मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक प्रश्न

सर्वसाक्षी · · काथ्याकूट
आज नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी. गांधीवधाबद्दल नथुराम यांना फाशी दिले गेले. गांधी हे अहिंसेचे पूजक, समर्थक व प्रसारक. 'डोळ्याला डोळा' या न्यायाने सगळे जग आंधळे होईल असा युक्तिवाद गांधीवादी 'हिंसेला हिंसा हे उत्तर नाही' याचे समर्थनार्थ करतात. फाशी म्हणजे हत्या हे समजत असतानाही नथुराम गोडसे यांना फाशी का दिली गेली? तो न्यायालयाचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित गांधीवादी करतीलही, पण एकाही गांधीवाद्याने या फाशीला अक्षेप घेतला नाही, त्याविरुद्ध आंदोलन केले नाहीवा कुणी आमरण उपोषणासही बसला नाही हे सत्य आहे. आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्याला वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता? (मला कम्युनिष्टांचे ब्रीदवाक्य आठवले - " ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल") ही फाशी म्हणजे अहिंसेचा पराभवच नाही का? हा चर्चा विषय हा नथुरामला झालेली फाशीची शिक्षा आणि त्या शिक्षेस अनुसरून अहींसेचे तत्वज्ञान या संदर्भात आहे. त्यावर सभासदांनी चर्चा करावी. इतर अति-अवांतर आणि भडक असलेले सर्व प्रतिसाद तात्काळ उडवले जातील याची नोंद घेण्यात यावी ही विनंती. - संपादक मंडळ

वाचन 55164 प्रतिक्रिया 0