चालू घडामोडी - जानेवारी २०२१

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
10 Jan 2021 - 10:51 pm
गाभा: 

अमेरिकेने तैवानवरील नियंत्रणे हटविल्याने चीनला संताप अनावर झालाय. मागील १-२ वर्षांपासून चीनला शह देण्यासाठी अमेरिका तैवानला पाठबळ देतेय. अमेरिका व तैवानचे राजनैतिक अधिकारी एकमेकांच्या देशात अधिकृत भेट द्यायला लागल्याने चीन अत्यंत नाराज आहे. आता यापुढील पाऊल म्हणजे अमेरिकेने तैवानला स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून अधिकृत मान्यता देणे. तसे झाले तर चीन संतापून तैवान ताब्यात घेण्यासाठी हल्ला करू शकतो.

आता भारताने सुद्धा वन चायना धोरणाला मूठमाती देऊन तैवानशी संबंध वाढवून तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी. त्यासाठी भारत बहुतेक आधी अमेरिकेने मान्यता द्यायची वाट पहात असावा.

https://m.timesofindia.com/world/us/us-lifts-self-imposed-restrictions-o...

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

13 Jan 2021 - 8:30 am | मराठी_माणूस

https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/13012021/0/0/

काही नैतीकता शिल्लक आहे का ?

मुक्त विहारि's picture

13 Jan 2021 - 10:58 am | मुक्त विहारि

काही राजकारणी लोकांचा आणि नैतीकतेचा संबंध नसतो.

मराठी_माणूस's picture

13 Jan 2021 - 1:17 pm | मराठी_माणूस

इथे राजकारणी नाहीय्येत

मुक्त विहारि's picture

13 Jan 2021 - 8:30 pm | मुक्त विहारि

हे मलाही माहिती आहे

४०० पेक्षाही जास्त प्रकारची केळीची बाग बनवणारा हा अफलातून भारतीय ह्याची दखल जगाने घेतली आहे

https://www.atlasobscura.com/articles/how-many-kinds-bananas-are-there

ह्याच विषयावरून आंबा ह्या विषयावरील हा लेख सुद्धा आठवला (गोव्याच्या मानकुराडच्या नखाचीही सर हापूस आंब्याला नाही असे अनेकांना म्हटले असता वाईट वाटते पण सत्य आहे हो) :

https://www.livemint.com/mint-lounge/features/my-mango-is-better-than-yo...

कंजूस's picture

13 Jan 2021 - 5:35 pm | कंजूस

महाराष्ट्रात काही लोक चवीप्रमाणे अशी क्रमवारी लावतात.
१)रत्नागिरी हापूस
२) दैवगड हापूस
३) बलसाड हापूस

इतर प्रकारात उत्तर भारतात
१)दशेरी
२) हापूस
३)रुमाली
४)लंगडा

परदेशांत केसर अधिक आवडू लागला आहे.
मानकुर फारच थोडा बघायला मिळतो.

सुबोध खरे's picture

19 Jan 2021 - 7:51 pm | सुबोध खरे

गोव्याच्या मानकुराडच्या नखाचीही सर हापूस आंब्याला नाही

याच्याशी मात्र अजिबात सहमत नाही.

हापूसची चव मानकुराड ला नाही हे १०० % सत्य

गोव्यात ५ वर्षे राहून हे अनुभवास आलेले आहे.

बाकी माहेरचा कावळा गोरा असतो हि उक्ती याबाबत सत्य आहे.

तुषार काळभोर's picture

13 Jan 2021 - 4:24 pm | तुषार काळभोर

चीन तैवान ताब्यात घेण्यासाठी हल्ला करू शकत नाही. थयथयाट करण्यापलिकडे ते काही करू शकणार नाहीत.
एकतर तैवान बेट असल्याने तिथे पुरेसे सैन्य, विमाने, रणगाडे नेणे ही खर्चिक अन वेळखाऊ बाब आहे. आणि ते होईपर्यंत तैवान (आणि जापान-अमेरिका सुद्धा) शांत बसणार नाहीत. जर चीनने असा प्रयत्न केलाच तर ही कदाचित दुसर्‍या महायुद्धातील नॉर्मंडी अथवा डंकर्क इतकी मोठी घडामोड असेल. फक्त इथे समोर तैवान्+जापान्+अमेरिका+कदाचित द कोरिया असतील. सध्याच्या काळात इतका मोठा आंतरराष्ट्रीय धोका अन आर्थिक बोजा चीन ओढावून घेणार नाही.

भारताचे तैवानशी चांगले सांस्कृतिक अन व्यापारी संबंध आहेत. मात्र राजकीय संबंध नाहीत. तसे ते अमेरिकेचेही नाहीत. अर्थात अमेरिकेने केल्यास नाटो सदस्य देश, भारत, जापान, द. कोरिया सुद्धा राजकीय संंबंध प्रस्थापित करतील हे नक्की. पण प्रश्न असेल की कधी. नजीकच्या भविष्यात असे घडण्याची शक्यता कमी दिसते. मात्र आर्थिक उलाढाल वाढवून चीनसोबतच्या व्यापारावरील अवलंबित्व किंचीत का होईना कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.

चौथा कोनाडा's picture

13 Jan 2021 - 5:20 pm | चौथा कोनाडा

मुंडे प्रकरणात निवडणूक आयोगाकडुन मुंडे यांच्यावर काही कारवाई होण्याची शक्यता नाही असे मत आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/advocate-aseem-sarode-facebook...

खेडूत's picture

13 Jan 2021 - 7:55 pm | खेडूत

लोकं तसे नेते..वेगळी काय अपेक्षा आहे?

संभाजीनगर नंतर आता धाराशिव असाही उल्लेख आला आहे सी एम ओ कडून! निवडणुकीची तयारी झाली वाटतं.

सौंदाळा's picture

13 Jan 2021 - 10:06 pm | सौंदाळा

नवाब मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थ प्रकरणात अटक
बातमी

आपल्या देशात प्रत्येक बाबतीत राजकारण केले गेले आणि केले जाते ! पण एकाच बाबतीत कधीच कोणते राजकारण केले गेले नाही, कोणी कोणला मदत केली नाही, कोणासाठी न्याय मागितला गेला पाहिजे असे देशातील मिडियाला देखील वाटले नाही, सगळे मौन होते.
हे कोण ? तर काश्मिरी पंडीत. ज्याच्या बायकांची अब्रु लुटली गेली, संपत्ती पळवली गेली आणि पुरुष कापले गेले ! जे पळाले तेच वाचले आणि स्वत:च्याच देशात आश्रित झाले, ज्यांना कोणी वालीच उरला नाही असे ते हतबल आणि शरणार्थी ! :(

आज सर्वस्व लुटले गेलेल्या काश्मिरी पंडीतांना स्वतःच देशात निर्वासित म्हणुन ३१ वर्ष झाली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India Today CFO and Distribution Head being grilled by ED again in the fake TRP case: Read details

काश्मीरी पंडीत आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध.
संपूर्ण भारतीयांसाठी काळा दिवस.

आणि भारत सरकारचे पुन्हा एकदा अभिनंदन की अश्या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून 370 कायद्याला केराची टोपली दाखवल्याबद्दल.
आता तरी काश्मीर मध्ये मुळ हिंदूंचे पुनर्वसन करून तिथे लोकसंख्येचा योग्य तो समतोल साधला गेला पाहिजे.

