते"
हि सूडजन्य परिस्थिती स्त्रिवर्गाने मुद्दामहून निर्माण केलेली नाही . तर , कालचक्राने निर्माण केलेली आहे . हा तर काळाचा महिमा आहे .
26 Jan 2015 - 10:03 pm | हाडक्या
स्त्रीवर्गाने निर्माण केली की नाही (जणु त्यांच्या स्त्री भृणहत्येत अजिबातच हात नव्हता कधी) हा प्रश्न इथे नाही. तसाही ही सूडजन्य परिस्थिती आहे हेही मान्य नाही तरीही असे मानू की अशी परिस्थिती आहे.
मग कालचक्राचा महिमा म्हणून अशा वेळी "एका पिढीच्या अन्यायाचा बदला पुढच्या पिढीकडून वसूल करणे" हे कसे बरोबर?
काळाचा महिमा ही तर पळवाट झाली आणि ती घातकही आहे, कारण,उद्या परिस्थिती उलट झाल्यावर मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न की मग.
अजून असे की मग हा "काळाचा महिमा" वाला नियम, आरक्षणे आणि तत्सम गोष्टींना ही लावणार काय?
म्हणजे, आधीच "पुरुष" आणि त्यात so called "उच्चवर्णीय" म्हणून भारतात जन्माला आलास, आता भोग तुझ्या सगळ्याच पूर्वजांची फळे !! असा तुमचा निष्कर्ष दिसतो, जो की पूर्णपणे चुकीचा आणि अन्याय्य आहे.
27 Jan 2015 - 12:23 am | बॅटमॅन
नायतर काय मायला...
27 Jan 2015 - 10:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हाडुकरावांशी सहमत!!
वड्याचं तेलं वांग्यावर काढायचा प्रकार आहे हा. आणि एक पुरुष स्त्रीचा जितका छळ करत नसेल ना तितका स्त्रीचं स्त्रीचा करते.
27 Jan 2015 - 2:53 pm | सूड
हैयोहैयेयो तुमचा किंवा तुम्ही त्यांचे डूआयडी आहात का हो? कालचक्र काय, काळाचा महिमा काय!! नाडीबद्दल लिहायला लागू नका आता म्हणजे मिळवली!!
26 Jan 2015 - 3:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा धागा इंचाइंचाने मिपावरचा प्रथम हजार-प्रतिसादी धागा बनतो आहे... याकरिता मुवि, मिपा आणि अनेक प्रतिसादकर्त्यांचे हार्दीक अभिनंदन !!!
(मुवि आपले हात पहिले तोंडावर ठेऊन, मग कानावर ठेऊन, शेवटी आकाशाकडे उंचावून "हा बहुमान मला मिळेल कधी वाटले नव्हते. धन्यवाद मिपा, धन्यवाद प्रतिसादक, इ, इ" म्हणत आहेत अशी स्मायली आणि एखाद्या वार्षीक बक्षिससमारंभाचे पार्श्वसंगीत वाजत आहे असे कल्पावे. :) ;) )
26 Jan 2015 - 3:24 pm | टवाळ कार्टा
अभ्याकडून याचा पण फ्लेक्ष तयार करुन घेउया का ;)
26 Jan 2015 - 3:27 pm | जेपी
या धाग्याबद्दल मुविंना कशेळी कर्जत संमेलनात सन्मानीत करण्यात यावे असा ठराव मांडत आहे. *wink*
26 Jan 2015 - 3:35 pm | टवाळ कार्टा
जोर्दार अणुमोदन...फक्त शाल व श्रीफळाऐवजी .... एल.पी. आणि पक्षी देउ :)
26 Jan 2015 - 3:39 pm | हाडक्या
अरे, हे एल.पी. ठाऊक आहे पण हे पक्षी काय आहे ?
26 Jan 2015 - 3:41 pm | यसवायजी
कात्रजला दरीपुलाजवळ एक हाटेल आहे "पंछी-क्रंची" नावाचं. :D
26 Jan 2015 - 3:41 pm | टवाळ कार्टा
26 Jan 2015 - 3:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय हे ? पक्षीतिर्थातले तिर्थ माहीत आहे आणि मग पक्ष्यांवर हा अन्याय करणे बरे दिसते का ?
