मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(मिसळपावीय स्वयंभोचक संघ )

परिकथेतील राजकुमार · · काथ्याकूट
मिसळपाव स्वयंभोचक संघ या संघटनेत सध्या बरीच खळबळ माजली आहे. ३०% मध्ये विलीन व्हायचे/अनिवासींवर वर अंकुश ठेवायचे/ अनिवासींचे चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे. मिसळपाव स्वयंभोचक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. पूर्वी शेकडा खेकडा नावाने स्वतःचे राजकीय आस्तित्व ठेवणारी ही संघटना आणीबाणीनन्तर बरीच बदलली. हिन आणी हिणकस पक्षाच्या अवांतर सरकारच्या काळात संघाने सत्तेची चव चाखली. त्यानन्तरच्या चांदणीच्या करिश्माच्या आणि चप्पल घालायच्या सहानभुतीच्या लाटेत 'अनवाणी' या नावाने रुपडे पालटून उतरलेला हा पक्ष वाहून जातो की काय अशी शंका होती. ३०% सरकारच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात शेकडा खेकडाने जाहीररित्या कंपु खेकड्याचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते पण नन्तर राजकारणात वैचारीक आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे अवांतर अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. शेकडा खेकडा म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र शेकडा खेकडातर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला. मिपा राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे. संघ म्हणजे शेकडा खेकडा नव्हे. संघ म्हणजे हि & हि परिषद नव्हे संघ म्हणजे अवांतर दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो. राजकारणात यायचे नाही पण राजकारण आपल्या तालावर व्हावे असा दुटप्पी अट्टाहास कशासाठी? चप्पल हल्ल्यात संघाचा हात नव्हता ( असे निदान सध्या तरी मानु यात) पण चप्पलांचा मुद्दा हा संघानेच शिजवत ठेवला होता. शेकडा खेकडाच्या राजकीय फायद्या साठी चपलांचा मुद्दा सतत तेवत रहाणे अत्यन्त आवश्यक होते . दुर्दैवाने चप्पल स्ट्रेटेजी अनवाण्यांनी पाडली. ( संघाचा अनवाण्यांशी संबन्ध नाही) आणि तो मुद्दा शेकडा खेकडाच्या हातून निसटला. शेकडा खेकडा सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्‍याच भोचकसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत. कधी चांदण्यांना विरोध कर त्यासाठी स्वतःचे खाते डिलीट करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे.कधी भेळवाल्याला विरोध कर अशा फारसा पक्का पाया नसलेल्या धोरणाना हाती धरत मिपात शेकडा खेकडाने आपले आस्तित्व टिकवून ठेवले. अवांतर प्रकरणात पुरती नाचक्की झाल्यानन्तर शेकडा खेकडाच्या सुदैवाने विरोधी पक्षानी बराच समजूतदारपणा दाखवला. संघाने त्या घटनेवर सोयीस्कर मौन पाळले. मध्यन्तरी दुसर्‍या भेळेच्या दुकानात जाऊन भोचकसेवकांनी भेळवाल्याची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. काही भोचकसेवकांनी चांदणी काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंभोचकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले. स्वातंत्र्यानन्तर दोन वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे. बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे. संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंभोचकानाच आता कळेनासे झाले आहे. संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य सदस्यांना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंभोचक तयार होत नाहीत. मिसळपाव स्वयंभोचक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य सदस्याचे हे मत आहे.

वाचन 19721 प्रतिक्रिया 0