देशविघातक जमातीची लोकसंख्या एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त वाढून दिली की हे असेच होते त्यामुळे ही वाळवी प्रमाणात ठेवण्यासाठी त्यांच्यावर कडक निर्बंध आणि लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी कायदा करणे अत्यावश्यक आहे.. अन्यथा अजुन एक पाकिस्तान अटळ आहे.

किती काश्मिरी पंडीत आतंकवादी झाले आहेत ? एक तरी शोधुन दाखवता येइल का ? नाही,कारण ते खूनशी वृत्तीचे नाहीत, ते बलात्कारी वृत्तीचे नाहीत आणि ते लुटारु वृत्तीचे देखील नाहीत. पण काश्मीर मध्ये मात्र आतंकवादीच्या जनाज्याला गर्दी करणारे मात्र शांतता प्रेमी समाजाचे आहेत नाही का ?
शाहीन बाग झाले तरी मिडिया यांचीच बाजू घेत राहिला. लव्ह जिहादाच्या घटना होत राहिल्या तरी मिडिया डोळे बंद करुन बसला होता... आता तांडव सुरु झाले !
असो...

आज महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी आहे, त्यांना कोटी कोटी नमन !

जाता जाता :- हिंदूंच्या स्त्रिया,मुली आजही फसवल्या जात आहेत, पळवल्या जात आहेत आणि बलात्कार करुन भोगल्या जात आहेत, तरी काही मिडियावाले म्हणतात लव्ह जिहाद असं काही नाहीच आहे.

मेरठ: नौकरी के नाम पर हिंदू लड़कियों को फंसाकर रेप, फिर पोर्न वीडियो से ब्लैकमेलिंग के जरिए कराता था धर्मांतरण, मो. आफताब गिरफ्तार
शादीशुदा सोहैल ने सन्नी बन कर युवती को फंसाया, धर्म परिवर्तन के लिए मारपीट, 'लव जिहाद' में गिरफ्तार

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India Today CFO and Distribution Head being grilled by ED again in the fake TRP case: Read details

मुक्त विहारि's picture

19 Jan 2021 - 8:00 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2021 - 10:59 pm | श्रीगुरुजी

मे २०२१ मध्ये केरळ, तामिळनाडू, पॉंडीचेरी, बंगाल व आसाम या ५ राज्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी एबीपी न्यूज व सी-व्होटर यांनी केलेल्या निवडणुकपूर्व सर्वैक्षणाचे अंदाज रोचक आहेत.

बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस २९४ पैकी १५४ जागा मिळवून सत्ता राखेल असा अंदाज आहे. परंतु २०१६ च्या तुलनेत तृणमूलला ५७ जागा कमी मिळतील. दुसरीकडे भाजपने २०१६ मध्ये फक्त ३ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०२१ मध्ये भाजप तब्बल १०२ जागा जिंकण्याचा अंदाज आहे.

तामिळनाडूत द्रमुक २३४ पैकी १६० जागा जिंकून सत्तेवर येईल, तर अद्रमुकची संख्या १२४ वरून वर येऊन सत्ता गमवावी लागेल.

केरळमध्ये सध्या सत्तेवर असलेले डाव्या आघाडीचे सरकार १४० पैकी ८६ जागा जिंकून सत्ता टिकवेल. २०१६ प्रमाणे २०२१ मध्येही कॉंग्रेसप्रणित आघाडीचा पराभव होईल. आटोकाट प्रयत्न करूनही भाजपला जास्तीत जास्त २ जागा मिळू शकतील.

१२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत सत्तेवर असलेल्या
भाजपप्रणित रालोआची सदस्यसंख्या ८६ वरून ७७ वर घसरली तरी सत्ता टिकून राहील. कॉंग्रेसची संख्या २६ वरून ४० वर पोहोचेल.

३० सदस्यांच्या पॉंडीचेरी विधानसभेत सध्या सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस-द्रमुक आघाडीला १४ जागा मिळतील. भाजप-अद्रमुक आघाडीला १६ जागा मिळून सत्तांतर होईल.

https://www.google.com/amp/s/www.financialexpress.com/india-news/assembl...

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2021 - 11:26 pm | श्रीगुरुजी

इंडिया टुडे हे साप्ताहिक दरवर्षी जानेवारी व ऑगस्टमध्ये मतदार सर्वेक्षण करून मतदारा़चा व जागा़चा अंदाज देतात. आज जाहीर झालेल्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार जर आज लोकसभा निवडणुक झाली तर रालोआला ३२१ जागा मिळून (त्यात एकट्या भाजपला २९१ जागा) रालोआ पुन्हा सत्तेत येईल. कॉंग्रेसप्रणित संपुआला ९३ जागा मिळतील (त्यात एकट्या कॉंग्रेसला ५१ जागा).

एकंदरीत पंतप्रधान मोदी व रालोआची लोकप्रियता अबाधित आहे, तर कॉंग्रेस अजूनही गाळात आहे. टाळेबंदी, टाळेबंदीमुळे घसरलेली अर्थव्यवस्था, पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन, शिवसेना-अकाली दल या पक्षांनी दिलेली सोडचिठ्ठी, चीनबरोबरील युद्धस्थिती अशा गोष्टींचा मतदारांवर प्रभाव पडलेला दिसत नाही.

https://www.indiatoday.in/mood-of-the-nation/story/covid-china-no-challe...

https://www.indiatoday.in/mood-of-the-nation/story/motn-poll-pandemic-re...

मदनबाण's picture

22 Jan 2021 - 2:10 pm | मदनबाण

युएइ आणि आपले संबंध अधिक घनिष्ट होत असुन दोन्ही देशांना या संबंधातुन मोठा फायदा होणार आहे.

UAE Air Force to help 3 Rafale fighters reach India, 7 more in April
UAE Air Force to help 3 Rafale fighters reach India, 7 more in April

Desert Knight 2021 :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ex-Desert Knight 21: Rafale to roar over Jodhpur skies during Indo-French air exercise

Rajesh188's picture

22 Jan 2021 - 3:13 pm | Rajesh188

सुशांत सिंग विषयी काहीच व्हिडिओ पोस्ट करत नाही.
खून होती आत्महत्या ह्या विषयी latest काहीच माहिती तुम्ही देत नाही.
कसा मिळणार सुशांत ला न्याय.
राम कदम,कंगना,आणि बरेच जण सुशांत विषयी गप्प आहे.
सुशांत ला न्याय देण्याची लढाई बिहार निवडणूक झाली की संपली काय?
आणि सीबीआय नी काय दिवे लावलेत त्या केस मध्ये त्याची पण माहिती न्यायप्रिय अर्णव महाराज देत नाहीत.

मराठी_माणूस's picture

22 Jan 2021 - 3:18 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-response-letter-...

"नामांतर करायचेच...................."

