येताच तू, किनारा
शब्दात व्यक्त होतो
बेभान लाट होते
वारा अनर्थ करतो
पदरावरी तुझ्या ग
फुलती फुले अनेक
संध्येस धुंदी येते
गंधात स्पर्श फिरतो
डोळ्यातले तुझे ते
निः शब्द भाव भोळे
उर्मीत भावनांच्या
ओठात शब्द घसरे
चढतो असाच कैफ
जाणीव भ्रष्ट होते
लहरीत भावनांच्या
मजसी भुरळ पडते
तो काळही थबकतो
अंधार पेट घेतो
लाजूनी सागरही
ओहोटीत मंद हसतो.
प्रतिक्रिया
23 May 2017 - 6:10 pm | ज्योति अळवणी
सुंदर
23 May 2017 - 6:39 pm | एस
छान कविता.
24 May 2017 - 11:50 am | पद्मावति
मस्तच.
27 May 2017 - 12:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहाहा...! जियो.
-दिलीप बिरुटे