भारताचे मित्र
मी काही दिवसांपासून एक विचार करतोय......
आपल्या भारताचे खरे मित्रदेश कोणते?
अमेरिका? तिचं इथे नांव काढू नका!!!! जरा मिपाची मागली पानं चाळून पहा!!! पार ठाण्यापासून ते थेट जाकार्तापर्यंत अमेरिकेला जहाल शिव्या दिलेल्या आढळतील!
एक सिंडी सोडली (म्हणजे तुम्ही सोडली आणि आम्ही धरली!!!) तर त्या अमेरिकेत आहेच काय?
मग मरो! ती अमेरिका जावो **त!
इंग्लंड आणि इतर पश्चिम युरोपीय देश? ते तर अमेरिकेचीच तळी उचलणार! लाचार साले!!!!!
चीन आणि पाकिस्तान! ते तर आपले उघड उघड शत्रूच म्हणायचे!!!
मग मला प्रश्न पडला की भारताचे खरेखुरे मित्र तरी कोणते?
बांगलादेश? तो तर आपल्या देशात त्याचे नागरीक घुसवतोय.....
नेपाळ? तो तर दहशतवाद्यांना आसरा देतोय....
श्रीलंका? त्यांनीच ना आपले १००० सैनिक मारले राजीव गांधींच्या काळात....
ब्रम्हदेश? शूऽऽऽ!!! मोठ्याने बोलूही नका!!! ते हुकुमशहा आपले दोस्त? जगात काय इज्जत राहील आपली?
मॉरिशस आणि आफ्रिकी देश? त्यांच्या मैत्रीला कोण विचारतंय? साली असून अडचण नसून खोळंबा!!!!
रशिया? त्यांना त्यांचंच जड झालंय, ते भारताशी काय भरीव मैत्री करणार?
जपान? आम्ही चार अणुबॉम्ब काय फोडले, हे आमचा छाती पिटून निषेध करायला लागले....
ऑस्ट्रेलिया? ते तर आमच्या लोकांना बडवतायत!!!!
मग मला सांगा, भारताचे मित्रदेश तरी कोणते?
आमचा तर काय भेजा चालत नाही....
तुम्हीसांगा...
सांगा मिपाकर मंडळींनो.....
(टीपः भूतान वगैरे सांगू नका हां गड्यांनो!! ज्या देशांच्या **त दम आहे असे देश सांगा!!!!:))
वाचन
19841
प्रतिक्रिया
0