मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?

अनिल चव्हाण रामपुरीकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आज सगळ जग डेवलप होतय , इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय , अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय | तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय , रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय, दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप || असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ? मोठाले याप‍री ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात, देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात | पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार न ‌फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, || त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास , अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास | आज तोच झाला खाक अन् त्याची स्वप्न झाली राख, आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक || पाणी नव्हत त्याच्या आडात तरी शेती केली जोमात, शेवटी अवकाळी आला अन् तोंडातला घास घेउन गेला, हाच तो सुखाचा घास नाही आज त्याच्या पोराच्या पोटात | त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप, असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप || टिप : ही कविता मा.बो. वर आधिच प्रकशित आहे , अनिथ या माझ्याच आय डी ने. धन्यवाद.

वाचन 30345 प्रतिक्रिया 0