औरंगाबाद च्या नाव बदलण्यासंबंधीचे तेथील नागरिकाचे मत

मदनबाण's picture

26 Jan 2021 - 9:26 pm | मदनबाण

ममता बॅनर्जी इतकी मूर्ख असेल असे मला वाटले नव्हते ! :))) [ ममता तिच्या राज्यात दंगली घडवुन येण्यास प्रोत्साहन देइल का ? ]

शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली दलाल आणि लाभार्थी यांनी जो हिंसाचार माजवला तो अतिशय निंदनिय आणि घृणास्पद दिसला. ट्रॅक्टर रॅलीची परवानगी दिली गेली तर त्या परवानगीचा उपयोग पोलिसांच्या अंगावरच ट्रॅक्टर घालण्यात केला गेला. हे शेतकरी आंदोलनाचे ढोंग आता सरकारने मोडुन काढायला हवे.
ज्या तिरंंग्याच्यासाठी आपले वीर सैनिक स्वतःचे बलिदान देतात त्या तिरंग्याचा आज अपमान देखील या ढोंगी आणि देशहित विरोधी आंदोलनाने केला, या आंदोलनला ज्या ढोंगी राजकारण्यांनी पाठिंबा दिला ते देखील यास तितकेच जवाबदार आहेत. :(
चीन सीमेवर मिसाइल सकट येउन बसला आहे, आपले लाखो सैनिक त्याच बॉर्डवर आपले रक्षण करण्यासाठी दिवसरात्र हाड गोठवणार्‍या थंडीत देखील आपले कर्तव्य निष्ठेने बजावत आहेत, त्यांचा तरी विचार आता लोकांनी करायला हवा... युद्धाचे सावट समोर असताने असली आंदोलने देशहिताची नसुन देशद्रोही आहेत.
६२ नंतर आता चीन परत सज्जतेने सीमेवर बसला आहे, काळ आणि वेळ सांगुन येत नसते हे करोनाने अधोरेखित केलेच आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- North Sikkim Clash: China तिलमिलाया है वो कुछ न कुछ करने का कोशिश करेगा, तैयार रहना चाहिए- GD Bakshi

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 4:26 pm | मुक्त विहारि

ती जनतेला मूर्ख बनवत आहे.

काही राजकारणी मंडळी अशीच असतात.

भारतात, राजा जयसिंगच्या पावला वर पाऊल टाकून चालणारी मंडळी, कमी नाहीत.

आणि अशा मंडळींना, साथ देणारी, त्यांचे गुणगान करणारी लाचार मंडळी, पण कमी नाहीत.

"[जगभरात] कोविड लस पुरवठा करण्यास भारत सज्ज" - पं. मोदी [twitter, 19Jan]
यासंदर्भात भारत सरकार कडून वॅक्सिन मैत्री या हॅशटॅग चा वापर करण्यात येतोय.

भारत या कार्यक्रमांतर्गत अनेक देशांना लस डोसेज पाठवत/पाठवणार आहे. जवळपास २ कोटी डोसेज भारत आपल्या शेजार्‍यांना पाठवण्याची योजना करत आहे आणि त्यानंतर जगभरात आणिक अनेक देशांना तसे पाठवेल.

२६ जाने. पर्यंतच्या माहितीनुसार भूतान [१.५० लक्ष], नेपाळ [१० लक्ष], बांगलादेश [२० लक्ष], मालदिव [१ लक्ष], म्यानमार [१५ लक्ष], सेशेल्स [०.५ लक्ष] यांना डोसेज पाठवलेले आहेत. हे सगळे डोसेज नि:शुल्क आहेत. यानंतर व्यापारी करार तत्त्वावर पुढचे डोसेज पाठवले जातील. लिंक

श्रीलंका आणि अफगाणिस्तानला देखील पाठवण्याची तयारी चालली आहे. हे डोसेज पाठवण्यासोबतच एक छोटा ट्रेनिंग प्रोग्रॅम देखील करवल्या जातोय ज्यात लस देण्यासंदर्भातील माहिती दिल्या जातेय. लिंक

या सगळ्यात आणिक महत्त्वाची बाब म्हणजे, चीन उत्पादित लस घेण्यासाठी प्रयत्न करणारे देशसुद्धा भारताकडे येत आहेत.

भारतातही २४ जाने. पर्यंत १६ लक्ष डोसेज देण्यात आलेले आहेत. लिंक

ब्राझिल आणि मोरोक्कोला व्यापारी तत्त्वावर लस पुरवठा करण्यात आलाय आणि पहिली शिपमेंट पोहोचलेली आहे. लिंक

आणि दोन मोठ्या लेकींची हत्या भयानक प्रकार आहे. आईवडील उच्चशिक्षित आहेत.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 11:44 am | मुक्त विहारि

कठीण आहे

कपिलमुनी's picture

29 Jan 2021 - 11:29 am | कपिलमुनी

पेट्रोल 94 ₹ झाले . भक्तांना ऑर्गझ्म आला असेल.
हे देशाच्या भल्यासाठी आहे हे पटवून सांगतील .
मग यांचे जुने ट्विट यांच्या तोंडावर मारले तर खरे-खोटे करणारे लोक्स गोल पोस्ट बदलून विषय भरकटत राहील याची काळजी घेतील

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 11:43 am | मुक्त विहारि

महाराष्ट्रातील, ह्या सरकारला, जनतेची इतकी काळजी आहे की, जसे वीज दर कमी करण्याचे आश्र्वासन दिले, तसेच, इंधनावरील कर माफीचे, आश्र्वासन पण देतील ....

जाताजाता, इतर काही राज्यात, महाराष्ट्रापेक्षा इंधन स्वस्त आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2021 - 11:46 am | श्रीगुरुजी

२०१३ मध्ये ८४ होते. त्या तुलनेत फारशी वाढ नाही.

सुबोध खरे's picture

29 Jan 2021 - 11:51 am | सुबोध खरे

भक्तांना ऑर्गझ्म आला असेल.

????

किती ती जळजळ?

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 12:19 pm | मुक्त विहारि

करोना संपला की, इंधनदर अजून वाढतील.

मागणी आणि पुरवठा, यांचे संतुलन, ओपेकच्या हातात आहे. ती राष्ट्रे त्यांचे नुकसान भरून काढणारच.

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 12:06 am | आग्या१९९०

जाने. २०१४ ला कच्च्या तेलाचा दर रु .६३०० प्रतिबॅरल होते आणि पेट्रोलचा दर रु. ८० प्रति लिटर होता.
आज कच्च्या तेलाचा दर रु. ३८०० प्रति बॅरल असताना पेट्रोलचा दर रु.९२ प्रति लिटर आहे. असे का बरं ?

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2021 - 8:42 am | श्रीगुरुजी

या विषयावर पूर्वी अनेकांनी लिहिले आहे.

पहिली गोष्ट म्हणजे इंधनावर केंद्राप्रमाणे राज्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कर लावून उत्पन्न मिळवितात.

इंधन, मद्य, विडी-सिगरेट इ. दुभत्या गायी असल्याने या गोष्टींंचा वस्तू व सेवा करांतर्गत समावेश करण्यास सर्व राज्यांनी विरोध केल्याने यावर किती कर लावायचा यावर कोणतीही मर्यादा नाही.

त्यामुळे हे दर कमी करण्यास कोणतेही राज्य व केंद्र तयार नाही.

अजून एक कारण म्हणजे अंदाजपत्रकातील वित्तीय तूट कमी करणे, कच्चे तेँल साठवण करण्यासाठी नवीन केंद्रे बांधणे, देशातील वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प, संरक्षण खात्यावरील खर्च इ. साठी केंद्राकडून कच्च्या तेलातून मिळालेला महसूल वापरला जातो. इंधन दर कमी केले तर यातून मिळणारा महसूल कमी होऊन या प्रकल्पांसाठी होणारा वित्तपुरवठा कमी होऊन प्रकल्प रेंगाळतील.

