भांडणानंतर...
लेखनविषय:
काव्यरस
खोटेच आहे रागावणे, तुझेही अन् माझेही
तोंड फिरवून झोपणे, तुझेही अन् माझेही
अबोला जरी धरून, आसमंत आज सारा
अस्वस्थ मनाशी बोलणे, तुझेही अन् माझेही
कोण चुकले कोठे, जाणतो मनी दोघेही
माघार परी न घेणे, तुझेही अन् माझेही
घन बरसत आला होता, त्या कोणी ना पाहीले
सांग कसे हे वागणे, तुझेही अन् माझेही
अंगार निवता जरा, स्वत:शीच हासून मग
ते विषय बोलण्या शोधणे, तुझेही अन् माझेही
- चाणक्य
२०/१०/२०१३
वाचन
5122
प्रतिक्रिया
0