भाषा - काही अप काही डाउन
लेखनप्रकार
प्रास्ताविक - बहुगुणी यांच्या एका लेखावरून मनात आलेले काही स्वैर विचार....
आपल्या लोकसंगीताच्या खाणीतील काही हिरे-माणके हिंदी चित्रपटगीतांत आणून बंगाली संगीतकारांनी दोन गोष्टी केल्या. एक हिंदी सिनेसंगीत अधिक समृद्ध केले आणि दुसरे म्हणजे, ह्या बंगाली खजिन्याची ओळख उर्वरीत देशवासीयांना करून दिली.
ह्यातील दुसर्या गोष्टीचे मला अधिक अपृप वाटते.
रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळाले त्याचबरोबर अनेक बंगाली कथा-कादंबर्यांची विविध भारतीय भाषांत रुपांतरेदेखिल झाली. परंतु, संगीताचा प्रभाव हा अधिक असतो, समाजातील सर्व स्तरांत झिरपणारा असतो.
नेमके हेच बंगाली संगीतकारांमुळे घडले. बंगाली ही इतर भारतीयांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय बनली. बंगाली शिकणे, गाणी मुखोद्गत करणे हे एका अर्थाने "स्टेटस सिंबॉल" बनले. थोडक्यात, बंगाली ही "अपमार्केट" भाषा बनली!
मराठी संगीतकारांनी संधी असूनही हे केले नाही. वास्तविक मराठी लोकसंगीताचा खजिनादेखिल अपरंपार आहे. "होनाजी बाळा" कार वसंत देसाईंचा लोकसंगीताचा अभ्यासही नक्कीच असावा. तरीही हे घडले नाही याची खंत वाटते. असे घडते तर मराठी माणिकमोत्यांची ओळख देशवासीयांना घडती; ज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ मराठी भाषेला होता.
अल्पसंख्य अशा अभिजनांची संस्कृती ही संपूर्ण समाजाची संस्कृती असल्याची प्रतिमा निर्माण करण्यात बंगाली यशस्वी ठरले. मराठी अभिजन यात कमी पडले.
रेल्वेप्रमाणेच भाषांतही - काही अप तर काही डाउन!
वाचन
3703
प्रतिक्रिया
0