बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही
लेखनविषय:
काव्यरस
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती,
तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही
....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची,
....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही
तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची
जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही
....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई
....... समजून तयाला घे तू , तो साहेब सरळसा नाही
सर्वस्व लुटले राज्याचे, काही ना बाकी उरले
किती स्वतःस हरवून बसले , पण साहेब बधला नाही,
.........इतुके न कुणाचे घ्यावे, की भार तयाचा व्हावा
........ बघ तुझ्यातही थोडा आहे, साहेब वेगळा नाही
या राज्यातील उपेक्षा, मी मूठ वळवली नाही
बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही,
........ साहेबांची होता मेहेरबानी , कार्यकर्ता बने खंडणीस्वार
........ उघड्या नयनांनी बघ तू , महाराष्ट्राचा बनेल बिहार
पैजारबुवा,
वाचन
18616
प्रतिक्रिया
0