कापून खाण्या सारखे आहे

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 12:05 pm | आग्या१९९०

आयकर , वस्तू सेवाकर वसूलीत वृदधी झाली असं सरकार म्हणत असतं , मग केंद्र सरकारला पेट्रोलजन्य पदार्थांवर कर वाढवायचे कारण काय? आणि केंद्र सरकार हा पैसा खर्च करत असेल तर अर्थव्यवस्था गटांगळ्या का खात आहे? हे सरकार आल्यापासून सतत जिडीपी घसरत आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2021 - 1:23 pm | श्रीगुरुजी

अभ्यास व वाचन वाढवा, म्हणजे कारणे समजतील.

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 1:42 pm | आग्या१९९०

अच्छा! म्हणजे तुम्हाला ह्याचे उत्तर ठाऊक नाही किंवा तुमचा तेव्हडा अभ्यास नाही. असंच ना?

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 1:53 pm | मुक्त विहारि

एका तेलियाने

ही दोन पुस्तके वाचलीत, तर काही समजेल ....

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2021 - 2:29 pm | श्रीगुरुजी

माझा अभ्यास आहे व उत्तर सुद्धा माहिती आहे. परंतु निद्रेचे सोंग घेतलेल्यांना जागृत करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. स्वतः वाचन वाढवा व अभ्यास करा. आपोआप उत्तरे मिळतील.

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 3:03 pm | आग्या१९९०

नुसतं ' माझा अभ्यास आहे उत्तर सुद्धा माहीत आहे ' असं बोलून नाही चालत . कितपत अभ्यास आहे हे सांगितल्याशिवाय कसं कळणार? शाळेत उत्तर पत्रिकेत असेच लिहायचे का? किंवा शाळेतील मुलं तुम्हाला असंच उत्तर देतात का?

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2021 - 3:15 pm | श्रीगुरुजी

मी सर्व काही सांगेन, पण ते ऐकणाऱ्याला समजायला नको का? ऐकणारा अज्ञानी असेल तर सांगून कळणारच नाही.

तस्मात् अभ्यास व वाचन वाढवा. अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 3:17 pm | मुक्त विहारि

स्वतः माहिती गोळा केली तरच फायदा होतो

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 1:50 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

धर्मराजमुटके's picture

29 Jan 2021 - 7:03 pm | धर्मराजमुटके

मुंबई च्या लोकल ट्रेन पुन्हा चालू !
महाराष्ट्र सरकारने अखेरे ट्रेन चालू करुन दाखवल्या. सरकारने सर्वसामान्यांसाठीचे वेळापत्रक इतके अफलातून बनविले आहे की ज्याचे नाव ते !

सामान्यांना कोणत्या वेळेत परवानगी ?
१. पहिली लोकल (साधारण पहाटे ४.३० ते सकाळी ७ पर्यंत)
२. दुपारी १२ ते दुपारी ४
३. रात्री ९ ते रात्री शेवटच्या लोकलपर्यंत (म्हणजे साधारण मध्यरात्री १ पर्यंत).

वरील वेळेत कामावर कसे जाणार आणी घरी कसे येणार ? त्यापेक्षा सरकारने सरकारी कार्यालयातील व्यक्ती, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती यांना या वेळेत प्रवास करायला लावावा. हवे तर त्यासाठी एक हुच्चस्तरीय समिती नेमावी आणि पुढील फेब्रुवारी २०२२ पर्यंत अहवाल द्यावा. तोपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवावी. आणि हो त्या समितीत मला पण घ्या. माझ्याकडे पण अशा अफलातून कल्पना आहेत. अजून कोणाला काही कल्पना सुचत असतील तर इथे लिहा. आम्हाला श्रेय नको. सरकारने श्रेय घेतले तरी चालेल. मात्र कल्पना अफलातूनच हवी.

बाप्पू's picture

29 Jan 2021 - 7:09 pm | बाप्पू

वाह्ह... करून दाखवले.. !!!!

आईभवानी चा आशीर्वाद आणि साहेबांची पुण्याई.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 7:26 pm | मुक्त विहारि

हे सरकार आल्या पासून, मी नंदनवनात रहात आहे ...

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 7:13 pm | मुक्त विहारि

असे अगाध ज्ञान, ऐकल्यापासून, मी आजकाल, जास्त विचार करत नाही...

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात,"80% लोकांनी नाकारलेल्या पक्षाचा, मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रातील 20% जनता फक्त शहाणी आहे.त्यामुळे, 20% लोकांचाच विचार करून, निर्णय घेतल्या जातील."

असो,

आपल्याला काय? लहानपणी तीन पायांची शर्यत खेळायचो,आता प्रत्यक्षात बघत आहे.

आनंद घ्यायचा ....

राघव's picture

29 Jan 2021 - 11:44 pm | राघव

तुम्हा लोकांना ना मेलं कश्शाचं कौतुकच नाही.
ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेसच बंद करावं लागणार ना? मुंबईसारख्या ठिकाणी करोनासाठीची गर्दी टाळून लोकल चालू करून दाखवा पाहू!

या अफलातून कल्पनेत आणिक भर टाकण्याचा मोह आवरत नाही.
सकाळी चर्चगेट कडे जातांना आणि संध्याकाळी विरारकडे जातांना लोकल ला खूप गर्दी असते. त्यावेळेस त्या त्या बाजूची लोकलसेवा बंद ठेवायची. गर्दीत सुद्धा लोकल चालवून दाखवली सा शेरा स्वतःलाच देऊन पाठ थोपटून घेण्याची नामी संधी!

[काही खास लोकांसाठी - हा उपरोधिक प्रतिसाद आहे हे कृपया ध्यानात घ्यावे अशी णम्र विनंती]

वजा 7 वर भारताचा GDP आणून दाखवलच

Remdesivir disrupts COVID-19 virus better than other similar drugs: study

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jan 2021 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंदोलन पार्ट टू

आंदोलन मोडीत काढण्याचे सरकारचे सर्वोतपरी प्रयत्न सुरु असतांना काल, टीकैत यांच्या भाऊक आवाहानानंतर, सद्भाभावना रॅली, एक दिवसाचे आमरण उपोषण आणि शेतक-यांची रात्रीपासून गाझीपूर बॉर्डरवर उत्सफूर्त वाढती गर्दी पाहता आंदोलन पार्ट टू पुन्हा जोमाने, उत्साहाने सुरु. एकदा की हे आंदोलन मोडल्या गेले. सरकार कोणतेही आंदोलन मोडीत काढत राहील. व्यवस्थेशी अन्यायाबाबत लढाई चालू राहीली पाहिजे, ही महत्वाची घडामोड वाटते.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 9:51 am | मुक्त विहारि

खलिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, अशा घोषणा ज्या आंदोलनात होतात, ते आंदोलन योग्य आहे, असे मी तरी समजत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jan 2021 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 10:45 am | मुक्त विहारि

अशा घोषणा देणे, योग्य आहे का?

सरकार कोणतेही आंदोलन मोडीत काढत राहील. व्यवस्थेशी अन्यायाबाबत लढाई चालू राहीली पाहिजे, ही महत्वाची घडामोड वाटते.

