गोष्ट लग्नाची
लेखनप्रकार
हुंडा देणे, घेणे गैर आहे हे माहित असूनही अजूनही हे प्रकार सर्रास चालूच आहेत.
याविषयावर अनेक चर्चाही होतात.
पण काही ठिकाणी चांगल्या प्रथाही पहावयास मिळतात.
जसे,.काही समाजात (कोकण भागातील) अशी प्रथा आहे ,लग्नाचा खर्च उभय पक्षांनी समान वाटून घ्यायचा.
हि पद्धत न अवलंबिल्यास त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात येते.
अशा पद्धतींचे अनुकरण सगळ्यांनी करणे गरजेचे आहे.
परंतु आजकाल टीव्ही,सिनेमा पाहून इतर समाजाच्या पद्धतीने नटणे,त्याच पद्धतीचे जेवणाचे अनेक पदार्थ,अन्नाची नासधूस यातच समाज अडकत चालला आहे.
यात वेळ,पैसा, श्रम यांचा विनाकारण अपव्यय होतो.
समाजातील काही लोक स्वतः बदल घडवू इच्छितात पण त्यांना अनुभव विचित्र येतात
ज्या मुलाकडचे लोक म्हणतात आम्हाला तुमच्याकडून काही नको फक्त मुलगी द्या,अशा मुलांना चक्क नकार आलेला आहे
कारण काय तर मुलात काही दोष असेल म्हणून काही मागत नाही (मला मान्य आहे काही वेळा असे असतेही,पण या गोष्टीची चौकशी करून माहिती काढता येतेही.)
मुलामुलींच्या अपेक्षाही वाढत चालल्या आहेत.
विशेषतः मुलींच्या,कारण त्या जास्त शिकलेल्या असतात,जास्त कमवत असतात,मग मुलगा त्यांच्यापेक्षा जास्त कमावणाराच पाहिजे असतो
शिवाय मुलगा सुप्रस्थापित (वेल सेटल्ड ) पाहिजे,स्वतःचे घर,चारचाकी गाडी असावी या अपेक्षा असतात.
अशा अपेक्षा असण वाईट नाही पण एकदम या गोष्टी मिळण थोड कठीण असतं.
मुलांचाही शिक्षणासाठी खर्च झालेला असतो (जसा मुलींचाही झालेला असतो आणि म्हणूनच मुलाकडच्यांनी हुंडा मागू नये,.)शिक्षणासाठीचे कर्ज,घरासाठी कर्ज यातून निघून हळूहळू तो सर्व काही मिळवू शकतो पण त्यासाठी काही वेळ जावा लागतो आणि हे सर्व पूर्ण करून मग लग्न करायचे तर वय वाढलेले असते,
म्हणून मला असे सांगावेसे वाटते कि मुलीकडच्यांनी या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेतले पाहिजेत.कारण या अपेक्षेतील मुलगा मिळेपर्यंत मुलींचेहि वय वाढत जाते आणि शेवटी कुठेतरी समझोता करावा लागतो.
(सदर लेख यापुर्वी चेपुवर प्रकाशित झाला आहे.)
वाचन
15000
प्रतिक्रिया
0