मला पडलेले काही प्रश्न ....
काल पासुन काही प्रश्नांनी माझ्या डोक्याची मंडई करून टाकली होती. स्वस्थ बसवेना.. मग मिपा वर येऊन ही मनाची उबळ काढली.............
१.सलमान खानला शिक्षा झाली होती तिचे पुढे काय झाले ? कोणत्या न्यायालयात तो खटला चालु आहे?
२.फरदीन खानने ९ ग्राम कोकेन बाळगले म्हणुन त्याला अटक झाली होती, त्याचे पुढे काय झाले ?
३.संजय दत्त बाँबस्फोट खटल्यात दोषी ठरूनदेखिल समाजात उजळ माथ्याने कसा वावरू शकतो?
४.राहुल महाजन ने अमली पदार्थाचे सेवन केल्याचे सार्या जगासमोर टिव्ही वर झळकले असताना त्याच्यावर कारवाई का होत नाही ?
५.अफजल गुरु ला कोणता पाहुणचार चालु आहे ?
६.खुनाच्या आरोपाखाली शिक्षा होऊनसुध्दा सिध्दु अजून मुर्खासारखा एका शो मध्ये रोज हसताना का दिसतो ?
७.राज ठाकरे यांची महाराष्ट्राची blue print कधी तयार होणार ?
८.अणुकराराविषयी गुप्त पत्राची बातमी व्रुत्तपत्राच्या पहिल्या पानावरून आतल्या पानावर कशी सरकली आणि नंतर गायब का झाली? कोणत्याच पक्षाला त्याचा पाठपुरावा का करावा वाटला नाही ?
९.आरुशी हत्याकांड म्हणजे देशाचा ज्वलंत प्रश्न आहे असे रान माजवणार्या व्रुत्तवाहिन्यांनी त्याबद्दल बातमी देणे का बंद केले ?
१०. खासदार पैसे वाटप प्रकरणाचे पुढे काय झाले ?
११. खैरलांजी प्रकरणावरून सरकार उलटवण्याची भाषा करणार्या दलित नेत्यांनी त्यातील काही आरोपींना परवा न्यायालयाने दोषमुक्त सोडल्यानंतर साधी प्रति़क्रिया सुध्दा का देऊ नये ?
१२...१३....
तुमच्याही मनात असेच काही प्रश्न येत असतील ????
वाचन
3510
प्रतिक्रिया
0