धान्यापासून मद्यार्क..
धान्यापासून मद्यार्क बनवण्याविषयी खूप ठिकाणी गेल्या दोन - तीन वर्षांत तीव्र प्रतिक्रिया येताहेत.
माझ्या माहितीनुसार बहुतांश ठिकाणी भिजून/ पडून राहून/ कीड पडून वाया गेलेल्या / सरकार दरबारी किंमत न येणार्या धान्यापासून औद्योगिक उपयोगाचे इथेनॉल (पेय मद्य नव्हे) बनवण्याची योजना आहे , ज्याचा उपयोग पेट्रोलमधे मिसळून अॅडिशनल बायोफ्युएल म्हणून केला जाऊ शकतो आणि इतरही इंडस्ट्रीज (वैद्यकीय वगैरे) मधे वापरला जाऊ शकतो.
सर्वत्र "बाजरापायपर व्हिस्की"चे कारखाने उभे राहणार आहेत आणि गरिबाच्या /लहान पोराच्या तोंडातले सकस धान्य काढून त्याची दारू दुरितांकडून बनवून प्यायली जाणार आहे हे बर्याच केसेसमधे खरे नाही (नसावे) असे वाटते.
तशीही पिण्याच्या मद्यासाठी कच्च्या मालाची पंचाईत आपल्याकडे नाहीच आहे. त्यासाठी धान्य वापरण्याची वेळ अजून आली नसावी.
शिवाय शेतकर्याला भाव नाही म्हणून फेकून द्यावे लागणारे धान्य त्यांच्याकडून बरा भाव देऊन कोणी घेत असेल तर ते धान्य कुठे चालले आहे याचा विचार शेतकरी करतील का? का करावा? आधी आपली अवस्था सुधारली तरच ओव्हरऑल समाज सुधारणार ना?
असो माझे ज्ञान खूप अभ्यासपूर्ण असेलच असं नाही. तज्ञ लोक अधिक माहिती देतील अशी आशा.
दारु पिणे बरे की अबरे हा विषय सनातन आणि स्कोप बाहेरचा आहे.
धान्यापासून मद्यार्क याविषयी फॅक्ट काय आहे हे समजावे...
वाचन
6046
प्रतिक्रिया
0