संघी टेरर व फेल्युअर ऑफ जस्टिस !!
आता एक दोन दिवसात संघी टेरर व फेल्युअर ऑफ जस्टिस !! ह्या विषयावर वेगवेगळे वक्ते बोलत असलेले व्हिडियो अन्हद ईंडीया तर्फे यु ट्युब टाकण्यात येत आहेत. हिंदु समाजाला बिथरवण्यासाठीच काही खास लोक, मिडीया असे प्रकार करत आहेत.
गेले हजारो वर्षे हिंदु समाज सहनशील होता पण आता तो सहनशील राहीलेला नसुन , आतंकवादी झालेला आहे अस ठासुन सांगण्यात ह्या लोकांना काय फायदा आहे हे समजणे अत्यावश्यक आहे.
ह्या व्हिडियोमध्ये बोलणार्या वक्त्यांना वरच्या विषयावर बोलण्यासाठी एकत्र केलेल आहे. हे लोक वेगवेगळ्या बॅक्ग्राऊंडचे असुन बरेच हिंदु लोक त्यात आहेत. ह्या व्याख्यानाचा श्रोता वर्ग खुपच छोटा असुनही ह्या व्याख्यानाला खुप मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत
असे दाखवण्याचा प्रयत्न आहे. ह्या बोलणार्यात एक आहे निरंजन टकले. हा आता "द वायर " साठी लिहीतो . काही लोक द प्रिंट साठी लिहीतात.
प्रत्येक समाजात अत्याचारा विरुद्ध आवाज उठवणारे लोक असणारच , मग त्याला हिंदु समाज अपवाद कसा ठरु शकेल ? अश्या आवाज उठवणार्या लोकांना पोलिस , सरकार मदत देत नसेल तर त्यांना कायदा हातात घेण्याशिवाय काय पर्याय असेल ?
समझौता एक्सप्रेस बाँब स्फोट, मालेगाव बाँब स्फोट सारख्या दोन उदाहरणा वरून सर्व हिंदु समाजाला अतिरेकी ठरवण्याचा कट २००७ -०७ सालीच काँग्रेसने रचलेला होता. त्यात दिग्विजय सीग, सुशिल कुमार शींदे , शिवराज पाटील, व ईतर श्रेष्ठ काँग्रेस नेते शामिल होते. ह्या सर्वांमागे पि चिदंबरमचा हात होता हे आता स्पष्ट होत आहे.
समझौता एक्सप्रेस बाँब स्फोटावर अनेक खुलासे उपलब्ध झालेले आहेत. त्यात महत्वाचा म्हणजे ह्या बाँब स्फोटात संदिग्ध असलेल्या एका पाकिस्तानी अतिरेक्याला पंजाब पोलिसांनी पकडले होते पण न्यायालयीन कोठडीत टाकण्या पुर्वी १५ दिवसा अगोदरच त्याला सोडुन दिले. त्याचे सर्व पुरावे नष्ट करण्यात आले.
http://rajatsharma.in/truth-about-samjhauta-express-blast-must-come-out/
मालेगाव स्फोट
Interview of Malegaon blast accused Ramesh Upadhyay मालेगाव स्फोट
https://www.youtube.com/watch?v=A7_2NDe32AM
हेमंत करकरे ह्यांनी कर्नल पुरोहीत ह्यांना मरण यातना दिलेल्या होत्या.
How Hemant Karkare tortured Lt. Col. Purohit
https://www.youtube.com/watch?v=TMmUa5twaUE
तेंव्हाच्या काँग्रेस सरकारच्या आदेशावर ( ह्यात नेत्यांची नावे वर दिलेली आहेतच) तेंव्हा हिंदु समाजाला अतिरेकी ठरवायचा प्रयत्न केला गेला. तो प्रयत्न आता सर्व स्तरावर न्यायालयात फेल गेला. सर्व हिंदु लोक ज्यांच्यावर खटले केले गेले होते ते सर्व लोक निर्दोष सिद्ध झाले.
हिंदु समाजाला आता कोर्टा कडुन न्याय मिळालेला असला तरीही अन्याय करणारे मोकळेच फिरत आहेत.
पण आता परत ह्या हिंदु आतंकवादाला चालना देण्याच काम करण्यात येत आहे ते कोण करत आहे त्या मागे त्यांचे काय ईरादे आहेत हे कळणे महत्वाचे आहे.
ज्यु समाजाच उदाहरण ईथे देता येईल. हिंदु प्रमाणेच गेल्या २००० वर्षांत लाखो ज्युंची हत्या करण्यात आलेली आहे. ( होय लाखो हिंदुंची हत्या करण्यात आलेली आहे ) ह्या ज्युंचा दोष फक्त ते ज्यु होते हा ईतकाच होता.
हिटलरच्या जर्मनीतच नव्हे तर पोलंड, रशीया मध्येही ह्या दरम्यान ज्युंची हत्या करण्यात आली . अत्यंत अमानुषपणे वेगवेग़ळ्या पद्धतीने ज्युंना मारण्यात आले. लाखो ज्युंना मारणारे नाझी फक्त काही शेकडोच होते. एका ही ज्युने ह्या मास किलींग विरुद्ध प्रयत्न सुद्धा केला नाही आपला हात उचलला नाही. त्या नंतर स्वातंत्र्य मिळवलेल्या ईझराईल मधल्या ज्युंना ह्या एका गोष्टीचे खुप दु:ख आहे.
त्यामुळे ज्यु समाजावर केलेल्या अत्याचाराचा सुड त्यांनी वेळोवेळी उगवलेला आहे. एक समाज म्हणुन हा त्यांचा प्रतिकार होता.
हिंदु समाजाला तोडण्याचा प्रयत्न करणार्यांचा प्रयत्न हाणुन पाडला पाहीजे पण त्यापुर्वी आपले शत्रु कोण आहेत त्यांना कोण मदत करत आहे त्यांची मनिषा काय आहे त्यांना काय साध्य करायच आहे हे समजावुन घेणे महत्वाचे आहे.
ऑगस्ता वेस्टलँड केस ची एफ आय आर आता कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे. ह्या एफ आय आर मध्ये तिन पत्रकारांचे नाव आलेले आहे .
१. शेखर गुप्ता ( द प्रिंट )
२. राजु संथानम
३. मनु पब्बी
हल्ली द प्रिंट, द वाय , न्युज लाँड्री सारखे ईंटरनेट वरच्या मिडीया मोदीजी विरुद्ध प्रचार का करत आहेत ह्याच उत्तर तुम्हाला मिळालेल असेल.
https://www.youtube.com/watch?v=9O9oVX_iwMQ&t=581s
वर्गीकरण
वाचन
21165
प्रतिक्रिया
0