चार टाळकी अन्याय अन्याय म्हणून बोंबलली म्हणजे अन्याय आहे अस नाही..
भर पावसाळ्यात चौकात उभे राहून 100 जण उन्हाळा उन्हाळा असे ओरडले म्हणून उन्हाळा होत नसतो.
शीख आणि दलाल यांचे सर्व व्हिडीओ पाहिलेत तर ह्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते समजून येईल. पण महत्वाच्या गोष्टीवर दुर्लक्ष करून आपला अजेंडा पुढं रेटायचा ही लिब्रान्दुची जुनी खोड.

बाकी लोकमत ने अशी बातमी छापून कालचा गोंधळ सोयीस्कर रित्या कसा दुर्लक्ष केला हे दिसतेच आहे. यालाच लिब्रान्दु ची तत्व म्हणतात. घडणाऱ्या गोष्टीचा रंग कोणताही असो दाखवताना आपल्याला नको असणारे रंग झाकून ठेवायचे.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 11:00 am | मुक्त विहारि

खोटी गोष्ट, परत परत रेटून सांगायची...

सुक्या's picture

30 Jan 2021 - 12:43 pm | सुक्या

जे बात.

हे असले चाळे खुप पाहिलेत. ह्या लोकांनी दिल्ली मधे जो गोंधळ घातला त्यावर अळी मिळी गुप चिळी. कुणी काही विचारले की "रजा घेतो" म्हणुन पलायण कारायचे. आणी लगेच बाहेर येउन गळे काढायचे सरकार च्या नावाने.

शिकलेला आणी सुशिक्षीत यात हाच फरक आहे.

अशा घोषणा सर्व आंदोलनकरत्यांनी एका सुरात दिल्या की 8 ते 10 लोक च अशा घोषणा देत होते.
मला जिथं पर्यंत माहिती आहे सर्व आंदोलन करत्यानी एकसुरात अशा घोषणा दिलेल्या नाहीत.
ज्या काही मोजक्याच लोकांनी दिल्या असतील त्यांच्या वर सरकार नी कारवाई करावी.
सरकार नी अशी कोणतीच कारवाई केली नाही ह्याचा अर्थ सरकार डाव पेच खेळत आहे.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 11:46 am | मुक्त विहारि

मानलं तुम्हाला ....

आपल्या सारख्या लोकांसाठी, राजीव गांधी, हे अतिशय योग्य नेते आहेत ...

पुलावामा प्रकरणात, राजीव गांधी, यांचे असेच मत होते की, भाजपने मुद्दाम हल्ला केला ....

आनंद आहे ....

त्यांना तेधून पुलगामा दिसत नाही.आणि मानव लोकात काय चालले आहे त्याच्या शी त्यांना काही देणे घेणे नाही

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 12:00 pm | मुक्त विहारि

त्यांची आणि तुमची, विचारसरणी जुळते, हा योगायोग ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jan 2021 - 11:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजचे पेट्रोल दर ९३.२८पैसे. डीजल ८२.४५ धन्यवाद. अच्छे दिन दुसरं काय.

यावर आज चांगलं फॉरवर्ड आलं.पुढील काही दिवसांत पेट्रोलची किंमत १00 / - वर जाईल. सर्व तयार रहा. एकदा का किंमत १०० / - पर्यंत पोहोचल्यावर ताबडतोब रस्त्यावर उतरा, आपले हेल्मेट काढा आणि आकाशाकडे पहा.

शतक ठोकल्यानंतर हे करण्याची प्रथा आहे. =))

-दिलीप बिरुटे

त्या गोष्टी समोर, ही इंधनवाढ काहीच नाही ...

शिर सलामत तो पगडी पचास

पाकिस्तान आणि चीनला, आर्थिक झळ सोसत असेल तर, इंधनदर कितीही होवो, चिंता नाही....

देश प्रथम.....

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 12:19 pm | आग्या१९९०

बदला घेतला? लाज वाटायला पाहीजे पुलवामा हल्ला झाला ह्याचे. नौटंकी करून आवेशात दम देऊन ना पाकिस्तान घाबरत ना चीन . आपले जवान हकनाक मरत आहे आणि हे म्हणत आहेत " ना कोई आया ना कोई गया " आपले जवान सीमेवर आत्महत्या करत आहेत असे म्हणायचे आहे का?

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 1:43 pm | मुक्त विहारि

100 न झालेले हल्ले असतात ....

आपले जवान हकनाक मरत आहेत कारण, हे शुक्लकाष्ठ, आपल्या मागे, जवाहरलाल नेहरू यांनीच, लाऊन ठेवले आहे....

मुंबई वर हल्ला झाला, तेंव्हा बदला नाही घेतला .... पण आता मात्र घेतला, ही वस्तुस्थिति आहे ....

लाज तर त्यांनाच वाटायला पाहिजे की, काॅग्रेसने इतक्या सगळ्या चुका करूनही, घराणेशाहीच्या उमेदवाराला मतदान करतात...

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 1:56 pm | आग्या१९९०

असे न झालेले हल्ले पूर्वीही होत. सीमेवर व आजूबाजूच्या दुर्गम परिसरात असे हल्ले भारतीय सेना पूर्वीपासून रोखत आहे. परंतू सैन्याच्या ताफ्यावर अन तेही हायवेवर असा हल्ला केला जातो ही लाजीरवरणी गोष्ट आहे.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 2:00 pm | मुक्त विहारि

मुंबई वर हल्ला झाला, तेंव्हा, बदला का नाही घेतला?

अर्थात, त्यावेळी, काॅग्रेसला लाज वाटली असावी ...

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 2:27 pm | आग्या१९९०

चीनने आपले २० सैनिक मारले तेव्हा बदला का नाही घेतला?

पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे शुक्लकाष्ठ यांनीच, आपल्या मागे लावले...

तिबेटला पाठिंबा, यांनीच दिला नाही...

चीनला दरवाज्या पर्यंत, यांनीच येऊ दिले...

देशाला सगळ्यात जास्त असुरक्षित, ह्यांनीच केले....

चुका करायच्या काॅग्रेसने आणि लाज मात्र, भारतीयांनी बाळगायची ...

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 2:01 pm | आग्या१९९०

लाल डोळे वटारायला काय लागतंय? तिकडे चीन आपल्या हद्दीत घुसून २० जवानांची हत्या करून निघून जाते. तरी ना आपण त्यांच्यावर हल्ला करत ना त्यांची घुसखोरी मान्य करत. डरपोक.

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2021 - 2:31 pm | श्रीगुरुजी

आपले अज्ञान वारंवार प्रदर्शित करू नका. वाचन व अभ्यास वाढविल्यास अज्ञानाचा अंधकार कमी होईल.

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 2:37 pm | आग्या१९९०

सरळ कबूल करा की , चीनची भ्या वाटते .

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2021 - 2:45 pm | श्रीगुरुजी
आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 2:51 pm | आग्या१९९०

मारुती कांबळेचे काय झाले?

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 2:58 pm | मुक्त विहारि

त्यांनीच, तुम्हाला विचारला पाहिजे....

बांगलादेश निर्माण केला हे भारताच्या फायद्याचे आहे की नुकसानीचे.
ह्या वर तुम्ही मत मांडावे.
पाकिस्तान ची निर्मिती झाली नसती आणि अखंड पाकिस्तान सह भारत निर्माण झाला असता तर आता भारताची अवस्था काय असती.
आणि त्या अखंड भारत देशावर सत्ता मुस्लिम नी गाजवली असती की हिंदू नी.
ह्या वर सुद्धा तुम्ही मत मांडावे अशी नम्र विनंती आहे.