समग्र-पक्षीतिर्थ-भाविंक-मंडळातर्फे हाडक्या यांच्या घरावर भव्य मोर्चा काढण्यात यावा ! ;)
26 Jan 2015 - 3:45 pm | टवाळ कार्टा
+११११
26 Jan 2015 - 3:59 pm | हाडक्या
अनुमोदन.
मोर्चा काढून या. आणि येताना पक्षी (प्राणी पण चालतील तसे) आणि भरपूर तीर्थ पण घेऊन या..
(आमच्या शेतात मट्टण पार्टी करण्याची इच्छा असलेला)
26 Jan 2015 - 3:40 pm | समिर२०
अनुमोदन
27 Jan 2015 - 12:35 am | मुक्त विहारि
कुणीही आक्रस्ताळे-पणे आपलीच बाजू योग्य, असे म्ह्णत नाही.
हजार प्रतिसादापेक्षा, सुसंवाद करणारे मिपाकर मला तरी जास्त आवडले.
26 Jan 2015 - 3:40 pm | स्वामी संकेतानंद
इंच इंच कमेंटत सहस्रकमेन्टदर्शनाकडे धाग्याची वाटचाल सुरु आहे. लगे रहो. लग्नाळू मित्रहो, पोरी बघून कंटाळलात की आमच्या कुशासनाशेजारी आपले दर्भासन टाका. आमच्या आश्रमात भरपूर जागा आहे. आपण मुलींची मानसिकता बदलावी ह्यासाठी तपश्चर्या करू... ;)
26 Jan 2015 - 3:43 pm | टवाळ कार्टा
नक्को....आम्ची प्रायवेट तपश्चर्या अस्ते ;)
आणि
यावरुन तुम्ही वेगळ्याच गुरुकुलातील दिस्ता =))
26 Jan 2015 - 3:46 pm | स्वामी संकेतानंद
नाही नाही. आपले गुरुकुल एकच.. पण पोरींच्या अपेक्षा विनासायास पूर्ण करायला स्वामी बनणे हाच एक खात्रीचा उपाय दिसला. =))
26 Jan 2015 - 3:46 pm | टवाळ कार्टा
=))
26 Jan 2015 - 4:03 pm | हाडक्या
स्वामी असलात तरी पण "सायास" तुम्हालाच करायला लागणार हो ?
(समजले नाही तर पोगो नैतर आस्था चॅनल बघत बसा हो स्वामी.. ;) )
26 Jan 2015 - 4:19 pm | टवाळ कार्टा
ये सायास सायास नही होते बच्चा ;)
27 Jan 2015 - 3:20 pm | हाडक्या
;) .. ;)
26 Jan 2015 - 3:46 pm | यसवायजी
लग्नाळू मित्रहो, पोरी बघून कंटाळलात की
पोरी बघण्यात कंटाळा कसला? ते काम तर आम्ही आजन्म करत राहू. (हो.लग्न झाल्यावरही) ;)
26 Jan 2015 - 3:47 pm | टवाळ कार्टा
खिक्क
26 Jan 2015 - 3:56 pm | टवाळ कार्टा
सग्ळ्या अनाहिता लाटणे मोर्चा काढतील तुमच्या घरावर =))
26 Jan 2015 - 4:09 pm | यसवायजी
@टका - आता यात अनाहितांचा काय संबंध? येऊदेत आल्यातर. बघून घीन. तू काड्या टाक अजून. :))
26 Jan 2015 - 4:20 pm | टवाळ कार्टा
अनाहितांना कधी कस्ल्या लॉजिकल कारणांची गरज पड्ते का =))
26 Jan 2015 - 4:25 pm | दादा पेंगट
जेन्डर बायस्ड कमेन्ट...
26 Jan 2015 - 4:45 pm | यसवायजी
अवांतर:- यावरून एक ज्योक आठवला.
Q.- what is the difference between a wife's arguments & a knife?
.
.
Ans- the knife has a point.
27 Jan 2015 - 4:11 pm | सस्नेह
पीजे. मतलब Pointless joke !
26 Jan 2015 - 5:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी चुकुन दर्भासनाऐवजी गर्धभासन वाचलं!!!
26 Jan 2015 - 3:53 pm | टवाळ कार्टा
हे प्रतिसादाचे १२ वे पान
26 Jan 2015 - 3:56 pm | टवाळ कार्टा
९९९ \m/
26 Jan 2015 - 3:56 pm | टवाळ कार्टा
१००० \m/