मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गलित आहे गात्र अजुनी

चिमिचांगा · · जनातलं, मनातलं
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ? सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ? उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे ? बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ? उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे ? *************************************** गलित आहे गात्र अजुनी, लाडके अवधी जरा दे एवढ्यातच पुनर्प्रत्यय मागशी, देऊ कसा गे? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन उरली रात्र अवघी, का न धरीशी धीर जरा गे? बघ अजून पुसतोच आहे पाठीवरचा घाम सारा कोरडा पडला घसा अन् प्राणही कंठाशी आले सांग, ह्या आतुरल्या मुखचंद्रम्याला काय देऊ? सुकून गेले ओठ, आता थोडका 'सूकून' दे गे प्रेमरंगी खेळता, घाई सखे नाही बरी गे दोन डावां अंतरी, थोडीतरी टँप्लिज दे गे - कवि चिमिचांगेश खट

वाचन 7169 प्रतिक्रिया 0