भारत सरकार नी ऍप वर बंदी घालण्या पलीकडे काहीच कारवाई केली नाही भारताचे 20 सैनिक मेले तरी सरकार चुपचाप बसले आहे.
एअर strike नाही,की पाकिस्तान मध्ये केला तसा गुप्त हल्ला नाही.
एवढी घबराट का आहे मोदी सरकार ला.
चीन नी कॅन्सर साठी लागणाऱ्या औषदा चा कच्चा माल भारतातला देणे बंद केल्या मुळे कॅन्सर वरील एक महत्वाचे औषद भारतात उपलब्ध च नाही.
किती अवलंबून राहणारा चीन वर.

काही तरी वेळ हा लागणारच ...

साधं, 370 कलम हटवायला, किती वेळ लागला?

चीन नामक शत्रू, एका दशकांत पण, आटोक्यात येणार नाही ...

वाचनाची आवड असेल तर, चीन-जपान, युद्धाच्या बाबतीत, जरा वाचून बघा...

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2021 - 3:20 pm | श्रीगुरुजी

भारतीय सैन्याने चीनला २०१७ मध्ये डोकलाममधून मागे जाण्यास भाग पाडलं, गलवानमध्ये भारतीय सैनिकांनी २० सैनिकांच्या बदल्यात ४५-५० चिनी माकडांंना यमसदनाला पाठवलं, अगदी मागच्या आठवड्यात सिक्कीममध्ये चिन्यांना दणका दिला.

दुर्दैवाने अज्ञान्यांना हे समजणे अशक्य आहे.

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 3:34 pm | आग्या१९९०

४० - ५० चिनी माकडं आपल्या हद्दीत आली होती का ? नसतील आली तर का आणि कसं मारलं ? ना कोई आया ना कोई गया असं पंतप्रधान म्हणाले म्हणून विचारले .

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2021 - 5:01 pm | श्रीगुरुजी
रात्रीचे चांदणे's picture

30 Jan 2021 - 4:56 pm | रात्रीचे चांदणे

चीन आणि भारता मध्ये बऱ्याच ठिकाणी LAC आणि LOC ची भानगड आहे. Pangong Tso च्या शेजारील डोंगर रांगांनां फिंगर 1 ते 8 अशी नावे दिलेली आहेत. झालेली घटना ही फिंगर 4 आणि 5 च्या मध्ये घडली आहे. भारताचा ताबा हा फिंगर 4 पर्यंत आहे तर दावा फिंगर 8 पर्यंत आहे, भारताची शेवटची चौकी फिंगर 3 आणि 4 च्या मध्ये आहे तर चीन ची शेवटची चौकी फिंगर 8 ला आहे तर दावा फिंगर 2 पर्यंत आहे. म्हणजेच भारताचा ताबा फिंगर 4 पर्यंत आहे तर चीन चा ताबाही फिंगर 4 पर्यंतच आहे. फिंगर 3 ते फिंगर 8 दरम्यान कोणतीही चौकी नव्हती. परंतु चीन ने 1-4 मे दरम्यान फिंगर 5 जवळ एक चौकी उभी केली होती आणि भारताचा त्याच गोष्टीला विरोध आहे. कारण भारत आणि चीन दरम्यान सीमेवर status quo maintain करायचा असा करार आहे.
कंमांडर पातळीवरील चर्चेत चीन ने चौकी काढुन टाकण्याचे काबुल ही केलेले होते. परंतु भारताचा चीन वरती विश्वास नसल्यामुळे चौकी काढली का नाही हे बघण्यासाठी च आपले सैनिक तिथे गेले होते आणि त्याच वेळी भारतीय सैनिक आणि चिनी सैनिक यांच्यात झटापट होऊन आपले 20 सैनिक शाहिद झालें. चीन ने त्यांच्या मेलेल्या सैनिकांची संख्या सांगितली नाही. 30-40 चिनी सैनिक मेल्याचा अंदाज आहे. आणि त्याच मुळे चीन अजून ही मेलेल्या सैनिकांची संख्या जाहीर करत नाही. कारण एकदा का हे मान्य केले की चीन च्या आंतराष्ट्रीय image वरती हा आघात असेल. डोकलांम नंतर भारताने चीन ला दिलेला हा दुसरा तडाखा आहे.
झालेली घटना ही फिंगर 4 च्या पुढे घडली आहे म्हणजेच जो भूभाग आपल्या ताब्यात आहे त्याच्या पुढे घडली आहे म्हणजेच चीन ने आपल्या भूमीत घुसकोरी केलेली नाही परंतु चीन ने Status quo maintain केला नाही हा भारताचा आरोप आहे, कारण त्या भागावरती आपला दावा आहे.
शेखर गुप्तांच्या Cut the cutter मध्ये त्यांनी झालेला प्रकार अतिशय योग्य रित्या समजावून सांगितला आहे.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 7:10 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

मोठी घडामोड घडून पण सर्व शांत आहेत.

हो का? काय आहे अर्थसंकल्पात? म्हणजे चांगला आहे की नेहेमिसारखा वाइट?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2021 - 8:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घडामोडीचा धागा काथ्याकूट करून टाकल्यावर काय घडामोडी लिहिणार.

१) इंधनदरवाढ, सारखीच होत होती आता उपकराच्या नावाखाली महागाई आपल्या मानगूटीवर अधिकृत बसली आहे. सरकारला योजनांसाठी पैसा लागतो तेव्हा त्यांच्याकडे हा लूट करण्याचा सोपा उपाय आहे. पेट्रोलवर प्रति लिटर 4 रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर २ रु२५० पैसे इतका 'कृषी अधिभार' आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे वाहतुकीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढतील, त्याचा परिणाम म्हणून देशात महागाई पुन्हा वाढू शकेल.

२) प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये जे प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात होते. त्यामध्ये ७५ हजार कोटी रुपयांवरून ६५ हजार कोटी रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्राप्त होणाऱ्या रक्कमेवर किंवा काही शेतकऱ्यांना या तुटपुंज्या लाभापासून वंचित ठेवण्यावर याचा थेट परिणाम होणार आहे.

३)एम एस पी दिडपट दिली जाणार आहे, परंतु वस्तुस्थिती एम एस पी दीडपट केली जाणार नसून एम एस पी साठीची तरतूद दीड पट केली जाणार आहे, शब्दांचा खेळ लक्षात घ्यावा.

४) देश बिकने नही दूंगा ' असे म्हणायचे व सरकारच्या माध्यमातून तेवीस सार्वजनिक उपक्रमांची विक्री केली जात आहे, जसे काही दिवाळी धमाका सेल लागला आहे.

Tax मधे काहीही बदल नाहीत, त्यामुळे सध्याच्या महागाईच्या काळात महागाई वाढतच आहे, उद्योगजगताचा फायदा, बेरोजगारांच्या वाट्याला काही नाही.

ही महत्वाची घडामोड.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 10:05 am | मुक्त विहारि

सरकारच्या ह्या मदतीची गरज नसल्याने, मी ती मदत घेत नाही ..

नंबर 4 बाबत,

तोट्यात चालणारे किंवा पुढेमागे पांढरे हत्ती होणारे सरकारी उपक्रम बंद करणेच उत्तम...

