महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंदाज २००९
महाराष्ट्रात येत्या तेरा तारखेला विधानसभेसाठी मतदान होतंय. प्रचार उद्या संपेल. आता मतदारापर्यंत कसं पोहचायचं तेवढाच प्रश्न शिल्लक उमेदवाराच्या मनात राह्यलाय. तन-मन-धन ही गोष्ट हायेच. २८८ जागांसाठी मतदान झाल्यानंतर मतमोजणी २२ तारखेला होणार. सत्तेच्या साठमारीत कोणाची सत्ता येईल. एवढाच एक उत्सुकतेचा प्रश्न राह्यलाय. प्रश्न, महागाई, जाहीरनामे,समस्या,जिथे असतात तिथेच असतात. मंत्र्याचा, आमदाराचा, विकास झाल्यावर थोडा फार जनतेचा विकास होतो नाय का ?
आपला अंदाज असा हाये की, महाराष्ट्रात सत्ता पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीची येईन. सध्याच्या सरकारावर जनता नाराज हाये म्हणजे ती काय भाजप-सेनेवर खूश आहे असा त्याचा काय अर्थ होत नाय. मतदार राजा कोणालाबी मतदान करु शकतो. मनसेलाबी मतदान करीन नाय तर रिडालोस ला करतीन. पण सत्ता कोणाची येईन हे काय सांगता येणार नाय. कोणाच्या मतदानाचा कोणाला फायदा होईन आण कोणता पक्ष सत्तेवर यीन. आपापला अंदाज इथे सांगायचा आन कारणबी सांगाचं ?
माहा आंदाज असा-
कॉंग्रेस-राष्ट्रवादीची=१४०-१६०
शिवसेना-भाजप=९०-१२०
मनसे =१२-२०
रिडालोस =०६-१०
अपक्ष -=१०-२०
इतर =१०
वाचन
11687
प्रतिक्रिया
0