We The People of India....१
लेखनप्रकार
नमस्कार,
येथे मिपावरती भारतीय राज्यघटनेवर काही माहितीपर लेखांची एक मालिका लिहायची असे बरेच दिवस आमच्या मनात जे होते त्याची आज आम्ही हा छोटेखानी प्रास्ताविक-लेख लिहून मुहुर्तमेढ करत आहोत.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली १९४७ साली जी समिती स्थापन झाली होती त्या समितीने जवळजवळ अडीच ते तीन महिने अथक परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटना तयार केली, जी आपण स्विकारली आणि अंगीकारली.
ही भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ एक कायद्याचे जाडजूड निर्जीव पुस्तक नव्हे, तर गीता, बायबल, कुराण यांच्या तोडीची आणि यांच्याइतकीच पवित्र अशी ती सार्वभौम भारताची राज्यपोथी आहे! ही पोथी म्हणजे लोकशाहीचा, प्रजासत्ताकाचा जसा आधारस्थंभ आहे तसाच तो सर्वोच्च मानबिंदू आहे. अर्थात, पायाही आहे आणि कळसही आहे.
आपल्या सार्वभौम भारताचा श्वासोश्वास जो या राज्यघटनेनुसार सुरू आहे त्या भारतीय राज्यघटनेचा अक्षरश: पन्नास पन्नास वर्षे अभ्यास करणारी मंडळी आहेत. त्यात अनेक विद्वान आहेत, तज्ञ आहेत, भाष्यकार आहेत. त्या मानाने आम्ही अगदीच 'नही के बराबर' या कॅटॅगरीत मोडणारे खूपच खालच्या वर्गातले विद्यार्थी आहोत याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. सबब ही लेखमाला म्हणजे भारतीय राज्यघटनेची आणि त्यातील काही महत्वाच्या कलमांची केवळ अन् केवळ एक तोंडओळख म्हणता येईल. ना हे भाष्य आहे, ना आम्ही भाष्यकार आहोत!
सार्वभौम संसद. हे भारतातचं सर्वात पवित्र मंदीर, सर्वात पवित्र चर्च, सर्वात पवित्र मशीद आणि सर्वात पवित्र गुरुद्वारा!
प्रास्त्वाविकातले पहिलेच शब्द किती सुंदर आहेत पाहा..
We The People of India....!!!!!!
किती मोल आहे या शब्दांना! हे मोल आहे एकीचं, हे मोल आहे सर्वभौम भारताच्या अखंडतेचं, हे मोल आहे बंधुत्वाचं..!
(क्रमश..)
-- (We The People of India मधलाच एक) कॉमॅ.
ही भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ एक कायद्याचे जाडजूड निर्जीव पुस्तक नव्हे, तर गीता, बायबल, कुराण यांच्या तोडीची आणि यांच्याइतकीच पवित्र अशी ती सार्वभौम भारताची राज्यपोथी आहे! ही पोथी म्हणजे लोकशाहीचा, प्रजासत्ताकाचा जसा आधारस्थंभ आहे तसाच तो सर्वोच्च मानबिंदू आहे. अर्थात, पायाही आहे आणि कळसही आहे.
आपल्या सार्वभौम भारताचा श्वासोश्वास जो या राज्यघटनेनुसार सुरू आहे त्या भारतीय राज्यघटनेचा अक्षरश: पन्नास पन्नास वर्षे अभ्यास करणारी मंडळी आहेत. त्यात अनेक विद्वान आहेत, तज्ञ आहेत, भाष्यकार आहेत. त्या मानाने आम्ही अगदीच 'नही के बराबर' या कॅटॅगरीत मोडणारे खूपच खालच्या वर्गातले विद्यार्थी आहोत याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. सबब ही लेखमाला म्हणजे भारतीय राज्यघटनेची आणि त्यातील काही महत्वाच्या कलमांची केवळ अन् केवळ एक तोंडओळख म्हणता येईल. ना हे भाष्य आहे, ना आम्ही भाष्यकार आहोत!
सार्वभौम संसद. हे भारतातचं सर्वात पवित्र मंदीर, सर्वात पवित्र चर्च, सर्वात पवित्र मशीद आणि सर्वात पवित्र गुरुद्वारा!
प्रास्त्वाविकातले पहिलेच शब्द किती सुंदर आहेत पाहा..
We The People of India....!!!!!!
किती मोल आहे या शब्दांना! हे मोल आहे एकीचं, हे मोल आहे सर्वभौम भारताच्या अखंडतेचं, हे मोल आहे बंधुत्वाचं..!
(क्रमश..)
-- (We The People of India मधलाच एक) कॉमॅ.
वाचन
6128
प्रतिक्रिया
0