शिवाय, हे सरकारी उपक्रम बंद करणे, सगळेच सरकार करत आहे ... अगदी, मनमोहन सिंग, यांच्या काळात पण केले आहेत ... मी तेंव्हा पण, तोट्यात चालणारे सरकारी उपक्रम बंद करणेच उत्तम, असे म्हणत होतो आणि आत्ता पण हेच म्हणत आहे ...

१. मजेदार गोष्ट आहे की नाही? म्हणजे खोटं बोल पण रेटुन बोल. गम्मत अशी आहे की 'कृषी अधिभार' आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्यावरचा बेसिक एक्साइज टॅक्स आणी स्पेशल एक्साइज टॅक्स अशे अ‍ॅड्जेस्ट केले आहेत की पेट्रोल व डिझेलवर च्या किमती वाढणार नाहीत. हे सांगायला विसरले की काय?

२. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ फक्त गरजु शेतकर्‍यांना असावा. तो फक्त २ हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांनाच मिळेल. ट्रअ‍ॅक्टर / मर्सिडीज वाले नाही.

३.माझा यावर जास्त अभ्यास नाही .. तस्मात पास . . .

४. पांढरे हत्ती / तोट्यात चालनारे उद्योग विकलेलेच बरे ...

बाकी ते ३५००० करोड कोविड लसिकरण करण्यासाठि दिले ... ते कुठेतरी वापरले गेले असते .. महामारी नसती तर.

बाकी चालु द्या. रौत दिल्ली ला शेतकरी लोकांना भेटनार आहे म्हणे. ते एकरी २५००० रु नुकसान भरपाइ चे काय झाले? सातबारा कोरा झाला का?

बाप्पू's picture

2 Feb 2021 - 3:02 pm | बाप्पू

@ सुक्या..
मस्त प्रतिसाद.
व्यवस्थित खोपच्यात घेतलेत स्वतः खोटे बोलून दुसऱ्यांना फेकूचंद म्हणणाऱ्यांना.
पण जित्याची खोड आहे.. मेल्याशिवाय जाणार नाही... लिब्रान्दु मारतील पण आपला हेका सोडणार नाहीत.
असो.

यावेळी कोविड च्या संकटामुळे मुळे आणि लोकडाऊन मुळे सरकारकडे पैसा नसल्याने यावेळचा अर्थसंकल्प काही विशेष नसणार आहे हे गल्लीतले शेंबड पोरग सुद्धा सांगू शकले असते. त्यामानाने निर्मला सीतारामन यांनी चांगला अर्थसंकल्प मांडला.
काही लोकं अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच त्याचा निषेध नोंदवत होते.. हे पाहून आश्चर्य वाटले.. आणि त्यांच्या बुद्धीची कीव वाटली..

अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक शीख आणि दलाल सरकारसोबत चर्चेला जाताना आमचे मुद्दे सरकार मान्यच करणार नाहीये असे बोंबलत चर्चा करायला जात असतो.
अरे दलाला.. जर एवढाच कॉन्फिडन्स आहे सरकारवर तर जातोसच कशाला चर्चेला??
फुकटची पब्लिसिटी हाणायला?? फक्त विरोधासाठी विरोध करणार्यांना काय म्हणावं.???

आंदोलन आणि विरोध करणाऱ्यांची अक्कल पहिली कि राहून राहून हा सीन आठवतो.

https://youtu.be/8g84-uqPYVw

हे देखील पहा.. ( जुना आहे पण आंदोलकांचे खरे रूप हेच आहे. )

https://youtu.be/9Ts4whaVOfw

सुक्या's picture

2 Feb 2021 - 11:29 pm | सुक्या

लिब्बु लोक याच कारणामुळे डोक्यात जातात.

काहीही झाले तरी गळे काढणे हेच एक काम असते ... गोचि झालि की सुंबडीत गायब ....
मग हळुच उगवनार ... परत गळा काढायला..

आग्या१९९०'s picture

2 Feb 2021 - 3:52 pm | आग्या१९९०

कृषी अधिभार' आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्यावरचा बेसिक एक्साइज टॅक्स आणी स्पेशल एक्साइज टॅक्स अशे अ‍ॅड्जेस्ट केले आहेत की पेट्रोल व डिझेलवर च्या किमती वाढणार नाहीत

बरोबर आहे. गुदगुल्या करणारे बजेट . गेल्या सहा वर्षात पहिल्यांदा बजेट नंतर एक दिवसात शेअर मार्केट मधून भरपूर फायदा झाला. आता माझ्या बँकेत सरकारने पैसे टाकणे बंद करावे , भले मी अल्पभूधारक असलो तरी.

सुक्या's picture

2 Feb 2021 - 11:32 pm | सुक्या

अगदी .. खरे .

जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल .. आणी तुम्ही शेतीवर अवलंबुन नसाल तर ह्या स्कीम मधे लाभार्थी न होणे हेच संयुक्तीक आहे.
सरकार ला तशी माहीती देउन मदत करु शकता.

त्यामुळे कदाचित खर्‍या गरजु ला मदत मिळेल. काय म्हणता?

आग्या१९९०'s picture

3 Feb 2021 - 12:34 am | आग्या१९९०

शेती व्यवसायातून झालेला फायदा शेअर्समध्ये लाँगटर्म गुंतवणुक करतो. दोन्हीही बेभरोशाचे असले तरी सरकारकडून अप्रत्यक्षपणे आर्थिक लाभ झाल्यामुळे अल्पभुधारक म्हणून पैसे घेणे बंद करणार.

शाम भागवत's picture

3 Feb 2021 - 1:40 am | शाम भागवत

_/\_

राघव's picture

3 Feb 2021 - 12:05 pm | राघव

_/\_

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 7:33 am | मुक्त विहारि

मी तसेच करत आहे ...

सध्या मीपण, अल्प भुधारक शेतकरी आहे ... पण, माझ्या पेक्षा, इतर शेतकरी बांधवांना, जास्त गरज असू शकते, म्हणूनच मी ह्या योजनेचा लाभ घेत नाही ....

राघव's picture

3 Feb 2021 - 12:05 pm | राघव

_/\_

शाम भागवत's picture

3 Feb 2021 - 3:33 pm | शाम भागवत

_/\_

उद्योग चालवणे हे सरकार चे काम नाही हा बकवास युक्तिवाद करून फायद्यात चालणाऱ्या कंपन्या विकायला काढल्या आहेत.
सरकार चा हेतू साफ असेल तर जागतिक निविदा मागवून जे जास्त किमंत देतील त्यांना विकाव्यात.जागतिक सर्व देश सहभागी पाहिजेत.
फक्त गौतम,आणि मुकेश नाही.
आणि त्या मध्ये परदर्क्षता असावी जनतेला सर्व निविदा बघता आल्या पाहिजेत.
गुपचूप व्यवहार केला की सरकार नी कमिशन साठी कंपन्या विकल्या असाच अर्थ काढावा लागेल.
लोक मग अशा सरकार ला दलाल सरकार हिच उपमा देईल.

तुमचा विचार बरोबर आहे. प्रत्येकाच्या कृतीवरूनच त्याच्याबद्दल मत बनवले पाहिजे. हेतू लक्षात घेण्याची गरज असतेच असे नाही. ते सोईस्करपणे टाळता येते.
सरकार काय किंवा तुम्हा-आम्हा सारखे लोकं काय, शेवटी माणसेच ना? जे नियम सरकारला लागू होतात ते आपल्यालाही लागू होतातच.

