मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेल्वे अर्थसंकल्प

वेल्लाभट · · काथ्याकूट
आज श्री सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री, यांनी २०१५-१६ चा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. त्यातील महत्वाच्या तरतूदी इथे टाकत आहे. - प्रवासी भाड्यांमधे कुठलीही वाढ नाही. (अर्थात अंतरिम अर्थसंकल्पात केली होती.) - १७००० शौचालये बायो-शौचालयांत रुपांतरित होणार - १३८ नंबरची रेल्वे चौकशीची दूरध्वनी सेवा १ मार्च पासून पुनरुज्जिवित होणार - प्रवाशांच्या तक्रारींसाठी मोबाईल अ‍ॅप बनविणार - ऑपरेशन ५ मिनिट्स. अनारक्षित तिकीट मोबाईलद्वारे ५ मिनिटात काढता येणार. - टीटीईंकडे हँडहेल्ड उपकरण. इ-तिकीट पेपरलेस होणार. - गाडीच्या वेळेसंदर्भात प्रवाशांना एसएमएस अलर्ट येणार. (ही अतिशय स्वागतार्ह सेवा असेल माझ्यामते) - अपंग, वृद्ध यांसाठी अद्ययावत सेवा. - ठराविक गाड्यांमधे २४ ते २६ डबे. अनारक्षित डब्यांची संख्या वाढवणार. - ४०० स्थानकांवर वाय-फाय - पुढच्या ५ वर्षांत रेल्वेमधे ८.५ लक्ष कोटींची गुंतवणूक - नवीन भागीदारी करारांतून दूरगामी आर्थिक परिस्थितीचं बळकटीकरण तसेच, आधुनिक मूलभूत सेवा - ठराविक मार्गांवर महिला डब्यांत सीसीटीव्ही - ए१ वर्गाच्या स्थानकांना वायफाय - प्रवासी सुविधांना ६७% अधिक निधी - १० प्रमुख शहरात सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल - गेल्या वर्षात रेल्वेच्या विधुतीकरणामधे १३३०% वाढ. - स्वच्छ रेल स्वच्छ भारत - स्वच्छतेला प्राधान्य - मुंबई - दिल्ली व मुंबई - कोलकाता प्रवास एका रात्रीत होणार - इस्रो च्या सहभागातून ३४३८ रेल्वे क्रॉसिंग काढून टाकणार - तांत्रिक क्रांतीसाठी 'कायाकल्प' ची घोषणा - २००० कोटींचा कोस्टल कनेक्टिविटी प्रोग्रॅम - कुठल्याही नवीन गाड्यांची घोषणा नाही. माझ्या मते तरी हे एक अतिशय संतुलित रेल्वे बजेट आहे आणि ठरावं. उगाच एवढ्या नवीन ट्रेन तेवढे नवीन मार्ग पेक्षा यात पायाभूत सुविधांकडे संपूर्ण लक्ष दिलेलं आहे. आपले विचार काय?

वाचन 14625 प्रतिक्रिया 0