लोकं आपल्याला काय म्हणतील याचा विचार न करता तुम्ही प्रतिक्रीया देत असता ना? आपल्या प्रतिक्रीयांची जबाबदारी आपण घेता [असे आपल्याला वाटते] ना?
तद्वतच लोकं आपल्याला काय म्हणतील याचा विचार न करता सरकारने काम केले पाहिजे. जबाबदारीही घेतली पाहिजे. काय म्हणता?

बाकी,
सरकार सक्षमपणे काम करतेय किंवा नाही, हे निवडणूकीतून बरोबर दिसतं. फक्त लोकांना ते पटवून देणे विरोधी पक्षांचे काम. कितीही झाले तरी सरकारक्डून ती अपेक्षा ठेवणे चूक आहे!! :-)

सक्षम पर्याय असण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची असते. राजकारणात सत्ताधारी पक्ष आपल्याच विरोधात कुणाला उभे राहू देईल, ही अपेक्षाही चुकीची नाही काय? =))

झालेय काय की, [बेलाशक अन् बेमुर्वतपणे] विरोधाला विरोध करून सर्व विरोधी पक्षांनी स्वतःचीच पार ठासून घेतलेली आहे. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून एक धड मुद्दाही त्यांना मांडता येत नाही ज्याला लोकाश्रय मिळेल. म्हणून मग दुसर्‍यांच्या आंदोलनातून श्रेय लाटण्यासाठी त्यांची मरमर चालते. त्यांचा कंठशोष ऐकतोय कोण?
जोवर विरोधी पक्ष म्हणून ते नीट काम करत नाहीत, तोवर तरी सरकारला काहीही धोका नाही!

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2021 - 7:42 am | श्रीगुरुजी

+ १

अगदी समर्पक शब्दात मांडलंय.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 7:59 am | मुक्त विहारि

सरकारने, तुम्हाला आधी फोन करून, अमकी तमकी सरकारी कंपनी विकायला काढली आहे आणि तिची किंमत, अमूक आहे, तर तुम्ही विकत घेतली असती का?

आपण स्वतः विकत घेऊ शकत नाही, हे खरे दुःख आहे ...

चंद्रसूर्यकुमार's picture

2 Feb 2021 - 4:23 pm | चंद्रसूर्यकुमार

उद्योग चालवणे हे सरकार चे काम नाही हा बकवास युक्तिवाद करून फायद्यात चालणाऱ्या कंपन्या विकायला काढल्या आहेत.

बकवास युक्तीवाद कोणत्या आधारावर? तुम्हाला चारचौघात मिरवायला हिंदुस्तान मशीन टूल कंपनीचे एच.एम.टी घड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा ईसी टीव्ही यात समाधान वाटायचे तर वाटू दे पण इतरांना तसे वाटायलाच पाहिजे असे अजिबात नाही. तस्मात तुमचा बकवास युक्तीवाद तुमच्याकडेच ठेवा. उद्योग चालवणे हे सरकारचे काम नाहीच.

सरकार चा हेतू साफ असेल तर जागतिक निविदा मागवून जे जास्त किमंत देतील त्यांना विकाव्यात.

तुम्हाला डिस-इन्व्हेस्टमेन्ट नक्की कशी चालते याची थोडीसुध्दा कल्पना नाही हेच या प्रतिसादातून दिसून येते. निविदा? डिस-इन्व्हेस्टमेन्ट म्हणजे काय गटारे साफ करायचे कंत्राट आहे का ते? आणि जागतिक? म्हणजे परत सरकारने देश परकीयांना विकायला काढला ही हाकाटी करायला तुमच्यासारखे लोक मोकळे. बाकी आतापर्यंत शेकडो सरकारी कंपन्यात डिस-इन्व्हेस्टमेन्ट झाले आहे- एस.बी.आय सारख्या सरकारी बँकांपासून एन.टी.पी.सी, ओ.एन.जी.सी, कोल इंडीया वगैरे कंपन्यांपर्यंत. ते सगळे शेअर्स गौतम आणि मुकेशनेच विकत घेतले असतील नाही का? उगीच काहीतरी बोलत सुटायचे.

लोक मग अशा सरकार ला दलाल सरकार हिच उपमा देईल.

बॉर. तुम्ही सरकारला मत देऊ नका आणि आमच्यासारखे दलालसमर्थक सरकारला मत देऊ. एनी प्रॉब्लेम? म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तरी त्याची कवडीइतकी पर्वा करायची गरज नसली तरी एक लिहायची पध्दत म्हणून ते लिहित आहे :)

Rajesh188's picture

2 Feb 2021 - 4:59 pm | Rajesh188

म्हणजे आपला हिस्सा विकणे ,म्हणजेच शेअर विकणे हे 5 वी नापास विद्यार्थी पण सांगेल.
तो शेअर विकताना काय गमती जमती पडद्या आडून होतात हे अर्थशास्त्र कोळून पिलेल्या व्यक्ती ला पण माहीत पडतील हे सांगता येत नाही.
कृत्रिम पने शेअर वाढवायचे कृत्रिम पने शेअर पाडायचे हा खेळ खेळणारे भिडू पक्के खेळाडू
असतात.
किंमत कमी असताना च शेअर विकायचे त्या मध्ये लाडक्या नाच विकायचे असतील तर बाकी नावडत्या ना कसे बाद ठरवयचे .
लय गमती असतात.

भंकस बाबा's picture

2 Feb 2021 - 8:38 pm | भंकस बाबा

ज्या विषयात आपल्याला गती नाही अशा जागी आपले तोंड फोडून घेऊ नये. निर्गुतवणूक हा प्रकार काँग्रेसने पहिल्यांदा आणला. त्यांचे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्री समर्थन करत होते. बीएसएनएलची गोची होत आहे हे जागतिक विचारवंत अंबानी आणि बिरलाची सेवा घेऊन बोंबलत आहेत यातच काय ते ठरवा!
बाकी मी बीएसएनएल वापरले होते काही काळ कर्जतला! लई भिक्कार सेवा

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 8:46 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

भंकस बाबा's picture

2 Feb 2021 - 8:51 pm | भंकस बाबा

तुम्हाला बरीच माहिती आहे मार्केटची!
मग तुम्हीच का नाही गुंतवणूक करत अशा समभागामध्ये?
बघा एके काळी 100 रुपयांवर असलेल्या एमटीएनेल आता 15/20 रुपयात मिळतो आहे , घेऊन टाका , मग सरकारला ठेंगा दाखवा

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 9:23 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

इरसाल's picture

3 Feb 2021 - 2:09 pm | इरसाल

केंद्रसरकारच्या सद्य परिस्थितीत विद्यमान अशा सगळ्या सल्लागारांवर "सर्वोच्च सल्लागार" म्हणुन मा. राजेश१८८ (अक्षरी एकशे अठ्ठ्यांशी) यांची शिफारीस मी पंतप्रधान कार्यालयात* केली आहे. कृपया नोंद घ्यावी.

*व्हाया माझा मोठ्ठा वशिला...........डायरेक्ट कनेक्शन.

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 4:45 pm | मुक्त विहारि

छान